Category: होम

भांडुप परिमंडलात पाच महिन्यात ८५३ वीज चोरट्यांना महावितरणचा दणका

५ कोटी ८५ लाखांची वीजचोरी उघड   भांडुप : महावितरणच्या भांडुप परिमंडलात अधिक हानी असलेल्या वीजवाहिन्यांवर गेल्या पाच महिन्यांमध्ये व्यापक शोध मोहीम राबवून तब्बल ८५३ वीज चोरट्यांना कारवाईचा दणका देण्यात आला. त्यांच्याकडील ५ कोटी ८५ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात महावितरणच्या पथकाला यश आले आहे. अधिक हानी असलेल्या ६० वीजवाहिन्यांवरील सदोष मीटर बदलणे, नवीन वीजजोडणी, कमकुवत वीजतारा बदलणे आदीं विविध उपाययोजनांमुळे महसुलात ४० लाख १४ हजार ५४१ युनिट विजेची भर पडली आहे. ऑगस्ट ते डिसेंबर २०२४ दरम्यान आखण्यात आलेल्या उपाययोजनांमध्ये ठाणे मंडल कार्यालयांतर्गत २५८ वीज चोरट्यांविरुद्ध कारवाई करून १ कोटी ७९ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात आली. वाशी मंडल कार्यालयातील ४०२ जणांकडे ३ कोटी ४७ लाख रुपयांची वीजचोरी सापडली. तर पेण मंडल कार्यालयातंर्गत १९३ जणांकडे ५९ लाख रुपयांची वीजचोरी आढळली. तर अधिक वीज हानी असलेल्या ६० वाहिन्यांवरील ४ हजार ६५२ सदोष वीजमीटर बदलण्यात आले. ४ हजार ३४५ जणांनी नवीन वीजजोडणी देण्यात आली. कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या १२४ ग्राहकांना पुनर्रजोडणी देण्यात आली. १३.४ किलोमीटर कमकुवत वीजतारा बदलण्यात आल्या व जवळपास १० किलोमीटर एरिएल बंच (इन्सुलेशन असलेली वाहिनी) बसवण्यात आली. परिणामी ठाणे मंडलात १० लाख २७ हजार ६७ युनिट, वाशी मंडलात सर्वाधिक २१ लाख ७९ हजार ४६१ आणि पेण मंडलात ८ लाख ८ हजार १३ युनिट विजेची वाढ नोंदवण्यात आली आहे. मुख्य अभियंता सुनिल काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी मंडलाचे अधीक्षक अभियंता संजय पाटील, ठाणे मंडलाचे अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम आणि पेण मंडलाचे अधीक्षक अभियंता राजाराम माने यांच्या नेतृत्वाखाली अभियंते, अधिकारी, जनमित्रांच्या चमुने ही कामगिरी केली. 00000

ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या `ज्ञानानंद’ शाळेतल्या विद्यार्थ्यांनी घेतली विशेष मुलांची भेट

ठाणे : विशेष मुलांना सामान्यांच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध संस्था, शाळा प्रयत्न करीत आहेत. या मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम देखील राबवले जात आहे. याचबरोबर सामान्य मुलांबरोबर या मुलांचा…

 अप्पा शिंदे अमृतपर्व नागरी सत्कार नियोजन समिती कार्यालयाचे उद्घाटन

29 जानेवारी रोजी अप्पा शिंदे यांचा कल्याणकरांच्या वतीने नागरी सत्कार   कल्याण : 29 जानेवारी रोजी ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांचा अमृतमहोत्सवी म्हणजेच 75 वा वाढदिवस असून तो कल्याण पूर्वेतील पोटे मैदानात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात दिगग्ज नेत्यांच्या उपस्थित साजरा होणार आहे. याकरिता कल्याण पूर्वेतील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची नियोजन समिती तयार करण्यात आली आहे. आप्पासाहेब अमृतपर्व नागरी सत्कार नियोजन समिती असे या समितीचे नाव असून या समितीच्या कार्यालयाचा उदघाटन सोहळा मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी रोड परिसरात पार पडला. यावेळी माजी महापौर रमेश जाधव, माजी नगरसेवक सचिन पोटे, नीलेश शिंदे, प्रशांत काळे, हर्षवर्धन पालांडे, संजय मोरे, माधुरी काळे, नरेंद्र सूर्यवंशी, अर्जुन नायर, सुभाष म्हस्के, विष्णु जाधव, संदीप तांबे, संदीप माने, उमाकांत चौधरी, रुपेश गायकवाड, विजय भोसले, मनोज नायर आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. २९ जानेवारी रोजी संपूर्ण कल्याण करांच्या माध्यमातुन अप्पा शिंदे यांचा अमृतपर्व नागरी सत्कार केला जाणार आहे. याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व काही मंत्री मंडळींसह आणखीन काही दिगग्ज नेत्यांची देखील उपस्थित लाभणार आहे. या संपूर्ण सोहळ्याकरिता समिती नेमण्यात आली असून कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे या समितीचे अध्यक्ष तर कल्याण पूर्व आमदार सुलभा गायकवाड या स्वागत अध्यक्षा असणार आहेत. तसेच या समितीत निलेश शिंदे, प्रशांत काळे, सचिन पोटे, नाना सूर्यवंशी, रमेश जाधव, हर्षवर्धन पालांडे, संजय मोरे यांसह कल्याण पूर्वेतील अनेक सर्वपक्षीय नेत्यांचे योगदान असणार आहे. यात प्रामुख्याने 21 पदाधिकाऱ्यांची मुख्य नियोजन समिती असून १०१ पदाधिकारी संयोजन समितीवर असणार आहेत. त्यामुळे पार पडत असणाऱ्या या भव्य दिव्य नागरी सत्कार सोहळ्याला कल्याण पूर्वेतील तमाम जनतेने उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी समितीच्या वतीने प्रशांत काळे यांनी नागरिकांना  केले आहे. 00000

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी आनंद परांजपे – सुनील तटकरे

अनिल ठाणेकर ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्तेपदी माजी खासदार आनंद परांजपे यांची नियुक्ती करण्यात येत आहे, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी केली. मुख्य प्रवक्ते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका व विचार हे माजी खासदार आनंद परांजपे हे मांडतील, भाष्य करतील. घटक पक्षांविषयीची भूमिका, इतर राजकीय भूमिका यांवर पक्षाचे इतर सर्व प्रवक्ते, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांच्याशी चर्चा करुनच पक्षाची भूमिका मांडतील. तर आनंद परांजपे हे, सखोल अभ्यास व माहिती घेऊनच, पक्षाची धेय्य धोरणे व भूमिका, प्रसार माध्यमांसमोर मांडतील, वक्तव्य करताना आपल्या पक्षाबद्दल गैरसमज व वाद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असा सल्लाही मुख्य प्रवक्ते म्हणून आनंद परांजपे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करताना प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिला आहे.

कोपरखैरणे व ऐरोली विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नवी मुंबई : महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे त्या अनधिकृत बांधकामांविरोधात नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल…

नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील –

ठाणे : घोडबंदर रोडवरील नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. या ठिकाणची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने अवजड…

२७ जानेवारीपर्यंत ऑनलाइन आरटीई’ प्रवेश – रोहन घुगे

अनिल ठाणेकर ठाणे : आरटीई’ अंतर्गत २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेत १४ जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आले आहे. बालकांच्या पालकांना २७ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार असून पालकांनी प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या जास्तीत जास्त बालकांच्या अर्जाची नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार(आरटीई) कायद्या अंतर्गत वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिले जातात. ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व महानगर पालिका अंतर्गत एकूण ६२७ पात्र शाळा असून एकूण ११ हजार ३२० रिक्त जागा उपलब्ध आहेत. ‘आरटीई’ अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून  https://student.maharashtra.gov.in/adm_Portal या वेबसाईटवर दि. १४ जानेवारीपासून ते २७ जानेवारीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पालकांसाठी मदत केंद्रांची यादी (Help Centers), ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणी बाबत मार्गदर्शक पुस्तिका (User Manual), आवश्यक कागदपत्रे इत्यादी बाबत सर्व माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याची सर्व संबधितांनी नोंद घ्यावी, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी दिली आहे. ०००००

खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार –  प्रताप सरनाईक

ठाणे : ओला , उबेर, रॅपिडो सारख्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या पुरवठादारांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. प्रवासी सुरक्षा, कार पुलींग, लायसन्स, ट्रॅफिक समस्या यासंदर्भातील…

अटलजींच्या द्रष्टेपणामुळेच भारतात आर्थिक ई क्रांती – सारंग दर्शने

अनिल ठाणेकर ठाणे : भारताचे पंतप्रधानपद तीन वेळा भुषविणाऱ्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये आर्थिक आघाडीवर मोठे काम केले, किंबहुना अटलजींच्या द्रष्टेपणामुळेच भारतात कम्युनिकेशनची आर्थिक ई क्रांती झाली. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध पत्रकार आणि लेखक सारंग दर्शने यांनी केले. ठाण्याच्या सरस्वती क्रीडा संकुल पटांगणात आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातुन सुरू असलेल्या ३९ व्या कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत सारंग दर्शने यांनी सोमवारी (ता.१३ जाने.) रोजी ‘अटलजींचा वसा आणि वारसा’ हे सहावे पुष्प गुंफले. यावेळी व्यासपीठावर या सत्राचे अध्यक्ष शरद गांगल, अध्यक्ष ठाणे जनता सहकारी बँक, सुहास जावडेकर उपस्थित होते. लेखक दर्शने यांनी, अटलजींच्या चरित्राचे पैलु उलगडताना संघाचे प्रचारक, जनसंघ ते पंतप्रधान पदापर्यतचा प्रवास श्रोत्यांसमोर मांडला. १९५० चे दशक ते १९७७ पर्यतचा काळ बिकट होता. समाजात उद्योजकतेला स्थान मिळत नव्हते. जागतीक अर्थव्यवस्थाही दोलायमान स्थितीत होती. जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बनलेल्या अटलजींनी त्याही वातावरणात देशाची प्रतिमा उंचावण्याचे कार्य केले. १९८५ – ८६ नंतर भारतीय जनता पक्षामध्ये गांधीवादी समाजवाद मागे पडत गेल्याचे सांगुन दर्शने यांनी, अटलजींच्या प्रतिभाशाली राजकिय कारकिर्दीवर प्रकाश टाकला. १९९६, १९९८ आणि १९९९ असे तीन वेळा अटलजींनी पंतप्रधान पद भुषविले. त्यांच्या कारकिर्दीमध्येच भारताने आर्थिक आघाडीवर मोठे काम केले. कम्युनिकेशनचे खाते स्वतःकडे घेत अटलजींनी कम्युनिकेशनचे ब्रिटीशकालीन कायदे बदलुन दुरसंचार धोरणात आमुलाग्र बदल केले. अटलजींच्या या द्रष्टेपणामुळेच भारतात कम्युनिकेशनची आर्थिक ई क्रांती झाली. ज्यामुळे देशातील १०० कोटी जनता आज ई पेमेंटचा वापर करीत असुन त्याचा पदोपदी प्रत्यय येत असल्याचे दर्शने यांनी सांगितले. नेतृत्वाचा कस लागणारे अनेक निर्णय अटलजींनी घेतले. ज्यात “बुद्ध पुन्हा हसला” या अणुस्फोटाच्या धाडसी निर्णयाचा समावेश आहे. अणुचाचण्यांपासून ते अंतराळ मोहिम आणि शैक्षणिक सुधारणांपर्यंतचे अनेक निर्णय घेतल्याने भारताची महासत्ता बनण्याकडे वाटचालीचा पाया रचला गेला. किमान समान कार्यक्रम राबवताना अटलजींनी पक्षाच्या धोरणांचा कधीच विसर पडु दिला नाही. अटलजींकडे पूर्ण बहुमत असते तर देशात समान नागरी कायदा कधीच पारित झाला असता, असे स्पष्ट करताना दर्शने यांनी अटलजींच्या नेतृत्वावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक गोष्टी विषद केल्या. राजकारणापेक्षा कवी म्हणून चांगली कारकिर्द केली असती, डॉक्टरेट करायची राहुन गेली आणि अध्यापन क्षेत्रात काम करणे राहुन गेल्याची खंत देखील अटलजींनी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. अशा कवी, राजकारणी आणि दूरदृष्टी असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांचा भारतीय जनता पक्षाच्याच नव्हे तर भारताच्या वाटचालीवर पुढील किमान ५० वर्षे प्रभाव राहिल. असेही दर्शने यांनी सांगितले. ००००

कार्यवाही न केल्यामुळे जन माहिती अधिकारी धनंजय कांबळे, निवासी नायब तहसीलदार यांना २५ हजारांचा दंड

अशोक गायकवाड खालापुर :जन माहिती अधिकारी धनंजय कांबळे, निवासी नायब तहसीलदार पेण यांना रुपये २५ हजार एवढा दंड (शास्ती) ठोठावण्यात आलेला असुन माहिती मोफत देण्यासंदर्भात देखील आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे लोकशाहीला माहिती अधिकार अधिनियम २००५ हा कायदा बळकटी देत आहे हे पुनः एकदा सिद्ध झाले आहे. सदर शास्ती बाबतच्या नोंदी जन माहिती अधिकारी धनंजय कांबळे यांच्या सेवाबुकमध्ये नोंद करण्यासाठी पत्रव्यवहार करणार आहे असेही सुधीर पाटील यांनी सांगितले आहे. पेण येथील माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्य जिल्हा पदाधिकारी सुधीर राजाराम पाटील यांनी पेण तहसील कार्यालय येथे कार्यालयीन माहिती मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यांच्या अर्जावर जन माहिती अधिकारी यांनी कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे त्यांनी कायद्याप्रमाणे प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे प्रथम अपील केले होते.प्रथम अपिलीय अधिकारी यांनी आदेश देऊनही कार्यालयीन जन माहिती अधिकारी धनंजय कांबळे निवासी नायब तहसीलदार, तहसील कार्यालय पेण, यांनी माहिती पुरविली नाही. त्यामुळे कायद्याचे कलम १८/१ अनुसार मा. माहिती आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडे पाटील यांनी तक्रार केली होती. (तक्रार क्रमांक ६३५/२०२१). त्या तक्रारीच्या अनुषंगाने जन माहिती अधिकारी धनंजय कांबळे, निवासी नायब तहसीलदार पेण यांना रुपये २५ हजार एवढा दंड (शास्ती) ठोठावण्यात आलेला असुन माहिती मोफत देण्यासंदर्भात देखील आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे लोकशाहीला माहिती अधिकार अधिनियम २००५ हा कायदा बळकटी देत आहे हे पुनः एकदा सिद्ध झाले आहे. 000000