Category: होम

नाशिकचा तीन दशकांचा प्रश्न मार्गी लागणार

 गंगापूर धरणातून थेट जलवाहिनीचे काम प्रारंभ हरिभाऊ लाखे नाशिक : गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्र या दरम्यान ४२५ दशलक्ष लिटर क्षमतेची साडेबारा किलोमीटर नवीन लोखंडी जलवाहिनी टाकण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. सध्या लोखंडी पाईपवर गंज प्रतिबंधक प्रक्रिया केली जात आहे. लवकरच खोदकाम होऊन प्रत्यक्ष पाईप टाकले जातील. या जलवाहिनीद्वारे पुढील ३० वर्षातील संभाव्य लोकसंख्येचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. गंगापूर धरणातून सध्या बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत सिमेंटच्या वाहिनीद्वारे पाणी आणले जाते. साधारणत: अडीच दशकांपूर्वी केलेली ही सिमेंटची जलवाहिनी जीर्ण झाली आहे. गळतीमुळे पाणी पुरवठ्यात अडथळे येतात. या पार्श्वभूमीवर, महापालिकेने १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून १८०० मिलीमीटर व्यासाची मुख्य लोखंडी जलवाहिनी टाकण्याचे निश्चित केले होते. प्रारंभी या कामासाठी २१० कोटींचा खर्च गृहीत धरण्यात आला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची प्रकल्प अहवालास तांत्रिक मान्यता घेऊन निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. हे काम जिंदाल कंपनीला मिळाले. विविध कारणांस्तव रखडलेल्या या कामाचा श्रीगणेशा झाला आहे. नव्या जलवाहिनीचे काम नऊ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे. गंगापूर धरणातून शहरात येणाऱ्या उजवा तट कालव्याची जागा पाटबंधारे विभागाकडून यापूर्वीच महापालिकेकडे हस्तांतरीत झाली आहे. त्या जागेत जुन्या वाहिनीला समांतर ही नवीन जल वाहिनी टाकण्यात येईल. या कामासाठी अवाढव्य लोखंडी पाईप नियोजित मार्गात आणण्यात आले आहेत. सध्या लोखंडी पाईपवर गंज प्रतिबंधक प्रक्रिया सुरू असून आठवडाभरात खोदकाम होऊन प्रत्यक्ष पाईप टाकण्याचे काम सुरू होईल, असे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर यांनी सांगितले. क्षमता कशी विस्तारणार ? नाशिक शहरातील पाणी पुरवठ्यासाठी ७५ टक्के पाणी गंगापूर तर २५ टक्के पाणी मुकणे धरणातून घेण्यात येते. सद्यस्थितीत एकूण ५५५ दशलक्ष लिटर पाणी धरणातून घेतले जाते. यातील गंगापूर धरणातून अस्तित्वातील वाहिन्यांची क्षमता सुमारे ३०० दशलक्ष लिटर आहे. हे सर्व पाणी शहरातील सात केंद्रात शुद्धीकरण करून ११९ जलकुंभ आणि सुमारे अडीच हजार किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांमधून वितरित केले जाते. गंगापूर धरण ते बारा बंगला ही नवीन जलवाहिनी जुन्या वाहिनीला समांतर असणार आहे. नवीन जलवाहिनीची क्षमता २२ तासात ४२५ दशलक्ष लिटर पाणी वहनाची आहे. ती २४ तास कार्यरत राहिल्यास ही क्षमता ४६० दशलक्ष लिटरपर्यंत जाऊ शकते. शहराची २०५५ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून जलवाहिनीचे नियोजन झाल्याचे अधिकारी सांगतात.

पनवेलमध्ये आरोग्यकिरण हेल्थ एक्स्पो

पनवेल : आरोग्यकिरण व कृष्णा इव्हेंटच्या संयुक्त विद्यमाने पनवेल शहरातील गोखले सभागृहात दिनांक  ४ व ५ जानेवारी आरोग्यकिरण हेल्थ एक्स्पो २०२५ आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे  उदघाटन शनिवार दिनांक ४ जानेवारीला…

कोकणातील तीन रेल्वेगाड्या ठाणे, दादरपर्यंत धावणार

मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे फलाट विस्तारीकरणाचे काम सुरू असून त्यामुळे फलाट क्रमांक १२ आणि १३ ची पायाभूत कामे केली जात आहेत. त्यामुळे कोकणातून मुंबईच्या…

कल्याण-डोंबिवलीतील रखडलेल्या प्रकल्पांना नवसंजीवनी

डोंबिवली : नववर्षाच्या प्रारंभी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी कल्याण-डोंबिवली परिसरातील प्रकल्पांची पाहणी केली. रखडलेल्या प्रकल्पांना नवसंजीवनी देण्यासाठी सदर प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासंदर्भात उपस्थित अधिकाऱ्यांना आयुक्तांनी सूचना…

कल्याण-डोंबिवलीत रात्री झाडांच्या आडोशाने बसणाऱ्या ८१ गांजा व्यसनींवर कारवाई

कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरातील गुन्हेगारी मोडून काढण्याचा चंग बांधलेल्या पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी आपल्या पोलीस ठाणे हद्दीतील स्थानिक पोलिसांना रात्रीच्या वेळेत झाडे, झुडपे, खाडी किनारा भागात गांजा, मद्य सेवन,…

लोणावळ्यातील संपर्क बाल ग्राम संस्था, अनाथ मुलांसाठी आशेचा किरण !

अनिल ठाणेकर लोणावळ्यातील संपर्क बाल ग्राम संस्थेला नुसीचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर यांनी आपल्या पत्नी समवेत नुकतीच  भेट दिली.  त्यांनी या सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे कौतुक करताना सांगितले की,  ही एक उल्लेखनीय संस्था आहे. जी असुरक्षित मुलांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी समर्पित आहे. जवळपास तीन दशकांपासून, SAMPARC (सोशल ऍक्शन फॉर मॅनपॉवर क्रिएशन) संपूर्ण भारतातील अनाथ, वंचित, आदिवासी आणि उपेक्षित मुलांसाठी आशेचा किरण आहे, अशी माहिती मारुती विश्वासराव यांनी दिली. आमच्या भेटीदरम्यान, आम्हाला SAMPARC चे संस्थापक आणि संचालक अमितकुमार बॅनर्जी यांच्यासोबत दोन तास घालविण्याचा बहुमान मिळाला. त्याच्या संस्थेचा प्रभाव खोलवर आहे – गेल्या  २९  वर्षांमध्ये, SAMPARC ने ११ हजारहून  अधिक गरजू मुलांचे पालनपोषण आणि समर्थन केले आहे. त्यांच्या सर्वसमावेशक पध्दतीमध्ये केवळ निवाराच नाही तर दर्जेदार शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण आणि उच्च शिक्षणाच्या संधी यांचा समावेश आहे. प्रत्येक मुलाचे यशस्वीरित्या पुनर्वसन आणि स्वावलंबी होईपर्यंत संस्था आपली वचनबद्धता कायम ठेवते.संपर्कमधील पाच मुलींचे पुनर्वसन करून स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहण्यासाठी आम्ही NUSI च्या (नॅशनल युनियन ऑफ सीफेअरर्स ऑफ इंडिया) उपक्रमाबद्दल माहिती दिली,  हा आमच्या भेटीतील एक महत्त्वपूर्ण उद्देश होता. या पाच  तरुणींची गोव्यातील प्रतिष्ठित नुसी मेरीटाईम अकादमीमध्ये जीपी रेटिंग प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे, त्यांच्या  शिक्षणाचा प्रत्येकी दोन लाख रुपये खर्च नुसी करणार असून, नोकरीची शाश्वती देखील देत आहे. आता सागरी क्षेत्रात अनेक करिअरच्या आशादायक संधी उपलब्ध झाल्या आहेत.  वंचित मुलांच्या यशस्वी करिअरसाठी दोन्ही संस्था एकत्रितपणे कसे कार्य करू शकतात याचे  हे चांगले उदाहरण आहे .संपर्कचे सर्वांगीण बाल विकास  समर्पण आणि प्रत्येक मुलाच्या भविष्यासाठी त्यांची कायम वचनबद्धता खरोखरच प्रशंसनीय आहे. त्यांचे कार्य तरुणांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणने समर्पित सामाजिक कृतीच्या सामर्थ्याचा पुरावा आहे.

जिल्ह्यात ‘स्वच्छ माझे अंगण’ अभियान सुरू – रोहन घुगे

ठाणे : कुटूंबस्तरावर वैयक्तिक शौचालय, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन स्वच्छतेची सवय अंगीकृत करणे, नियमितपणे वापर करणाऱ्या कुटूंबांना प्रोत्साहन देणे, त्यांचे अनुकरण करण्याकरीता इतर ग्रामस्थांना, कुटूंबधारकांना…

जानेवारीत महाराष्ट्र निर्यात संमेलनाचे आयोजन

ठाणे : ठाणे जिल्हा उद्योग केंद्र यांच्यामार्फत 7 जानेवारी सकाळी 9 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे येथे महाराष्ट्र निर्यात संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील लघु व…

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

ठाणे : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी…