Category: होम

 नवरस या अभिनव व अर्थपूर्ण ‘थीम’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 एस. टी. कदम विद्यालयाचे आगळेवेगळे स्नेहसंमेलन   योगेश चांदेकर पालघरः प्रत्येक शाळेत दरवर्षी स्नेहसंमेलन वेगवेगळ्या उपक्रमांनी आणि कार्यक्रमांनी साजरे केले जात असते; परंतु एखादी विशिष्ट ‘थीम’ निवडून त्यावर कार्यक्रम सादर करण्याचे आव्हान कुणीच स्वीकारत नाही, असे आव्हान स्वीकारून पालघरच्या एस. टी. कदम विद्यालयाने नवरसाच्या ‘थीम’वर एक अभिनव उपक्रम राबवून पालक आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली.  नवरस या अभिनव व अर्थपूर्ण ‘थीम’वर या शाळेचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या अभिनव ‘थीम’ची चर्चा आता पालघरमध्येच नव्हे, तर सर्वत्र होत आहे. नृत्य, नाट्य आणि संगीतातून सादरीकरण तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी नवरस ही ‘थीम’ घेऊन त्यावर विविध नृत्य, नाट्य आणि संगीत कार्यक्रम सादर केले. आनंद, दुःख, करुणा, रौद्र, वीर, भयानक, शृंगार, विभक्त आणि शांत या नऊ रसांची प्रभावी व व भावनिक प्रस्तुती विद्यार्थ्यांनी रंगमंचावर सादर केली. तिला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. मुलीचा जीवन प्रवास उलगडला ‘थीम’मधून नवरस या ‘थीम’चा मुख्य भाग एका मुलीच्या जीवन प्रवासावर आधारित होता. तिच्या आनंदी बालपणानंतर ती कठीण प्रसंगावर कशी मात करते, समाजातील सकारात्मक व्यक्तींच्या सहाय्याने ती कशी उभारी घेते, हे या वेळी नृत्य नाट्य आणि संगीताच्या माध्यमातून सादर करण्यात आले. मोनोॲक्ट आणि नुत्यांद्वारे या भावनांना प्रभावीपणे सादर करून तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. विद्यार्थ्यांचा सन्मान या कार्यक्रमाची सुरुवात जीवन विकास संस्थेचे कार्याध्यक्ष वागेश कदम यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. मुख्याध्यापक कमल कचोलिया यांनी शाळेच्या वार्षिक प्रगती अहवालाचे वाचन केले. या वेळी विद्यार्थ्यांचा व पालकांचा प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषेत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कदम परिवार आवर्जून उपस्थित या वेळी संस्थेचे कार्यवाह रवींद्र कदम, कोषाध्यक्ष प्रणव कदम, व्यवस्थापक कोमल कदम, भावी मुख्याध्यापक प्रदीप पाणीग्रही, उपमुख्याध्यापक नेहा पाटील, मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापक संगीता गायकवाड, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पालकांनी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. पालक आणि उपस्थितांची मनापासून मिळालेली दाद ही या शाळेसाठी एक अभिमानाची आणि चिरस्थायी बाब ठरली. 000000

नववर्षाचे औचित्य साधून आजोबा गडावर राबवली स्वच्छता मोहिम

कल्याण : शंभुदुर्ग संघटनेच्या वतीने दरवर्षी नवीन वर्षाचे निमित्त साधून दोन दिवसीय गडकिल्ले स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात येते.  दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा संघटनेच्या वतीने शहापूर तालुक्यातील आजोबा गडावर स्वछता मोहिमेचे…

 ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून ११ शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू

ठाणे : जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत ११ शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया नोव्हेंबर, २००५ पूर्वी सुरू झाल्यामुळे ११ शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे.  ठाणे गिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या मात्र नोव्हेंबर २००५ पूर्वी भरती प्रक्रिया सुरू झालेल्या शिक्षकांना यापूर्वी परिभाषित अंशदान योजना लागू करण्यात आली होती. मा. उच्च न्यायालयाने एका याचिकेत या शिक्षकांच्या सेवेबाबत पडताळणी करून जुनी निवृत्ती वेतन योजना लागू होते किंवा कसे याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने संबंधित शिक्षकांची सुनावणी घेऊन कागदपत्रे पडताळणी अंती या ११ शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया नोव्हेंबर, २००५ पूर्वी सुरू झाल्यामुळे ११ शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे.याबाबत विशेष पाठपुरावा प्रत्येक सोमवारी आढावा बैठक घेऊन शिक्षकांचा बराच काळ प्रलंबित असलेले विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न जिल्हा परिषदे मार्फत करण्यात येत आहेत. कामकाजाचा वेळोवेळी पाठपुरावा होत असल्याने ११ शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे.  याबाबत संबंधित शिक्षक व शिक्षक संघटना यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी (प्राथ) बाळासाहेब राक्षे यांचे आभार व्यक्त केले आहेत. 000000

वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ ४२६ शिक्षकांना मंजूर

ठाणे : राज्यात २०१४ मध्ये सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला असून जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभागातील ४२६ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदे मुख्य कार्यकारी…

वंचितांचा रंगमंच शहरी व ग्रामीण भागात अभिव्यक्ती प्रेरणेसाठी महत्त्वाचा – ॲड. इंदवी तुळपुळे

ठाणे : ठाण्यासारख्या मोठ्या शहरातील वस्ती मध्ये विचारांना चालना देणारा वंचितांचा रंगमंच उपक्रम ११ वर्ष सातत्याने चालू राहणे हे त्या समाजातील मुलांच्या वैचारिक प्रगतीसाठी अतिशय महत्वाचे आहे. छोटी शहरे आणि…

 ‘नितेश राणेंनी सर्वच मर्यादा ओलांडल्या’

बाळासाहेब थोरातांची खरमरीत टीका  मुंबई : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मंत्री नितेश राणे यांनी केरळ राज्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन टीका केली आहे. नितेश राणे यांनी काल सासवडमध्ये बोलताना केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान असल्याचं…

वाल्मिक कराडला कोणत्याही क्षणी अटक होणार ?

स्वाती घोसाळकर मुंबई_: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा आका असणा-या वाल्मिक कराडला कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. या हत्या प्रकरणातील तीन आरोपी अजूनही फरार असून…

मुरबाड रस्त्यावरील लांबलचक खड्ड्यांमुळे प्रवासी त्रस्त

कल्याण – कल्याण शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरबाड-शहाड रस्त्यावर प्रेम ऑटो चौक येथे काही यंत्रणांनी भूमिगत सेवावाहिन्या टाकण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून खोदून ठेवले आहे. खोदाई केलेला भाग पेव्हर ब्लॉक किंवा काँक्रीटने…

अखिलेश शुक्लासह सात जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

कल्याण : येथील पश्चिमेतील योगीधाम आजमेरा हाईट्स गृहसंकुलातील मराठी कुटुंबीयांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल प्रकरणातील शासकीय सेवेतील पर्यटन अधिकारी (निलंबित) अखिलेश शुक्ला यांच्यासह सात जणांना रविवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातील सुट्टीकालीन न्यायाधीशांनी चौदा दिवसांची पोलीस…