Category: होम

हिरामण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रामदास आठवले यांचा वाढदिवस कर्जतमध्ये उत्साहात साजरा !

अशोक गायकवाड कर्जत : महाराष्ट्राच्या कानाकोप-यात अन्याय अत्याचाराविरोधात दंड थोपटून आवाज उठवून सर्वसामान्य बहुजन वर्गाला ” पँथर ” स्टाईल ने न्याय देऊन आपला सामाजिक बांधिलकीचा पगडा ” संघर्षनायक ” म्हणून ओळख निर्माण करणारे तसेच तमाम दलित – शोषित, वंचित बहुजन समाजाचे नेते, संघर्ष योद्धा रामदास आठवले यांच्या ६५ व्या वाढदिवसा निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रि.पा.इं. कर्जत तालुक्याच्या वतीने कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषद शाळा किरवली येथे विद्यार्थ्यांना फळ वाटप करून राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रिपाइंचे कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळीच रिपाइंच्या कार्यकर्त्यानी राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा जयघोष केला, त्यानंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजिप शाळा किरवली येथे शाळेत केक कापून व विद्यार्थ्यांना फळ वाटप करून वाढदिवस साजरा केला . दरवर्षी होत असलेल्या या रिपाइंच्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे, ” शिक्षण हे ज्ञानरुपी तिसरा डोळा आहे” जो ज्ञान प्राशन करतो, तो गुरगुरल्या शिवाय रहात नाही, हि शिकवण विश्वरत्न बाबासाहेब डॉ.आंबेडकर यांची असल्याने शिक्षण घेणाऱ्या देशाच्या भावी पिढीस सक्षम बनविण्यासाठी व आपणही या समाजाचे काही देणे आहोत, यासाठी हा उपक्रम राबविल्याचे रिपाइंचे कर्जत ता. अध्यक्ष हिरामण गायकवाड यांनी सांगितले, तर किरवली शाळेत विविध उपक्रम राबवून शाळेला कुठल्याही प्रकारच्या मदतीची गरज भासल्यास ती केली जाईल असे आश्वासन दिले.दरम्यान कर्जत तालुक्यांतील विविध भागात मोठमोठे फलक लावुन व विविध स्तुत्य उपक्रम – राबवून रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी मुख्याध्यापिकामती प्रियांका प्रदीप हरवंदे, उपशिक्षिका  चित्रा किशोर पाटील, वैशाली रुपेश पाटील,शिक्षक आकाराम तुकाराम पाटील, राजेंद्र सोपान रुपवनकर, ह. भ . प. प्रभाकर गोविंद बडेकर यांचे व सर्व पदाधिकाऱ्यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले, यावेळी आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले, तसेच पुढील भविष्यासाठी शाळेला शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी आरपी आय कर्जत ता. अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्या समवेत, कर्जत तालुका संपर्कप्रमुख किशोर द्वारकानाथ गायकवाड, कर्जत तालुका सचिव अशोक दत्तु गायकवाड, तालुका उपाध्यक्ष जगदीश शिंदे, खजिनदार विकास गायकवाड, कर्जत तालुका प्रसिद्धीप्रमुख विजय गायकवाड, उमरोली रा. जि.प वार्ड अध्यक्ष अमर गायकवाड, सावेळे पंचायत समिती वार्ड अध्यक्ष अमर जाधव, नेरळ शहर कार्याध्यक्ष हरिश्चंद्र सदावर्ते, मंजुळा किशोर गायकवाड, राधिका रविंद्र गायकवाड, योगिनी हिरामण गायकवाड, रेखा देवराम गायकवाड, रेखा चंद्रकांत जाधव, निशा प्रमोद लवांडे , अस्मिता जितेंद्र गायकवाड, शुभांगी महेंद्र भालेराव, कविता राजेश गायकवाड, शामिली सतीश गायकवाड, ज्योती हरिचंद्र रोकडे, कांचन उमेश भालेराव, अनुजा रुपेश रोकडे, शारदा सुखदेव भालेराव त्याचप्रमाणे आर पी आय चे असंख्य कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

 खडेगोळवलीतील तळीरामांना उठाबश्यांचे धडे

 गांजा व्यसनी, मद्यधुंदांविरुध्द पोलीस उपायुक्तांची मोहीम   कल्याण : कल्याण, डोंबिवली शहर परिसरातील गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी आता पोलीस उपायुक्त अतुल झेंडे स्वता रात्रीच्या वेळेत रस्त्यावर उतरले आहेत. गांजा, अंमली पदार्थ…

शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

माथेरान : लहान मुले ही देवघरची फुले आहेत आणि जेव्हा त्यांना एखादी वस्तू किंवा साहित्य असो अथवा खाऊ असो हे त्यांना अचानकपणे प्राप्त झाल्यास त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं स्मितहास्य निर्माण…

 दुसरे अखिल भारतीय महिला गझल संमेलन

नवी मुंबईत १९ जानेवारी रोजी रंगणार नवी मुंबई :गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे १९ जानेवारीला सकाळी ९ ते ६ यावळेत विष्णुदास भावे नाट्यगृह, सेक्टर -१६ A, वाशी बस डेपो समोर, जुहू…

अनुकंपा अंतर्गत ९ उमेदवारांची रोहन घुगे यांच्या हस्ते नियुक्ती

ठाणे : शासकीय सेवेत कार्यरत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका पात्र वारसाला अनुकंपातत्वावर अनुकंपा उमेदवारांच्या शैक्षणिक अहर्ता व अनुकंपा प्रतीक्षा यादीतील ज्येष्ठतेनुसार जिल्हा परिषदेच्या दरवर्षी रिक्त होणाऱ्या सरळ सेवेच्या…

शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी जिल्हास्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन

ठाणे : मुलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत मार्फत प्रोजेक्ट दिशा व्ही स्कूल पोर्टल द्वारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावण्यासाठी कामकाज करण्यात येत आहे.…

चिरंजीवी संघटनेचे ‘बालपण वाचवा मानवता वाचवा’ यासाठी लाक्षणिक उपोषण

ठाणे : चिरंजीवी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सलोनी(अवली)तोडकरी यांचे बालपण वाचवा मानवता वाचवा, यासाठी ३ दिवसीय लाक्षणिक उपोषण विक्रमगड येथे नुकतेच पार पडले. चिरंजीवी संघटना ही जिज्ञासू बालकांची मानवतावादी संघटना असून,…

शहापूर तालुक्यात शिवजल सुराज्य अभियानाचे रोहन घुगे यांच्या हस्ते शुभारंभ

ठाणे : ठाणे ग्रामीण भागातील पाणी समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत “शिवजल सुराज्य अभियान” राबविण्यात येत असून या अभियानाचे शुभारंभ शुक्रवार, २६ डिसेंबर, २०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या…

‘खारफुटी’ मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्याने चिंता

 फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या अहवालात रमेश औताडे मुंबई : भारतीय वन व पर्यावरण विभाग प्रत्येक वर्षी पर्यावरण अहवाल सादर करत असते. निसर्ग, हवामान, तापमान, स्वच्छ पाणी या बाबींचा विचार करता…

२८ व २९ डिसेंबरला नागपुरात ‘अक्षरक्रांती’ आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव

नागपूर : अक्षरक्रांती फाऊंडेशन व कला गौरव संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले शिक्षण संस्था सभागृह, रेशिमबाग, नागपूर येथे २८ व २९ डिसेंबरला ‘पहिले अक्षरक्रांती आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव’ संपन्न होत…