Category: होम

पक्षाचा एक नंबर कायम ठेवायचा आहे – आमदार संजय केळकर

अनिल ठाणेकर विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशानंतर हूरळून जाण्याची गरज नाही. त्याच ताकतीने आणि एकजुटीने पुन्हा आपल्याला कामाला लागायचे असून पक्षाचा एक नंबर कायम ठेवायचा आहे. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेणे जरुरीच आहे असे मार्गदर्शन करताना आमदार संजय केळकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी भाजपा उत्तर रायगड जिल्हा सदस्यता नोंदणी कार्यशाळेत उपस्थित राहून भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ह्यावेळी व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार सुरेश लाड, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुण भगत, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.उत्तर रायगड जिल्हा सदस्य  नोंदणी कार्यशाळा रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल येथे पार पडली.

मुकुंद केणी प्रतिष्ठान आयोजित भव्य चित्रकला स्पर्धा

ठाणे : कळवा विभागातील दरवर्षीप्रमाणे यंदाही मुकुंद केणी प्रतिष्ठान आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन कळवा विभागात करण्यात आले होते. माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला मुकुंद केणी व मंदार मुकुंद केणी यांच्या…

कल्याणमधील मुलीच्या हत्याप्रकरणातील गुन्हेगाराला राजकीय पाठबळ

माजी नगरसेवक महेश गायकवाड यांची टीका   कल्याण : येथील पूर्वेतील चक्कीनाका भागातील निष्पाप अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना पोलिसांनी लवकरात लवकर त्यांना कठोर शिक्षा होईल या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या…

आंतर रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धा ६ जानेवारीपासून रंगणार

मुंबई : गिरनार  चहा  पुरस्कृत  आणि  मुंबई क्रिकेट  असोशिएशन  मान्यता प्राप्त  असलेली आंतर रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धा येत्या ६ जानेवारी पासून शिवाजी पार्क येथे रंगणार आहे. यंदाचे या स्पर्धेचे ३१ वे वर्ष असून मुंबईतील  १६ नामांकित रुग्णालयीन क्रिकेट संघांचा  या…

डहाणूतील अतिक्रमणांवरील कारवाईविरोधात विनोद निकोले रस्त्यावर

 पूर्वसूचना, नोटिसा न देता कारवाई डहाणूच्या मुख्याधिकारी आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात संताप योगेश चांदेकर पालघरः रस्त्याच्या रूंदीकरणात येणारी अतिक्रमणे हटवल्याच्या विरोधात विनोद निकोले रस्त्यावर उतरले असून, नुकसान भरपाई आणि पुनर्वसन झाल्याशिवाय डहाणूतील रस्त्याचे रुंदीकरण होऊ न देण्याचा इशारा विनोद निकोले यांनी दिला आहे. डहाणूतील दुकाने, व्यापारी संकुलातील गाळे आणि झोपडपट्ट्या तोडण्याचे कारवाई डहाणू नगरपालिकेने केली असून त्या विरोधात आ. निकोले यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. यापूर्वी चर्चा झालेली असताना कोणतीही पूर्वसूचना न देता अतिक्रमणे काढण्यात आल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. दीडशे वर्षांपासून राहणाऱ्यांना केले बेघर विधिमंडळाचे अधिवेशन चालू असताना आमदारांना माहिती न देता ही कारवाई करण्यात आल्याबद्दल आ. निकोले यांनी नाराजी व्यक्त केली. डहाणू शहरातील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी रस्त्यालगतची दुकाने, टपऱ्या, व्यापारी संकुले तसेच काही पक्की घरेही पाडण्यात आली. त्या संदर्भात कोणालाही नोटिसा किंवा पूर्वसचना देण्यात आली नव्हती, असा आरोप आ. निकोले यांनी केला. डहाणूतील काही लोक शंभर दीडशे वर्षांपासून या घरात राहत आहेत. त्यांच्या नावावर वीजबिले, तसेच घरपट्टी आहेत. असे असताना त्यांना डहाणू नगरपालिकेने कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न पाठवता त्यांची पक्की बांधकामे उद्ध्वस्त केली. मुख्याधिकाऱ्यांची बेपर्वा वृत्ती डहाणू नगरपालिकेने मुख्याधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अतिशय बेपर्वाईने वागले असून याप्रकरणी त्यांनी आमदारांनाही विश्वासात घेतले नाही. आमदाराच्या सूचनांनाही डावलले. हा हक्कभंग आहे. याप्रकरणी आपण मुंबईच्या अधिवेशनात आवाज उठवणार आहोत; शिवाय सर्व गाळेधारक व्यापारी तसेच ज्यांची बांधकामे पाडली, ते नागरिक यांची एक सर्वसमावेशक बैठक घेऊन त्यांच्या पुनर्वसनाचा तसेच त्यांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न त्यात मांडला जाईल. त्याबाबत नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची काय भूमिका आहे ती जाणून घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.यावेळी माकपचे चंद्रकांत घोरखना  चेतन माढा,धनेश आक्रे, तसेच शमी पीरा संजय पाटील आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. संबंधितांवर कारवाईचा आग्रह संबंधितांवर कारवाई करण्याबाबत आपण वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करू, असे सांगून जोपर्यंत पुनर्वसन आणि नुकसान भरपाईबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत डहाणूतील रस्त्यांचे रुंदीकरण होऊ देणार नाही, असा इशारा आ. निकोले यांनी दिला. डहाणू आणि तलासरी तालुक्यातील जनता या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संबंधितांना जाब विचारेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

पाच दशकांच्या छळयुगाचा अंत!

सीरियामधील बंडखोरांनी वायव्येकडील इडलिबमधील तळावरून अचानक मोहीम सुरू केली आणि राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांची जुलमी राजवट संपुष्टात आली. त्यांच्यामुळे सीरियात गृहयुद्ध सुरू झाले, त्यात पाच लाखांहून अधिक लोक मारले गेले…

ठाण्यातील बी केबिनमधील गौतमवाडी भीम अनुयायांनी केला अमित शहा यांचा जाहीर निषेध

ठाणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाच्या विरोधात ठाण्यातील बी कॅबिन विभागात असणाऱ्या नवतरुण मित्र मंडळातर्फे रस्त्यावर उतरून जाहीर  निषेध करण्यात आला. यावेळी अध्यक्ष भानुदास…

दुनिया कृत्रिम पर्वतांची…

आपल्या जगात खूप मोठी पर्वत आहेत ही माहिती प्रत्येकाला असणारच. परंतु वेगळी माहिती अशी की या पर्वतांच्या सोबतच जगात अनेक प्रचंड आकाराचे कृत्रिम पर्वत आहेत आणि त्यांचीच माहिती आज घ्यायची…

कल्याणमधील मुलीच्या हत्याप्रकरणातील गुन्हेगाराला राजकीय पाठबळ

माजी नगरसेवक महेश गायकवाड यांची टीका कल्याण : येथील पूर्वेतील चक्कीनाका भागातील निष्पाप अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना पोलिसांनी लवकरात लवकर त्यांना कठोर शिक्षा होईल या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या मागणीसाठी बुधवारी सकाळी येथील संतप्त नागरिकांनी मूक मोर्चा काढला. कल्याण पूर्वेतील नंदादीप नगर येथून पालिकेच्या ड प्रभाग कार्यालयाजवळील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत हा निषेध मूक मोर्चा काढण्यात आला. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असलेल्या गुन्हेगाराला यापूर्वी नेहमीच राजकीय पाठबळ मिळत गेले. या गुन्हेगारावर सहा गुन्हे दाखल आहेत. त्या गुन्ह्यांमध्ये त्याला वेळीच शिक्षा झाल्या असत्या तर आता मुलीच्या हत्येचे धाडस त्याने केले नसते. त्यामुळे आता तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या गुन्ह्याची व्याप्ती विचारात घेऊन या गुन्ह्यातील मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होतील यासाठी निर्णय घ्यावेत, अशी मागणी माजी नगरसेवक महेश पाटील यांनी केली आहे. माजी नगरसेवक महेश गायकवाड, रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते अण्णा रोकडे, ठाकरे गटाचे शहरप्रमुख शरद पाटील आणि इतर या निषेध मोर्चात सहभागी झाले होते. नागरिकांनी तोंडाला काळी पट्टी लावली होती. शांततेत मोर्चा काढण्यात आला. अनुचित प्रकार टाळण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानक परिसर, कोळसेवाडी भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कल्याण शहरातील वाढत्या गुन्हे प्रकरणाने नागरिक अस्वस्थ झाले आहेत. राजकीय पाठबळ अल्पवयीन मुलाच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. या गुन्हेगाराला यापूर्वीपासून राजकीय पाठबळ मिळाले आहे. त्याच्यावर यापूर्वीच्या गुन्ह्यात कठोर कारवाई झाली असती तर त्याने हा गुन्हा केला नसता. परंतु, यापूर्वी या गुन्हेगाराला नेहमीच राजकीय अभय मिळत गेले. या गुन्हेगाराला पाठबळ देणारे राजकीय लोक कोण आहेत हे सर्वांना माहिती आहे, असे महेश गायकवाड यांनी माध्यमांना सांगितले. मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी या गुन्ह्यातील आरोपींना विनाविलंब फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली. कोट अल्पवयीन मुलीच्या हत्येमधून याप्रकरणातील गुन्हेगार किती विकृत, क्रूर आहे हे दिसून येते. मृत मुलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी आणि यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी शासनाने याप्रकरणातील गुन्हेगारांवर कठोर कारवाईच्या दृष्टीने निर्णय घ्यावेत. -महेश गायकवाड,माजी नगरसेवक. कोट ज्या क्रूरतेचा कळस गाठून गुन्हेगारांनी अल्पवयीन मुलीची हत्या केली. त्याच पध्दतीने आता या प्रकरणातील गु्न्हेगारांचा न्याय झाला पाहिजे. या गु्न्हेगारांना लवकरात लवकर फाशी होईल यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा.- शरद पाटील,ठाकरे गट शहरप्रमुख,कल्याण पूर्व.

वेगवान घडामोडींचे वर्ष

पान ४ वरुन एकाच वेळी अनेक ठिकाणी संघर्ष सुरू असल्यामुळे जग अधिकाधिक विकेंद्रित होत असल्याचे तीव्रतेने जाणवले. 2024 मध्ये राजकीय हसाचारात 27 टक्के वाढ झाली. त्याची तीव्रता आणि वारंवारताही वाढली.…