Category: होम

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड 

पनवेल : पत्रकारिता क्षेत्रासोबत सातत्याने सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या पनवेल तालुका विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे  यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.  पनवेल तालुका पत्रकार विकास मंचची वार्षिक सर्वसाधारण बैठक मंचाचे…

सांगलवाडी, सांगलीत कुमार राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

मुंबई:- महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसीएशनच्या मान्यतेने सांगली जिल्हा कबड्डी असोसीएशनच्या विद्यमाने व युवक मराठा क्रीडा संस्था यांच्या सहकार्याने २८ डिसेंबर ते १जानेवारी  या कालावधीत ५१व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य कबड्डी असो.चे उपाध्यक्ष व माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा चिंचबाग मैदान, सांगलवाडी, सांगली येते होईल. या स्पर्धेतून निवडण्यात आलेला कुमार/कुमारी गटाचा संघ ८ ते ११ जानेवारी २०२५ या कालावधीत हरिद्वार येथे होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. मातीच्या ६ क्रीडांगणावर होणारी ही स्पर्धा सकाळ व सायंकाळ या दोन्ही सत्रात खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व संलग्न जिल्हा मुलींच्या संघाने २७ डिसेंबरला सायं. ०४-०० वा. स्पर्धेच्या स्थळी आपली उपस्थिती राखाव.  त्याच दिवशी मुलींची वजने व छाननी केली जाईल. तर मुलांच्या सर्व संघानी २९ डिसेंबर सायं. ०४-०० वा. आपली उपस्थिती राखावी. मुलांची वजने व छाननी २९ डिसेंबरला करण्यात येतील. सर्व जिल्हा संघटनांच्या सचिवांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन राज्य कबड्डी असो. चे सचिव बाबुराव चांदेरे यांनी सर्व प्रसार माध्यमाद्वारे केले आहे. 0000  

शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार पोलीसांना बडतर्फ करा – हिरामण गायकवाड

अशोक गायकवाड कर्जत:परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालया समोरील विश्वरत्न बाबासाहेब डॉ . भीमराव आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारका शेजारच्या संविधान प्रतिमेची विटंबना व अवमान प्रकरणी संबंधित घटनेचे शांततापूर्ण निषेध आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना अमानुष बेदम मारहाण केली. या आंदोलनामध्ये सामील नसलेला कायद्याचे शिक्षण घेणारा विद्यार्थी, भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेला असल्याने सदर प्रकरणात सखोल कठोर व निपक्षपणे न्यायालयीन चौकशी करावी व याप्रकरणी मारहाण करणारे जे पोलीस जबाबदार असतील त्यांना तात्काळ नोकरीतून बडतर्फ करावे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक गोरबांड या जातीयवादी आणि मनुवादी विचार सरणीच्या पोलीस निरीक्षकाचे तात्काळ निलंबन करावे, अशी संतप्त मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कर्जत तालुका अध्यक्ष हिरामणभाई गायकवाड यांनी केली. सोमवार १६ डिसेंबरला कर्जत उपविभागीय (प्रांत) अधिकारी प्रकाश संकपाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत डी.डी टेळे , तहसीलदार कर्जत धनंजय जाधव, पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांना या घटने संबंधी निवेदन देण्यात आले. झालेली घटना ठरवून केली असून केलेली मारहाण अतिशय निंदनीय होती. यामुळेच एका निष्पाप भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. या सर्व घटनेची चौकशी होवून अमानुष मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा त्यांनी जाहीर निषेध करून त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना नोकरीतून बडतर्फ करावे अशी संतप्त मागणी आर पी आय (आ) कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांनी केली आहे. यावेळी कर्जत तालुक्यात संतप्त वातावरण असून निवेदन देतेप्रसंगी किशोर गायकवाड – संपर्कप्रमुख आरपीआय, अशोक गायकवाड सचिव, प्रेमनाथ जाधव – पत्रकार / पक्ष प्रवक्ता, विकास गायकवाड – खजिनदार, विजय गायकवाड – प्रसिद्धी प्रमुख, नितीन सोनवणे पंचायत समिती अध्यक्ष वेणगाव, अमर जाधव पंचायत समिती अध्यक्ष सावेळे, सतीश रिकेबे – तालुका संघटक, हरिश्चंद्र सदावर्ते – कार्याध्यक्ष नेरळ शहर, बाळा चंदनशिवे – अध्यक्ष नेरळ शहर, मयूर गायकवाड, रूपेश उर्फ बिनू रोकडे, उमेश भालेराव, महेंद्र भालेराव, अमित गायकवाड, ईश्वर भालेराव, कैलास पोटे सामाजिक कार्यकर्ता, जगदीश जाधव, अनिल जाधव, विश्वास भालेराव, त्याचप्रमाणे महिला कार्यकर्ते मंजुळा किशोर गायकवाड, अक्षदा अमित गायकवाड उपाध्यक्ष महिला आरपीआय, राधिका रविंद्र गायकवाड, योगिनी हिरामण गायकवाड, रेखा देवराम गायकवाड, रेखा चंद्रकांत जाधव, निशा प्रमोद लवांडे , अस्मिता जितेंद्र गायकवाड, शुभांगी महेंद्र भालेराव, कविता राजेश गायकवाड, ज्योती भारत रोकडे, कांचन उमेश भालेराव, त्याचप्रमाणे आर पी आय चे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

सफाई मित्रांकरिता विशेष कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न

नवी मुंबई : राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ (NSKFDS) व्दारे ‘नमस्ते’ योजनेंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या सफाईमित्रांसाठी महानगरपालिका क्षेत्रातील मलनि:स्सारण वाहिन्या व सेप्टिक टॅंक यांची सुरक्षित साफसफाई या विषयाबाबत विशेष कार्यशाळा नमुंमपा मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न झाली. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यधुनिक यंत्रणा वापरुन शहर स्वच्छतेवर भर दिला जात असतानाच शहर स्वच्छतेसाठी झटणा-या स्वच्छतामित्र व सफाईमित्रांच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या ‘नमस्ते’ योजनेंतर्गत सफाईमित्रांसाठी आयोजित करण्यात आलेली ही विशेष कार्यशाळा प्रातिनिधीक स्वरुपातील 50 हून अधिक सफाईमित्र यांच्या सहभागातून यशस्वीरित्या संपन्न झाली. राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ यांच्या वतीने जेनरोबोटिक इनोव्हेशन यांच्या माध्यमातून ही कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये मलनि:स्सारण वाहिन्या व सेप्टिक टॅंक सुरक्षितरित्या सफाई करण्याची गरज विशद करण्यात आली तसेच त्याकरिता असलेल्या नियमांची व कायद्यांची माहिती देण्यात आली. मॅनहोलची सफाई पध्दत पूर्णपणे बंद करुन मशीनहोल सफाईचा अंगिकार करण्याच्या कायद्याविषयी माहिती देताना नवी मुंबई महानगरपालिका कायदा होण्याच्या आधीपासूनच मशीनहोल सफाईला प्राधान्य देत असल्याबद्दल जेनरोबोटिकच्या प्रशिक्षकांनी प्रशंसा केली. यावेळी सुरक्षा साधने व सुरक्षित यंत्रसामुग्री यांचीही सविस्तर माहिती प्रशिक्षकांनी दिली. सफाईमित्रांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारमार्फत राबविण्यात येणा-या योजनांची माहिती देत प्रशिक्षकांनी स्वच्छता उद्यमी योजनेंतर्गत सफाई मित्रांना कर्ज स्वरुपात वित्त पुरवठा केला जातो त्याची सविस्तर माहिती दिली. त्यासोबतच ‘नमस्ते’ आणि ‘दक्ष’ उपक्रमांतर्गत करण्यात येणा-या कामाची माहिती दिली. अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांच्या नियंत्रणाखाली, कार्यकारी अभियंता श्री. दिपक सूर्यराव, कनिष्ठ अभियंता श्री. दिलीप बेनके व श्री. वैभव देशमुख यांनी कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केले. मलनि:स्सारण व्यवस्थापनाप्रमाणेच हा स्वच्छ सर्वेक्षणाचा भाग असल्याने तसेच स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत सध्या स्वच्छ शौचालय अभियान सुरू असल्याने यामध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागानेही महत्वाचा आयोजन सहभाग घेतला.

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर कोकणचे आमदार निरंजन डावखरे यांची नियुक्ती

मुंबई : विद्यापीठाच्या अधिसभेवर (सिनेट) भाजपाचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे प्रतिनिधी म्हणून आमदार डावखरे यांना नामनिर्देशित करण्यात आले आहे. विधीमंडळातील तरुण चेहरा म्हणून आमदार निरंजन डावखरे यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून त्यांची २०१२ मध्ये पहिल्यांदा विधान परिषदेवर निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी विधान परिषद निवडणुकीत हॅट्रिक नोंदविली. गेल्या १२ वर्षांच्या काळात त्यांनी विधान परिषदेत शैक्षणिक, सामाजिक आणि नागरी समस्यांकडे सातत्याने लक्ष वेधले. तसेच ते सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. राज्यातील शिक्षकांचे प्रश्नही त्यांनी हिरीरीने मांडले. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या असून, `एमपीएससी’साठी बेलापूर येथे स्वतंत्र मुख्यालय मंजूर करुन घेतले. कोकणातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी सर्व शाळा डिजिटल करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत कोकणातील शेकडो शाळांना संगणकासह विविध साहित्यपुरवठा करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या कक्षेत कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग  हेपाच जिल्ह्यातील महाविद्यालये आहेत. त्याचबरोबर काही शहरात विद्यापीठाची उपकेंद्रे आहेत. मुंबई विद्यापीठ प्रशासन आणि महाविद्यालयातील समन्वय, तसेच उपकेंद्रात नवे अभ्यासक्रम आणि प्रशासकीय सुधारणा आदी करण्यामध्ये कोकणचे आमदार निरंजन डावखरे यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.

घोडबंदरवासींच्या माथी टँकरपोटी लाखोंचा बोजा !

तत्काळ २५ एमएलडी पाणी द्या – आमदार संजय केळकर अनिल ठाणेकर नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील पाणी टंचाईचा मुद्दा उपस्थित करत तातडीने अतिरिक्त २५ एमएलडी पाणी देण्याची मागणी केली. घोडबंदर भागात रहिवाशांना टँकरपोटी नाहक दरमहिना लाखो रुपये मोजावे लागत असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. ठाण्यात विशेषतः घोडबंदर परिसरात वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची गरज आणि पुरवठा यात मोठी तफावत असून पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. लाखो रुपयांची कर्जे घेऊन या भागात घरे घेतलेल्या नागरिकांना मालमत्ता, पाणीपट्टी असे कर भरूनही पिण्याच्या पाण्यासाठी महिन्याकाठी लाखो रुपये खर्च करावे लागत असल्याची खंतही केळकर यांनी सभागृहात व्यक्त केली. एकीकडे पाणी टंचाईने रहिवासी होरपळत असताना आणि टँकर लॉबी गब्बर होत असताना दुसरीकडे बहुमजली इमारतींची संकुले मोठ्या प्रमाणात घोडबंदर भागात उभी राहत आहेत. या संकुलामध्ये हजारो कुटुंबे वास्तव्यास येणार आहेत. आधीच अपुरा पाणी पुरवठा होत असताना नव्या वसाहतीतील नागरिकांना पाणी कुठून देणार असा प्रश्नही श्री.केळकर यांनी उपस्थित केला आहे. ठाणे शहराला अतिरिक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी ठाणे महापालिका आणि मुंबई महापालिकेला मी पत्र दिले असून पाठपुरावाही करत आहे. शहराला ५० एमएलडी ज्यादा पाणी देण्यास मंजुरी मिळाली आहे, पण त्यापैकी २५ एमएलडी पाणी तातडीने दिल्यास घोडबंदर परिसर टँकरमुक्त होईल, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली.

मध्य रेल्वेत नॅशनल रेल्वे मजदूर युनियनला मिळाली मान्यता !

एनआरएमयुचा हा ऐतिहासिक विजय रेल्वे कामगारांना समर्पित – वेणू नायर अनिल ठाणेकर ठाणे : भारतीय रेल्वेत ४ ते ६ डिसेंबरला रेल्वे कामगार युनियनच्या मान्यतेची निवडणूक झाली. या निवडणुकीत वेगळ्या संघटनांनी भाग घेतला होता. त्यामुळे ही निवडणूक नॅशनल रेल्वे मजदूर युनियनला आव्हानात्मक होती. नॅशनल रेल्वे मजदूर युनियन मात्र कामगारांच्या विश्वासावर एकटी मान्यतेसाठी निवडणूक रिंगणात होती. कामगारांनी या निवडणुकीत आव्हानाला सडेतोड उत्तर देऊन आपला विश्वास,  सर्वधर्म समभाव असलेली व कामगारांचे खरे प्रतिनिधित्व करणाऱ्या सरचिटणीस वेणू नायर यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल रेल्वे मजदूर युनियनला विजय मिळवून दिला.रेल्वे कामगारांचा हा ऐतिहासिक विजय असून, हा विजय आम्ही रेल्वे कामगारांना समर्पित करीत आहोत, अशी प्रतिक्रीया नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे सरचिटणीस वेणू नायर यांनी दिल्याचे कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी सांगितले. नॅशनल रेल्वे फेडरेशन ऑफ इंडिया ला संलग्न असलेली सेंट्रल रेल्वे मंजूर संघटना या संघटनेने आपला संपूर्ण जीव ओतून अनेक राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली असलेल्या कामगार संघटनाला सोबत घेऊन: मान्यता मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. नॅशनल रेल्वे मजदूर युनियन ला मान्यता मिळू नये म्हणूनसर्व संघटना बरोबर हातमिळवणी केली. परंतु कामगारांच्या मनात रुजलेली, भ्रष्टाचारी नसलेली शंभर वर्षाची परंपरा असलेल्या नॅशनल रेल्वे मजदूर युनियनला ४१.५८ टक्के मतदान करून मध्य रेल्वेच्या कामगारांनी मोठे योगदान देऊन विरोधी संघटनांना त्यांची जागा दाखवून दिली. या निवडणुकीत रेल्वे कामगारानी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनवर विश्वास ठेवून आपले बहुमूल्य मतदान केले. त्याबद्दल युनियनचे जनरल सेक्रेटरी वेणू नायर यांनी कामगारांना धन्यवाद देऊन सांगितले की.  रेल्वे कामगारांचा ऐतिहासिक विजय असून, हा विजय  आम्ही रेल्वे कामगारांना समर्पित करीत आहोत यबद्दल. . या निवडणुकीत कामगारांची एकता,  प्रगतीची दिशा दिसून आली. या निवडणुकीत प्रत्येक शाखा, मंडळ,  मुख्यालय व प्रत्येक सदस्यांनी मनापासून काम केले,  त्याचीच ही पोहचपावती आहे. रेल्वे कामगारांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे १६ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता मिरवणूक काढून मध्य रेल्वेत नॅशनल रेल्वे मजदूर युनियनला मिळालेल्या मान्यतेचा हा ऐतिहासिक विजयी सोहळा साजरा करण्यात आला. अशाच प्रकारे विविध ठिकाणी मोर्चे काढून विजय सोहळा, मंडळ व डेपोमधील कार्यकर्त्यांनी साजरा केला.

भाजप सरकारचा फायदा गरिबांना नाही तर मुठभर श्रीमंतानाच-वर्षा गायकवाड

मुंबई : संविधान बदलाचे रक्त काँग्रेसच्या तोंडाला लागले आहे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा खासदार वर्षा गायकवाड यांनी खरपूस समाचार घेतला. काँग्रेसचे रक्त देशाची एकता व अखंडतेसाठी या मातीत…

– वैभव, ओम साईश्वर, सरस्वती, विद्यार्थीची विजयी घोडदौड

किशोर-किशोरी मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा   मुंबई, मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने महाराष्ट्र अॅमॅच्युअर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे १४ वर्षांखालील किशोर-किशोरी (सब ज्युनिअर) मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिर, माटुंगा (प.), मुंबई येथे सुरु आहे. आज झालेल्या किशोरांच्या सामन्यात वैभव स्पोर्ट्स क्लब, ओम साईश्वर सेवा मंडळ, सरस्वती स्पोर्ट्स क्लब, विद्यार्थी क्रीडा केंद्राने विजयी घोडदौड सुरु केली आहे. किशोर गटाच्या उपांत्य फेरीमध्ये ओम साईश्वर सेवा मंडळ विरुद्ध वैभव स्पोर्ट्स क्लब व सरस्वती स्पोर्ट्स क्लब विरुद्ध विद्यार्थी क्रीडा केंद्र असा सामना रंगणार आहे किशोर गटाच्या पहिल्या सामन्यात वैभव स्पोर्ट्स क्लबने सरस्वती मंदिर हायस्कूलचा (६-२-३-३) ९-५ असा ४ गुणांनी पराभव केला. वैभवतर्फे यश यादवने नाबाद ५ मि. संरक्षण करुन आक्रमणात २ गडी बाद केले. सिधांश सावंतने १:३०, २:३० मि. संरक्षण करुन आक्रमणात १ गडी बाद केला. शुभम माळीने १:३० मि. संरक्षण करुन आक्रमणात ४ गडी बाद केले. सरस्वतीतर्फे हार्दिक कारंडेने ३ मि. संरक्षण केले. सार्थक बटावलेने ३:२० मि. संरक्षण केले. किशोर गटाच्या दुसऱ्या सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने स्टुडंट स्पोर्ट्स क्लबचा ८-१ असा १ डाव ७ गुणांनी पराभव केला. ओम साईश्वरतर्फे श्राथिक गामीने नाबाद ७ मि. संरक्षण करुन आक्रमणात २ गडी बाद केले. आरव साठमने ४:३० मि. संरक्षण केले. अदिराज गुरवने आक्रमणात २ गडी बाद केले. स्टुडंटतर्फे दिवेक सिंगने २:१० मि. संरक्षण केले. किशोर गटाच्या तिसऱ्या सामन्यात सरस्वती स्पोर्ट्स क्लबने ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिराचा (१०-२-६) १०-८ असा १ डाव २ गुणांनी पराभव केला. सरस्वती तर्फे महेक अडवडेने ३:३० मि. संरक्षण करुन आक्रमणात ४ गडी बाद केले. शिवम झाने  ३ मॉनिट संरक्षण करुन आक्रमणात १ गडी बाद केला. प्रथमेश तर्पेने २ मि. संरक्षण करुन आक्रमणात २ गडी बाद केले. ॐ समर्थतर्फे निहाल शिंदेने २:३० मि. संरक्षण करुन आक्रमणात ३ गडी बाद केले. देवेंद्र शिंदेने १:३० मि. संरक्षण करुन करुन आक्रमणात २ गडी बाद केले. किशोर गटाच्या चौथ्या सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्रने श्री समर्थ व्यायाम मंदिराचा (२१-१-४) २१-५ असा १ डाव १६ गुणांनी पराभव केला. विद्यार्थी तर्फे अपसर शेखने नाबाद ४:३० मि. संरक्षण करुन आक्रमणात १ गडी बाद केला. आयुष नवलेने २:३० मि. संरक्षण करुन आक्रमणात २ गडी बाद केले. विराज वाघमारेने आक्रमणात ४ गडी बाद केले. श्री समर्थ तर्फे कृशल वाघधरे आक्रमणात ३ गडी बाद केले. किशोर गटाच्या पाचव्या सामन्यात वैभव स्पोर्ट्स क्लबने अमर हिंद मंडळाचा (२-२-६-५) ८-७ असा चुरशीच्या सामन्यात १ गुणाने पराभव केला. वैभवतर्फे यश जाधवने नाबाद ४:२०, नाबाद ३:५० मि. संरक्षण करुन आक्रमणात २ गडी बाद केले. शुभम माळीने १:२०, १:२० मि. संरक्षण करुन आक्रमणात ४ गडी बाद केले. सोहम नार्वेकरने ६:३०, ३,५० मि. संरक्षण करुन आक्रमणात १ गडी बाद केला. संतोष केवटने आक्रमणात २ गडी बाद केले. 00000

डॉ. किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र मोहिमेचा शुभारंभ

अशोक गायकवाड अलिबाग‌ : रायगड जिल्ह्यात कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या हस्ते सोमवारी अलिबाग तालुक्यातील वरसोली येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. सदर मोहीम १६ डिसेंबर ते २० डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणारं असून, या मोहिमेतंर्गत वीटभट्टी, खाणकामगार, स्थलांतरित व्यक्ती, कारागृहातील कैदी, वृध्दाथम, अनाथाश्रम, वसतिगृहातील विद्यार्थी इत्यादींची तपासणी केली जाणार आहे.जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात येणार आहे. कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र मोहिमेतंर्गत नियमित सर्वेक्षणामध्ये कुष्ठरोगाच्या तपासणीपासून वंचित राहिलेल्या घटकांचे सर्वेक्षण, जनजागृती करुन, नवीन कुष्ठरुग्ण शोधून, मोफत बहुविध औषधोपचारांद्वारे संसर्गाची साखळी खंडीत करणे, हा उद्देश ठेवण्यात आला आहे. जिल्हाभरात ३७ हजार ५६८ इतक्या लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये वीटभट्टी, खाणकामगार, स्थलांतरित व्यक्ती, कारागृहातील कैदी, वृध्दाथम, अनाथाश्रम, वसतिगृहातील विद्यार्थी इत्यादींची तपासणी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमेचि शुभारंभ वरसोली येथे करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे, डॉ. प्राची नेहूलकर, डॉ. सचिन संकपाळ, डॉ. अश्विनी सकपाळ उपस्थित होते. 0000