Category: होम

 घनकचरा संकलन व विल्हेवाट लावण्यासाठी मुंबईकरांवर अवाजवी आर्थिक भार कशासाठी?

 वर्षा गायकवाड यांचा सवाल   मुंबई : मुंबई महापालिकेत लोकनियुक्त सरकार नसताना भाजपा युती सरकार प्रशासकामार्फत महापालिकेची तिजोरी आपल्या कंत्राटदार मित्रांचे खिसे भरण्यासाठी रिकामे करत आहे. भ्रष्ट भाजपा युती सरकार यावर कहर करत शहरातील घनकचरा उचलण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ‘युजर फी’च्या नावाखाली मुंबईकरांवर नवीन आर्थिक भार टाकण्याचा प्रस्ताव आणत आहे. कचऱ्याचे संकलन करून त्याची विल्हेवाट लावणे हे मुंबई महानगरपालिकेचे बंधनकारक कर्तव्य असताना मुंबईकरांवर हा अवाजवी आर्थिक भार का लादता? असा प्रश्न विचारुन काँग्रेसचा अशा कोणत्याही प्रस्तावाला ठाम विरोध आहे, असे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड यांनी म्हटले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर तोफ डागत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मोदीनिर्मित महागाई आणि दरवाढीने मुंबईकर आधीच भरडला जात आहे. खाद्यतेल, किराणासह सर्व जिवनावश्यक वस्तू सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. जीएसटी सारख्या गब्बरसिंग टॅक्सने जनतेचे कंबरडे मोडले आहे. महागाईचा सामना करणाऱ्या मुंबईकरांच्या माथी आणखी आर्थिक बोजा पडला तर त्यांना ते परवडणारे नाही. कचरा संकलनासाठी नागरिकांवर अवाजवी भार लावण्याऐवजी मुंबई महानगरपालिका आणि कंत्राटदारप्रेमी भाजपा युती सरकारने व्यवस्थित घनकचरा व्यवस्थापन करण्यावर आधी लक्ष केंद्रीत करावे, असेही खासदार वर्षाताई गायकवाड म्हणाल्या. ०००००

 राष्ट्रीय लोकअदालतला उत्तम प्रतिसाद

 लघुवाद न्यायालयात २१ प्रकरणे निकाली   मुंबई : राष्ट्रीय लोकअदालत कार्यक्रमांला मुंबईतील लघुवाद न्यायालयात उत्तम प्रतिसाद मिळाला असून १८३ पैकी २१ प्रकरणं निकालात निकाली आहेत. त्यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या खटल्यातील न्यायप्रक्रियेतील कार्याला या उपक्रमामुळे गती येत असल्याचे दिसून येत आहे. गिरगावच्या प्रसिद्ध केशवजी चाळीतील काही वर्षे प्रलंबित असलेले एक प्रकरणदेखील निकालात निघाले आहे. लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीकांत एल आणेकर व अतिरिक्त मुख्य न्यायाधीश श्रीमती ए. एस. खडसे, यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतचे काम अतिरिक्त मुख्य न्यायाधीश एस. एस. देशपांडे, न्यायाधीश ए. एस. पंडागळे आणि ए. जे. फटाले, वकील अस्वीनी सिंग आणि पी. पी. तवसाळकर यांनी यशस्वी केले. या उपक्रमाचे यशस्वी आयोजन अप्पर प्रबंधक अतुल राणे आणि आर. के. कुळकर्णी तसेच कर्मचारी वृंद यांनी केले.

वरळीच्या पूनम चेंबरमध्ये आग

मुंबई : वरळीतील पूनम चेंबरमध्ये रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास आग लागली. सात मजली व्यवसायिक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. वरळीतील ऍनि बेझन्ट मार्गावर ऍट्रिया मॉलच्या समोर असलेल्या पूनम…

आरोग्य विभागाने केल्या वर्षभरात १,५८४ बालकांवर हृदय शस्त्रक्रिया!

मुंबई : शहापूर तालुक्यातील दुर्गम गावातील अंगणवाडीत लहान मुलांच्या आरोग्याची तपासणी करताना सचिन कंजारा या तीन वर्षाच्या मुलाच्या ह्रदयाच्या ठोक्यात गडबड असल्याचे डॉक्टरांना आढळून आले. या मुलाला ठाण्यातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये…

ठाण्यात रशियन तरुणींचे मायाजाल

ठाणे : ठाण्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट जोमाने वाढतोय हे पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून समोर येत आहे. ठाण्यातील वागळे स्टेट परिसरात वागळे स्टेट पोलीस पथकाने छापा मारून तीन रशियन व एका…

नाशिक महापालिका खरेदी करणार १२८ अमृत कलश

हरिभाऊ लाखे नाशिक : गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. गोदापात्रावरील पुल, मंदिर, घाट परिसरात अमृत कलश ठेवले जाणार असून, या माध्यमातून नदीपात्रात निर्माल्य टाकण्यापासून रोख‌ले जाणार आहे. पर्यावरण विभागाने १२८ अमृत कलश खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी १७.८० लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. नाशिक शहर हे धार्मिक आणि पौराणिक म्हणून ओळखले जाते. यामुळे या ठिकाणी देशभरातूनच नव्हे, तर परदेशातील अनेक पर्यटक, भाविक भेटी देत असतात. यामुळे नाशिक शहराला पर्यटनस्थळाचा दर्जा देखील प्राप्त होऊ लागला आहे. नाशिक शहरातून दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीमुळे शहराला अनन्यसाधारण महत्व देखील आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून या नदीला प्रदुषणाचा विळखा बसलेला असून, उपनद्या असलेल्या नंदिनी, वाघाडी यांना देखील प्रदुषणाचा सामना करावा लागत आहे. नदी प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने गोदावरी गटारीकरण विरोधी मंचच्या वतीने २०१२ मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून, या समितीकडून प्रदुषण कमी करण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला जातो. गोदावरी व उपनद्यांवर शहर परिसरात अनेक ठिकाणी पूल उभारण्यात आले आहेत. या पुलांवरून ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून नदीपात्रात निर्माल्य तसेच अनेकदा केरकचरा व प्लास्टिक सुध्दा टाकले जाते. रामकुंड परिसरात तसेच विविध घाटांवर देखील भाविक व पर्यटकांकडून नदीपात्रात निर्माल्य टाकले जाते. यामुळे हे निर्माल्य नदीपात्रात पडण्याऐवजी ते अमृत कलशमध्ये टाकले जावे या उद्देशाने मनपाच्या गोदावरी संवर्धन व पर्यावरण विभागामार्फत १२८ अमृतकलश खरेदी केले जाणार आहेत. निर्माल्यासाठी स्वतंत्र घंटागाड्यांची मागणी गोदाघाटावर ठेवण्यात येणाऱ्या अमृत कलशात निर्माल्यादी कचरा टाकला जाणार आहे. या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी दोन ते तीन स्वतंत्र घंटागाड्याची व्यवस्था करण्याची मागणी पर्यावरण विभागातर्फे घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे केली जाणार असल्याची माहिती पर्यावरण विभागाचे उपायुक्त अजित निकत यांनी दिली.

‘मालमत्ता खरेदी करताना’ या पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई : ग्रंथाली प्रकाशन आणि एनसीपीएच्या संयुक्त विद्यमाने माजी सहजिल्हा निबंधक तसेच लेखक धनराज खरटमल यांच्या ‘मालमत्ता खरेदी करताना’ या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्या…

श्री माँ विद्यालयाच्या रौप्य महोत्सवातील 20 वी आंतरशालेय लोकनृत्य स्पर्धा संपन्न

ठाणे : श्री माँ ट्रस्ट संचालित श्री माँ विद्यालय, ऑफ घोडबंदर रोड, पातलीपाडा, ठाणे (प.) या ठिकाणी शनिवारी आंतरशालेय स्तरावर २० व्या वार्षिक लोककला नृत्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले.   ग्रामीण व शहरी…

आंतरमहाविद्यालयीन सुगम गीत गायन स्पर्धेचे आयोजन

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आंतरमहाविद्यालयीन सुगम गीत गायन स्पर्धा संस्थेच्या सभागृहात आयोजित केली आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी शनिवार दिनांक ४ जानेवारी २०२५ या दिवशी सकाळी ९.३० वाजता…

 मार्केटिंगच्या नवनव्या तंत्राची आगरी महोत्सवात तरुणांना ओळख

 प्रसिद्ध यूट्यूबर निकुंज लोटिया -बीयुनीक यांचा टॉक शो   डोंबिवली : डोंबिवलीत सुरू असलेल्या आगरी महोत्सवात प्रसिद्ध यूट्यूबर निकुंज लोटिया-बीयुनीक यांच्या टॉक-शो मध्ये नव्या पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच मार्केटिंगच्या तंत्राची ओळख करुन देण्यात आली. आता सोशल मीडियात `एआय’ची नवी क्रांती येणार असून, नव्या पिढीने `एआय’ तंत्र आत्मसात केल्यास भविष्य उज्जवल होईल, असे आवाहन निकुंज यांनी केले. आगरी समाजाबरोबरच राज्यातील तरुणांना सोशल मीडियाबाबत मार्गदर्शन मिळावे, यासाठी आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, सरचिटणीस रामकृष्ण पाटील यांच्यासह पांडुरंग म्हात्रे, रंगनाथ ठाकूर, दत्ता वझे, जालिंदर पाटील, गजानन मंगरूळकर, बंडू पाटील, भास्कर पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी डोंबिवलीकर रहिवाशी व लाखो फॉलोअर्स असलेल्या निकुंज लोटिया-बीयुनीक यांना निमंत्रित केले होते. मंडळाचे ज्येष्ठ सदस्य शरद पाटील यांनी खुमासदार शैलीत निकुंज यांची मुलाखत घेत सोशल मीडियातील आव्हाने, कार्य आणि अपेक्षित उत्पन्नाबाबत तरुणांच्या विविध प्रश्नांना उत्तरे मिळवून दिली. डोंबिवलीतील रहिवाशी असलेल्या निकुंज लोटिया यांचे जगभर लाखो फॉलोअर आहेत. त्यांची प्रत्यक्ष मुलाखत ऐकण्यासाठी आगरी महोत्सवात तरुणांची गर्दी झाली होती. अत्यंत साध्या सोप्या शैलीत निकुंज यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. आम्ही दहा वर्षांपूर्वी सोशल मीडियावर काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी यूट्यूब हे माध्यम नवीन होते. पण मेहनतीने आम्ही आता स्थिरावलो. पण दररोज आव्हाने उभी आहेत. दर्शकांच्या अपेक्षा वाढत आहेत. सोशल मीडियामध्ये करिअरसाठी येणाऱ्या तरुणांनी आपल्याला अन्य मार्गाने निश्चित उत्पन्न मिळेल, याची तरतूद करावी. त्यानंतर सोशल मीडियात काम सुरू करावे. आता सोशल मीडियात सध्या असलेल्या माध्यमांऐवजी भविष्यात `एआय’ तंत्रज्ञानाचा बोलबाला असेल. त्यात तरुणांनी एकाग्रता व मेहनत घेऊन दररोज एक तास व्हिडिओ पाहून नवे तंत्र आत्समात करावे. नोकिया ही सर्वश्रेष्ठ मोबाईल कंपनी होती. पण अॅड्राईड आल्यानंतर त्यांनी बदल न केल्यामुळे ते नामशेष झाले. त्यामुळे जीवनात बदल हे करीत राहावे, असे आवाहन निकुंज यांनी केले. तुम्ही करीत असलेल्या व्हिडीओमुळे किती जणांचे समाधान होते, ते महत्वाचे आहे. दर्शकांना होणाऱ्या फायद्यातून तुमचे त्यांच्या मनातील स्थान पक्के होईल. दर्शक (व्ह्यूअर्स) वाढविणे, हे टार्गेट ठेवू नये. तुम्ही कामामध्ये उत्साह व नवनव्या कल्पना मांडल्यास तुम्हाला यश मिळेल, असा मंत्र निकुंज यांनी दिला. अविनाश-विश्वजीतच्या संगीताने रसिक मंत्रमुग्ध प्रसिद्ध मराठी चित्रपटातील संगीतकार अविनाश-विश्वजीत यांनी सादर केलेल्या संगीताने रसिक मंत्रमुग्ध झाले. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या प्रायोजकत्वाखाली या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका जुईली जोगळेकर, रोहित राऊत, मनिष राजगिरे, रवींद्र खोमणे, संजना अरुण, प्रणव देहेरकर, साक्षी चौहान यांची सुमधुर गीते, हास्यकलाकार सुप्रिया पाठारे, गौरव मोरे, दिगंबर नाईक आणि प्रणव रावराणे यांच्या विनोदी किस्स्याने हास्याचे फवारे उडाले. अमिशिक कामठे व आरती पानसरे यांनी सादर केलेल्या लावण्यांना `वन्स मोअर’ मिळाला. दीप्ती भागवत यांनी संगीत रजनीचे सूत्रसंचालन केले.