Category: होम

मराठी भाषा टिकविण्यासाठी लेखकांनी मायबोली भाषेत लेखन करावे  – रामदास फुटाणे

मुंबई : महाराष्ट्रात अनेक दिवाळी अंक निघत असून दिवाळी अंक हे महाराष्ट्राचे भूषण आहे, तर देहू व आळंदी ही महाराष्ट्राची विद्यापीठे आहेत.  मराठी भाषा टिकवण्यासाठी लेखकांनी आपले लेख , कथा व…

कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन व आणीबाणी सेवा                                      

कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील खडकपाडा , वायले नगर, कल्याण पश्चिम येथील वरटेक्स सॉलिटेअर ए.१ या इमारतीला आग लागल्याची वर्दी श्री अविनाश या इसमाने भ्रमणध्वनी क्रमांक ९८९२४०९२६० द्वारे दिनांक २६ नोव्हेंबर…

वृद्ध महिलेची ७८ लाखांची सायबर फसवणूक

    मुंबईः आर्थिक गैरव्यवहारात अडकल्याची भीती दाखवून बोरिवलीमधील वृद्ध महिलेची ७८ लाख ७० हजार रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरोधात उत्तर…

 गुटखा माफियांना कोणाचा आशीर्वाद?

मुरबाड शहरी व ग्रामीण भागात राजरोसपणे गुटखा विक्री सुरु मुरबाड : (राजीव चंदने ) संपूर्ण मुरबाड शहरात व तालुक्यात छुपा पद्धतीने राजरोसपणे गुटखा विक्री सुरू याबाबत तालुक्याची कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या मुरबाड पोलिस प्रशासनाला खबर नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गुटखा विक्रीला महाराष्ट्रात बंदी असली तरी तो बिनधास्तपणे दुध डेयरी, पानटपरी व वडापाव गाडीवर चोरून विकला जात आहे. शहरातील रस्ते, शासकीय कार्यालय, बस स्थानक परिसर तसेच अनेक सार्वजनिक ठिकाणी गुटका थुंकल्याचे ताजे ठसे हमखास नजरेस पडत असतात. मुरबाड तालुक्यात किमान दर महिन्याला लाखोंचा गुटखा विक्री होत असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे, या गुटख्याचे होलसेल व्यापारी दररोज तालुक्यातील रस्त्यांवरून या गुटख्याची बिनदास्तपणे वाहतूक करीत असल्याची चर्चा उघड चर्चा आहे. मात्र असे असतांना गेल्या पाच ते सहा वर्षात मुरबाड पोलीस ठाण्यात एक ही गुन्हा दाखल नसल्याची खंत नागरिक करीत आहेत, अनेक वृत्तपत्रात गुटखा माफिया बाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई का झाली नाही? असा सवाल मुरबाड शहरातील शिवसेना पक्षाचे (उ. बा. ठा.) कार्यकर्ते नरेश देसले यांनी उपस्थित केला आहे. शहर व ग्रामीण भागातील गुटखा विक्रेते यांच्या विरोधात आम्ही अनेकदा तक्रारी केल्या परंतु या गुटखा माफियाना पोलिसांचा अभय असल्यामुळे ते बिनधास्त पणे खुलेआम गुटखा विक्री करीत आहेत, या संदर्भात आम्ही मुरबाड पोलीस यांच्याकडे पुन्हा एकदा लवकरच तक्रार करणार आहोत,आणि त्या गुटखा माफियावंर मुरबाड पोलिसांना कडक कारवाई करण्यास भाग पाडू आणि कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करू —–नरेश देसले, शिवसेना(उ.बा.ठा )कार्यकर्ते 000000

 खो-खो स्पर्धेतील अजिंक्यपदामुळे राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा लौकिक कायम

४३ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा सळुग- दुहेरी विजेतेपद मिळविणाऱ्या खेळाडूंचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन मुंबई, :- उत्तरप्रदेशमधील अलिगड येथे पार पडलेल्या ४३ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांनी आणि मुलींनी दुहेरी विजय मिळविल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी दोन्ही संघांचे अभिनंदन केले आहे. खो-खो स्पर्धेतील अजिंक्यपदामुळे या खेळातील महाराष्ट्राचा दबदबा-लौकिक कायम राखला गेला असून त्यामुळे राज्यातील क्रीडा क्षेत्राला आणखी चालना मिळेल आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. अजिंक्यपद खो-खो स्पर्धेतील अभिमानास्पद कामगिरीबद्दल खेळाडू, प्रशिक्षक यांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, उत्तरप्रदेशमधील अलिगडच्या महाराणी अहिल्याबाई होळकर स्पोर्टस्‌‍ स्टेडियम येथे पार पडलेल्या ४३ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेतील विजयामुळे महाराष्ट्राच्या कुमार गटाचे सलग १९वे तर मुलींचे सलग १०वे अजिंक्यपद ठरले आहे, याचा सर्वच महाराष्ट्रीयन जनतेला सार्थ अभिमान वाटत आहे. आतापर्यंत महाराष्ट्राच्या कुमारांनी एकूण ३५ तर मुलींनी एकूण २६ वेळा राष्ट्रीय अजिंक्यपद पटकावले आहे, यातून खो-खो खेळातील महाराष्ट्राचा दबदबा, मेहनत, प्रावीण्य याची प्रचिती येते. या स्पर्धेत धाराशिवच्या जितेंद्र वसावे याला वीर अभिमन्यू तर सुहानी धोत्रे हिला जानकी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करतो. सर्वच विजयी खेळाडूंना, प्रशिक्षकांना उज्ज्वल कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो, असेही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. 0000000

शिवरायांचा अश्वारूढ पुतळा सहा वर्षे अडगळीत,

रेल्वे मंडळाच्या धोरणांमुळे अनावरणात अडसर मुंबई : रेल्वे मंडळाच्या धोरणांमुळे गेली सहा वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा अडगळीत पडून आहे. पुतळा निर्मितीसाठी १.५ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.…

सलग दहाव्यांदा महाराष्ट्राला दुहेरी सुवर्ण मुकुट

४३वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खोखो स्पर्धा धाराशिवच्या जितेंद्र वसावेला वीर अभिमन्यू तर सुहानी धोत्रेला जानकी पुरस्कार   अलिगड, – कुमार व मुलींच्या ४३व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुले व  मुलींच्या संघाने सलग दहाव्यांदा विजेतेपद पटकावित  दुहेरी मुकुटाचा मान मिळविला. अलिगड (उत्तरप्रदेश) येथील महाराणी अहिल्याबाई होळकर स्पोर्टस्‌‍ स्टेडियमवर दुहेरी विजेतेपद मिळवताच खेळाडू व प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.  कुमार गटाचे हे  १९ वे तर मुलींचे १० वे सलग विजेतेपद आहे. या विजयासह महाराष्ट्राच्या कुमारांचे हे एकूण ३५ वे तर मुलींचे २६ वे राष्ट्रीय अजिंक्यपद आहे. शुक्रवारी झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात महाराष्ट्राने दोन्ही गटात ओडिसा संघाला नामवित ही कामगिरी केली. मुलींच्या गटात अश्विनी शिंदेच्या (३.३०, २.३० मि. संरक्षण व २ गुण) अष्टपैलू खेळीमुळे महाराष्ट्राने ओडिसावर २४-२० असा ४ गुण व ५.१० मिनिटे राखून ओडिसाचा धुव्वा उडवत विजय मिळवला. मध्यंतरालाच त्यांनी १४-१० अशी चार गुणांची आघाडी घेतली होती. यात अश्विनीला तन्वी भोसले (२.१० मि. संरक्षण), स्नेहा लामकाने (१.३० मि. संरक्षण), प्रणाली काळे (१.१० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी साथ दिली. त्यानंतरच्या डावात ओडिसाच्या संरक्षकांनी शानदार खेळी करीत लढत देण्याचा प्रयत्न केला. परंतु महाराष्ट्राच्या संरक्षक सुहानी ढोरे (१.२० मि. संरक्षण व ६ गुण) व प्राजक्ता बिराजदार यांनी (२ मि. संरक्षण) दुसऱ्या डावात बहारदार खेळी करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. सानिका चाफे हिने आपल्या धारदार आक्रमणात पहिल्या डावात व दुसऱ्या डावात प्रत्येकी चार खेळाडू  टिपले. ओडिसाच्या अर्चना प्रधान (२.०० मि. ४ गुण ), लीसा राणी (१.०० मि. ६ गुण) यांचे प्रयत्न अपुरे पडले. मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडीसावर ३३-२९ अशी १.३० मिनिटे राखून मात केली व सलग विजेतेपदाचे दावेदार महाराष्ट्रच असल्याचे दाखवून दिले. मध्यंतराची १८-१४ ही चार गुणांची आघाडीच महाराष्ट्राला विजय मिळवून देऊन गेली. महाराष्ट्राच्या विजयात जितेंद्र वसावे (२.३०, १.२० मि. संरक्षण व ४ गुण), कृष्णा बनसोडे (१.४०, १.४० मि. संरक्षण व ४ गुण) यांच्या अष्टपैलू खेळाचा समावेश आहे. पार्थ देवकते व प्रेम दळवी यांनी प्रत्येकी सहा गडी बाद करीत विजयात जोरदार साथ दिली. ओडीसाकडून बापी मुरमु (२.००, १.२० मि. संरक्षण व २ गुण ), सुनील पात्रा (१.३०, १.०० मि. संरक्षण व ६ गुण ) यांची लढत अपुरी पडली. मुलांचे प्रशिक्षक युवराज जाधव व मुलींचे प्रशिक्षक श्रीकांत गायकवाड यांनी विजयानंतर खेळाडूंनी संघभावनेने खेळ केल्याचे सांगितले व यासाठी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे पदाधिकारी पूर्णपणे पाठीशी असल्याने सर्व सुविधा मिळाल्या व विजय सुकर झाल्याचे स्पष्ट केले. —— सुहानी धोत्रे ‘जानकी’, जितेंद्र वसावे ‘वीर ‘अभिमन्यू’चे मानकरी सर्वोत्कृष्ट अष्टपैलू  खेळाडूचा वीर अभिमन्यू पुरस्काराचा जितेंद्र वसावे हा तर सुहानी धोत्रे ही जानकी पुरस्काराची मानकरी ठरली. हे दोघेही धाराशिवचे आहेत. अन्य पुरस्काराचे मानकरी : आक्रमक : प्रेम दळवी (सांगली, महाराष्ट्र), लीसा राणी (ओडीसा), संरक्षक : बापी मुरमु (ओडीसा), तन्वी भोसले (धाराशिव, महाराष्ट्र). —– महाराष्ट्राचे ड्रीम गुणही वसूल यंदाच्या राष्ट्रीय स्पर्धेपासून ड्रीम गुण देण्यास सुरुवात झाली. एका तुकडीत तीन खेळाडू असतात. या तिघांनी मिळून चार मिनिटे  संरक्षण केल्यास एक ड्रीम गुण मिळतो.  त्यानंतर प्रत्येक मिनिटाला ती तुकडी बाद होईपर्यंत एक ड्रीम गुण मिळतो. महाराष्ट्राच्या मुलांनी १ व मुलींनी ४ गुण वसूल केले. ओडीसाच्या मुलांनीही एक गुण कमावला. ——–…

शनिवारपासून थंडी कमी होणार?

गालच्या उपसागरातील वादळाचा थंडीवरील परिणाम मुंबई : नैऋत्य बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अति तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शनिवारपासून (३० नोव्हेंबर) राज्यातील थंडी कमी होण्याचा अंदाज आहे. नाशिक, नगर, पुण्यात गुरुवारीही…

विनाहेल्मेट दुचाकीस्वार व सहप्रवाशावर कारवाईचा बडगा

मुंबईत विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर २ वर्षांत १०७ कोटींचा दंड मुंबई : विनाहेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या सहप्रवाशावर कारवाई करण्याचे आदेश राज्य वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व…

 स्वर्गीय वसंतराव डावखरेंच्या स्मृतिप्रित्यर्थ रविवारी शिक्षकांना वसंतस्मृती पुरस्कार

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यक्रम   ठाणे : विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने कोकणातील १२५ आदर्श शिक्षक व १० आदर्श संस्थाचालकांचा वसंतस्मृती पुरस्कारासह सन्मान करण्यात येणार आहे. ठाण्यातील एम. एच. हायस्कूलमध्ये रविवारी होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असेल. कोकणातील शहरी, सागरी आणि डोंगरी भागात नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम व विद्यार्थी हितासाठी दक्ष असलेले आदर्श शिक्षक व आदर्श संस्थाचालकांचा गौरव व्हावा, यासाठी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी २०१८ पासून वसंतस्मृती शिक्षक पुरस्कार सोहळा सुरू केला आहे. यंदाही कोकणातील शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित केले जाईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवींद्र चव्हाण असतील. तर स्वागताध्यक्ष आमदार निरंजन डावखरे आहेत. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे खासदार हेमंत सवरा, आमदार संजय केळकर, आमदार किसन कथोरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजपा ठाणे शहराध्यक्ष संजय वाघुले, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, कोल्हापूर येथील श्री स्वामी विवेकानंद संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजनक विकास पाटील, एन. एम. भामरे, सचिन बी. मोरे, ज्ञानेश्वर घुगे उपस्थित असतील. या कार्यक्रमाची किशोर पाटील, विनोद शेलकर, संभाजी शेळके, सुभाष सरोदे, रमेश शर्मा, मुकेश पष्टे यांच्याकडून तयारी करण्यात येत आहे. 000000000