Category: होम

 कचरा संकलनात हलगर्जीपणा

केडीएमसीकडून या 3 प्रभागातील कंत्राटदाराचा ठेका रद्द   कल्याण : कचरा संकलनात हलगर्जीपणा करणाऱ्या 3 प्रभाग क्षेत्रातील खासगी कंत्राटदाराचा ठेका रद्द करण्याचा निर्णय केडीएमसी प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या तिन्ही प्रभागांमध्ये आता केडीएमसी प्रशासनाकडूनच सकाळऐवजी दुपारच्या सत्रात कचरा संकलन केले जाणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी केले आहे. तसेच केडीएमसी क्षेत्रात सात प्रभागांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या नविन खासगी एजन्सीचे कामही लवकरच सुरू होणार असून त्यानंतर हा सर्व प्रश्न मार्गी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील बी, डी आणि जे या तीन प्रभागक्षेत्र कार्यालयांतर्गत कचरा संकलनासाठी आर अँड बी कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. मात्र या कंपनीकडून जुन्या झालेल्या कचऱ्याचा गाड्या, सतत उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्या आणि नादुरुस्त असलेल्या गाड्यांमुळे या तिन्ही प्रभागांतील कचरा संकलनावर मोठा परिणाम झाला होता. या प्रभागातील कचरा संकलन व्यवस्थित होत नसल्याबद्दल अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी केडीएमसी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्यावर केडीएमसी प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराला रीतसर नोटीसही बजावली होती. मात्र त्यानंतरही परिस्थितीत कोणतीच सुधारणा न झाल्याने अखेर या कंत्राटदाराचा ठेका रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी दिली. तसेच त्यांच्याऐवजी आता केडीएमसीच्या सफाई कर्मचारी आणि यंत्रणेकडूनच बी डी आणि जे प्रभागांमध्ये कचरा संकलन केले जाणार आहे. मात्र हे काम सकाळऐवजी दुपारी 2 ते रात्री 10 या वेळेमध्ये केले जाणार असून त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन अतुल पाटील यांनी केले आहे. तसेच केडीएमसी क्षेत्रातील ए बी आणि सी हे तीन प्रभाग वगळता उर्वरित 7 प्रभगांतील कचरा संकलन, वाहतूक आणि प्रक्रिया पद्धतीसाठी नविन एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या दोन ते अडीच महिन्यांमध्ये या एजन्सीचे काम सुरू होणार असून त्यानंतर या सातही प्रभागातील सफाई कर्मचारी आणि इतर यंत्रणा केडीएमसी प्रशासनाकडून ए बी सी प्रभागांमध्ये वळवण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात ही यंत्रणा उपलब्ध झाल्यानंतर या तिन्ही प्रभागांमध्ये आणखी चांगल्या पद्धतीने साफ सफाई आणि स्वच्छतेचे नियोजन करणे शक्य होणार असल्याची महत्त्वाची माहितीही उपायुक्त अतुल पाटील यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर ही सर्व नविन यंत्रणा कार्यान्वित होईपर्यंत ब, ड आणि जे प्रभागातील नागरिकांनी काही काळ कळ सोसून महापालिका प्रशासनाला आवश्यक सहकार्य करावे. तसेच कचरा संकलन करणारी गाडीला उशिरा झाल्यास रस्त्यावर, मोकळ्या जागेमध्ये किंवा उघड्यावर कचरा न टाकण्याचे करण्याचे आवाहनही उपायुक्त  अतुल पाटील यांनी केले आहे. 0000

सरपंच हत्याकांड प्रकरणी ‘ग्रामपंचायत बंद’ यशस्वी

मुंबई / रमेश औताडे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाल्यामुळे दोषीवर कडक कारवाई करावी व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी संरक्षण कायदा करावा या मागणीसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने गुरुवारी एक दिवस राज्यभरातील ग्रामपंचायत बंद करण्याचे आंदोलन केले. राज्यातील अनेक जिल्ह्यांतील बहूतांश सर्व ग्रामपंचायतीने बंद पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे . राज्यातील सुमारे १५ हजार ग्रामपंचायतीमध्ये स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहून ग्रामपंचायत काम बंद आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायती बंद राहिल्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे निर्माण झालेला असंतोष ग्रामीण महाराष्ट्रात दिसून आला. तसेच सरपंच व त्यांचे सहकारी कर्मचारी हेही त्यांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायद्यासाठी आक्रमक झाल्याचे चित्र राज्यभर दिसून आले. सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सुचने नुसार राज्यातील सर्वच विभागात प्रत्येक जिल्ह्यात ग्रामपंचायतीने उत्स्फूर्तपणे बंद पळून त्याला चांगला प्रतिसाद दिला. राज्यातील सरपंच उपसरपंच कर्मचारी काही गावातील गावगुंडा पासून भयभीत झालेले आहेत समाजसेवा करताना अनेक जण यांच्या दबावाखाली काम करत आहेत तेलंगणा व राजस्थान मधील न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे सरपंचाच्या फिर्यादी नुसार शासकीय कामातील अडथळ्याचा गुन्हा गाव गुंडावर दाखल करावा अशी मागणी केली. 0000

 ठाणे युवा क्रिकेटपटू ‘यशस्वी भूपेंद्र कुमार जयस्वाल’ यांचा शिव गौरव पुरस्काराने सन्मान

 ११वा वार्षिक ‘विहंग संस्कृती आर्ट्स फेस्टिव्हल २०२५’ युवकांच्या प्रतिभेला सलाम आणि भारतीय संविधानाला आदरांजली देत, ११वा वार्षिक ‘विहंग संस्कृती आर्ट्स फेस्टिव्हल २०२५’ ठाण्यात साजरा होणार आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली संस्थापक अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनात आणि संस्कृती आर्ट्स फेस्टिव्हल टीमच्या प्रयत्नांमुळे या वर्षीचा कार्यक्रम एका ऐतिहासिक क्षणाला साक्षी ठेवणार आहे – शिव गौरव पुरस्कार २०२५चा मानकरी ठरले आहेत भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख तारा यशस्वी जयस्वाल. यशस्वी जयस्वाल हे स्फोटक फलंदाजी आणि अपराजित निर्धारासाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या आयपीएलमधील विक्रमी कामगिरीसह त्यांनी क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे – कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध १३ चेंडूत वेगवान पन्नाशी पूर्ण करण्याचा विक्रम आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सकडून १२४ धावांची भव्य खेळी केली. ही खेळी संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या न खेळलेल्या खेळाडूंच्या विक्रमात नोंदली गेली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट सामन्यांत ८२ आणि ८४ धावा तसेच सराव सामन्यात ४५ धावांच्या योगदानाने त्यांनी संघाच्या यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या या अद्वितीय कामगिरीसह नम्रता आणि क्रीडासंस्कारांमुळे त्यांना शिव गौरव पुरस्कार २०२५ देण्यात येणार आहे. हा मानाचा पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केला जाणार आहे. हा सोहळा ११ जानेवारी २०२५ रोजी उपवन तलाव, ठाणे येथे संपन्न होणार आहे. ‘यशस्वी जयस्वाल यांना शिव गौरव पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. ते भारतीय तरुणांसाठी प्रेरणादायक आहेत,’ असे प्रतिपादन संस्कृती आर्ट्स फेस्टिव्हलचे संस्थापक-अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. विहंग संस्कृती आर्ट्स फेस्टिव्हल २०२५ बद्दल: संस्कृती आर्ट्स फेस्टिव्हल टीमच्या आयोजनाखाली ११वा वार्षिक विहंग संस्कृती आर्ट्स फेस्टिव्हल १० जानेवारी ते १३ जानेवारी २०२५ दरम्यान ठाण्यातील उपवन तलावाच्या किनारी साजरा होणार आहे. हा उत्सव भारतीय सांस्कृतिक विविधतेचे प्रतिबिंब आहे आणि संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या कलासंवर्धनासाठीच्या दृढ बांधिलकीचे प्रतीक आहे. फेस्टिव्हलमध्ये पारंपरिक संगीत, बॉलीवूड, लोककला आणि आधुनिक नृत्यसंगीताचे अप्रतिम सादरीकरण होणार आहे.

हवेच्या गुणवत्ता वाढीकडे लक्ष देत डीप क्लिनींग मोहीमेचे सर्वत्र आयोजन

नवी मुंबई : स्वच्छतेइतकेच पर्यावरणाकडे लक्ष देत नवी मुंबई महानगरपालिकेच्या आठही विभागांमध्ये सखोल स्वच्छता मोहीमांना सुरूवात करण्यात आलेली आहे. या अंतर्गत वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी असते असे शहरातील मुख्य रस्ते,…

लिबरल आयकॉन… ते खलनायक

  जस्टिन ट्रुडो नेता होण्यापूर्वी व्हँकुव्हरमध्ये शिक्षक होते. त्यांनी चित्रपटांमध्येही काम केले. ‘द ग्रेट वॉर’ हा त्यांचा लक्षात राहिलेला चित्रपट. त्यानंतर २००८ मध्ये त्यांनी कॅनडाच्या संसदेत लिबरल पक्षाचे सदस्य म्हणून…

करमहसुलात समाधानकारक वृद्धी

करमहसूल लक्षणीयरीत्या वाढणे ही स्वागतार्ह बाब आहे. अप्रत्यक्ष करांऐवजी प्रत्यक्ष करांमधून मिळणारा महसूल वाढणे, ही अधिक चांगली बाब आहे. अलिकडेच अग्रिम करसंकलन 21 टक्क्यांनी वाढून साडेसात लाख कोटी रुपयांवर गेले.…

गोड गळ्याचे गायक; येसुदास

आज १० जानेवारी हिंदी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम गायक आणि संगीतकार येसुदास यांची ८५ वाढदिवस. हिंदी चित्रपट सृष्टीत ज्या गायकांनी आपल्या मधुर आवाजाने ठसा उमटवला त्यात येसुदास हे एक महत्वाचे नाव.…

वाढते चेंगराचेंगरीचे प्रकार अत्यंत चिंताजनक

आंध्रप्रदेशातील प्रसिद्ध तिरूपती बालाजी मंदिराजवळ वैकुंठ व्दार दर्शनाच्या टोकन वितरण केंद्रावर झालेल्या चेंगराचेंगरीत बुधवार दिनांक ८ जानेवारी २०२५ ला ६ जणांचा मृत्यू झाला तर ४० हुन अधिक गंभीर जखमी झाले.ही…

१ व्या संस्कृती आर्ट फेस्टिवलचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते होणार उद्घाटन – मंत्री प्रताप सरनाईक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये सहभागी होणार अनिल ठाणेकर ठाणे : ठाणेकरांसाठी एक खास सांस्कृतिक पर्वणी ठरू पाहत असलेल्या विहंग ‘संस्कृती आर्ट फेस्टिवल’ चे आयोजन १०…