Category: होम

 ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून ११ शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू

ठाणे : जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत ११ शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया नोव्हेंबर, २००५ पूर्वी सुरू झाल्यामुळे ११ शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे.  ठाणे गिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या मात्र नोव्हेंबर २००५ पूर्वी भरती प्रक्रिया सुरू झालेल्या शिक्षकांना यापूर्वी परिभाषित अंशदान योजना लागू करण्यात आली होती. मा. उच्च न्यायालयाने एका याचिकेत या शिक्षकांच्या सेवेबाबत पडताळणी करून जुनी निवृत्ती वेतन योजना लागू होते किंवा कसे याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने संबंधित शिक्षकांची सुनावणी घेऊन कागदपत्रे पडताळणी अंती या ११ शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया नोव्हेंबर, २००५ पूर्वी सुरू झाल्यामुळे ११ शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे.याबाबत विशेष पाठपुरावा प्रत्येक सोमवारी आढावा बैठक घेऊन शिक्षकांचा बराच काळ प्रलंबित असलेले विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न जिल्हा परिषदे मार्फत करण्यात येत आहेत. कामकाजाचा वेळोवेळी पाठपुरावा होत असल्याने ११ शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे.  याबाबत संबंधित शिक्षक व शिक्षक संघटना यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी (प्राथ) बाळासाहेब राक्षे यांचे आभार व्यक्त केले आहेत. 000000

वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ ४२६ शिक्षकांना मंजूर

ठाणे : राज्यात २०१४ मध्ये सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला असून जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभागातील ४२६ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदे मुख्य कार्यकारी…

वंचितांचा रंगमंच शहरी व ग्रामीण भागात अभिव्यक्ती प्रेरणेसाठी महत्त्वाचा – ॲड. इंदवी तुळपुळे

ठाणे : ठाण्यासारख्या मोठ्या शहरातील वस्ती मध्ये विचारांना चालना देणारा वंचितांचा रंगमंच उपक्रम ११ वर्ष सातत्याने चालू राहणे हे त्या समाजातील मुलांच्या वैचारिक प्रगतीसाठी अतिशय महत्वाचे आहे. छोटी शहरे आणि…

 ‘नितेश राणेंनी सर्वच मर्यादा ओलांडल्या’

बाळासाहेब थोरातांची खरमरीत टीका  मुंबई : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मंत्री नितेश राणे यांनी केरळ राज्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन टीका केली आहे. नितेश राणे यांनी काल सासवडमध्ये बोलताना केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान असल्याचं…

वाल्मिक कराडला कोणत्याही क्षणी अटक होणार ?

स्वाती घोसाळकर मुंबई_: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा आका असणा-या वाल्मिक कराडला कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. या हत्या प्रकरणातील तीन आरोपी अजूनही फरार असून…

मुरबाड रस्त्यावरील लांबलचक खड्ड्यांमुळे प्रवासी त्रस्त

कल्याण – कल्याण शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरबाड-शहाड रस्त्यावर प्रेम ऑटो चौक येथे काही यंत्रणांनी भूमिगत सेवावाहिन्या टाकण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून खोदून ठेवले आहे. खोदाई केलेला भाग पेव्हर ब्लॉक किंवा काँक्रीटने…

अखिलेश शुक्लासह सात जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

कल्याण : येथील पश्चिमेतील योगीधाम आजमेरा हाईट्स गृहसंकुलातील मराठी कुटुंबीयांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल प्रकरणातील शासकीय सेवेतील पर्यटन अधिकारी (निलंबित) अखिलेश शुक्ला यांच्यासह सात जणांना रविवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातील सुट्टीकालीन न्यायाधीशांनी चौदा दिवसांची पोलीस…

छतावरील सौरऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राची ‘पॉवरफुल’ कामगिरी 

केंद्राकडून मिळाली २६० कोटींची प्रोत्साहनपर रक्कम मुंबई : राज्यात आतापर्यंत २,३७,६५६ वीज ग्राहकांनी छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले असून त्यांची एकूण क्षमता २,७३८ मेगावॅट आहे. घरांच्या छतावर सौर पॅनेल बसवून वीजनिर्मिती करण्यात उत्तम…

नवीन वर्षाच्या स्वागताच्या वेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त

सुरक्षेसाठी 12 हजार पोलीस तैनात मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतवेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. 8 अप्पर पोलिस आयुक्त, 29 पोलिस उपायुक्त, 53 सहाय्यक पोलिस आयुक्त, 2184 पोलिस अधिकारी आणि 12 हजार 48 पोलिस अंमलदार गस्तीवर असणार आहेत, अशी माहिती…