Category: होम

खर्चिक प्री-वेडींगला आगरी समाजाचा विरोध

बदलापूर : दिमाखदार लग्न सोहळ्यासोबतच गेल्या काही वर्षात प्री-वेडींग अर्थात लग्नपूर्व चित्रण करण्याची पद्धत वाढली. यात मोठा पैसा खर्च होतो. तसेच हे आपल्या संस्कृतीला शोभणारे नाही. त्यामुळे आगरी विवाहांमध्ये असे…

सोमवती अमावस्येनिमित्त गोदावरीच्या रामकुंडावर स्नानासाठी गर्दी

हरिभाऊ लाखे नाशिक : सोमवती अमावास्येला धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्व असून या वर्षाच्या यंदाची शेवटची सोमवती अमावस्या असून ती मार्गशीर्ष महिन्यात आल्याने हा मुहूर्त विशेष मानला जात आहे. ही संधी साधण्यासाठी सोमवारी पहाटेपासून रामकुंडावर भाविकांनी गोदा स्नानासाठी सकाळपासूनच गर्दी केली आहे. भाविक स्नान करून कपालेश्वर व बाणेश्वर महादेव मंदिरात जाऊन मनोभावे शिवपूजन करीत आहेत. महिला भाविकांची संख्या लक्षणीय असून पहाटेपासूनच गोदावरीपूजन व देशदर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली पहावयास मिळत आहे. हिंदू धर्मात अमावस्येच्या तिथीला खूप महत्व आहे. पंचांगानुसार प्रत्येक अमावस्येचे वेगळे नाव वैशिष्ट्य आणि महत्व आहे. मात्र, काही अमावस्यांना विशेष महत्व आहे. त्यापैकीच सोमवती अमावस्या एक आहे. जी अमावस्या सोमवारी येते तिला सोमवती अमावस्या म्हटले जाते. सोमवती अमावस्येला अनन्य साधारण महत्त्व हिंदू धर्मात आषाढी ते कार्तिक या चातुर्मासात भगवंत उपासना सांगितली आहे. मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या सोमवती अमावस्येला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. सोमवती अमावस्येला महत्त्व असून, या दिवशी शिव आराधना केली जाते. यादिवशी शिव शंकराचे पंच महाभूतात्मक पंचमुख दर्शन होत असल्याचे, ज्योतिषाचार्य सांगतात. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे सोमवती अमावस्येला दान व स्नान आदींचे महत्व असून, यादिवशी शिव शंकराची मनोभावे पूजा अर्चा केली जाते. सोमवती अमावस्या असल्याने गोदावरी नदीवरील रामकुंडावर भाविक स्नानासाठी हजर होत असून गोदाघाटावर होणारी गर्दी लक्षात घेता पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून होत आहे. काही भाविकांकडून फुले व दीप गोदेच्या प्रवाहात सोडले जात असल्याने निर्माल्य हे अमृतकलशामध्ये टाकण्याचे आवाहन करण्यात येत असून गोदावरीचे पावित्र्य जपण्याचे आवाहन पुरोहित संघ आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समितीकडून करण्यात आले आहे. विशेषतः महिला भाविक स्नान करून बाणेश्वर व कपालेश्वर महादेव मंदिरात जाऊन पूजा करून दर्शन घेत आहेत. कपालेश्वर मंदिरात यानिमित्ताने भाविकांची दर्शनासाठी गर्दी पहावयास मिळत आहे. भविकांची होणारी गर्दी लक्षात घेता या परिसरात पंचवटी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. ०००००

महापालिकेच्या डास प्रतिबंधाच्या नियमास गृहसंस्थांचा विरोध

 कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील ५० पेक्षा अधिक सदनिका असलेल्या गृहसंकुलांनी अधिकृत पेस्ट कंट्रोल एजन्सी नेमून डास आळीनाशक औषधांची फवारणी करण्याचे परिपत्रक महापालिका प्रशासनाने काढल्यानंतर यास आता गृहनिर्माण संस्थेच्या संघटनेने विरोध केला आहे. परिपत्रकानुसार गृहसंकुलात डासांच्या आळ्या आढळल्यास दंडही भरावा लागणार आहे. महापालिकेच्या या परिपत्रकाचा गृहनिर्माण संस्थेच्या संघटनेने विरोध केला आहे. तसेच महापालिकेच्या कारवाईला देखील सामोरे जाण्याचा तयारी दर्शविली आहे. तसा ठरावच संघटनेने केला. संघटनेच्या या निर्णयास ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. महापालिकेच्या निर्णयामुळे आता वाद पेटण्याची चिन्हे आहेत. दि ठाणे ड्रिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन आणि ठाणे जिल्ह्याच्या सहकार विभागाच्या वतीने सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अधिवेशन भरविले होते. यावेळी गृहनिर्माण संस्थांचा पूनर्विकास, समस्या याविषयी संस्थांतील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ठाणे महापालिका क्षेत्रात डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेकडून फवारणी केली जाते. महापालिकेने नुकताच एक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, ५० पेक्षा जास्त सदनिका असलेल्या गृहसंकुलांना स्वत:च डास प्रतिबंधक फवारणी करावी लागणार आहे. तसेच डासांच्या आळ्या आढळल्यास दंडही भरावा लागणार आहे. महापालिकेने गृहनिर्माण संकुलांना नोटीसा देखील बजावल्या आहेत. या निर्णयास दि ठाणे ड्रिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन या गृहनिर्माण संस्थेच्या संघटनेने विरोध केला. संमेलनामध्ये फेडरेशनचे महापालिकेच्या परिपत्रकाचा विषय निघाला. फवारणीचा खर्च उचलणार नाही. गुन्हा दाखल झाल्यास त्यास आम्ही तयार आहोत. लोकप्रतिनिधींनी हा विषय प्राधान्यांने मांडायला हवा असे ते म्हणाले. यास खासदार नरेश म्हस्के आणि आमदार संजय केळकर यांनीही पाठिंबा दिला. फवारणी करण्यासाठी महापालिका पत्रक काढत असेल तर नागरिकांनी हे पैसे भरू नका असे म्हस्के म्हणाले. असे परिपत्रक महापालिकेने तातडीने रद्द केले पाहिजे. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. तातडीने हे परिपत्रक रद्द करून घेऊ असेही केळकर म्हणाले. कचरा, मलनिस्सारण वाहिन्या, रस्ते आम्हीच स्वच्छ करायचे. आता डासांचा प्रतिबंधही आम्ही करायचा, मग महापालिका केवळ दंड लावून कर घेणार का? ठाणे महापालिकेच्या निर्णयाला आमचा पूर्णत: विरोध आहे. -सिताराम राणे, अध्यक्ष, दि ठाणे ड्रिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन. मुख्यमंत्र्यांचा मोबाईलद्वारे संवाद देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे केंद्र सरकारने सात दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. या कार्यक्रमास भाजपचे आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते. फडणवीस यांनी दरेकर यांच्या मोबाईलवर संपर्क साधून उपस्थितांशी संवाद साधला. या संमेलनातील निर्णय, अडचणींबाबत मुंबईत बैठक बोलविणार असल्याचे फडणवीस म्हणाले. तक्रारीत ठाणे जिल्हा अग्रेसर कोकण विभागातील गृहनिर्माण संस्थेच्या तक्रारींपैकी ८० टक्के तक्रारी या ठाणे जिल्ह्यातील असतात. यामध्ये निवडणुक, परिक्षण, विशेष सभा, पूर्नविकास या विषयांवरील तक्रारी अधिक आहेत. कायद्याच्या अभावामुळे या तक्रारी वाढलेल्या दिसून येते. गृहनिर्माण सोसायट्यांमधील पदाधिकारी आणि तक्रारदारांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळेच तक्रारी वाढत असल्याचे सहकार विभागाचे सह-निबंधक मिलिंद भालेराव यांनी सांगितले. जिल्ह्यात ३० हजाराहून अधिक सोसायट्या आहेत त्यापैकी केवळ ५० टक्केच सोसायट्यांचे परिक्षण झाले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 00000

मुंबई नाशिक महामार्गावर कारला लागलेल्या आगीमळे महामार्गावर वाहतुक कोंडी

ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील दिवे अंजूर भागात सोमवारी सकाळी एका कारला अचानक आग लागली. या घटनेमुळे परिसरात वाहतुक कोंडी झाली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या…

‘माझ्या हत्येचा कट रचणाऱ्यांना सोडणार नाही’

अंबरनाथ : ‘माझ्या हत्येचा कट रचणाऱ्यांना सोडणार नाही,’ अशी संतप्त प्रतिक्रिया अंबरनाथचे डॉ. बालाजी किणीकर यांनी दिली आहे. किणीकर हे लातूरहून अंबरनाथमध्ये परतल्यानंतर अंबरनाथ पोलिसांनी त्यांची भेट घेतली. किणीकर यांच्या…

डोंबिवलीत रिजन्सी, गोळवली, दावडीकडे जाणाऱ्या रिक्षा चालकांची मनमानीने भाडेवाढ

डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाकडून रिजन्सी गृहसंकुल, दावडी, गोळवली, सोनारपाडा दिशेने जाणाऱ्या रिक्षा चालकांना गेल्या काही दिवसांपासून अचानक पाच ते दहा रूपयांची वाढ केली आहे. रिक्षा संघटना, उपप्रादेशिक परिवहन…

भालचंद्र पाटील यांना आगरी समाजभूषण प्रदान

कल्याण : मुंबईत १९३५ साली स्थापन झालेल्या आगरी समाज संघ यांच्या विद्यमाने समाज मोहोत्सव साजरा करण्यात आला. त्या समयी समाजातील विविध क्षेत्रात सामाजिक कार्यकरणाऱ्या अनेक बांधवांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये…

‘जेबीएसपी’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

पनवेल : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच झाली.या सभेत संस्थेच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली…

कल्याण परिमंडळ 3 मध्ये नशेखोरांविरोधात कारवाई सुरूच

 रविवारी 108 नशेखोरांवर आणि 92 मोटारसायकलस्वारांवर कारवाई  कल्याण : अल्पवयीन मुलीची हत्या आणि इतर वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांनंतर कल्याणचे पोलिस उपायुक्त अतूल झेंडे यांनी पोलीस प्रशासनाला चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आणल्याचे दिसत आहे. कल्याणच्या विविध भागांमधील नशेखोरांना ताब्यात घेत डीसीपी अतुल झेंडे यांनी चांगलाच इंगा दाखवला. पोलीसी खाक्या दाखवण्यासह अनेक नशेखोरांना उठाबशा काढायला लावल्या आणि पोलीसांनी त्यांची वरातही काढल्याचे दिसून आले. पोलीस उपायुक्तांच्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून अशा प्रकारची कारवाई सतत सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. कल्याण परिमंडळ 3 मधील विविध पोलीसस्टेशन अंतर्गत मोकळी मैदानी, निर्जनस्थळे व रोडवरील आस्थापना यांच्यावर पोलिसांतर्फे धडक कारवाई सुरू असून रविवारी रात्री या ठिकाणी एकुण 108 नशेखोरांविरोधात कारवाई करण्यात आली. तसेच रोडवरील अती वेगाने मोटार सायकल चालवणे आणि ट्रिपल सीट वाहन चालवणे अशा एकूण 92 कारवाई कल्याणमध्ये पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. पोलिसांची धडक कारवाई मोहिम अशीच सुरू राहणार  असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. पोलिसांच्या या कारवाई सत्रामुळे नशेखोरांचे मात्र धाबे दणाणले आहेत.

ठाण्याच्या अतिरिक्त पाण्यासाठी मुंबई महापालिकेच्या हालचाली..

 आमदार संजय केळकर यांची दोन्ही महापालिका अधिकाऱ्यांशी संयुक्त बैठक अनिल ठाणेकर मुंबई महानगरपालिकेच्या कोट्यातून ठाणे महापालिकेला अतिरिक्त ५० एमएलडी पाणी मिळावे यासाठी आमदार संजय केळकर यांनी आज दोन्ही महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची मुंबईत संयुक्त बैठक घेतली. यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अधिकाऱ्यांना तांत्रिक अडचणी दूर करून कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. ठाण्याला विशेषतः घोडबंदर परिसर, बाळकुम, कोलशेत, ढोकाळी आदी भागात पाणीटंचाई भेडसावत आहे. अशात आणखी नवनवीन गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे भविष्यात पाण्याचा तुटवडा आणखी मोठ्या प्रमाणात भासणार आहे. त्यादृष्टीने आमदार संजय केळकर यांनी  अधिवेशनात अनेकवेळा वाचा फोडली असून ठाणे महापालिकेसह मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला आहे. सोमवारी केळकर यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच पाणी पुरवठा विभागाची जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचीही भेट घेतली. त्यानंतर  मुंबई महापालिकेचे उपजल अभियंता (प्रचालने) पराग शेठ, कार्यकारी अभियंता जयंत खराडे, प्रकाश खराडे, ठाणे महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार, श्री.कुलकर्णी यांची संयुक्त बैठक घेऊन चर्चा केली. ठाणे शहराला मुंबईकडून मिळणाऱ्या नियोजित ५० एमएलडी पाण्यापैकी २५ एमएलडी पाणी आधी तातडीने मिळावे याबाबत श्र.केळकर यांनी आग्रह धरला. अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी ठाणे महापालिकेला अतिरिक्त पाणी देता येईल असे सांगितले. याबाबत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.याबाबत आमदार संजय केळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अतिरिक्त पाण्याबाबत मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी या आधी ठाणे महापलिकेचे आयुक्त म्हणून काम केले असल्याने त्यांना ठाणे शहराच्या पाणी पुरवठ्याची माहिती आहे. त्यांनी ठाण्याला अतिरिक्त पाणी देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले. यावेळी ठाणे महापालिकेला कशा पद्धतीने अतिरिक्त पाणीपुरवठा करायचा यावर चर्चा झाली. मुंबई महापालिकेचे वरळी येथे पाणी पुरवठा विभागाचे नियोजन केंद्र असून तेथील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या ठाण्याला तातडीने २५ एमएलडी पाणी निश्चित मिळेल, असा विश्वास केळकर यांनी सांगितले.