Category: होम

मुंब्य्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारावा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव कमिटीची निवेदनाद्वारे मागणी       मुंब्रा : शहरातील तमाम आंबेडकरी जनतेची तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव कमिटी मुंब्रा-कौसा कमिटीची अनेक वर्षापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा मुंब्रा शहरामध्ये उभारावा अशी मागणी होती, त्यासाठी सदर कमिटीतर्फे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना निवेदनातर्फे मागणी करण्यात आली असून लवकरच पुतळा उभारण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच माजी गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही निवेदन देण्यात आले. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनाही निवेदन देण्यात आले आहे. अशी माहीती मुंब्य्रातील युवा नेतृत्त्व बुद्धभूषण गोटे यांनी दिली. निवेदन देण्यासाठी समाजसेवक भुजंग साळवी, संतोष भालेराव, अनिता साळवी, जितू अडांगळे, दीपक साळवी, मयूर कांबळे, धीरेंद्र मिश्रा, श्री. सिंग, कुणाल निकाळे, शनिदास कांबळे, किरण गोटे आदी उपस्थित होते. 00000

 ‘खारफुटी पर्यावरणशील संवर्धन दिन’ साजरा

ऐरोली खाडीकिनारा स्वच्छ करत लोकसहभागातून   नवी मुंबई : युनेस्कोने जाहीर केल्याप्रमाणे 26 जुलै रोजी जगभरात ‘खारफुटीच्या पर्यावरणशील संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय दिन’ साजरा होत असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही ऐरोली सेक्टर 10 येथील खाडीकिनारी विद्यार्थी व नागरिकांच्या सहयोगातून खारफुटीच्या संरक्षण संवर्धनाकरिता खाडीकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत सफाई अपनाओ बिमारी भगाओ अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून माझी वसुंधरा अभियानाचेही विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला विस्तृत असा खाडीकिनारा लाभला असून त्याची स्वच्छता रहावी व त्याचा उपयोग खाडीकिना-यांच्या पर्यावरण संरक्षणाला व्हावा या भूमिकेतून ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम राबविण्यात आली असून ऐरोलीचे विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त श्री. अशोक अहिरे, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. सतिश सनदी व उप मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र इंगळे यांच्या माध्यमातून या विशेष स्वच्छता मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक, विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतामित्र यांचेसह वनशक्ती स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख श्री.विकी पाटील व त्यांचे सहकारी तसेच घाटकोपर येथील झुनझुनवाला महाविद्यालयाचे एनएसएस विद्यार्थी, शिक्षक यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. या खाडीकिना-याच्या विशेष स्वच्छता मोहीमेत 60 गोणी प्लास्टिक बाटल्या, प्रतिबंधात्मक प्लास्टिक, चपला तसेच तत्सम कचरा गोळा करण्यात आला. याप्रसंगी माझी वसुंधरा अभियान आणि प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर टाळण्याची शपथ घेण्यात आली. त्याचप्रमाणे खारफुटी जतन व संवर्धन करण्याचे महत्व सांगण्यात आले. ००००

शहापूर तालुक्यातील धबधबे बंद

खर्डी : चार ते पाच वर्षांपासून शहापूर तालुक्यातील धबधब्याच्या पाण्यात ठिकठिकाणी अनेकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे या वर्षी खबरदारीची उपाययोजना म्हणून तालुक्यातील धबधब्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधक उपाय म्हणून ३१ ऑगस्टपर्यंत पर्यटकांना…

जुन्या पेन्शनसाठी दंडवत आंदोलन

पालघर : राज्यातील सरकारी-निमसरकारी अधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तत्काळ लागू करा, या मागणीसाठी पालघर जिल्ह्यातील हजारो कर्मचाऱ्यांनी काल भरपावसात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ रस्त्यावर दंडवत आंदोलन केले. ‘एकच मिशन-जुनी…

मोखाड्यातील १७ गावपाडे दरडीच्या सावटाखाली

मोखाडा, ता. २८ : तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण आणि दरी डोंगरात वसलेल्या मोखाडा तालुक्यात १७ गावपाडे डोंगराच्या पायथ्याशी व माथ्यावर…

दहीहंडी उत्सवाची राष्ट्रीय खेळ म्हणून ओळख होण्यासाठी ‘प्रो गोविंदा सीझन’ – पुर्वेश सरनाईक

अनिल ठाणेकर     ठाणे : दहीहंडी उत्सव हा केवळ पारंपारिक खेळ म्हणून नव्हे तर या खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी प्रो गोविंदा सीझन या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मातीपासून ते मॅटपर्यंत दहीहंडीचा प्रवास पाहताना अतिशय समाधान वाटते, अशा भावना प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केल्या. दहीहंडी उत्सव हा केवळ पारंपारिक खेळ म्हणून नव्हे तर या खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कबड्डी, क्रिकेटप्रमाणे या खेळाचे व्यावसायिकीकरण करून खेळाडूंना प्रोत्साहित करणे, खेळामधील सुरक्षितता वाढवणे तसेच प्रेक्षकांचा सहभाग वाढवणे हा या स्पर्धेमागील उद्देश आहे. पूर्व पात्रता फेरीत मानवी मनोऱ्यांचा अद्भूतपूर्व खेळ अनुभवण्यास मिळला. गोविंदांच्या क्रीडा कौशल्याला जगासमोर आणणे व या खेळाला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देणे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. मातीपासून ते मॅटपर्यंत दहीहंडीचा प्रवास पाहताना अतिशय समाधान वाटते असे पूर्वेश सरनाईक यांनी म्हटले. प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक, मुंबई टी २० लीग चेअरमन विहंग सरनाईक, डोम सिनेयुग कंपनीचे संचलाक अध्यक्ष मोहम्मद मोरानी, डोम एन्टरटेन्मेंटचे व्यवस्थापकीय संचालक मजहर नाडियावाला यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे येथील स्व. बाबुराव जिम्नॅस्टिक सेंटर येथेप्रो गोविंदा सीझन २  ची पूर्व पात्रता फेरीतील पहिली फेरी, राज्यभरातील ३२ संघांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. श्री आगरेश्वर गोविंदा पथक, यश गोविंदा पथक, अजिंक्यतारा गोविंदा पथक, खोपटचा राजा गोविंदा पथक, मरीआई मेटपाडा गोविंदा पथक, बालवीर गोविंदा पथक, बाल उत्साही गोविंदा पथक, ओम ज्ञानदीप मंडळ, ओम साई माऊली गोविंदा पथक, हिंदु एकता दहीहंडी पथक, श्री अष्टविनायक बालमित्र मंडळ, हिंदमाता गोविंदा पथक, शिवसाई क्रीडा मंडळ, साईराम गोविंदा पथक, आई चिखलदेवी गोविंदा प्रतिष्ठान, कोकण नगर गोविंदा पथक आदी पथकांची पूर्व पात्रता फेरी शनिवारी, २७ जुलै व उर्वरित १६ संघांची पूर्व पात्रता फेरी रविवारी, २८ जुलै रोजी संपन्न झाली. या फेरीतून अंतिम फेरीसाठी १६ संघ निवडण्यात आले. अंतिम फेरी १८ ऑगस्टला वरळीतील NSCI डोम येथे होणार आहे, अशी माहिती पूर्वेश सरनाईक यांनी दिली. ००००

उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुरारोग्यासाठी बोरीवली येथे आदिशक्ती महायज्ञ

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे पक्ष प्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेना शाखा क्रमांक १४ तर्फे उद्धवजी ठाकरे यांच्या उत्तम, निरोगी…

नवी मुंबईत विविध विभागांत एकाच वेळी आठ ठिकाणी अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई

नवी मुंबई : महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 चे कलम 54 अन्वये नो‍टीस देऊनही संबंधितांनी नोटीशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे…

विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी संपन्न

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना दिली शपथ     मुंबई दि. 28. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान पार पडले होते. या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सर्व सदस्यांना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यावेळी  शपथ दिली. यामध्ये पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, भावना गवळी, कृपाल तुमाने, योगेश टिळेकर, डॉ. प्रज्ञा सातव, शिवाजीराव गर्जे, अमित गोरखे, मिलिंद नार्वेकर, राजेश विटेकर या 11 सदस्यांनी शपथ घेतली. विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला.  यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सर्व नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 00000

रायगड बालकल्याण समितीचे काम कौतुकास्पद -पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे

अशोक गायकवाड     अलिबाग : रायगड बालकल्याण समितीचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.महिला बालविकास विभाग, रायगड अंतर्गत बालकल्याण समिती व पोलिस अधीक्षक कार्यालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने बालकल्याण सन्मान सोहळा व ताण तणाव व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बेलत होते. यावेळी कोकण मार्गदर्शक ऍडव्होकेट सीमा अदाते, बाल कल्याण समिती सदस्य डॉ गाणार, ऍड श्रीमती झेमसे,जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन जयवंत गायकवाड, कॅलिडा रिहॅबचे डॉ. प्रशांत, डॉ. संतोष पवार, डॉ. अक्षय पाटील उपस्थित होते. या वेळी बालकांच्या क्षेत्रात कायद्याला अनुसरून उल्लेखनीय काम केलेल्या पोलीस अधिकारी,कर्मचारी यांचा सन्मानपत्र देऊन पोलीस अधीक्षक घार्गे व बालकल्याण समिती चे अध्यक्ष जगन्नाथ साळुंखे व सदस्य यांचे हस्ते यथोचित गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश बालकांच्या प्रति काम केलेल्या अधिकाऱ्यांचा गौरव करून बालकांप्रती काम करण्यासाठी प्रेरणा ऊर्जा उत्साह निर्माण करणे. बालकांची जास्तीत जास्त काळजी व संरक्षणाची जबाबदारी घेऊन बालकांचे पुनर्वसन करणे तसेच तनावाचे व्यवस्थापन करणे. यासाठी कॅलिडा रिहॅब सेंटर व भूमिका फाउंडेशन चे मोठे योगदान व मार्गदर्शन मिळाले. याबाबत पोलीस अधीक्षक घार्गे यांनी दोन्ही संस्थांचे कौतुक करून बालकल्याण समितीला धन्यवाद दिले.या कार्यक्रमात बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड (कर्जत), राजेंद्र मायने (महाड), निवृत्ती बोराडे (माणगाव), श्रीमती प्राची पांगे, श्रीमती माधुरी घाडगे, श्रीमती वर्षा पाटील तर नवी मुंबईचे सुनील होलार, अभिजीत मोरे, दत्तात्रय पवार, संतोष पिलाने, श्रीमती प्रणिता भाकरे, श्रीमती सारिका बोराटे, रेल्वे पोलीस आदी उकृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांचा शाल सन्मानपत्र व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. या कार्यक्रमात राहुल धुळे यांचा निरोप समारंभ करून उपस्थित संस्थेच्या व संपर्क बालग्रामचे विनायक पाटील,संपर्क बाल ग्रामचे खंदारे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बालकल्याण समितीचे अध्यक्ष जगन्नाथ साळुंखे जि.प. जयवंत गायकवाड ,डॉ विशाल गाणार, ऍड आधाते ऍड झेमसे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. 00000