Category: होम

महापालिकेसह सर्व यंत्रणांनी एक टीम बनून काम करावे-आयुक्त सौरभ राव

ठाणे : पावसाळ्यात रस्ते खराब होऊन त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करताना कमीत कमी वेळेत प्रतिसाद दिला गेला पाहिजे. त्यासाठी महापालिकेसह सर्व यंत्रणांनी एक टीम बनून काम करावे. संसाधने, मनुष्यबळ, रस्त्याची…

मुरबाड तालुक्यात ४० गावे  टँकरमुक्त – रोहन घुगे

ठाणे :  २०२० ते २०२४ या पाच वर्षात ८६ टंचाईग्रस्त गाव- पाडे होते. यावर्षी जल जीवन मिशन व विविध उपक्रमांच्या माध्यमातून एकूण ४० गाव- पाडे कायमस्वरुपी टँकरमुक्त करण्यात आले आहेत.  प्रगतीपथावरील…

आनंदवाटा प्रतिष्ठान व पारसिक हिल ट्रि प्लांटेशन ग्रुप यांनी केले पारसिक टेकडी येथे वृक्षारोपण

ठाणे : आनंदवाटा प्रतिष्ठान व पारसिक हिल ट्रि प्लांटेशन ग्रुप यांच्या मदतीने संस्थेच्या ७ व्या  वर्धापनाचे औचित्य साधत पारसिक टेकडी कळवा, ठाणे येथे वृक्षारोपण करण्यात आले. एकूण २५ करंजाची रोपटे लावण्यात आली. त्याचे कारण असे की, आपल्या भागातील हवामानात करंज झाडाची वाढ चांगली होते तसेच या झाडाला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व स्थान आहे. शासनाचा देखील वन महोत्सव आता चालू आहे. तापमान वाढ व पाणीटंचाई यामुळे झाडे लावण्यासोबतच त्यांचे संगोपन करणे हे देखील महत्त्वाचे आहे. पारसिक हिल ट्रि प्लांटेशन ग्रुप वर्षभर पारसिक टेकडीवर झाडे लावून त्यांचे संगोपन देखील करत असते. चांगलं काम करणाऱ्या संस्था बरोबर आनंदवाटा प्रतिष्ठान नेहमी स्वतःला त्यांच्याशी जोडून घेऊन वर्षभर पर्यावरण व शैक्षणिक उपक्रम राबवितात. या वेळेच्या उपक्रमात तरुण मुलांचा उत्स्फूर्त सहभाग होता.  पारसिक हिल ट्रि प्लांटेशन ग्रुप व उपस्थित तरुण मुलांचे आनंदवाटा  तर्फे कृतज्ञता व्यक्त  करून “साथी हात बढाना, एक अकेला थक जायेगा, मिलकर पेड लगाना “हे  गाणे सर्वांनी सामूहिक रित्या गाऊन वृक्षारोपण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अशी माहिती संस्थेचे सभासद रवींद्र निर्मला तानाजी ह्यांनी दिली.

मंगळवारी पावसाचा व्यत्यय नाही, तरीही मध्य रेल्वे विस्कळीत

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची घडी मंगळवारीही जैसे थेच होती. मध्य रेल्वेवरील लोकल मंगळवारी सकाळपासूनच कूर्मगतीने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना इच्छित वेळेत लोकल मिळत नव्हती. त्यामुळे…

महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सुरु आहे. या प्रचंड धावपळीतही विधानमंडळाचे प्रधान सचिव श्री. जितेंद्र भोळे यांची ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांनी ज्येष्ठ  पत्रकार श्री. विलास मुकादम…

 ‘ध्येय डोळ्यासमोर ठेऊन मेहनत केल्यास निश्चित यश मिळते’

गुणगौरव समारंभात कपिल पाटलांचा विद्यार्थीना सल्ला राजीव चंदने     मुरबाड : ध्येय डोळ्या समोर ठेऊन मेहनत घेतल्यास निश्चित पणे यश मिळते असा कानमंत्र माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी मुरबाड येथिल विध्यार्थी गुणगौरव समारंभात विद्यार्थ्यांना दिला. भारतीय जनता पार्टी मुरबाड तालुका व कपिल पाटील फाउंडेशन यांच्या वतीने दहावी बारावी, पदवी व कला क्रीडा क्षेत्रात विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभ मुरबाड मधील माऊली गार्डन येथे मंगळवारी संपन्न झाला. त्यावेळी पाटील हे बोलत होते. याप्रसंगी,माजी मंत्री जगन्नाथ पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे, हरेश खापरे,नारायण गोंधळी,उल्हास बांगर, सुभाष घरत,माजी नगराध्यक्ष किसन अनंत कथोरे, दिपक खाटेघरे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष शीतल तोंडलीकर,संजय हंडोरे,महेंद्र पवार, आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलतांना पाटील म्हणाले की ठाणे जिल्ह्या सारख्या ग्रामीण भागातही विदयार्थ्यां मध्ये प्रचंड प्रमाणात गुणवत्त्ता आहे, मात्र विदयार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत जाणे गरजेचे आहे, डॉक्टर, ईजींनीयर, यासारख्या तत्सम पदव्या घेऊन ही विदयार्थ्यांनी त्यावरच अवलंबून न राहता यु पी एस सी, एम पी एस सी, यासारख्या परीक्षा देऊन लोकसेवा करावी, यावेळी विदयार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात करियर कसे उज्वल करावे याबाबत पुणे येथील करियर व्याख्यात्या ऍड.अदिती निटूरे यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच त्यावेळी शेकडो विदयार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले, यावेळी गुणवंत विदयार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्न देऊन गौरविण्यात आले. 0000

कल्याण डोंबिवली पालिकेत जन्म-मृत्यू दाखले मिळण्यास विलंब

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या जन्म, मृत्यू दाखले ऑनलाईन माध्यमातून देण्याच्या कार्य प्रणालीमध्ये शासन निर्देशानुसार बदल केले जात आहेत. या बदलाच्या कार्य प्रणालीची अंमलबजावणी सुरू होईपर्यंत पालिकेकडून देण्यात येणारे जन्म,…

कल्याणमधील गांधारी नदीत गाळात अडकलेल्या वृध्द महिलेला वाहतूक पोलिसांनी वाचविले

कल्याण – कल्याणमधील गांधारी नदी पात्रात घरातील निर्माल्य टाकण्यासाठी गेलेली महिला रविवारी नदीला आलेल्या पुरातील चिखलात अडकली होती. ही माहिती नदी काठाने चाललेल्या एका नागरिकाला समजात त्याने हा विषय गांधारी…

 कल्याण-डोंबिवलीत समुह विकास योजना राबविण्यास सर्वाधिक प्राधान्य

आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची माहिती     कल्याण : ठाणे महापालिकेप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत समुह विकास योजना राबविण्यासाठी प्रशासन सर्वाधिक प्रयत्नशील आहे. पालिका हद्दीतील धोकादायक इमारती, चाळी, त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न विचारात घेऊन समुह विकास योजनेच्या माध्यमातून शहराचे वेगवेगळे भाग विकसित करण्यासाठी ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासन पावले उचलत आहे, असे आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागाचा पुनर्रचना आराखडा तयार करताना आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी नगररचना विभागाच्या प्रमुख साहाय्यक संचालक नगररचना यांना केवळ इमारत बांधकाम परवानग्या, भोगवटा प्रमाणपत्र या विषयांपुरतेच मर्यादित न ठेवता त्यांना चार हजार चौरस मीटर भौगोलिक क्षेत्रापुढील इमारत बांधकाम परवानगीचे अधिकार आणि चार हजार चौरस मीटर खालील अधिकार नगररचना अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांच्या या विकेंद्रीकरणामुळे साहाय्यक संचालक नगररचना यांना नगररचना विभागाशी संबंधित भूसंपादन, समुह विकास, विकास आराखड्यातील रस्ते आणि इतर प्रकल्प विकासाकडे लक्ष देणे यापुढे शक्य होणार आहे. साहाय्यक संचालक नगररचना अधिकारी यांना समुह विकासाची पूर्णवेळाची जबाबदारी देण्यात येणार आहे, असे आयुक्त डॉ. जाखड यांनी सांगितले. विकास आराखड्याचा पूर्ण क्षमतेने विकास, प्रकल्पासाठी भूसंपादन हेही नगररचना विभागाचे काम आहे. आतापर्यंत नगररचना अधिकाऱ्यांनी इमारत बांधकाम परवानग्यांच्या चौकटीत राहुनच आपल्या पुरते काम केले. त्यामुळे या विभागाशी संबंंधित भूसंपादन, विकास आराखड्याचा विकास हे विषय वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिले, अशी माहिती आयुक्त डॉ. जाखड यांनी दिली. पालिका हद्दीत धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर आहे. या इमारतींचा समुह विकास (क्लस्टर योजना) योजनेतून विकास करण्यासाठी प्रशासन गंभीर आहे. हा विषय साहाय्यक संचालक नगररचना यांच्या अखत्यारित पूर्ण क्षमतेने देऊन ठाणे पालिकेप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत समुह विकास योजना राबविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे, असे डॉ. जाखड यांनी सांगितले. ४१ समुह विकास अडचणीचे कल्याण डोंबिवली पालिकेा हद्दीतील धोकादायक इमारती, चाळी यांचा विचार करून पालिकेने समुह विकास योजना राबवावी म्हणून आपण मागील सहा ते सात वर्षापासून शासनाकडे प्रयत्नशील आहोत. या तगाद्यामुळे पालिकेने कल्याण, डोंबिवली शहरांच्या विविध भागांचे एकूण ४१ समुह विकास योजनेसाठी भाग केले आहेत. हे भाग २५ हेक्टर भौगोलिक क्षेत्राचे आहेत. एवढे क्षेत्र कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत उपलब्ध होणार नाही. पालिकेत समुह विकास योजना अंमलात येण्यास प्रस्तावित भौगोलिक क्षेत्र अडथळा आहे. हे क्षेत्र पाच ते सात हेक्टर ठेवले तरच ही योजना पालिका हद्दीत यशस्वी होऊ शकते आणि २५ हेक्टर या एका मुद्द्यावर हा प्रकल्प कधीही आकाराला येणार नाही, असे आपण शासनाला कळविले आहे, असे सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी सांगितले. 00000