Category: होम

विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे यशस्वी आयोजन   पनवेल : विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिर 700 पेक्षा जास्त तरुणांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पनवेल मधील व्ही के हायस्कूल येथे पार पडले. यावेळी उपस्थित तरुणांना श्री सुनील गायकवाड सर,(एक्स. सीनियर मॅनेजर,एअर इंडिया कमर्शियल डिपार्टमेंट), श्री.भूषण खैरे (एअरपोर्ट ऑपरेशन्स इन,कॉन्टस ऑस्ट्रेलियन एअरलाइन्स), श्री.सर्वेश पाटील (कस्टमर एक्झिक्युटिव्ह, एअर इंडिया मुंबई एअरपोर्ट), श्री.रुद्राश गोवारी(एअर इंडिया, गोवा एअरपोर्ट) श्री वसीम सर (फिनिक्स एअरपोर्ट ट्रेनिंग अकॅडमी) यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने जॉब कोणत्या एअरलाइन्स मध्ये आहेत, इंटरव्यू साठी जाताना कसा ड्रेस कोड पहिजे, आपले डॉक्युमेंट कशाप्रकारे असावेत, नक्की कामाचं स्वरूप काय आहे, ड्युटीची वेळ किती तास आणि कुठल्या शिफ्ट असतात,  तुमच्या आत्मविश्वासावर, बोलण्याच्या कलेवर आणि शिक्षणावर तुमचं सिलेक्शन होतं अशाप्रकारे मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थ्यांना मिळाले. विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषेचे ज्ञान असणे महत्त्वाचे यासाठी त्यांनी विविध ऑनलाईन किंवा ऑफलाईन इंग्रजीचे कोर्सेस केलात तरी सुद्धा पंधरा दिवसात बोलण्या आणि समजण्या इतपत इंग्रजी शिकू शकता असे मान्यवरांनी सांगितले. नवी मुंबई विमानतळ चालू झाल्यावर मोठ्याप्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत. स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्यात हेच आमचे प्रथम प्राधान्य असणार असल्याचे- प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी सांगितले. पनवेल – उरणच्या पासून हाकेच्या अंतरावर नवी मुंबई विमानतळाचे काम जोरदार सुरु आहे. आणि अशा ठिकाणी मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. या ठिकाणी आपली माणसे, आपले स्थानिक लोकाना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत अशी रोखठोक भूमिका प्रितम म्हात्रे यांनी घेतली आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.आमदार श्री बाळाराम पाटील, श्री काशिनाथ पाटील(मा.प..पं.स. सभापती), मा.श्री गोपाळ भगत,मा.नगरसेविका सौ प्रीती जॉर्ज आणि सौ.सारिका भगत, श्री.देवा पाटील (जिल्हाध्यक्ष पु.यु.सं.रायगड), श्री बबन विश्वकर्मा हे उपस्थित होते. कोट भविष्यात आपल्या पनवेल मध्ये सुरू होणाऱ्या स्वर्गीय दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळात आपल्या विभागातील जास्तीत जास्त तरुण नोकरीसाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम होतील त्या दृष्टीने उचललेले हे पहिले पाऊल आहे. या पुढील भविष्यात अशा प्रकारे विविध शिबिर शेतकरी कामगार पक्ष आणि जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून राबवण्याचा माझा मानस आहे.- प्रितम जनार्दन म्हात्रे, अध्यक्ष , जे.एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था. 00000

भिवंडी तालुक्यात मुंबई ऊर्जा मार्गचे कार्य प्रगतीपथावर

भिवंडी : भारताचे ऊर्जा मंत्रालय देशाला ऊर्जेच्या बाबतीत सक्षम बनवण्यासाठी एक निश्चित ध्येय डोळ्यापुढे ठेवून कामास लागले आहे. ऊर्जा मंत्रालयाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून विजेची मागणी आणि विद्यमान पुरवठा यातील तफावत भरून काढण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत. मुंबई महानगर प्रदेशाला साडेचार हजार मेगा वॅट इतका विजेचा तुटवडा भासत आहे. यापैकी २००० मेगा वॅट अतिरिक्त वीज पुरविण्याची जबाबदारी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांना देण्यात आली आहे. काही महिन्यातच हा प्रकल्प पूर्ण होणार असून सध्या भिवंडी तालुक्यात या प्रकल्पाचे कार्य जोमाने प्रगतीपथावर आहे. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय प्रगती पोर्टलच्या माध्यमातून सदरच्या प्रकल्पपुरती करता लक्ष ठेवून आहे. प्रकल्पाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय देखील प्रकल्प पूर्णत्वाकरिता युद्ध पातळीवर कार्य करत आहे. तूर्तास भिवंडी तालुक्यातील तीन गावांतून या प्रकल्पाची उच्च वीज वाहिनी जाते. खानिवली, तळवली तर्फे राहुर आणि कांदली तर्फे राहुर अशा तीन गावांतून जाणाऱ्या या वाहिनीची साधारणपणे लांबी ४.३ कि.मी. इतकी आहे. उच्च वीज वाहक तारा वाहून नेणारे टॉवर हे या प्रकल्पातील अत्यंत महत्त्वाचे घटक असतात. भिवंडी तालुक्यातील तीन गावांच्या 19 टॉवर उभारण्यात येणार आहेत. यातील जवळपास सर्वच टॉवर उभारणीच्या पाया बांधणीचे कार्य पूर्ण झालेले असून.१४ टॉवर उभारून पूर्ण देखील झालेले आहेत. या प्रकल्पाकरित या तीन गावांतील ९०५ भूधारकांची जमीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकरता वापरली जाणार आहे. राष्ट्रीयकृत प्रकल्पांकरता जाणाऱ्या जमिनींच्या मोबदल्याचे बाबत २०२२ मधील सुधारित तरतुदींच्या अन्वये भूधारकांना जमीन वापरल्याचा परतावा दिला जाणार आहे. तूर्तास २७७ भूधारकांना परतावा देण्याचे काम पूर्ण झालेले असून उर्वरित भूधारकांना परतावा देण्याचे काम सुरू आहे. एकत्रित मिळून तब्बल २४ कोटीपेक्षा अधिक रुपयांचा परतावा भूधारक लाभार्थींना मिळणार असल्याचे समजते. गुजरात राज्यामधून येणारी ही वीज मुंबई महानगर प्रदेशात पोहोचविली जाणार आहे.पडघा ते खारघर या टप्प्यात ४०० के व्ही क्षमतेची उच्च वीज वाहक यंत्रणा उभारण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. आगामी काळात विद्युत ऊर्जा हीच ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत राहणार आहे. घरगुती वापरण्याची उपकरणे ते थेट दुचाकी – चार चाकी वाहने हे सारे विजेवरती वापरले जात आहे. अर्थातच यामुळे विजेचा वापर वाढता राहणार आहे. मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून मिळणारी अतिरिक्त ऊर्जा ही हरित ऊर्जा असल्याकारणाने ती उपभोक्त्यांच्या खिशावरील ताण हलका करणारी ऊर्जा असेल. यंदाच्या उन्हाळ्यामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी उच्चांक मोडणारे कमाल तापमान नोंदविले गेले. अशा परिस्थितीत वीज प्रवाह खंडित झाल्यास जीवाची लाही लाही होऊन उष्माघात रुग्णांचे प्रमाण वाढले होते. अशा परिस्थितीत वाढता विजेचा वापर ही मनुष्य प्राण्याची अपरिहार्यता ठरते. या पार्श्वभूमीवर मुंबई ऊर्जा मार्ग लि यांचा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होणे हे जनतेच्या हिताचे ठरेल चौकट: प्रकल्प पूर्णत्वाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. प्रकल्पासाठी ज्या भूधारकांची जमीन वापरली जात आहे त्यांना मिळणारा परतावा हा समाधानकारक व न्याय्य असावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सध्याच्या घडीला २७७ भूधारकांना आम्ही परतावा दिलेला आहे. बाकी भूधारकांना परतावा देण्याचे काम प्रामाणिकपणे सुरू आहे. – सुरजित नारायण प्रकल्प अधिकारी,मुंबई ऊर्जा मार्ग ली.

सिग्‍नल शाळा झाली हरित शाळा

ठाणे : शिक्षण हे सामाजिक बदलाचे साधन आहे हा विचार बाळगून आंतरराष्‍ट्रीय पर्यावरण दिनाच्‍यानिमित्‍ताने सिग्‍नल शाळेने अभिनव उपक्रम राबविला असून शाळा परिसरात जवळपास तीन हजार रोपे लावून सिग्‍नल शाळेला हरित शाळेचे रूप दिले आहे. वृक्षरोपनासोबतच शाळेतील ओला कच-याचे खत व सुका कचरा पुनर्प्रक्रियेसाठीच्‍या उपक्रमाचा देखील शुभारंभ करण्‍यात आला. लायन्‍स क्‍लब ऑफ मांडवी इस्‍ट, ठाणे महानगरपालिका व समर्थ भारत व्‍यासपीठ यांच्‍या सहकार्याने हरित शाळा उपक्रम राबविण्‍यात आला आहे. तीन हात नाका परिसर हा ठाण्‍यातील सर्वांधिक वाहनांची वर्दळ असलेला परिसर आहे. वाहनांच्‍या धुराने व धुळीने होणारे प्रदुषण कमी व्‍हावे तसेच पुलाखाली असलेल्‍या शाळेतील मुलांना हवा प्रदुषणाचा त्रास होऊ नये म्‍हणून सिग्‍नल शाळेला हरित शाळेचे स्‍वरूप देण्‍यात आले आहे. शाळा परिसरात मुंबई व ठाणे दिेशेला असलेल्‍या दोन्‍ही रस्‍त्‍यावर ‘व्‍हर्टीकल गार्डन’ची निर्मिती करण्‍यात आली आहे. या व्‍हर्टीकल गार्डनमध्‍ये जवळपास तीन हजार रोपांची लागवड करण्‍यात आली असून यामुळे वाहनांच्‍या आवाजाचा त्रास कमी होऊन हवा प्रदुषण देखील रोखले जाणार आहे. व्‍हर्टीकल गार्डन सोबतच शाळाच्‍या आवारात, वर्गखोल्‍याच्‍या बाहेर मोठया प्रमाणावर कुंडयाची आरास केली आहे. यामुळे प्राण वायुचा पुरवठा देखील वाढणार आहे. हरित शाळेतील रोपांची देखभाल करण्‍यासाठी विदयार्थ्‍यांचे प्रशिक्षण घेण्‍यात आले असून या माध्‍यमातून जीवशास्‍त्राचे प्रत्‍यक्ष ज्ञान मुलांना अनुभवता येणार आहे. रोप लागवड, बोन्‍साय निर्मिती, एका रोपापासून अनेक रोपे तयार करणे, कुंडीतील निगा व देखभाल याचे देखील प्रशिक्षण या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून विदयार्थ्‍यांना दिले जाणार आहे. ‘माझी वसुंधरा व स्वच्छ भारत’ अभियानाचा भाग म्हणून ठाणे महानगरालिकेच्यावतीने संपूर्ण शहारात  हरित शहर व कचरा मुक्त शहरासाठी अभिनव उपक्रम राबविले जात आहेत. याचाच भाग म्हणून शहरातील शाळा हरित व कचरा मुक्त व्हाव्यात यासाठी आवाहन करण्यात येत आहे. याला प्रतिसाद म्हणून ठाणे महानगरपालिका पुरस्कृत व समर्थ भारत व्यासपीठ संचलित सिग्नल शाळेने हरित व कचरा मुक्त शाळेचा हा उपक्रम राबविला आहे. रोप लागवडी सोबतच रोपांना कायम उत्‍तम दर्जाचं खत पुरवठा व्‍हाव म्‍हणून शाळेत तयार होण्‍या-या ओल्‍या कच-यापासून खत निर्मिती करण्‍याचा उपक्रम सुरू करण्‍यात आली असून खत निर्मितीचे काम देखील विदयार्थ्‍यांच्‍या सहकार्याने केले जाणार आहे. ओल्‍या कच-यासोबत कच-याचे वर्गीकरण करणे, टाकाऊ पासुन टिकाऊ वस्‍तू बनवणे, सुका कचरा समर्थ भारत व्‍यासपीठाच्‍या प्रकल्‍प पुनर्निमाण या सुका कचरा व्‍यवस्‍थापनाच्‍या प्रकल्‍पास पाठवून शाळा ‘शून्‍य कचरा’ करण्‍यात आली आहे. सिग्‍नल शाळेने रस्‍त्‍यावरील निर्वासित मुलांच्‍या शिक्षणाला हिरवा सिग्‍नल दिला. लायन्‍स क्‍लबने हा वसा पुढे नेत शाळा हरित करण्‍याचा उपक्रम राबविला याबद्दल क्‍लबच्‍या अध्‍यक्षा लायन धारिका गडा व निधीदात्‍या चंदा कारटेला यांचे लायन्‍स क्‍लबचे वाईस डीजी १ लायन फीरोज कात्रक, माजी डीजी लायन दिनेश शहा यांनी कौतुक केले. यावेळी समर्थ भारत व्‍यासपीठाचे संचालक उल्‍हास कार्ले, लायन शांती सावला सह लायन्‍स क्‍लबचे सदस्‍य उपस्थित होते.  पाटील इंटरप्रायजेसचे संकेत पाटील व प्रवीण जाधव यांचे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले. लायन्‍स क्‍लबचे वाईस डीजी १ लायन फीरोज कात्रक, माजी डीजी लायन दिनेश शहा, लायन्‍स क्‍लब मांडवी इस्‍टच्‍या अध्‍यक्षा लायन धारिका गडा, या उपक्रमासाठी ज्‍यांनी अर्थसहाय्य केले त्‍या लायन चंद्रा कारटेला, समर्थ भारत व्‍यासपीठाचे संचालक उल्‍हास कार्ले यांच्‍या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ करण्‍यात आला.

६७२ नागरिकांनी घेतला दाखल्यांचा लाभ – आनंद परांजपे

अनिल ठाणेकर   ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे आणि पारसिक वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, दत्तवाडी, कळवा येथे आयोजित केलेल्या मोफत दाखले वाटप शिबीरात ६७२ नागरिकांनी विविध दाखल्यांचा लाभ घेतला असल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस, अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे आणि पारसिक वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक १६ जून, २०२४ रोजी, सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेमध्ये श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, दत्तवाडी, कळवा येथे मोफत दाखले वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १) रहिवासी दाखला, २) अधिवास (डोमेसाईल दाखला), ३) उत्पन्नाचा दाखला आणि ४) ज्येष्ठ नागरिक दाखला असे ६७२ विविध दाखले नोंदविण्यात आले. या मोफत दाखले वाटप शिबीराचा नागरिकांनी मोठ्याप्रमाणात लाभ घेतला, अशी माहिती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी केली आहे. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, उमेश पाटील, विजया लासे,  मंगला कळंबे, राजेंद्र साप्ते, राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, रविंद्र पालव, प्रदेश युवक उपाध्यक्ष आदित्य धुमाळ, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड, परिवहन सदस्य नितिन पाटील, मोहसीन शेख, युवक कार्याध्यक्ष संदेश पाटील, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष हुसेन मणियार, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष मंगेश सूर्यवंशी, कार्याध्यक्ष कुणाल साबळे, वैद्यकीय आरोग्य कक्ष कार्याध्यक्ष रोहन जाधव, कार्यकारिणी सदस्य दीपक पाटील, दिनेश बने, सुनिल पाटील, पल्लवी गिध, मयूर आरोटे, युवक पदाधिकारी रोहित रायकर, शहबाज चेऊलकर, संदीप शिंदे, नासीर शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आई-बाबा सामाजिक संस्थेतर्फे 1000 हजार विद्यार्थ्यांना वह्यांची भेट

जयेंद्र कोळी व माजी नगरसेविका नम्रता कोळी यांचा उपक्रम   ठाणे : आई-बा सामाजिक संस्थेच्या वतीने ठाण्यातील प्रभाग क्रमांक 22 मधील एक हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना वह्यांची भेट मिळाली आहे. ज्युनियर…

कोकणातून मी शिवसेना संपवली- नारायण राणे

रत्नागिरी- कोकणातून महायुतीला तडीपार करा म्हणणाऱ्या शिवसेनेला मी कोकणातून संपवले असेअसे धक्कादायक विधान माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी केलं आहे. खासदार नारायण राणे यांनी शनिवारी कुडाळ येथे…

वाचक मनोगत

रस्त्यावरील पदार्थ खाणे म्हणजे आरोग्य बिघडवून घेणे रस्त्यावर बाराही महिने खाद्यपदार्थ विकले जातात कारण खाणारांची संख्या मोठी आहे. पावसाळ्यात रस्त्यावरील पदार्थ खाणे म्हणजे आरोग्य बिघडवून घेणे अशीच अवस्था असते .उघड्या…

मातृभाषेतून शिक्षण ही काळाची गरज

विशेष श्याम ठाणेदार शिक्षणाची भाषा कोणती असावी यावर आपल्याकडे गेली अनेक वर्ष विचारमंथन सुरू आहे. केवळ समाजातच नव्हे तर घराघरांत यावर चर्चा सुरू आहे. चर्चा कसली वाद विवादच म्हणा कारण…

दूरदृष्टी असणारे रामोजी

श्रद्धांजली स्वाती पेशवे दूरदृष्टी, उद्यमशीलता आणि धडाडी असेल तर सामान्य घरातील माणूसही किती मोठी मजल मारु शकतो, हे रामोजी राव यांच्या जीवनचरित्रातून समजते. जागतिक पातळीवर नोंद घेतली गेलेल्या रामोजी फिल्म…