Category: होम

वीस हजार विद्यार्थ्यांनी घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव

नीट वादग्रस्त निकाल प्रकरण : मुंबई : वादग्रस्त ठरलेल्या नीट निकालाविरोधात देशातील जवळपास २० हजार विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेत नीट पुन्हा घेण्यात यावी किंवा श्रेणी गुण पद्धत रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घाई-गडबडीत जाहीर केलेला नीटचा निकाल वादग्रस्त ठरला आहे. या निकालाबाबत विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे कोटा येथील मोशन एज्युकेशन संस्थेने नीट परीक्षेतील गैरप्रकारांबाबत डिजिटल सत्याग्रह सुरु केला आहे. त्यात २० हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या सत्याग्रहाचा एक भाग म्हणून कोटा येथील शिक्षणतज्ज्ञ नितीन विजय यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नीट परीक्षेत ६७ विद्यार्थी हे प्रथम क्रमांकावर आहेत. नीटच्या परीक्षेत नकारात्मक गुण पद्धत असल्याने सर्व प्रश्न सोडविणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक प्रश्न चुकला तरी त्याला ७२० पैकी ७१५ गुण मिळणे अपेक्षित आहे. मात्र विद्यार्थ्यांना ७१८, ७१९ गुण कसे दिले गेले, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहेत. क्लॅटसाठी अतिरिक्त गुण देण्याच्या सूचना न्यायालयाने २०१८ मध्ये दिल्या होत्या. त्याचा हवाला एनटीएकडून देण्यात येत आहे. परंतु ती परीक्षा ऑनलाइन होती तर नीट ही ऑफलाइन आहे. त्या सूचनेचा दाखला देत ग्रेस मार्क्स देणे कितपत योग्य आहे? पेपर उशिरा वाटला तर जास्त वेळ देता आला असता, गुण का दिले? परिपत्रक, निकाल पत्रात ग्रेस गुणांच्या तरतुदीचा उल्लेख नाही. तक्रार करणाऱ्यांनाच ग्रेस गुण मिळाले आहेत. ज्या मुलांनी तक्रार केली नाही त्यांचा काय दोष? एनटीएने १४ जून रोजी निकालाची संभाव्य तारीख जाहीर केली असताना १० दिवस आधीच निकाल जाहीर करण्याचे कारण काय? असे अनेक प्रश्न याचिकेत उपस्थित करण्यात आले आहेत. वेळ कमी पडल्यास अतिरिक्त गुण देण्याबाबत एनटीएकडे कोणताही आधार नसल्याचा मुद्दाही नितीन विजय यांनी याचिकेत उपस्थित केला आहे.

‘पावसात मॅनहोल्सचे झाकण उघडू नका’

पालिकेचे आवाहन; संरक्षक जाळ्यांचे काम पूर्ण मुंबई : पावसात मॅनहोल्समध्ये कोणीही पडून अपघात होऊ नये, यासाठी मलनिस्सारण आणि पर्जन्य जलवाहिन्यांवरील एकूण १ लाख २८६ हजार मॅनहोल्समध्ये संरक्षक जाळ्या बसवण्याची प्रक्रिया पालिकेने ७ जूनपर्यंत पूर्ण केली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात तरी मॅनहोल्समुळे होणारे अपघात टळतील, अशी अपेक्षा करण्यात येत आहे. मात्र, मॅनहोलवरील झाकणे नागरिकांनी उघडू नयेत, असे आवाहन पालिकेने समाजमाध्यमांद्वारे केले आहे. मुंबईकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि पावसाळ्यात जलवाहिन्यांमध्ये कचरा अडकून पाणी साचू नये, यासाठी मॅनहोल्समध्ये संरक्षक जाळ्या बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्यासाठी सुरुवातीला जाळ्यांचा प्रोटोटाइप बनवण्यात आला. त्यानंतर जाळ्या बसवण्यास सुरुवात झाली. हे काम ३१ मेच्या आधी होणे अपेक्षित होते. एक लाख संरक्षक जाळ्या बसवण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, २४ मेपर्यंत त्यातील केवळ ४३ हजार ५८१ संरक्षक जाळ्या मॅनहोल्समध्ये बसवण्यात आल्या होत्या. बॅरिकेड्सचा उपाय मॅनहोलवरील झाकण चोरीला जाणे, तसेच मॅनहोलमधून पाणी ओव्हरफ्लो होण्याच्या घटना नेहमीच घडतात. त्याला आळा घालण्यासाठी मॅनहोलवर सायरन वाजून अलर्ट देणारी यंत्रणा मुंबईतील १४ ठिकाणी बसवून त्याची गेल्या तीन महिन्यांपासून चाचणी घेण्यात येत होती. त्यावेळी तांत्रिक अडचणी आणि यंत्रणाही उपयुक्त ठरत नसल्याने गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेली ही चाचणी बंद करण्यात आली. पावसाळ्यात मॅनहोल काही कारणास्तव उघडे राहिल्यास त्याला तात्पुरते बॅरिकेड्स लावण्यात येणार आहेत. काही उघड्या मॅनहोलमध्ये झाडाची फांदी किंवा लाकडी सामान ठेवण्याचेही प्रकार केले जातात. मात्र, तसे न करता आता तात्पुरते बॅरिकेड्स लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गोखले-बर्फीवाला पुलाची मार्गिका जुलैमध्ये खुली

सर्व कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा गोखले पूल आणि अंधेरी पश्चिम येथे असलेला सी. डी. बर्फीवाला पूल यांच्या जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ते ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे उर्वरित कामे जलदगतीने करून हा गोखले-बर्फीवाला पुलाची मार्गिका जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबईकरांसाठी खुली करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. गोखले पुलाची एक बाजू २६ फेब्रुवारीला वाहतुकीसाठी खुली करण्यात आली असली तरी अंधेरी पश्चिमेला असलेला बर्फीवाला पूल आणि गोखले पूल यांची पातळी वरखाली झाली होती. परिणामी, बर्फीवाला पूल बंद ठेवावा लागला होता. त्यामुळे गोखले पूल आणि बर्फीवाला पूल जोडण्यासाठी पालिका प्रशासनाने मुंबई आयआयटी आणि व्हिजेटीआय या संस्थांची मदत घेतली. त्यांच्या अहवालानुसार हे दोन पूल जोडण्यासाठी जॅक लावून पुलाचा काही भाग वर खेचून पातळी समतल करण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. महापालिकेकडून वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हिजेटीआय), तसेच तांत्रिक सल्लागाराच्या देखरेखीखाली गोखले पुलाचे काम सुरू आहे. दोन्ही पूल जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. चौकशी अहवालाची प्रतीक्षा कायम गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांच्यातील पातळी वरखाली झाल्यामुळे जे हसे झाले, त्यावरून प्रशासनाने आता बोध घेण्याचे ठरविले आहे. याप्रकरणी सत्यशोधन करण्याचा निर्णय घेतला असून, त्याकरिता अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांची नियुक्ती केली आहे. यापुढे कोणत्याही प्रकल्पाच्या नियोजनात त्रुटी राहू नयेत म्हणून सत्यशोधन करण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या चौकशीचा अहवाल प्रलंबित आहे. ३१ सप्टेंबरपर्यंत गर्डर गोखले पुलाच्या दुसऱ्या गर्डरचे सुटे भाग मुंबईत येण्यास उशीर झाला आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत दुसऱ्या गर्डरचे सगळे भाग एकत्र करून येत्या ३१ सप्टेंबरपर्यंत गर्डर बसविण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

ठाण्यात सामाजिक कार्याचा आदर्श तारामाऊली सेवा संस्थेकडून प्रस्थापित

भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांचे प्रतिपादन, ओमकार चव्हाण यांचाही वाढदिवसही साजरा ठाणे : ठाणे शहरात विविध क्षेत्रात सामाजिक कार्याचा आदर्श तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेकडून प्रस्थापित करण्यात आला आहे, असे…

अमृत महोत्सवी गौरव ग्रंथाचे १५ जूनला प्रकाशन व चर्चा

‘छावणी’ या प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन डांगळे यांच्या अनिल ठाणेकर ठाणे : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र, मुंबई व सायन पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘छावणी’ या प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन डांगळे यांच्या अमृत महोत्सव गौरव ग्रंथाचे शनिवारी १५ जून रोजी प्रकाशन व चर्चा विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली आहे.याप्रसंगी प्रमुख वक्ते सुभाष देसाई, दिनकर गांगल, डॉ. मनोहर जाधव व डॉ. प्रज्ञा दया पवार हे उपस्थित राहणार आहेत ‘छावणी’ या प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन डांगळे यांच्या अमृत महोत्सव गौरव ग्रंथाचे प्रकाशन व चर्चा हा कार्यक्रम शनिवारी, १५ जून २०२४ रोजी सायंकाळी ५ .३० (साडेपाच वाजता) सम्राट अशोका हॉल, पहिला मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी भवन, चार बंगला, लोखंडवाला रोड, अंधेरी – पश्चिम, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास विशेष अतिथी डॉ. महेंद्र भवरे, डॉ. सुनील अवचार, किशोर मेढे (संपादक) व नितीन कोतापल्ले (सायन पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड) हे उपस्थित राहणार आहेत.  या कार्यक्रमास जनतेने आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन केंद्राचे सरचिटणीस चंद्रकांत बच्छाव यांनी केले आहे.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विलेपार्ले शाखेच्या वतीने आय़ोजित करण्यात आलेल्या चांद्रयान पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात कोकण मराठी साहित्य परिषदेचे ज्येष्ठ सदस्य सुरेंद्र पोतदार यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

येत्या गुरुवारी वंचितांच्या रंगमंचावर रंगणार युवा नाट्यजल्लोष

ठाणे : आर्थिक दृष्ट्या वंचित पण कलागुणांनी समृद्ध अशा युवांचा कलाविष्कार अर्थात युवा नाट्यजल्लोष या वर्षी येत्या गुरुवारी १३ जून रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटर मधे संध्याकाळी ४ वाजता रंगणार आहे. ११ जून या साने गुरुजींच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने साने गुरुजी १२५ या अभियानांतर्गत हा कार्यक्रम सादर होत आहे. समता विचार प्रसारक संस्था आयोजित करत असलेल्या या उपक्रमात या वर्षी नाटकांची थीम असणार आहे ‘दीवार’ म्हणजेच ‘भिंत’! ठाणे परिसरातील खारटन रोड, अंबिका नगर, मानपाडा, किसन नगर आणि घणसोली अशा विभागातून युवा आपले विचार नाटकातून सादर करणार आहेत. श्रेष्ठ साहित्यिक आणि नाटककार स्मृतिशेष रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या वंचितांच्या रंगमंचाचे हे दहावे वर्ष आहे, असे संयोजिका हर्षदा बोरकर यांनी सांगितले. प्रतिभाताई मतकरी, प्रतिभा मतकरी, सुप्रसिद्ध अभिनेत्री व मराठी भाषा दूत, चिन्मयी सुमित, सिने दिग्दर्शक व टॅग सदस्य विजू माने, अभिनेता व टॅग सदस्य, उदय सबनीस, सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया मतकरी विनोद, गणेश मतकरी, संपादक, दै. ठाणे वैभव चे संपादक मिलिंद बल्लाळ, लघु चित्रपटकार, आंतरराष्ट्रीय किर्तीचे फिल्म ज्युरी, डॉ. संतोष पाठारे, थिएटर कोलाजची संचालिका, अभिनेत्री, निवेदिका, पल्लवी वाघ – केळकर,टॅग अध्यक्ष, महेश शानबाग, श्रीरंग खटावकर, पत्रकार आणि यू ट्यूबर रविंद्र पोखरकर आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. ठाण्यातील संवेदनशील नागरिकांना विनंती आहे की त्यांनी हा युवांचा कलाविष्कार बघण्यासाठी अवश्य यावे असे आवाहन समता विचार प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संस्थेचे सचिव अजय भोसले (81089 49102) यांच्याशी संपर्क करावा.

‘ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत माध्यमिक शाळेत प्रवेश घेऊ नका’

माध्यमिक शिक्षणाधिकारी ललीता दहितुले यांचे आव्हान ठाणे : ठाणे जिल्ह्यात एकूण २४ माध्यमिक शाळा अनधिकृतपणे सुरू होत्या त्यापैकी २३ शाळा बंद केल्या असून सद्यस्थितीत ०१ अनधिकृत शाळा सुरू आहे. या ०१ अनधिकृत शाळेवर एफ.आय.आर दाखल करण्यात आला आहे. पुढील शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करिता या अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये. ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी प्रकाशित करण्यामागे हाच उद्देश आहे कि पालकांनी पाल्याचे माध्यमिक शाळेत प्रवेश घेताना अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये. पालकांनी अधिक माहिती घेऊनच पाल्याचे शाळेत प्रवेश निश्चित करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी माध्यमिक ललीता दहितुले यांनी केले आहे. जिल्ह्यात अनधिकृत सुरू असलेल्या माध्यमिक शाळा बंद केल्याबाबतचे हमीपत्र सादर केलेल्या शाळाची यादी स्टारइंग्लिश हायस्कुल, दिवा, ठाणे मनपा क्षेत्र, डिवाईनग्रेस हायस्कुल, वज्रेश्वरी ता. भिवंडी  जि. ठाणे, आरएन इंग्लिश स्कूल कोन गाव भिवंडी ठाणे, फरानइंग्लिश मिडीअम स्कुल,गौरीपाडा, भिवंडी जि.ठाणे, आरंभइंग्लिश स्कुल श्री, गणेश नगर चौळ गणेश मंदिराचे मागे दिवा आगासन रोड दिवापुर्व, न्युगुरुकुल कॉन्व्हेंट स्कुल श्लोकनगर दातिवली रोड दिवा पुर्व 400602, ग्रीनव्व्हॅली कॉन्व्हेंट स्कुल,शिवसर्थ अपार्ट सदगुर नगर, दिवा आगासन दिवा जि.ठाणे, एस. एस. इंग्लिशस्कुल बाबुराव रेसिडेंन्सी हनुमान मंदिर निअर दिवा, आरएल पी हायस्कुल शिवम अपार्ट मुंब्रादेवी कॉलनी दिवा, आदर्शगुरुकुल स्कुल निअर जिव्हाळा हॉल दिवा इंग्रजी, आदर्शगुरुकुल स्कुल वैभव ढाब्यासमोर दिवा शिळ रोड दिवा पुर्व  माध्यम मराठी, आदर्शगुरुकुल स्कुल वैभव ढाब्यासमोर दिवा शिळ रोड दिवा पुर्व माध्यम इंग्रजी, एसआर पी इंग्लिश स्कुल वक्रतुंडनगर दिवा, ओमसाईइंग्लिश स्कुल, दातिवली रोड दिवा जि.ठाणे, श्री. विद्याज्योतीइंग्लिश स्कुल,नारायण कॉम्पलेस्क मुंब्रादेवी कॉलनी रोड मुंब्रा जि.ठाणे, सिम्बॉयसिसस्कूल, सुंदरबन नगर, दातिवली रोड दिवा, केम्ब्रीजइंग्लिश स्कूल, मानसी कॉम्प्लेक्स भोलेनाथ मुंब्रादेवी कॉलनी रोड मुंब्रा जि.ठाणे, पब्लीकइंग्लिश स्कुल, गणेशपाडा दातिवली दिवा, आर्यगुरुकुल इंग्लिश स्कुल दातिवली रोड दिवा, श्रीरामकृष्णा इंग्लिाश स्कुल, दिवा दातिवली रोड दिवा, स्मार्टएज्युकेशन इंग्लिश स्कु मुंब्रा, जेडी इंग्लिश स्कुल फेस 2 श्लोक नगर मुंब्रा जि.ठाणे,…

लोकलमधून लंपास झालेले दागिने पुन्हा मिळाले

कल्याण: माटुंगा ते कसारापर्यंत प्रवास करणाऱ्या महिलेच्या बटव्यातील मोबाईल, सोनसाखळी असा एकूण दीड लाखाहून अधिक किमतीचा ऐवज गुरूवारी चोरीला गेला. रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी चोराला पकडून महिलेचा चोरीला गेलेला ऐवज परत केला. ठाण्यात संभाजीनगर भागात राहणाऱ्या श्वेता हेमंत शिंदे (२३) या नोकरदार आहेत. त्या माटुंगा भागात नोकरीला जातात. गुरूवारी कामावरून सुटल्यावर त्या माटुंगा रेल्वे स्थानकात कसाराकडे जाणाऱ्या लोकलमध्ये बसल्या. त्यांना ठाणे येथे उतरायचे होते. पण बाहेर उन्हाची काहिलीने त्या हैराण होत्या. लोकलमध्ये खिडकीजवळ बसण्यास जागा त्यांना मिळाली. श्वेता यांना गाढ झोप लागली. ठाणे रेल्वे स्थानक येऊन गेले तरी त्यांंना काही कळले नाही. त्या थेट कसारा रेल्वे स्थानकापर्यंत पोहचल्या. तेथून लोकल कसारा यार्डात गेली. तेथे त्यांना जाग आली. त्यावेळी त्या सुरूवातीला घाबरल्या. कसारा येथे पोहचल्याचे लक्षात आल्यावर त्या सावध झाल्या. बटव्यातील मोबाईल, गळ्यातील सोनसाखळी चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. श्वेता यांंनी तातडीने कसारा रेल्वे स्थानकात येऊन तेथून त्या कल्याण रेल्वे स्थानकात आल्या. त्यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात येऊन घडल्या चोरी प्रकाराची तक्रार करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी कल्याण रेल्वे स्थानकात आशीष जाॅन मकासरे याला अटक केली होती. त्याच्या जवळ एक महागडा मोबाईल, सोनसाखळी होती. हा ऐवज कोठूण आणला आहे याची सविस्तर माहिती आशीष पोलिसांना देत नव्हता. श्वेता लोहमार्ग पोलीस ठाण्यात हजर असताना रेल्वे पोलीस आशीषला पोलीस ठाण्यात घेऊन आले. त्यावेळी आशीष जवळ असलेला ऐवज आपला असल्याचे श्वेताने ओळखले. पोलिसांंनी आशीषवर गुन्हा दाखल करून श्वेता शिंदे यांचा मोबाईल, सोनसाखळी असा दीड लाखाहून अधिक किमतीचा ऐवज परत केला.

फी भरली नाही म्हणून शंभर मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशीच काढले वर्गाबाहेर!

ठाणे: पहिल्याच दिवशी चालू वर्षातील शाळेतील फी न भरल्यामुळे महागिरी येथील पोलीस शाळेत शिकणाऱ्या शंभर मुलांना त्यांच्या पालकांना कल्पना न देता वर्गाबाहेर काढण्यात आले, अशी शंभर मुले बाहेर काढण्यात आली. यात पोलिसांबरोबर इतर सर्वसामान्य नागरिकांची देखील मुलं आहेत. शाळेचे एक ॲप आहे आणि त्या ॲपवर 12 तारखेपर्यंत फी भरू शकता असे नमूद करण्यात आले आहे. परंतु असे नमूद केले असताना देखील आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि आजच फी आणायला हवी होती असा धोशा लावणाऱ्या पोलीस शाळा प्रशासनाने शंभर मुलांना वर्गाच्या बाहेर शाळेतील ग्राउंड वर बसवून ठेवले. पोलीस नाईक म्हणून काम करणाऱ्या लक्ष्मी क्षीरसागर म्हणाल्या की, “माझ्या मुलाला मी सात वाजता शाळेत पाठवले असते. आठ वाजता समजले की त्याला वर्गाबाहेर बसवून ठेवले. फी आम्ही वेळेतच भरतो. मी आता शाळेमध्ये चेक देखील घेऊन आली आहे परंतु शाळा प्रशासन, तेथील मुख्याध्यापक आम्हाला पालकांना दाद देत नाही. पोलिसांनी ड्युटी करायची का या प्रश्नाकडे बघत राहायचं. पोलिसांच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार नाही का?असा प्रश्न त्यांनी केला. पूनम कडव म्हणाल्या, एका मुलीने तिच्या घरी फी भरली नाही म्हणून आम्हाला बाहेर बसवला आहे असे तिच्या आईला कळवल्यानंतर तिच्या आईने मला कळवलं त्यावेळी मला समजलं माझ्या मुलाला बाहेर काढलेला आहे मी जनरल कॅटेगिरी मध्ये येते माझा पगार दहा तारखेला होतो त्यामुळे मी संध्याकाळी फी भरेल असे मी ठरवले असताना देखील आणि ॲपवर 12 तारखेची मुदत दिलेली असताना देखील त्यांनी माझ्या मुलाला बाहेर बसवलं मुलांच्या मनावरती काय परिणाम होणार अर्धी मुले शाळेत शिकत आहेत आणि अर्ध्या मुलांना वर्गाच्या बाहेर बसवण्यात आले आहेत. याचबरोबर, आम्ही मीडियाशी बोलो म्हणून उद्या आम्हाला भविष्यात त्रास होण्याची शक्यता आहे. उद्या आमच्या मुलांवर खुन्नस देखील काढली जाईल असेही या पालकांनी सांगितले आहे. वैभवी बांदेकर म्हणाल्या की, मी तर फी देखील भरली असताना देखील माझ्या मुलाला बाहेर बसवलं. आता मुलांना आमच्या ताब्यात देखील देत नाहीये. एका पालकांनी व्हिडिओ काढला म्हणून मुलांना एका रूममध्ये बसवण्यात आला आहे परंतु त्यांना वर्गात शिकण्यासाठी देत नाहीये. असा मनमानी कारभार पोलीस स्कूल प्रशासनाचा चालू आहे असा आरोप पालकांनी केला आहे.