Category: होम

क्रांतिकारी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी महापौर हर्षाली चौधरी यांना निवेदन

क्रांतिकारी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी महापौर हर्षाली चौधरी यांना निवेदन आरती परब डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील पत्रकारांसाठी “पत्रकार विकास योजना” राबवण्या बाबत “क्रांतिकारी पत्रकार संघाच्या” वतीने महापौर यांना निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील पत्रकार आपल्या मूलभूत सुविधा पासून वंचित आहेत. पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. पत्रकार हे लोकशाही टिकवण्यासाठी धडपड करत असतात. आपले जीवन जनतेसाठी समर्पित करून कार्य करत असतात, वेतन नसल्यामुळे या महागाईच्या जमान्यात पत्रकारांची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे व पत्रकारितेतून कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी पुरेसा मोबदला मिळत नसल्याने कौटुंबिक परिस्थिती हलाकीची झाल्याने त्यांना त्यामध्ये जीवन जगावं लागतं आहे. तेव्हा वस्तुस्थिती समजून घेता सहानूभूतीपूर्वक पत्रकार विकास योजना राबवून सहकार्य करावे. प्रामुख्याने पत्रकारांच्या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा विनामूल्य मिळाव्यात, ज्या पत्रकारांचे स्वतःच घर आहेत त्यांना महानगरपालिके तर्फे घर पट्टी माफ करणे, पालिकेतील रुग्णाल्यातून निशुल्क सुविधा मिळाव्यात, मेडिक्लेम, विमा, आरोग्य सुविधा देण्यात याव्या. शासनाने पत्रकारांसाठी राबवलेले धोरण महानगर पालिकेने लागू करावे. महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यात पत्रकारांसाठी घरकुलासाठी/भुखंड योजना राबवण्यात आल्या आहेत. तत्कालीन आयुक्त आर. डी. शिंदे, यांनी सन २००८ च्या पत्रकार समारंभात सर्व पत्रकारांसाठी घरासाठी मनपा हद्दीत भूखंड उपलब्ध करून दिला जाईल असे सूचक विधान केले होते. त्यामुळे पत्रकारांसाठी घरकुल योजना किंवा गृह भूखंड योजना राबविण्यात यावी. लोकशाहीचा हा चौथा स्तंभ मजबूत करण्यासाठी ही वस्तुस्थिती डोळ्यासमोर ठेऊन सुविधा, सवलती मिळतील अशा आशयाचे निवेदन संघटनेच्या वतीने महापौरांना देण्यात आले. यावेळी, राष्ट्रीय अध्यक्ष – गुलाबचंद्र यादव, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष – मधुकर वाल्हेकर, राष्ट्रीय सचिव – प्रमोद तांबे, पत्रकार – राजू काऊटकर, पत्रकार – दीपक इंगळे, यांनी निवेदन सादर केले. तसेच अधिक माहिती साठी आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण, उपमहापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिका, शहर अभियंता, कल्याण डोंबिवली महानगरपालिका उप आयुक्त सामान्य प्रशासन यांना प्रत रवाना करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर महायुतीचे वर्चस्व…!

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर महायुतीचे वर्चस्व…! उबाठा सेनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह ? महायुतीच्या विरोधात बंडखोरी करणारे ७ अपक्ष विजयी. राजन चव्हाण सिंधुदुर्ग : तब्बल नऊ वर्षांनी होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत…

जिल्हा परिषदेतही भाजपच पुन्हा नंबर १

१२ पैकी सात जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता  पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची एकहाती सत्ता रत्नागिरीत एकनाथ शिंदेंची शिवसेना सत्ता सांगलीत महाविकास आघाडी सत्तेत मुंबई : बुहप्रतिक्षित १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या निकालात…

शरद पवारांची प्रकृती बिघडली, पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल

शरद पवारांची प्रकृती बिघडली, पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने बारामतीहून पुण्यातील रूबी रूग्णालयात हलवण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे…

बारावीची परीक्षा आजपासून

बारावीची परीक्षा आजपासून पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे उद्या मंगळवार दिनांक १० फेब्रुवारी पासून राज्यभरात बारावीची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेसाठी १० हजार ६६४ शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांतील १५ लाख ३२ हजार ४८७…

१२०० कोटींची फसवूणक करणाऱ्या ‘बंटी-बबलीला’ गुंतवणूकदारांनी न्यायालयाच्या आवारातच घेरले

१२०० कोटींची फसवूणक करणाऱ्या ‘बंटी-बबलीला’ गुंतवणूकदारांनी न्यायालयाच्या आवारातच घेरले ठाणे : जादा परताव्याचे अमीष दाखवून गुंतवणूकदारांची  तब्बल १२०० कोटींची फसवणूक करणाऱ्या टीडब्ल्यूजे असोसिएटेड प्रा. लि. या कंपनीच्या संचालकांना आज त्रस्त गुंतवणूकदारांनी न्यायालयाच्या आवारतच…

उल्हासनगरात लेटलतिफांना आयुक्तांचा शिस्तीचा दणका

उल्हासनगरात लेटलतिफांना आयुक्तांचा शिस्तीचा दणका उल्हासनगरः उल्हासनगर महापालिकेत लोकनियुक्त सरकार स्थापन होताच सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पालिका मुख्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला. उशिराने आलेल्या प्रवाशांना थेट पालिका मुख्यालयातच प्रवेश नाकारण्यात आल्याने कर्मचाऱ्यांची पहिल्याच…

महाराष्ट्रातील ख्रिश्चन समुदाय राजकारणात नामशेष होण्याच्या मार्गावर ?

महाराष्ट्रातील ख्रिश्चन समुदाय राजकारणात नामशेष होण्याच्या मार्गावर ? कल्याण : महाराष्ट्र आणि देशाच्या प्रगती आणि विकासात ख्रिश्चन समुदायाचे योगदान दुर्लक्षित करता येणार नाही, तरीही गेल्या ४० वर्षांत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकाही ख्रिश्चन व्यक्तीला संधी देण्यात आलेली नाही. विखुरलेल्या ख्रिश्चन मतपेढीमुळे आज महाराष्ट्रात या समुदायाचा कोणताही आमदार निवडणूक जिंकू शकत नाही हे वेगळे आहे. तथापि, ख्रिश्चन समुदायाला प्रतिनिधित्व देण्यासाठी, महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी उदारता दाखवून विधान परिषदेच्या माध्यमातून एका ख्रिश्चन सदस्याला मंत्रिमंडळात स्थान देऊन इतिहास घडवला. परंतु दुःखाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात ख्रिश्चन समुदायाशी अनेकदा भेदभाव केला गेला आहे, म्हणूनच आजही महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगावर एकाही ख्रिश्चन व्यक्तीची नियुक्ती झालेली नाही यावरून हे सिद्ध होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नोवेल साळवे यांनी केला आहे. ज्याप्रमाणे सर्व धर्म आणि जातीच्या लोकांना राजकारणात त्यांच्या समुदायाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जाते, त्याप्रमाणे ख्रिश्चन समुदायातील लोकांनाही राजकारणात त्यांच्या समुदायाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली पाहिजे अशी मागणी साळवे यांनी केली आहे.

 केडीएमसीच्या “डिप क्लीनिंग” विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ

केडीएमसीच्या “डिप क्लीनिंग” विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ महापौर हर्षाली चौधरी थविल, उपमहापौर राहुल दामले यांच्याहस्ते मोहिमेला सुरवात कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका, घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत महापौर हर्षाली चौधरी थविल व उपमहापौर राहूल दामले यांच्या हस्ते दुर्गाडी किल्ला येथून दुर्गा देवीचे दर्शन घेऊन “डिप क्लीनिंग” विशेष स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. ही मोहीम सर्व प्रभागक्षेत्रात सुरुवात करण्यात आलेली आहे. ९ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत हि विशेष स्वच्छता मोहीम दैनंदिन सर्व प्रभागक्षेत्रात सुरु राहणार आहे. या प्रसंगी घनकचरा व्यवस्थापन उप आयुक्त रामदास कोकरे यांनी प्रस्तावना करुन स्वच्छता मोहीम राबविणे का आवश्यक आहे व त्याचे महत्व काय? याबाबत नागरीकांचा सहभाग अपेक्षित आहे असे सांगितले. तर आयुक्त अभिनव गोयल यांनी सर्वकष स्वच्छता ठेवुन शहर शाश्वत स्वच्छ कसे राहिल या करिता व मानांकन उंचावणेकरीता नगरसेवक व नागरिक यांनी सहकार्य करण्याचे आश्वासीत केले. उप महापौर राहूल दामले यांनी सुध्दा शहर स्वच्छ ठेवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न करावेत. महापौर हर्षाली चौधरी थविल यांनी अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग यांनी संपूर्ण शहर तसेच ग्रामिण विभाग सुध्दा सर्वकष विशेष स्वच्छता मोहीम राबवून शहराचे मानांकन उंचावण्याचे आदेश उप आयुक्त व सर्व अधिका-यांना दिले. अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. या प्रसंगी महापौर, उप महापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उप आयुक्त, नगरसेवक अस्मिता मोरे, विजया पोटे, शालिनी वायले, रेखा चौधरी, समिना शेख, गणेश जाधव, गणेश लांडगे, उमेश बोरगांवकर, मोरेश्वर भोईर, जयवंत भोईर, रमेश जाधव, कांचन कुलकर्णी, जतिन प्रजापती, तसेच सहा. आयुक्त प्रीती गाडे, मुख्य स्वच्छता अधिकारी आगस्तिन घुटे,  स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व सफाई कर्मचारी उपस्थित होते.