Category: होम

 समाजभूषण नासिकेत पानसरे आदर्श पत्रकार ; दैनिक संध्यातर्फे पुरस्कार प्रदान

समाजभूषण नासिकेत पानसरे आदर्श पत्रकार ; दैनिक संध्यातर्फे पुरस्कार प्रदान मुंबई : महाराष्ट्र शासनाने समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले मंत्रालय , मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार नासिकेत पानसरे यांना आदर्श पत्रकार…

 चिन्मय मिशनच्या ठाणे केंद्रामध्ये अमृत्व महोत्सव प्रित्यर्थ गुरुपादुका पूजन सोहळा संपन्न

चिन्मय मिशनच्या ठाणे केंद्रामध्ये अमृत्व महोत्सव प्रित्यर्थ गुरुपादुका पूजन सोहळा संपन्न ठाणे – परमपूज्य स्वामी चिन्मयानंद यांनी वेदांताचा प्रामुख्याने श्रीमद्भगवद्गीतेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी स्थापन केलेल्या विश्वव्यापी चिन्मय मिशनला…

जागतिक दर्जाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे भारतातीलच नाही तर जगातील एक नावाजलेले विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४९ रोजी झाली म्हणजे आज हे विद्यापीठाला ७७ वर्ष पूर्ण होऊन ७८…

चेहऱ्यावरील अॅसिड…

महिलांच्या चेहऱ्यावरील अॅसिड हल्ले केवळ अत्याचारच नाहीत तर अतिशय क्रूर मानवी वृत्तीचे प्रतीक म्हणून निंदनीय देखील आहेत परंतु केवळ महिलाच नव्हे तर आजकाल काही पुरुषही ‘फेशियल’ या सौन्दर्यासाठीच्या नावाखाली चेहऱ्यावर…

रस्त्याला हवा आणखी एक पर्याय

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून कोकणात जाणारे त्र्यंबकेश्वरपासून गडहिंग्लजपर्यंत अनेक घाट रस्ते आहेत. त्यापैकी मुंबई-पुण्यादरम्यानचा बोरघाटातील रस्ता हा अतिशय महत्त्वाचा आहे. जुन्या मुंबई-पुणे रस्त्याला द्रुतगती मार्गाचा पर्याय दिला असला, तरी बोरघाटात हे रस्ते…

आर्थिक पातळीवर फसगत कुठे?

आर्थिक पातळीवर फसगत कुठे? सध्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात देशात कोणतीही असामान्य परिस्थिती नाही. उद्योगजगतात असलेली असामान्य परिस्थिती मुख्यत: आंतरराष्ट्रीय पातळीवर, विशेषतः अमेरिकेने वाढवलेल्या टेरिफमुळे आहे. ताज्या अर्थसंकल्पाकडूनही वास्तव लक्षात घेऊन तरतुदी…

महाराष्ट्र राज्य पाणी स्वच्छता कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

महाराष्ट्र राज्य पाणी स्वच्छता कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन रमेश औताडे मुंबई : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जलजीवन मिशन अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन, सेवा-सुरक्षा व सामाजिक संरक्षणाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीने राज्य सरकारकडे केली असल्याचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड कार्याध्यक्ष सचिन जाधव उपाध्यक्ष ऋषिकेश शिलवंत उपाध्यक्ष बंडू हिरवे यांनी आझाद मैदानात आंदोलन दरम्यान सांगितले. याबाबतचा निवेदनपत्र ४ फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांना देण्यात आले आहे. राज्यातील ग्रामीण भागात स्वच्छता, पाणीपुरवठा, जनजागृती, क्षमता बांधणी आणि घराघरात नळजोडणी (हर घर जल) यांसारख्या महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या ऑक्टोबर २०२५ पासून मानधन प्रलंबित असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. निधीअभावी ही परिस्थिती निर्माण झाली असून, यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.असे सचिन जाधव व संदीप पाटील यांनी सांगितले. या कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे राज्यातील हजारो गावे ओ डी एफ प्लस घोषित झाली असून हजारो गावे ‘हर घर जल’ म्हणून प्रमाणित झाली आहेत. मात्र, इतके महत्त्वाचे काम करूनही कर्मचाऱ्यांना मानधन, आरोग्य व सामाजिक सुरक्षा सुविधा मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अंजना उबाळे यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न

अंजना उबाळे यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न ठाणे : शहापूर तालुक्यातील साठगाव येथील रहिवासी असलेल्या अंजना तानाजी उबाळे या भिवंडी परिमंडळ पोलीस उपायुक्त कार्यालयात सळग ३१ वर्षे चतुर्थ श्रेणी पदावरून आपली सेवा करून अलीकडेच सेवानिवृत्त झाल्या आहेत.काल त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम साठगाव येथे आयोजित करण्यात आला होता.त्यांनी  उत्तम सेवा बजावली.त्याच्या सेवेच्या कामगिरी बद्दल ठाणे पोलिस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुंबरे यांनी त्यांच्या कार्याचा सन्मानपत्र देऊन गौरव केला आहे. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते मधुकर उबाळे,जेष्ठ पत्रकार  बी.डी. गायकवाड,पत्रकार अविनाश उबाळे, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी मारुती चन्ने,डॉ.  बी.बी. प्रधान,कुमार उबाळे,गोविंद विशे,लक्ष्मण विशे,दीपक गायकवाड,मनोहर गायकवाड,जगन गायकवाड,राज जाधव भिवंडी पोलीस उपायुक्त कार्यालयातील कर्मचारी,साठगावचे पोलीस पाटील सचिन गायकवाड गावातील ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी भीमाई संस्थेचे अध्यक्ष घनश्याम गायकवाड, पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले.उपस्थित मान्यवरांनी सेवापूर्ती समारंभाच्या निमित्ताने आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे  बौद्धाचार्य  मनोज गायकवाड यांनी केले. उपस्थितांचे आभार घनश्याम गायकवाड यांनी मानून कार्यक्रमाची सांगता केली.

 अरुळे ग्रामस्थांचे स्नेहसंमेलन उत्साहात

अरुळे ग्रामस्थांचे स्नेहसंमेलन उत्साहात मुंबई : मौजे अरुळे ग्रामविकास मंडळ, मुंबईचे वार्षिक स्नेहसंमेलन रविवारी शारदा मंगल कार्यालय, दादर येथे उत्सहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष सुभाष करपे, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार जगदीश भोवड उपस्थित होते.  यावेळी व्यासपीठावर मंडळाचे चिटणीस विकास खांबल, सुरेश रावराणे, सुभाष रावराणे, सहचिटणीस प्रकाश करपे, अजय वारीक हे उपस्थित होते. याप्रसंगी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, सेवानिवृत्तांचा सत्कार, विजयी स्पर्धकांचे बक्षीस वितरण, हळदीकुंकू समारंभ आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले. प्रमुख पाहुणे जगदीश भोवड यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गावात शिक्षण घेऊन मुंबईला आल्यानंतर येथील आव्हाने स्वीकारत, मिळालेल्या संधीचे सोने करीत मी स्वतः जिद्दीने उभा राहिलो. आपल्या गावातील अनेक लोक असेच गरिबीतून पुढे आलेले आणि मोठे झालेले आहेत. त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. आपण सकारात्मक जीवन जगणे गरजेचे आहे. मंडळाचे अध्यक्ष सुभाष करपे यांनी आपल्या भाषणात मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता रावराणे आणि प्रभाकर रावराणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष करपे, विकास खांबल, देवकुमार बोडके, अजय वारीक, अनिल बाणे, मंगेश बाणे, जगदीश रावराणे, मधुकर खांबल, चंद्रकांत रावराणे, माधव काटे, प्रकाश करपे, मधुकर जैतापकर, नारायण खांबल, रमेश मराठे, चंद्रकांत खानविलकर, शांताराम खानविलकर, प्रभाकर रावराणे, नंदकुमार नारकर, प्रमोद नारकर, संतोष माईणकर, सुभाष जाधव, संतोष रावराणे, दिलीप जैतापकर, श्वेता रावराणे यांनी मेहनत घेतली.

परीक्षा काळात भाडे नाकारू नका – मनोज प्रधान

परीक्षा काळात भाडे नाकारू नका – मनोज प्रधान अनिल ठाणेकर ठाणे-  मंगळवारपासून राज्यात बारावीच्या तर 20 फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. परीक्षा केंद्रावर पोहोचण्यात विद्यार्थ्यांना उशीर होऊ नये, यासाठी रिक्षा चालकांनी कोणतेही भाडे नाकारू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी रिक्षा चालक – मालक संघटनांकडे निवेदनाद्वारे केले आहे. ठाणे शहरात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. अशा स्थितीत परीक्षा केंद् गाठणे परीक्षार्थीना जिकिरीचे होणार आहे. त्यामुळे सार्वजनिक बसगाड्या वाहतूक कोंडीत अडकण्याची शक्यता असल्याने अनेक विद्यार्थी आणि पालकांकडून परीक्षा केंद्र गाठण्यासाठी रिक्षासारख्या वाहनांचा वापर करणार आहेत. मात्र, आजवरचा अनुभव पाहता रिक्षा चालकांकडून भाडे नाकारण्याचे प्रकार घडत असतात. ते किमान परीक्षा काळात तरी घडू नयेत, परीक्षार्थीना अपेक्षित केंद्रांवर रिक्षा चालकांनी सोडावे, असे आवाहन प्रधान यांनी केले आहे. यासंदर्भात मनोज प्रधान यांनी सर्व रिक्षा संघटनांशी पत्रव्यवहार केला असून रिक्षा चालकांना समज देण्याची विनंती केली आहे. चौकट राष्ट्रवादी (श.प.) चे कार्यकर्ते सज्ज वाहतूक कोंडी अथवा इतर कोणत्याही अडचणीमुळे विद्यार्थ्यास परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर होत असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते विद्यार्थ्यांच्या मदतीला उभे राहणार आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष तथा नगरसेवक अभिजीत पवार, कार्याध्यक्ष राजेश कदम,  श्रीकांत भोईर तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष राहू पाटील ( +918424004747) यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्यकर्ते अनुक्रमे कळवा, ठाणे आणि घोडबंदर पट्ट्यात दुचाकीवरून विद्यार्थ्यांना अडचणीच्यावेळी परीक्षा केंद्रावर पोहोचवतील, असेही मनोज प्रधान यांनी सांगितले.