Category: होम

ड्रग्सवरील कारवाई कोणत्या मंत्र्यांच्या सांगण्यावरून रोखली?

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा फडणवीसांना सवाल मुंबई : महाराष्ट्रातील युवकांना नशेबाज करणाराड्रग्सचा साठा नाशिक ते लोणावळा या दरम्यान आहे. परंतु, अजूनही तिथे छापा टाकला जात नाही. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला सांगावं की, त्यांना केंद्रातील कोणत्या मंत्र्यांकडून सूचना…

नरेंद्र मोदींचा आत्मविश्वास डळमळीत झालाय- शरद पवार

सातारा : इंडिया आघाडीला महाराष्ट्रात मिळणारा पाठींबा पाहुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. आपले पंतप्रधानपद धोक्यात आल्याची त्यांना भीती वाटत आहे, अशी टीका करतानाच राज्यातून इंडिया आघाडीचे ३० ते ३५ खासदार निवडून येतील, असा विश्वास…

चंद्रकांत पाटीलांच्या विधानावर अजित पवारांची टीका

पुणे: एन निवडणूकीच्या धामधुमीत शरद पवारांचा बारामतीत पराभव करायचा आहे हे चंद्रकांत पाटील यांचे विधान अनाठायी होती. अशा स्वरुपाच्या विधानाची गरज नव्हती, त्यामुळे बारामतीत नाराजी पसरली अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी…

उल्हासनगरात डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या विकास रथाचे पप्पू कलानी, कुमार आयलानी सारथी

उल्हासनगर : महायुती मधील सर्व धर्मीयांसोबत उल्हासनगरातील तमाम सिंधी नेते आणि राजकीय वैरी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना पुन्हा तिसऱ्यांदा जिंकून देण्यासाठी एकवटले असून डॉ.शिंदे यांच्या विकास रथाचे माजी आमदार पप्पू कलानी,आमदार कुमार आयलानी सारथी बनल्याचे चित्र उल्हासनगरातील रॅलीत बघावयास मिळाले आहे. या सुखावून टाकणाऱ्या चित्रांमुळे संपूर्ण शहरातून महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे यांना रेकॉर्डब्रेक मते मिळणार आणि ते विजयाची हॅटट्रिक मारणार असा विश्वास कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी व्यक्त केला आहे. बुधवारी 8 तारखेला सायंकाळ पासून शहरातून दोन टप्यात डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या रॅली काढण्यात आल्या.पहिला टप्पा हा अंबरनाथ विधानसभा व कल्याण पूर्व विधानसभेतील कॅम्प नंबर 5 नेताजी चौक ते कॅम्प नंबर 4 ओटी सेक्शन. या रॅलीत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या सोबत जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,आमदार डॉ.बालाजी किणीकर,आमदार कुमार आयलानी,शिवसेनेचे चंद्रकांत बोडारे,अरुण आशान,राजेंद्र चौधरी,रमेश चव्हाण,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री,भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी,टीम ओमी कलानीचे कमलेश निकम,मनोज लासी,पीआरपीचे प्रमोद टाले,महिला आघाडी यांनी मोठया संख्येने भाग घेतला. पप्पू कलानी-कुमार आयलानी एकत्र रात्रीचा उल्हासनगर विधानसभा क्षेत्रातील दुसरा टप्पा हा लक्षवेधक ठरला.या रॅलीत डॉ.श्रीकांत शिंदेंसोबत सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे प्रणेते,चारदा आमदार म्हणून निवडून आलेले व जन्मठेपेच्या शिक्षेतून बाहेर आलेले माजी आमदार पप्पू कलानी,विद्यमान आमदार कुमार आयलानी,आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव,भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री,मनसेचे शहराध्यक्ष संजय घुगे आदी सहभागी झाले होते. राजकीय वैरी एकवटले विशेष म्हणजे युथ आयकॉन ओमी कलानी यांच्या टीम ओमी कलानी सोबत कुमार आयलानी,प्रदीप रामचंदानी,भगवान भालेराव,भारत गंगोत्री यांचे राजकीय गणित जुळत नसून त्यांचे राजकीय वैर हे अनेकदा मासमीडियावर उघड होते.असे असले तरी डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या सोबत पप्पू कलानी,कुमार आयलानी,भगवान भालेराव,प्रदीप रामचंदानी,भारत गंगोत्री हे एकाच रथावर एकवटल्याने डॉ.श्रीकांत शिंदे यांनी रथी महारथिंची मोट बांधली असा सकारात्मक सूर उमटू लागला आहे. डॉ.श्रीकांत शिंदे-ओमी कलानी यांचे दोस्ती का गठबंधन ओमी कलानी यांची पत्नी पंचम ओमी कलानी ह्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षा आहेत.मात्र डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याशी मैत्रीचे नाते असल्याने ओमी कलानी यांनी डॉ.शिंदे यांच्यासोबतचे दोस्ती का गठबंधन जाहीर केलेले आहे.त्यासाठी त्यांनी 5 हजार स्टिकर्स तयार केले असून त्याचे अनावरण डॉ.शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलेले आहेत.याशिवाय डॉ.शिंदे यांच्या प्रचारासाठी दोन प्रचार रथ सज्ज केलेले आहेत.

रिया गायकवाडचा अटकेपार झेंडा

अमेरिकेच्या बफेलो विद्यापीठात ऑनर्स स्टुडेंट कॉन्सीलच्या अध्यक्षपदी मुंबई (प्रतिनिधी):- लातुरचे माजी खा. अ‍ॅड. सुनिल गायकवाड यांची पुतणी रिया विजयकुमार गायकवाड हिची अमेरिकेच्या बॅफेलो विद्यापीठाच्या ‘ऑनर्स स्टुडेंट’ कौन्सीलच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. सन २०२४-२५ या वर्षासाठी तिची अध्यक्षपदी निवड झाली आहे. रिया ही बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग (बायोमेडिकल इंजिनिअरिंग) प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. सातसमुद्रापार तिने हे यश मिळविल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत असून मा.खा. सुनिल गायकवाड, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष अनिलकुमारजी बी. गायकवाड, विक्रांद टाइम्स व अग्रसेन टाइम्स परिवार, मुख्य संपादक अरुणकुमार एस. मुंदडा, लेखक मिलिंद काटे, ज्येष्ठ पत्रकार गुलाब भावसार, भागा वरखडे, राजीव मंडलिक, अण्णा सोमवंशी, चांद शेख, निलेश वाणी आदींनी तिचे अभिनंदन केले आहे. तिच्या या यशाने गायकवाड कुटुंबीयाच्या मानात आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

केजरीवालांच्या जामीनावर आज फैसला

नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभेच्या निवडणूकीला कलाटणी देणारा निकाल आज सर्व्वोच्च न्यायालय सुनावणार आहे. दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीनअर्जावर सर्व्वोच्च न्यायालयाची आज सुनावणी होणार…

ईव्हीएम माझ्या बापाची ! भाजपा नेत्याच्या मुलाचा मतदान केंद्रात धुमाकूळ

फेसबुक लाईव्ह करत केले बोगस मतदान भाजपाला मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात जाऊन धमकावले पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या अहमदाबाद : गुजरातमधील दाहोद लोकसभा मतदार संघात लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगत भाजपा नेत्याच्या मुलाने…

रोमहर्षक लढतीत अंबरनाथ रायझिंगने मारली बाजी

१२ वी ठाणे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा ठाणे : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने  गतविजेत्या एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब) संघाचा ३ धावांनी पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित १२ व्या ठाणे प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.  विजयासाठी  १२५ धावांचा पाठलाग करणाऱ्या एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाला १२२ धावांवर रोखत अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने पहिल्यांदाच विजेतेपदाच्या करंडकावर नाव कोरत ९९,९९९ रुपयांचे रोख बक्षीस मिळवले. स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगीरी करणाऱ्या अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबच्या सामन्यातील आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. उपविजेत्या एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाला ५५,५५५ रुपयांवर समाधान मानावे लागले. अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करून मोठे आव्हान उभे करण्याची रणनीती आखली होती. नाणेफेकीचा कौल विरोधात गेल्यावरअपेक्षेप्रमाणे फलंदाजी करण्याची संधी मिळालेल्या अंबरनाथ क्रिकेट क्लबला पहिला धक्का पहिल्याच चेंडूवर मिळाला. अंजदीप लाडने सलामीची जोडी फोडत धावांचे खातेही न उघडलेल्या अंबरनाथ क्रिकेट क्लब ब संघाला अडचणीत आणले. पण या धक्क्यानंतर श्रीराज घरतने नाबाद ५० आणि परीक्षित वळसंगकरने २० धावा करत संघाला शतकी धावसंख्या उभारून दिली. अमित पांडे, धृमील मटकर, अमन खानने प्रत्येकी दोन आणि अंजदीप लाड, हेमंत बुचडे आणि अर्जुन शेट्टीने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. माफक आव्हानाला सामोरे जाताना अमन खानने २२ धावांची खेळी करत संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. पण त्यानंतर थोड्या थोड्या क्रमाने फलंदाज बाद झाल्याने एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाची मधली फळी दडपणाखाली आली. या नाजूक परिस्थितीत विकी पाटीलने ३१ आणि आशय सरदेसाईने १८ धावा करत संघाला विजयाची आस दाखवली. पण हे दोघे बाद झाल्यावर जेत्या संघाच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजांना डोके वर काढण्याची संधी मिळू दिली नाही. फलंदाजाना दबावाखाली ठेवताना परिक्षीत वळसंगकर आणि कर्णधार प्रथमेश महालेने प्रत्येकी तीन बळी मिळवले. दशरथ चव्हाणने दोन आणि सौद मंसूरीने एक फलंदाज बाद केला. संक्षिप्त धावफलक : अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब : १९.४ शतकात सर्वबाद १२५ ( श्रीराज घरत नाबाद ५०, परिक्षीत वळसंगकर २०, अमित पांडेय ४-३३-२, अमन खान २-१६-२, धृमील मटकर ४-२४-२  हेमंत बुचडे ४-१४-१, अंजदीप लाड २-१८-१, अर्जुन शेट्टी २.४- १५-१) विजयी विरुद्ध एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब) : २० षटकात ९ बाद १२२ ( विकी पाटील ३१, अमन खान २२, आशय सरदेसाई १८, परिक्षीत वळसंगकर ४-१-१५-३, प्रथमेश महाले ४-२३-३, दशरथ चव्हाण ४-२६-२, सौद मंसुरी १-९-१ ). सर्वोत्तम खेळाडू फलंदाज : आदित्य रावत ( बॉईज क्रिकेट क्लब, १८१ धावा). गोलंदाज : धृमील मटकर (अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब, ९ बळी). क्षेत्ररक्षक : अतुल सिंग ( एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब), ५ झेल).

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

महिला गटात चार व व पुरुष गटात चार संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश ठाणे : श्री मावळी मंडळ आयोजित ९९ व्या शिवजयंतीउत्सवानिमित्त ७१ व्या राज्यस्थरीय कबड्डी स्पर्धेच्या चौथ्या दिवशी  महिला गटात प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन (पुणे), स्वराज्य स्पोर्ट्स क्लब (मुंबई उपनगर), कर्नाळा क्रीडा (रायगड) व शिवशक्ती महिला संघ (मुंबई शहर)या संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर पुरुष गटात मिडलाईन कर्जत (ठाणे), विजय काल्हेर (ठाणे), शिव शंकर क्रीडा मंडळ (ठाणे) व स्वस्तिक क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर) ह्या संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिला गटातील पहिल्या उप-उपांत्य लढतीत मुंबई उपनगरच्या स्वराज्य स्पोर्ट्स क्लब संघाने धुळ्याच्या शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब संघाचा अटीतटीच्या लढतीत ३३-३१ असा २ गुणांनी पराभव करून  उपांत्य फेरीत प्रवेश केला. सदर सामन्यात स्वराज्य स्पोर्ट्स क्लब संघाच्या याशिक पुजारीने उकृष्ट चढाया करीत आपल्या संघाला मध्यन्तराला १९-१० अशी ९ गुणांची आघाडी मिळवून दिली. तिला समृद्धी मोहितेने पक्कडीत सुरेख साथ दिली. मध्यन्तरानंतर   शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब संघाच्या विद्या दोलताडे व ज्योती उफळे यांनी चतुरस्त्र खेळ करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढवण्यात यश मिळवले. परंतु शेवटच्या दोन मिनिटात  राज्य स्पोर्ट्स क्लब संघाने अतिशय परिपक्व खेळाचे प्रदर्शन करीत सामना आपल्या बाजूने झुकवला . महिला गटातील दुसऱ्या उप-उपांत्य फेरीच्या लढतीत पुण्याच्या प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने ठाण्याच्या आर एफ नाईक  संघाचा ४९-१८ असा ३१ गुणांनी पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. ह्या सामन्यात  प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघानेसुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करीत मध्यन्तराला २३-८ अशी १५ गुणांची घेतली ती अंकिता पिसाळ व हर्षी शेट्टी यांच्या उत्कुष्ट खेळामुळे.  मध्यन्तरानंतरही   प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने सामन्याची पक्कड घट्ट ठेवीत सामना ३१ गुणांनी जिंकला . महिला गटातील तिसऱ्या उप-उपांत्य फेरीच्या सामन्यात ताकदवर अश्या मुंबई शहरच्या शिवशक्ती महिला संघाने ठाण्याच्या होतकरू मित्र मंडळाचा २८-२० असा ८ गुणांनी पराभव करीत गेल्या अनेक वर्षाची परंपरा कायम ठेवीत श्री मावळी मंडळ स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. ह्या सामन्यात दोन्ही तुल्यबळ संघानी सुरुवातीपासूनच अतिशय सुंदर खेळाचे प्रदर्शन करीत सामन्यात रंगत आणली. मध्यन्तराला शिवशक्ती महिला संघाने प्रतीक्षा तांडेल व समृद्धी भागात यांच्या अष्टपैलू खेळामुळे १४-११ अशी ३ गुणांची नाममात्र आघाडी घेतली.  होतकरू मित्र मंडळाच्या   प्राजक्ता पुजारी व चैताली बोराडे यांनी खोलवर चढाया करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढवली. परंतु या दोघी आपल्या संघाचा पराभव टाळू शकल्या नाहीत. पुरुष गटातील उप-उपांत्य फेरीच्या लढतीत ठाण्याच्या मिडलाईन कर्जत संघाने वाशिंदच्या जय बजरंग क्रीडा मंडळाचा २४-२० असा ४ गुणांनी पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. सुरुवातीपासून सामना अतिशय दोलायमान असा झाला व गुणसंख्येचे पारडे दोन्ही संघाकडे फिरत होते. मिडलाईन कर्जत संघाच्या पवन अडेच्या  उत्कुष्ट चढाया, वैभव पाटील व वैभव मोरे ह्यांच्या सुंदर पक्कडीमुळेमध्यंतराला मिडलाईन कर्जत संघाने  १२-१० अशी २ गुणांची नाममात्र आघाडी घेतली.  मध्यन्तरानंतर दोन्ही संघानी अतिशय सावध खेळ करीत आपल्या संघाला आघाडी मिळवून देण्याचा प्रयत्न करीत होते. जय बजरंग क्रीडा मंडळाच्या दर्शन पवार व आशिष पाटील यांनी आपल्या संघाला आघाडी मिळवून देण्यासाठी निकराचे प्रयत्न केले. परंतु आपल्या संघाचा पराभव टाळू शकले नाहीत. उत्कुष्ट चढाईपट्टू (पुरुष) : आर्यवर्धन नवले (ओवळी क्रीडा मंडळ,मुंबई उपनगर), उत्कुष्ट पक्कड (पुरुष)  : वैभव मोरे (मिडलाईन कर्जत, ठाणे), उत्कुष्ट चढाईपट्टू (महिला)  : विद्या दोलताडे (शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब, धुळे), उत्कुष्ट पक्कड (महिला )  : समृद्धी मोहिते (स्वराज्य स्पोर्ट्स क्लब, मुंबई उपनगर) शिव शंकर क्रीडा मंडळ (ठाणे) X  बंड्या मारुती सेवा मंडळ (मुंबई शहर)  ४१ X २७ स्वस्तिक क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर) X ओवळी क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर)  ३७ X२२ विजय काल्हेर (ठाणे)  X  श्री विठ्ठल क्रीडा मंडळ (ठाणे) ४४ X ३९

२६ मित्रपक्षांची ही खिचडी निष्ठावंतांची – भास्कर बैरीशेट्टी

अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात २६ मित्रपक्षांच्या आघाडीचा खिचडी म्हणून उल्लेख केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओवळा माजिवडा विधानसभा उपशहरप्रमुख भास्कर बैरीशेट्टी यांनी, ही खिचडी निष्ठावंतांची असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच केलेल्या भाषणामध्ये इंडिया अलायन्सचा उल्लेख २६ मित्र पक्षांच्या आघाडीचा खिचडी म्हणून केला होता. आमची ही खिचडी निष्ठावंतांची आहे.हे लक्षात ठेवा. ही आमची खिचडी एनडीए बरोबर असलेल्या महायुतीतील तीन पक्षांच्या बिर्याणीपेक्षा कितीतरी पटीने स्वच्छ, चवदार व पारदर्शक आहे. भारतातील नागरिकांना बिर्याणीपेक्षा खिचडी अधिक आवडते कारण ती पचविणे सोपे असते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यासारख्या अनुभवी वक्त्याने कोणतेही वक्तव्य करताना थोडे तरी भान बाळगावे, असा सल्ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओवळा माजिवडा विधानसभा उपशहरप्रमुख भास्कर  बैरीशेट्टी यांनी दिला आहे.