Category: होम

ठाण्यात इंडिया-महाविकास आघाडीची वज्रमूठ

जोरदार शक्तिप्रदर्शन करत राजन विचारे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे लोकसभेचे इंडिया- महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी ठाण्यातील कोपनेश्वर मंदिर येथे दर्शन घेऊन धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शक्ती स्थळावर आशीर्वाद घेऊन आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आल्याने ठाण्यात इंडिया-महाविकास आघाडीची वज्रमूठ पाहायला मिळाली. तसेच ठाण्यात मिंधेची उमेदवारी  गुजरातमधून आदेश आल्यानंतर ठरणार असल्याची खरमरीत टीका करत आदित्य ठाकरे यांनी गद्दार गॅंगवर जोरदार निशाणा साधला. इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भर उन्हात कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याने हे ठाणेकरांचे प्रेम असल्याचे ठाकरे म्हणाले. शिवसेना आणि ठाण्याचे जुने नाते आहे. ही लढाई पक्ष आणि बाप चोरणाऱ्या, संविधान बदलणाऱ्या आणि महाराष्ट्राला दिल्लीमध्ये झुकवणाऱ्यांच्या विरोधात असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. त्यावेळी शिवसेना, युवासेना सचिव वरूणजी सरदेसाई, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, कॉंग्रेसचे अध्यक्ष ठाणे जिल्हा विक्रांत चव्हाण, शिवसेना उपनेते विजय कदम, संभाजी ब्रिगेड अध्यक्ष अॅड. मनोज आखरे, नवी मुंबई कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष कौशिक आनंद, कॉंग्रेस उपाध्यक्ष राखी पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला जिल्हाध्यक्ष नवी मुंबई सलुजा सुतार, कॉंग्रेस महिला आघाडी पूनम पाटील, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, प्रभाकर म्हात्रे, केदार दिघे, अनिश गाढवे, मुजफ्फर हुसैन, धर्मराज्य पक्ष अध्यक्ष राजन राजे, व इंडिया-महाविकास आघाडीचे प्रमुख नेते व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बिल्डरने लावला घर खरेदीदारांना चुना, घरखरेदीदार रस्त्यावर

केतन खेडेकर मुंबई : सुप्रिम सिव्हील कन्स्ट्रक्शन इंडिया प्रा.लि. या कंपनीचे डायरेक्टर अब्बास कुरेशी यांनी त्यांच्या  कंपनीच्या माध्यमातून चेंबूर येथे इमारतीचे बांधकाम करण्याचे काम घेतले. त्यानंतर त्यांनी एका व्यावसायिक ओळखीतून  कुर्ला (पूर्व) येथील वत्सलाताईनगर, नेहरूनगर मधील, ‘ग्रेस अर्बन डेव्हलपमेंट कार्पोरेशन’ या बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) कंपनीच्या ‘मास मेट्रोपोलिसीस या प्रकल्पाचे काम मिळाले. ह्या कामाची पाहणी करण्याकरिता व प्राथमिक बोलणी करण्याकरिता  तसेच आमचे प्रोजेक्ट डायरेक्टर श्री. निकेश इंदरलाल रावल गेलो असता. या मास मेट्रोपॉलिसीस साईट साठी ‘ग्रेस अर्बन डेव्हलपमेंट कार्पोरेशन’ या कंपनीस बार्टर सिस्टम (पैशाच्या बदल्यात फ्लॅट अथवा बांधकाम एरिया देणे) नुसार काम द्यायचे ठरले. त्यानुसार ‘ग्रेस अर्बन डेव्हलपमेंट कार्पोरेशन’ चे मालक अत्ताउल्ला अन्सारी, दानिश अन्सारी, निशांत अन्सारी यांच्या विरोधात मी दिनांक २६/०७/२०२२ रोजी गुन्हेगारी, कट, फसवणूक, विश्वासभंग आणि धमकी देत असल्याच्या गुन्ह्याबद्दल मा. पोलिस सहआयुक्त (गुन्हे) यांचे कडे तक्रार केली होती. आमच्या सोबत खरेदीदारांची ही फसवणूक केली आहे. ११ फ्लॅट पैकी ०२ फ्लॅट चे रजिस्ट्रेशन करून दिले आणि उर्वरित ०९ फ्लॅट च्या ‘अलॉटमेंट लेटर’ आणि ‘डीड ऑफ कॅन्शलेशन’ यामध्ये फ्लॅट एरिया, फ्लॅट नंबर यांमध्ये तफावत आहे. तसेच अलॉटमेंट लेटर दिल्यानंतर फ्लॅट हे दुसऱ्याच व्यक्तीना रजिस्ट्रेशन करून विक्री केले. त्यानुसार सतत 2 वर्षांपासून आम्ही आमची तक्रार गुन्हे शाखेने नोंदवली नाही, आरोपीच्या चुकीच्या तक्रारीवर आमचा धक्का आणि आश्चर्य व्यक्त करत संयुक्त सीपी गुन्ह्याने प्रकरण 6 वरून युनिट 7 कडे वर्ग केले. तसेच घर खरेदीदार यांनी रिट याचिका क्र. 4218आणि अशोका बिल्डकॉन यांनी अनेक रिट याचिका क्र. 5779 ऑफ 2024 आणि आम्ही रिट याचिका क्र. 4691ऑफ 2024 केल्यानंतरच पोलिसांनी आमची प्रकरणे घेतली आणि एफआयआर नोंदविला गेला नाही तोपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही, या सर्व विकासानंतरही आणि माननीय उच्च न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशानुसार आरोपींना अटक केली जात नाही आणि कायद्याची भीती न बाळगता आरोपी मुक्तपणे फिरत आहे. एकूण रु. 12 करोडची आमची फसवणूक करूनही पोलीस त्यांना अटक करत नाहीत किंवा कोणतीही कारवाई करत नाहीत. एक आरोपी केवळ श्रीमंत आणि उच्च संपर्कातील लोक असल्यामुळे आमचे संरक्षण कसे होते, या प्रकरणात निष्पक्षता का नाही, पोलिसांच्या या दृष्टिकोनाने आम्ही हैराण झालेल्या सर्व उच्च अधिकाऱ्यांकडे जाऊन देखील आम्हाला कोणतेही यश मिळालेले नाही किंबहुना आमची रक्कम किंवा घर देखील आम्हाला परत मिळालेले नाहीत. तरी आम्ही संपूर्णपणे हवालदिलं झाले असून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही प्रसारमाध्यमांना आवाहन करत आहोत की आम्हाला आमचे हक्काचे घर मिळवून द्यावे अशी माहिती बांधकाम व्यवसायिक निकेश रावल आणि अब्बास कुरेशी यांनी पत्रकार परिषद घेऊन  दिली.

‘दुष्काळातही रेशनचे धान्य मिळत नाही साहेब! ८० कोटी जनतेला धान्य मिळाल्याचा गप्पा सांगू नका’

थेट भर सभेत लाभार्थ्यानी जाब विचारला जरंडीतील महायुतीच्या प्रचार सभेतील प्रकार छायाचित्र ओळ-जरंडी येथील महायुतीच्या सभेत मार्गदर्शन करताना अब्दुल सत्तार दुसऱ्या छायाचित्रात उमेदवार रावसाहेब दानवे मार्गदर्शन करताना तिसऱ्या छायाचित्रात जनसमुदाय…. सोयगाव : अहो साहेब! दोन वर्षांपासून आमचा शेतकऱ्यांना दुष्काळात धान्य मिळत नाही आमचे रेशनचे धान्य बंद केले आहे आम्हाला त्या अंशी कोटी लोकांच्या गप्पा नका सांगू आमचे धान्य का बंद आहे याबाबत तालुका प्रशासन दरबारी ओरड मांडा असा भर सभेत लाभार्थ्यांनी जाब विचारुन सभेत मार्गदर्शन करतांना खासदार रावसाहेब दानवे यांना दोन मिनिटे भर सभेत स्तब्ध केल्याचा प्रकार सोमवारी राज्य आणि केंद्राच्या दोन मंत्र्यांच्या सभेत जरंडी (ता सोयगाव) येथे घडला दरम्यान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही ग्रामस्थांची समजूत काढून आधी ऐकून तर घ्या ऐकल्याशिवाय कसे समजेल असे प्रत्युत्तर देऊन वेळ मारून नेली आहे … जालना लोकसभाचे महायुतीचे  उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ सोमवारी मतदार संघाचे शेवटचे टोक समजले जाणाऱ्या जरंडीतून सुरुवात करण्यात आली होती यावेळी मंत्री अब्दुल सत्तार,केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रचार सभेला मार्गदर्शन करताना मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ८० कोटी जनतेला २०२२ पर्यंत मोफत रेशनचे गहू व तांदूळ दिल्या चा मुद्दा काढताच साहेब आम्हाला दोन वर्षांपासून रेशनचे धान्य मिळत नाही ते आधी सुरू करा आमच्याकडे तीन एकर शेती आहे काय खावे दुष्काळात धान्य मिळत नाही असा जाब थेट सभेत दोन्ही मंत्र्यांना विचारला त्यावेळी मंत्री सत्तार स्तब्ध झाले तर दुसरे मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाषण पुढे सुरू ठेवत आधी ऐकून घ्या त्याशिवाय समजणार नाही असे बोलून वेळ काढून घेतली होती यावेळी व्यासपीठावर   भाजपचे जेष्ठनेते सुरेश बनकर,अल्पसंख्याक चे प्रदेशाध्यक्ष इंद्रिस मुलतानी,बाजार समितीचे उपसभापती दारासिंग चव्हाण,शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रभाकर काळे, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पुष्पाबाई काळे, भाजपा तालुकाध्यक्ष बद्री राठोड,  भाजपचे  जयप्रकाश चव्हाण,आदींची उपस्थिती होती काय म्हणाले शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रभाकर काळे— महायुतीच्या बाबतीत शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रभाकर काळे यांनी सांगितले की राज्यात युती असली तरीही सिल्लोड सोयगाव तालुक्यात भाजपा युती धर्म पाळत नाही त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची सोयगाव तालुक्यात भाजपा सोबत काम करण्याची मानसिकता नाही मात्र मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आदेशाचा सन्मान करत आम्ही काम करत आहे भाजपने सुधारणा करावी मागील विधानसभा निवडणुकीत सिल्लोड सोयगाव ची भाजपा युतीच्या विरोधात होती हे सर्वश्रुत आहे असे शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रभाकर काळे यांनी सांगितल्यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावर खुलासा करत रावसाहेब दानवे यांच्या सोबत या मुद्द्यावर सात बैठका झाल्या आहे यावर लक्ष ठेवण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आलली आहे असे सांगून चार महिन्यात भाजपा काय आहे हे कळेलच असा टोला अब्दुल सत्तार यांनी लगावला तर उमेदवार रावसाहेब दानवे यांनी यावर पोतारा फिरवीत अब्दुल सत्तार आणि मी चाळीस वर्षांपासून दोस्त आहे आम्ही भांडतो व एकही होतो राजकारनात कोणीही कोणाचा मित्र व शत्रू नसतो त्यामुळे आता आमचं जमलं तुमचं जमलं पाहिजे तुम्ही जमवून च्या घ्या असा सूचक टोला रावसाहेब दानवे यांनी भाजपा च्या कार्यकर्त्यांना मारला यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनीही पुन्हा रेल्वे मंजुरीचा विषय काढत जालना वरून पुढील निवडणूकीत रावसाहेब दानवे यांना थेट रेल्वेने फर्दापुरला निवडणुकीच्या प्रचाराला बोलावू असा खोचक शब्दात सूचक वक्तव्य केले त्यामुळे जरंडीतील प्रचार सभेतही या दोघांच्या मध्ये राजकिय कलगीतुरा रंगला होता… यावेळी अनुसूचित जातीचे भाजपा जिल्हाध्यक्ष संजीवन सोनवने,राजेंद्र पाटील,सरपंच स्वाती पाटील,वंदनताई पाटील,धृपाताबाई सोनवणे, शमा तडवी, श्रीराम चौधरी, समाधान तायडे,आदींसह तालुक्यातील भाजपा शिवसेना कार्यकर्त्यांची उपस्थिती होती उपसरपंच संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले पुष्पा बाई काळे यांनी आभार मानले.

१ मेला वाजणार ठाणे प्रिमियर लीगचा बिगुल

ठाणे : महाराष्ट्र माझा सेवा संस्थेतर्फे १ ते ८ मे दरम्यान ठाणे प्रिमियर लीग २०२४ आयोजन करण्यात आले आहे. मुंबई क्रिकेट संघटनेची मान्यतेने दादोजी कोंडदेव स्टेडियमवर रंगणाऱ्या या लीगचे यंदा…

नवी मुंबईत ‘मतदार अन् लोकशाही’ची लग्नपत्रिका

वाशी : सध्या देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू असून काही राज्यांमध्ये मतदानाचा टक्का घसरला आहे. त्यामुळे ठाणे लोकसभा मतदानात जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, यादृष्टीने नवी मुंबई महापालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून निवडणूक आयोगाकडून लग्नपत्रिकेच्या स्वरूपात मतदानाची पत्रिका छापली असून पालिकेच्या विभाग कार्यालयाबाहेर तसेच सरकारी कार्यालयांच्या बाहेर चिकटवण्यात आली आहे. समाजमाध्यमांवरदेखील या पत्रिकेची चर्चा सुरू आहे. भारतीय नागरिकांचा ज्येष्ठ चिरंजीव चि. मतदार व भारतीय संविधानाची ज्येष्ठ सुकन्या चि.सौ.कां. लोकशाही यांचे सोमवारी, २० मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी पाच या शुभमुहूर्तावर लग्न होणार आहे. लोकसभा २०२४च्या निमित्ताने भारतीय संविधानाने दिलेल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची सुसंधी, उज्ज्वल भारताची स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपले एक पाऊल, आपला आवाज संसदेत पाठविण्यासाठी आपल्या एक एक मतदानरूपी आशीर्वादाने हा राष्ट्रीय उत्सव साजरा व्हावा, यासाठी आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले आहे. ‘आपले मतदान हाच आमचा आहेर’ ‘आपले मतदान हाच आमचा आहेर आणि विकसित भारत हेच तुमचे रिटर्न गिफ्ट’ असा पत्रिकेतील टीपमध्ये संदेश देण्यात आला आहे. या पत्रिकेतून मतदानांची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिकेने पालिकेच्या मालमत्ता करांवर ‘मी जागरूक मतदार, मतदान करणारच’ असा उल्लेख करत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. एनएनएमटीमध्येदेखील जनजागृती करण्यात येत आहे; तर शहरात पालिकेने फ्लेक्स लावले आहेत. निळ्या शाईचे आवाहन पत्रिकेच्या समारोपामध्ये ‘वरील विनंतीला मान देऊन मतदानाला यायचं हं…’ ‘आमच्याशिवाय तर मज्जाच नाही’ असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच कु. निळी शाई आणि चि. ईव्हीएम यांनी मतदानाला येण्याचे आवाहन केले आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानांची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. पथनाट्य, पालिकेच्या मालमत्ताकराच्या पावतीवरदेखील संदेश देण्यात आला आहे. तसेच शहरांमध्ये फलक लावण्यात आलेले आहे. पालिकेच्या मुख्यालयात स्क्रीन लावण्यात आलेली आहे. – शरद पवार, उपआयुक्त, निवडणूक विभाग

कोंकणातील तापमानात वाढ झाल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी– विभागीय आयुक्त डॉ. कल्याणकर

नवी मुंबई : कोंकण विभागातील तापमानात वाढ झाल्याने  उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी  नागरिकांनी  दुपारी 12 ते 3च्या वेळी अनावश्यक घराबाहेर पडू नये. आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन कोंकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे. वातावरणातील तापमान प्रमाणाबाहेर वाढले की शरीरातील तापमान नियंत्रित करण्याची यंत्रणा कोलमडते. उष्माघात झाल्यावर चक्कर येणे, मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी, दरदरून घाम फुटणे, थकवा येणे  स्नायूंना आकडी येणे अशी लक्षणे दिसू लागताच जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क करावा. उष्माघात  होऊ नये म्हणून  तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात प्यावे,  हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत, बाहेर जातांना गॉगल्स, छत्री/ टोपी, बूट व चपलांचा वापर करण्यात यावा, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. कोंकणातील जनतेने काळजी घ्यावी . उन्हाळ्यात त्रास होऊ लागल्यास जवळच्या शासकीय जिल्हा रुग्णालय अथवा तालुका किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करावा. अनेक आरोग्य केंद्रात उष्णतेचा त्रास होणाऱ्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षाची सोय करण्यात आली आहे.

‘मी मतदान करणारंच .. आपणही मतदान करा’

ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी केली मतदारांमध्ये जनजागृती ठाणे : ‘मी मतदान करणारंच.. आपणही मतदान करा आणि लोकशाही बळकट करा’ अशा घोषणा देत 25 ठाणे-लोकसभा मतदारसंघांतर्गत १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघात ठाणे महानगरपालिकेच्या सफाई कामगारांनी भास्कर कॉलनी येथील हजेरी शेड या ठिकाणी मतदान जनजागृती केली. स्वीप कार्यक्रमातंर्गत शहरात विविध ठिकाणी मतदानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. १४८ ठाणे मतदार संघ सहा.निवडणूक अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज (२९ एप्रिल) सफाई कामगारांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. या ठिकाणी मतदान जनजागृतीपर सामूहिक घोषणा देऊन सफाई कामगारांना मतदान करण्यासाठी आवाहन करुन मतदानाची सामूहिक  शपथ घेण्यात आली. या मतदान जनजागृती कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या प्रत्येक सफाई कामगारांना मी मतदान करणारंच….. आपण ही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा या संदेशासह मतदानाची तारीख  दर्शवणारे माहितीपत्रकाचेही वाटप करण्यात आले. सर्व स्वच्छता सफाई कर्मचाऱ्यांना मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि मतदान आपला अधिकार आणि आपली जबाबदारी आहे याची जाणीव त्यांना करून देण्यात आली. सर्वानी आपल्या कुटूंबातील सदस्यांनी व तुम्ही राहता तेथील आजूबाजूच्या नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मेला अवश्य मतदान करावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी मोठ्या आवाजात सामूहिक पणे “आम्ही राबऊ स्वच्छ्ता अभियान,पण तुम्ही करा हक्काने मतदान या घोषणे द्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

कुंभारखाणपाडा येथे ‘महारेरा’ गुन्ह्यातील बेकायदा इमारत भुईसपाट

डोंबिवली: डोंबिवलीतील कुंभारखाणपाडा येथील हरितपट्ट्यात कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांंधकाम परवानग्या न घेता, महारेराचा नोंदणी क्रमांंक मिळवून उभारलेली बेकायदा इमारत पालिकेच्या ह प्रभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्या तोडकाम पथकाने पोकलेन यंंत्राच्या साहाय्याने भुईसपाट केली. पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता अशा इमारतींना महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाचा (महारेरा) नोंंदणी क्रमांंक मिळवून या बेकायदा इमारतींमधील सदनिका ग्राहकांना बेमालुमपणे विकून त्यांची फसवणूक करण्याचा उद्देश भूमाफियांचा होता. याप्रकरणी प्रसिध्द वास्तुविशारद संदीप पाटील यांंनी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवरून तत्कालीन पालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी अशी बेकायदाशीर कृती करणाऱ्या डोंबिवलीतील ६५ भूमाफियांवर नगररचना अधिकाऱ्यांच्या साह्याय्याने मानपाडा, रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. या गन्ह्यात कुंभारखाणपाडा येथील अजिंक्य नारकर आणि सुनील नारकर या बंधूंंनी वास्तुरचना वास्तुविशारद फर्मचे पांडुरंग म्हात्रे यांच्या साहाय्याने उभारलेल्या सात माळ्याच्या बेकायदा इमारतीचा समावेश होता. यापूर्वी या इमारतीवर दोन ते तीन वेळा जुजुबी कारवाई यापूर्वीच्या साहाय्यक आयुक्तांकडून करण्यात आली होती. हरितपट्ट्यातील अडगळीच्या जागेत असलेल्या या इमारतीचे पाडकाम साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांंच्या मार्गदर्शनाखाली तोडकाम पथकाने मागील पधरा दिवसांंपासून पोकलेन यंंत्राच्या साहाय्याने सुरू केले होते. या इमारतीवर कारवाई होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांंवर खूप राजकीय दवाव होता. परंतु, साहाय्यक आयुक्त सावंत यांंनी हे दबाव न जुमानता आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, उपायुक्त अवधूत तावडे यांच्या आदेशावरून ही बेकायदा इमारत बुधवारी भुईसाट केली. या कारवाईने भूमाफियांना मोठा तडाखा बसला आहे. या कारवाईने भूमाफियांचे सुमारे दोन ते तीन कोटीचे नुकसान झाल्याचे समजते. या इमारतीत एका माजी नगरसेवकाने ‘खुशी’ (बोनस) म्हणून दोन ते तीन सदनिकांची मागणी भूमाफियांकडे केली होती. या कारवाईनंतर ह प्रभागाकडून ठाकुरवाडीतील अग्निदेवी मंदिराजवळ उभारलेली प्रकाश गोठे, शंकर ठाकूर यांंची फशी हाईट्स, गटारावर उभारेली बेकायदा इमारत, राहलुनगर मधील रमाकांत आर्केड, सुदामा हाईट्स आणि खंडोबा मंदिर भागातील बेकायदा इमारती, गरीबाचापाडा येथील वसंत हेरिटेज, जुनी डोंबिवलीतील शाळेच्या आरक्षणावरील शिव लिला आणि कोपर रेल्वे स्थानकाजवळील कोंबड्याच्या खुराड्यावर कधी कारवाई केली जाते याकडे नागरिक, तक्रारदारांचे लक्ष लागले आहे.

मुंब्रा येथे कपड्याच्या दुकानाला आग

आगीत दोन दुकानांमधील वस्तू खाक मुंब्राः येथील दोन कपडे विक्रीच्या दुकानांना लागलेल्या आगीत दुकानातील कपडे तसेच इतर वस्तू जळून खाक झाल्या.मुंब्रा शहरातील कौसा भागातील नशेमन काँलेनी परीसरातीलएका एका  हाँटेलच्या जवळ असलेल्या दहा बाय दहा फूट आकाराच्या कपडे विक्रीच्या दुकानांमध्ये सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली. याबाबतची माहिती मिळताच वीज वितरण करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी आणि  मुंब्रा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.जवानांनी एक फायर आणि दोन हायराईज फायर वाहनांच्या मदतीने अल्पावधित  आग पूर्णपणे विझवली.या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.परंतु भाडेतत्वावर दुकान चालवत असलेल्या अब्दुल लतिफ आणि मोहम्मद शेख या दोघांच्या  दुकानातील कपडे,कपाट,विद्युत वायरींग,वातानाकुलित यंत्र(एसी) पूर्णपणे जळून खाक झाले असल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली. दरम्यान सदरच्या दुकानांमधील आग शाँर्टसर्किटमुळे लागल्याची तसेच दोन  दुकानांमधील लाकडी पार्टिशनमुळे ती दुस-या दुकानामध्ये पसरल्याची माहिती मुंब्रा अग्निशमन दलाचे स्थानक प्रमुख एन.वाय.शिंदे यांनी दिली.

ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी भरला उमेदवारी अर्ज

ठाणे : ठाणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शक्तीस्थळ ते ठाणे बाजारपेठ काँग्रेस ऑफिस वरून वळसा मारून शिवाजी मैदान अशी रॅली काढून शक्ती प्रर्दशन केले. ठाणे  लोकसभा  मतदार संघातून उद्धव सेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजन विचारे यांनी साडे अकरा वाजता सर्वात प्रथम स्वर्गीय आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळ येथील  समाधीस्थळाला भेट देऊन त्यांचे आर्शिवाद घेतले.त्यानंतर  त्यानंतर  तेथूनच  एक   रॅली काढण्यात आली.या रॅलीत  जांभळी नाका परिसरात  शिवसेनानेने  युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, हे सामील झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे, काँग्रेसचे शहरअध्यक्ष विक्रांत चव्हाण हे उपस्थित होते.या रॅलीत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थितीत होते. दुपारी साडे बारा च्या मुहुर्तावर विचारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड  यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे, मुलगी लतिका विचारे, धनश्री विचारे हे उपस्थित होते.