Category: महाराष्ट्र

Maharashtra News

नागपूरमध्ये दारूगोळा कंपनीतील स्फोटात १७ कामगारांच्या मृत्यू

नागपूर: नागपरूमधील राऊळगाव जवळील ‘एवनीरा’ परिसरातल्या एस.बी.एल. एनर्जी लिमिटेड या दारुगोळा बनवणऱ्या डिटोनेटर कंपनीत रविवारी सकाळी भीषण साखळी स्फोट झाले. यात १७ कामगारांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये १४ महिलांसह ३ पुरुष कामगारांचा समावेश…

अवघ्या ६ तासात चाकरमनी मुंबईतून कोकणात इलो….

सावंतवाडी: मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या मुंबई-विजयदुर्ग रो-पॅक्स जलवाहतूक सेवेचा आज थाटात शुभारंभ झाला आणि चाकरमनी अवघ्या ६ तासात मुंबईतून कोकणात इलो. मुंबईतील भाऊचा धक्का येथून मंत्री नितेश…

 विज्ञान, वाणिज्य शाखेसाठीही लवकरच मराठीतून पुस्तके

विज्ञान, वाणिज्य शाखेसाठीही लवकरच मराठीतून पुस्तके विश्व मराठी संमलेनातील परिसंवादात दावा हरिभाऊ लाखे नाशिक : राष्ट्रीय शिक्षण धोरणातंर्गत मातृभाषेतील ज्ञानाने आत्मविश्वास विकसित करणे तसेच मातृभाषेचा अभिमान बाळगणे आवश्यक आहे. शिक्षणाचे मूळ संस्कृतीत आहे. लवकरच पदवीसाठी विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील पुस्तके मराठीत आणण्यात येणार असल्याची माहिती अभ्यासक्रमातील मराठी भाषा या विषयावरील परिसंवादात देण्यात आली. येथील के. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या आवारात आयोजित विश्व मराठी संमेलनात परिसंवाद झाला. उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणककर , कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी परिसंवादात सहभाग घेतला. डॉ. देवळाणकर यांनी, शिक्षणाचे महत्व कमी होत असल्याचे सांगितले. शुल्क किंवा अन्य गोष्टींवर चर्चा होत असतांना परदेशात मात्र शिक्षण आणि शिक्षकाला महत्व आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे मातृभाषेला महत्व देण्यावर भर दिला जात असल्याचे नमूद केले. डॉ. सोनवणे यांनी अभ्यासक्रम आणि मराठी या गोष्टींचा विचार करायला हवा. मराठी भाषा आत्मविश्वास निर्माण करते. भाषेमध्ये आपण आशयाचा आधार घेतो. मराठी समृद्धीसाठी भाषा समकेंद्री , शब्द संपदा, व्याकरण यांचा विचार व्हायला हवा. मराठी भाषा तंत्रस्नेही होणे आवश्यक असल्याचे मांडले. डॉ.आवलगावकर यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असला तरी शैक्षणिक पातळीवर भाषेचा व्यापार, व्यवहार यामध्ये कितपत उपयोग होतो, हे पाहणे गरजेचे असल्याचे मांडले. शैक्षणिक पातळीवर या अनुषंगाने विविध अभ्यासक्रम मराठीत तयार करण्यात येत आहेत. त्यामध्ये उच्चारण आणि लेखन यावर भर देणे आवश्यक आहे. भाषेशी असणारी आपली नाळ तुटता कामा नये, याची काळजी घ्यायला हवी, असे त्यांनी सांगितले. डॉ. कुलकर्णी यांनी शब्दकोशाच्या बाबतीत आपल्याकडे फारसे काम झाले नसल्याची खंत व्यक्त केली. डॉ. गोसावी यांनी कला, विज्ञान, वाणिज्य शाखेतील अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीत येत असून पुढील वर्षापासून ती मिळतील. विज्ञान आणि भाषा एकत्र आणण्याचे काम होणे गरजेचे आहे. बोलीभाषाही तितकीच महत्वाची असल्याचे मांडले.

कणकवलीतील ‘मेगा स्पेशालिटी आरोग्य शिबीर’ यशस्वी…!

कणकवलीतील ‘मेगा स्पेशालिटी आरोग्य शिबीर’ यशस्वी…! पालकमंत्री नितेश राणे यांची संकल्पना….! कणकवली : कणकवली शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘मेगा स्पेशालिटी आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तालुक्यातील ग्रामस्थ आणि रुंग्णांनी आपला…

कालिदास नाट्यगृहात ‘मराठी बोलींचा उत्सव’ संपन्न

कालिदास नाट्यगृहात ‘मराठी बोलींचा उत्सव’ संपन्न हरिभाऊ लाखे नाशिक : मराठी बोलींचा महोत्सवाचे उद्घाटन मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी आणि मधु मंगेश कर्णिक, डॉ. सदानंद मोरे,…

१८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाचा मराठी विश्वकोशातील अवमानजनक उल्लेख तत्काळ दुरुस्त करा…..

१८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाचा मराठी विश्वकोशातील अवमानजनक उल्लेख तत्काळ दुरुस्त करा….. पत्रकार साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांची मागणी नागपूर.. महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोश मंडळाने प्रकाशित केलेल्या मराठी विश्वकोशात १८५७ च्या…

वाचू पुस्तके… बोलू पुस्तके…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फ मराठी भाषा गौरवदिनानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईतील मराठी वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहीनीच्या संपादकांच्या हस्ते या प्रदर्शनाचे…

पुण्यात ALIGN या संरचित रेजोनन्स उपक्रमाचा शुभारंभ

पुण्यात ALIGN या संरचित रेजोनन्स उपक्रमाचा शुभारंभ पुणे : सजगता -आधारित रेजोनन्स उपक्रम ALIGN चा औपचारिक शुभारंभ रविवारी बाणेर येथील Fitcue Fitness Studio येथे करण्यात आला. या कार्यक्रमात सहभागींसाठी ध्वनी -आधारित, संरचित आणि सखोल अनुभव सादर करण्यात आला, ज्याचा उद्देश मज्जासंस्थेचे संतुलन, भावनिक स्थैर्य आणि अंतर्मनातील स्पष्टता वाढवणे हा आहे. प्रिथा देशपांडे आणि डॉ. नेहा साटम यांनी अमोल चाफेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची स्थापना केली आहे. ALIGN ची संकल्पना अशी आहे की ‘अलाइनमेंट’ ही अशी अवस्था आहे, ज्याकडे व्यक्ती जाणीवपूर्वक परत जाऊ शकते. चेतना-विषयक पद्धती आणि मोजता येणाऱ्या आरोग्य-जागरूकतेचा संगम घडवून संरचित आणि सर्वांसाठी उपलब्ध असे व्यासपीठ निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मार्गदर्शित रेजोनन्स-आधारित तसेच इतर उपचारात्मक अनुभवांच्या माध्यमातून व्यक्तींमध्ये संतुलित उपस्थिती, भावनिक समतोल आणि सजग जीवनशैली विकसित करण्याचे ‘ALIGN’चे ध्येय आहे. २०३० पर्यंत २३ लाखांहून अधिक लोकांपर्यंत सकारात्मक प्रभाव पोहोचविण्याचा संकल्प संस्थेने व्यक्त केला आहे. उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात छोटेखानी समारंभाने झाली. त्यानंतर उपक्रमाच्या कार्यपद्धती आणि तज्ज्ञ टीमची ओळख करून देण्यात आली. विशेष बाब म्हणजे सत्रापूर्वी आणि सत्रानंतर सहभागींचे हृदयगती व ऑक्सिजन पातळी यांसारखे मूलभूत आरोग्य निर्देशांक नोंदवण्यात आले. अनुभवात्मक साधना आणि मोजमापयोग्य निरीक्षण यांचा संगम साधणारी ही रचनाबद्ध कार्यपद्धती ‘ALIGN’ची वैशिष्ट्यपूर्ण ओळख ठरली आहे.

 सोमेश्वर चषक खुल्या व विविध गटातील रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

‘सुपर सनी मंथ’ क्रीडा महोत्सवाअंतर्गत सोमेश्वर चषक खुल्या व विविध गटातील रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन स्पर्धेत एकूण १,००,०००रकमेची पारितोषिके पुणे : युवा सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित “सुपर सनी मंथ” या क्रीडा महोत्सवाअंतर्गत सोमेश्वर चषक खुल्या व विविध गटातील रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. हि स्पर्धा रविवार, १ मार्च रोजी, गोविंद गार्डन मंगल कार्यालय पाषाण या ठिकाणी होणार आहे. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी सांगितले की, “बुद्धिबळ हा केवळ खेळ नसून तो विचारशक्ती, संयम आणि निर्णयक्षमता विकसित करणारा बौद्धिक व्यासपीठ आहे. आपल्या भागातील लहान मुलांपासून युवा खेळाडूंना स्पर्धात्मक संधी मिळावी आणि त्यांच्यातील गुणवत्ता पुढे यावी, हा ‘सुपर सनी मंथ’ मागील मुख्य उद्देश आहे. अशा उपक्रमांमुळे भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडतील, असा मला विश्वास आहे.” स्पर्धेत एकूण १ लाख रुपयांची पारितोषिके, करंडक देण्यात येणार आहेत. पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कल यांच्या मान्यतेखाली होत असलेली हि स्पर्धा ७,१०,१२,१५ वर्षाखालील व खुल्या गटात पार पडणार आहे. स्पर्धेला भरघोस प्रतिसाद लाभला असून आतापर्यंत विविध वयोगटात मिळून १७० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असून यामध्ये ५० रेटेड खेळाडूंचा देखील समावेश आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी स्पर्धा संचालक व एमसीएचे उपाध्यक्ष राजेंद्र कोंडे (९८२२३०३५४०) व दिक्षा गडसिंग(७८३७८३०४०६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

  नाशिक मनपाच्या तिजोरीच्या चाव्या तरुण नेतृत्वाकडे

नाशिक मनपाच्या तिजोरीच्या चाव्या तरुण नेतृत्वाकडे मच्छिंद्र सानप स्थायी समितीचे 39 वे सभापती! हरिभाऊ लाखे नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदी मच्छिंद्र बाळासाहेब सानप यांची बिनविरोध निवड होताच शहराच्या आर्थिक निर्णयप्रक्रियेची घ्रा तरुण नेतृत्वाकडे आली आहे. स्थायी समितीचे ते ३९वे सभापती ठरले असून, आगामी काळात महापालिकेच्या अर्थकारणावर त्यांची निर्णायक छाप राहणार आहे. राजकारणाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. माजी महापौर तथा माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे ते सुपुत्र आहेत. त्यामुळे संघटन, निवडणूक आणि प्रशासकीय व्यवहार यांचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना लहानपणापासूनच मिळत गेला. महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीत ते सलग दुसऱ्यांदा निवडून आले, यापूर्वी २०१७ मध्ये पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भाजपच्या तिविकटावर त्यांनी विजय मिळवला होता. प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, गटारे, सार्वजनिक सुविधा यांसाठी सातत्याने पाठपुरावा करत त्यांनी स्थानिक पातळीवर सक्रिय नगरसेवक म्हणून काम केले आहे. महापालिकेतील विविध समित्यांमधील त्यांचा अनुभवही उल्लेखनीय आहे. पंचवटी प्रभाग समितीचे सभापतिपद त्यांनी भूषवले आहे. वृक्षप्राधिकरण समिती तसेच विभागीय क्रीडा संकुल समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. उत्तर महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राशीही त्यांचा संबंध राहिला असून, इंडिया स्पोर्टसच्या कार्यकारिणीत त्यांनी सहभाग नोंदवला आहे. संघटन पातळीवर भाजप ओबीसी युवा मोर्चाच्या विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती लक्षणीय राहिलो आहे. औराम रथोत्सव, नवरात्रोत्सव, कृष्ण जन्मोत्सव, गणेशोत्सव यांसारख्या उत्सवांत ते सक्रिय सहभागी राहिले आहेत. यामुळे राजकारणासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. स्थायी समितीचे सभापती म्हणून त्यांच्यासमोर मोठी जबाबदारी आहे. कोट्यवधींच्या विकासकामांना मंजुरी देणे, निविदा प्रक्रियेवर देखरेख ठेवणे आणि महापालिकेच्या आर्थिक शिस्तीची काळजी घेणे या सर्व निर्णयांमध्ये त्यांची भूमिका केंद्रस्थानी असेल, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या नियोजनबद्ध विकासाची ग्वाही त्यांनी दिली असून, पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.