घुफ्रान – आकांक्षा विजयी
जॉली जिमखाना कॅरम स्पर्धा घुफ्रान – आकांक्षा विजयी विद्याविहार (पश्चिम) येथील घाटकोपर जॉली जिमखान्याच्या वतीने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने ३ री घाटकोपर जॉली…
Maharashtra News
जॉली जिमखाना कॅरम स्पर्धा घुफ्रान – आकांक्षा विजयी विद्याविहार (पश्चिम) येथील घाटकोपर जॉली जिमखान्याच्या वतीने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने ३ री घाटकोपर जॉली…
लोगो विश्वनाथ स्पोर्ट्स मीट एमआयटी-एडीटी विद्यापीठात क्रिकेट सामन्यांची रोमांचक सुरुवात एमआयटी एसओसी, मॉडर्न लॉ कॉलेजची विजयी सलामी लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे यांच्या वतीने आयोजित आठव्या विश्वनाथ स्पोर्ट्स मीट…
नाशिक जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांपुढे संकट अजूनही अनेक विद्यार्थी ‘अपार आयडी’ च्या प्रतिक्षेत हरिभाऊ लाखे नाशिक : बारावी उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतात. त्यातही सध्या व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा अधिक ओढा आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना सीईटी विभागामार्फत घेतली जाणारी परीक्षा देणे आवश्यक असते. परंतु, त्यासाठी विद्यार्थ्यांना ‘ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्रेशन’ (अपार) आयडी काढणे बंधनकारक आहे. परंतु, नाशिक जिल्ह्यात अजूनही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार नसल्याने या विद्यार्थ्यांसमोर वेगळाच धोका निर्माण झाला आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत अपार आयडी ही संकल्पना पुढे आली आहे. अपार आयडी संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा डिजिटल मागोवा घेण्यात येणार आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात काही निर्देश दिले आहेत. त्यानुसार ३१ जानेवारी २०२६पर्यंत शाळांतील सर्व विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडून देण्यात आले आहेत. राज्यात २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात एकूण २ कोटी १५ लाख ४५ हजार १९४ विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. सीईटीसह कोणत्याही प्रवेशपूर्व परीक्षेचा अर्ज अपार आयडी असल्याशिवाय विद्यार्थ्यांना भरता येणार नाही. नाशिक प्रमाणेच मुंबई महानगर प्रदेश विभागातही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी प्रक्रियेबाहेर राहिल्याने शिक्षण विभागाने शाळास्तरावर विशेष मोहिमा राबविण्याचे आदेश दिले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांचा अपार आयडी आवश्यक झाला आहे. अपार आयडी प्रक्रियेत काही अडथळे निर्माण होत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. आधार प्रमाणीकरण हा सर्वात मोठा अडथळा असल्याच्या तक्रारी शिक्षकांकडून करण्यात येत आहेत. राज्यभरात साडेपाच लाखापेक्षा अधिक अर्ज काही त्रुटींअभावी अपार अयाडीसाठी पात्र ठरलेले नाहीत. आधार पडताळणी न होणे, नाव आणि जन्मतारीख न जुळणे, पालकांची संमती न मिळणे, अशा काही प्रमुख कारणांचा त्यात समावेश असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. राज्यात पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये बारावीची राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी परीक्षा होणार आहे. त्यानंतर मार्च महिन्यापासून विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांना सुरुवात होईल. बारावीनंतर विद्यार्थ्यांकडून देण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी अपार आयडी असणे बंधनकारक करण्यात आल्याने विद्यार्थ्यांवरील ताण वाढलेला आहे. नाशिक जिल्ह्यात अजूनही अपार आयडीविना बारावीचे आठ हजारपेक्षा अधिक विद्यार्थी बाकी आहेत. विद्यार्थ्यांना ज्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घ्यावयाचा असेल, त्या अभ्यासक्रमासाठी असलेल्या प्रवेश परीक्षा अर्ज भरण्यापर्यंत अपार आयडी तयार न झाल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेला मुकावे लागण्याची भीती आहे. मार्च ते मे या महिन्यांदरम्यान सीईटी परीक्षा होण्याची शक्यता आहे. या परीक्षेसाठी अपार आयडी असणे बंधनकारक करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील बारावीच्या ८९.१६ टक्के विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार झाले आहेत. परंतु, अजूनही आठ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार होणे बाकी आहेत. अपार आयडी तयार करण्यासाठी ३१ जानेवारी ही मुदत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडून देण्यात आली आहे. अपार आयडी तयार करण्याच्या कामात राज्यभरात होणाऱ्या महापालिका निवडणूक कामांचा अडथळा आल्याचा शिक्षकांचा दावा आहे.
नवी दिल्ली : महापालिका निवडणूकांचा राज्यातील यंत्रणेवरील ताण लक्षात घता सुप्रीम कोर्टाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यास आता दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. निवडणूक आयोगाने ही मुदतवाढ मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर, राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला असून जिल्हा परिषद निवडणुकां या आता १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्यास मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालायने ३१ जानेवारीपर्यंत राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांमध्ये ५० टक्क्यांमध्ये आरक्षण आहे. तर इतर २० जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली गेली असल्यामुळे त्याविषयी काय निर्णय होणार, यावर प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालायने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका पुढे ढकलण्यास परवानगी दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मागणीनुसार सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे, आता १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.
सोमनाथ : गझनीपासून औरंगजेबापर्यंत सोमनाथ मंदिरावर आक्रमक करणारे अनेक आक्रमक इतिहासाच्या पानांमध्ये गडप झाले, पण सोमनाथ मंदिर तिथेच गर्वाने उभं आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. सोमनाथ मंदिराच्या स्वाभिमान पर्वामध्ये रविवारी नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला यावेळी ते बोलत होते. सोमनाथ मंदिर येथे १०८ अश्वांसह काढण्यात आलेल्या शौर्य यात्रेमध्ये ते सहभाही झाले होते. ही शौर्य यात्रा सोमनाथ मंदिराच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या अगणित वीर योद्ध्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने काढण्यात आली होती. शौर्यसभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, एक हजार वर्षांपूर्वी १०२६ साली महमूद गझनी याने केलेल्या हल्ल्यावेळी इथे काय वातावरण असेल, आज इथे उपस्थित आहेत, त्यांच्या पूर्वजांनी, आमच्या पूर्वजांनी आपल्या आस्थेला वाचवण्यासाठी आपल्या महादेवांसाठी प्राणांची बाजी लावली होती. एक हजार वर्षांपूर्वी हे आक्रमक विचार करत होते की, त्यांनी आम्हाला जिंकलंय. मात्र आज एक हजार वर्षांनंतरही सोमनाथ महादेव मंदिरावर फडकत असलेला ध्वज हिंदुस्तानची शक्ती काय आहे, त्याचं सामर्थ्य काय आहे हे संपूर्ण सृष्टीला दाखवून देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, जेव्हा गझनीपासून औरंगजेबापर्यंत सर्व आक्रमक सोमनाथ मंदिरावर हल्ले करत होते. तेव्हा त्यांना वाटत होते की, त्यांची तलवार सनातन सोमनाथवर विजय मिळवत आहे. मात्र ज्या सोमनाथला ते नष्ट करू इच्छित होते, त्याच्या नावामध्येच सोम अर्थात अमृत आहे, हे धर्मांध कट्टरपंथी समजू शकले नाहीत. त्याच्यामध्ये हलाहल प्राशन करून अमर राहण्याचा विचार जोडलेला आहे. तसेच त्यामध्ये सदाशि महादेवांच्या रूपात चैतन्यशक्ती प्रतिष्ठित आहे. ती कल्याणकारक आहे आणि प्रचंड तांडव: शिव: हा शक्तीचा स्रोहती आहे. त्यामुळेच गझनीपासून औरंगजेबापर्यंत सोमनाथवर हल्ला करणारे सर्व आक्रमक इतिहासाच्या पानांमध्ये गडप झाले. मात्र चिरंतन सोमनाथ मंदिर सागर किनाऱ्यावर अभिमानानं उभं आहे. असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
महाराष्ट्राचे वादळ तेलंगणात धडकणार! ५८ व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी ‘मिशन चॅम्पियन’ सज्ज! मुंबई उपनगरचा निहार दुबळे व पुण्याची रितिका राठोड कर्णधारपदी पुणे : अस्सल मराठी मातीतील खेळ असलेल्या खो-खोचा रणसंग्राम आता तेलंगणाच्या भूमीत पेटणार असून महाराष्ट्राची फौज जेतेपदाचा झेंडा रोवण्यासाठी सज्ज झाली आहे. काजीपेठ (तेलंगणा) येथील रेल्वे ग्राउंडवर ११ ते १५ जानेवारी, दरम्यान होणाऱ्या ५८ व्या पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने आपले पुरुष व महिला संघ जाहीर केले आहेत. हे संघ सहभागापुरते नसून जेतेपदावर दरारा निर्माण करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरले आहेत. प्रशिक्षण शिबिरातून आत्मविश्वासाचा नवा जोश स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर बीड येथील राजश्री शाहू कन्या शाळेच्या मैदानावर यशस्वीरीत्या पार पडले. शिबिराचा समारोप महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी सरचिटणीस प्रा. जनार्दन शेळके व सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. दोन्ही संघ सुवर्णपदक जिंकतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर महाराष्ट्राचे दोन्ही संघ काजीपेठ, तेलंगणा येथे रवाना झाले. गटवारीचा थरार : ‘अ’ आणि ‘ब’ गटात महाराष्ट्र सज्ज भारतीय खो-खो महासंघाच्या गटवारीनुसार पुरुष संघ ‘ब’ गटात असून उत्तर प्रदेश, मणिपूर, जम्मू–काश्मीर व मेघालय यांच्याशी लढत देणार आहे. महिला संघ ‘अ’ गटात असून उत्तर प्रदेश, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश व चंदीगड ही आव्हाने असतील. दोन्ही गटांत फेव्हरेट म्हणून महाराष्ट्र आपली ताकद दाखवणार आहे. पुरुष संघ : अनुभव, वेग आणि आक्रमणाची संगत कर्णधार : निहार दुबळे (मुंबई उपनगर) यांच्या नेतृत्वाखाली पुरुष संघात अनुभवाची भक्कम फळी आहे. संघात शुभम थोरात, प्रतिक वाईकर, सुयश गरगटे, रुद्र थोपटे (सर्व पुणे), अनिकेत चेंदवणकर, निहार दुबळे (कर्णधार), प्रतिक देवरे, ऋषिकेश मुर्चावडे (सर्व मुंबई उपनगर), विजय शिंदे, सचिन पवार (सर्व धाराशिव), अक्षय मासाळ, अभिषेक केरीपाळे (सर्व सांगली), शुभम उतेकर (ठाणे), वेदांत देसाई (मुंबई), तुकाराम कारंडे (बीड) यांचा समावेश आहे. प्रशिक्षक : डॉ. नरेंद्र कुंदर (मुंबई उपनगर), सहाय्यक प्रशिक्षक : अजित शिंदे (सोलापूर), व्यवस्थापक : प्रफुल हाटवटे (बीड) अशी मार्गदर्शक फळी आहे.…
औंध – बोपोडी परिसराच्या विकासाला गती देणार- सनी विनायक निम्हण पुणे: महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांचे जगणे सुलभ आणि वेगवान करणाऱ्या प्रकल्पांवर भर देणार असल्याचा निर्वाळा भारतीय जनता पक्ष –रिपब्लिकन पक्ष (आठवले)…
भूमी अभिलेखची फौज शेतकऱ्यांच्या बांधावर प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करणार रत्नागिरी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सचिन इंगळी यांचे आवाहन रत्नागिरी : (अशोक गायकवाड )—जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाच्या कार्यालयात तीन महिन्यांवरील प्रलंबित असलेल्या जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी १०, ११, १७ व १८ जानेवारी रोजी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पावसाळ्यात काम होऊ न शकल्याने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख रत्नागिरी कार्यालयाच्या अधीनस्थ कार्यालयात माहे ऑक्टोबर अखेरील १२११ मोजणी प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यापैकी ५१२ मोजणी प्रकरणे मोजणी पूर्ण होऊन कार्यालयीन कामावर प्रलंबित असून उर्वरित प्रकरणांपैकी १०२ मोजणी प्रकरणे वरील नमूद सुट्टीचे दिवशी कार्यालयातील उपलब्ध भूकरमापकांमार्फत निपटारा करण्यात येणार आहे. ज्यासाठी ५१ भूकरमापक सहभागी होतील, अशी माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी यांनी दिली. या विशेष मोहिमेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळून मोजणी प्रकरणांचा निपटारा जलदगतीने होणार आहे. या मोजणी प्रकरणांचा निपटारा जलदगतीने करण्यासाठी जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (म. राज्य) पुणे सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार व उपसंचालक भूमी अभिलेख, कोंकण प्रदेश, मुंबई अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून या प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ही विशेष मोहीम राबविली जात आहे. यातील १२११ मोजणी प्रकरणे मुदतबाह्य झालेली असून, तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीवर प्रलंबित आहेत. यापैकी ५१२ प्रकरणांत मोजणी पूर्ण झालेली असून, ६०४ प्रकरणांच्या मोजणी तारखा जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यात लावण्यात आलेल्या आहेत. उर्वरित ९५ मुदतबाह्य मोजणी प्रकरणांना अद्याप मोजणी तारीख मिळण्यावर शिल्लक असून, सदर प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत नमूद सुट्टीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात निपटारा होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. यासाठी इतर तालुक्यातील ५१ सर्वेअर यांना बोलावून मोहीम यशस्वी केली जाणार आहे. पक्षकारांनी विशेष मोहिमेचा लाभ घ्यावाया मोहिमेअंतर्गत १०२ मोजणी प्रकरणे १०, ११, १७ व १८ जानेवारी या शासकीय सुट्टीच्या दिवशी मोजणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणांत मोजणीच्या नोटीस सर्व संबंधितांना पाठविण्यात आल्या असून, संबंधित अर्जदार व हितसंबंधित यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असून, अर्जदार यांनी उपस्थित राहून आपल्या जमिनींची मोजणी करून विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख इंगळी यांनी केले आहे.
काँग्रेसचे उमेदवार पोरके; पक्षाने सोडली साथ हरिभाऊ लाखे नाशिक : निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वच पक्ष आक्रमकपणे प्रचारात उतरले असताना काँग्रेस मात्र कोमात असल्याचे चित्र आहे. निवडणुकीत उमेदवारांना ताकद देण्याची गरज असताना…
आठवी विश्वनाथ स्पोर्ट्स मिट २३ जानेवारीपासून एमआयटी एडीटी विद्यापीठात रंगणार राष्ट्रीय आंतरविद्यापीठीय स्पर्धेचा थरार ऑलिंपियन मुष्ठीयोद्धा विजेंदर सिंह यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे भव्य उद्घाटन पुणे: एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ,…