Category: महाराष्ट्र

Maharashtra News

अंबड व सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी मुंबईच्या दिशेने पायी कूच करणार

माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सहभागी होणार   हरिभाऊ लाखे नाशिक : अंबड व सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या मागण्यांसाठी अंबड येथून गुरुवार १६ जानेवारी सकाळी ८ वाजता पायी मोर्चा मुंबईकडे रवाना होणार आहे. २२ जानेवारी रोजी राज्यपाल यांना भेटून निवेदन देणार आहोत या आंदोलनात शेवटी शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सहभागी होणार असल्याची माहिती प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी दिली. अंबड व सातपूर येथील सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची सुमारे 1100 हेक्टर इतकी जमीन सन 1973 ला बळजबरीने संपादित केली. त्यावेळी अनेक आश्वासने शासनाने दिली होती. एकही आश्वासनाची पूर्तता केली नाही. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या : 1994 च्या परिपत्रकातील पीएपी धोरणात बदल करण्यात यावा अंबड ग्रामस्थांना कोणत्याही मूलभूत सुविधा न देता ग्रामस्थांची असलेली गायरान जमीनही विनासंमती एमआयडीसीला देण्यात आली. ती गायरान जमीन घेण्यात येऊ नये अथवा मोठ्या उद्योगाला देण्यात यावी. एम आय डी सी व नासिक महानगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करूनही STP v ETP प्लांट न बनवल्यामुळे उरलेली शेती नापीक झाली त्यामुळे शेती पिकत नाही. सन 1973 ला जमीन संपादित झाल्यानंतर त्यांच्या लेआउट मध्ये 4 ते 5 मीटर चे रस्ते सोडल्याने आज उरलेल्या जमिनीत अंतिम लेआउट करता येत नाही. एमआयडीसीतील अनेक पडीत भूखंडाचे छोटे छोटे तुकडे करून बिल्डर व गुंतवणूकदार यांना वाटप करण्यात येत असल्याने उद्योजकांना भूखंड मिळत नाही. अंबड चुंचाळे येथे प्रचंड नागरी वस्ती वाढल्याने गेल्या 20 वर्षापासून मागणी असलेले नवीन स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर करण्यात यावे. एमआयडीसीत अनेक भूखंडावर बेकायदेशीर पोटभाडेकरू व बेकायदेशीर भूखंडाचा वापर थांबविण्यात यावा. अशा विविध मागण्यांबाबत शासनाने दखल घ्यावी यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाचे स्वरूप मोर्चेकरी साधारणता 100 ते 125 प्रकल्पग्रस्त शेतकरी असतील सुरुवात दिनांक 16/1/2025 पासून अंबड येथून 1) 16/1/25 मुक्काम 1ला घोटीच्या आसपास 2) 17/1/25 मुक्काम 2रा कसारा खर्डीच्या आसपास…

नांदुरी-सप्तश्रृंगी गड रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत

हरिभाऊ लाखे नाशिक : सप्तशृंगी गड विकास आराखडा योजनेतून चार महिन्यांपासून सुरू असलेले सप्तशृंगी गड- नांदुरी घाट मार्गातील कड्याकडील बाजूस दरड प्रतिबंधक जाळी लावण्याचे काम पूर्ण झाल्याने रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला आहे. सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी नांदुरीपासून १० किलोमीटर घाटरस्ता आहे. या घाट रस्त्यावर दरड कोसळणे, मोठे दगड पडून रस्ता बंद होण्याचे प्रकार बरेचदा झाले आहेत. काही भाविकांच्या वाहनांचे नुकसानही त्यामुळे झाले आहे. गडावर दररोज भाविकांची संख्या वाढतच असल्याने सावधगिरी म्हणून सप्तशृंगी देवी विश्वस्त मंडळ आणि ग्रामपंचायतीने घाट रस्त्याच्या कडेला दरड प्रतिबंधक जाळी (रॉकफॉल प्रोटेक्शन) लावून रस्ता सुरक्षित करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. या अनुषंगाने शासनाने सप्तशृंगी गड विकास आराखडा योजनेत या कामासाठी ३३ कोटी रुपये मंजूर केले होते. या कामाला २३ सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली सुरूवात झाली होती. यानंतर नवरात्रौत्सव, दिवाळी, नाताळ, नविन वर्ष दरम्यान काम बंद ठेवण्यात आले होते. सकाळी सहा ते ११.३० या वेळेत रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येत होता. यामुळे सप्तशृंगी गडावर भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. आता काम पूर्ण झाल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे. संपूर्ण घाट रस्त्याची पाहणी करण्यात आल्यानंतर डोंगरावरील सैल दगड काढून टाकण्यात आले. डोंगराच्या मध्यापासून रस्त्याच्या काठापर्यंत दरड प्रतिबंधक लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या. जेणेकरून पावसाळ्यात, उन्हाळ्यात सैल झालेले दगड खाली आल्यास ते जाळीमध्ये अडकतील किंवा रस्त्याच्या कडेला पडतील. कुठलीही जीवित वा वित्तहानी होणार नाही. यामुळे भाविकांचा प्रवास सुरक्षित होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हटले आहे.

भुजबळांविषयी न बोलण्याचा माणिक कोकाटे यांना अजित पवार गटाचा आदेश

हरिभाऊ लाखे नाशिक –मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या (अजित पवार) प्रमुख नेत्यांना लक्ष्य करणारे माजीमंत्री छगन भुजबळ आणि त्यांना सडेतोड भाषेत प्रत्युत्तर देणारे कृषिमंत्री ॲड. माणिक कोकाटे यांच्यातील कलगीतुरा तूर्तास…

आगासन गाव येथे अखंड हरिनाम सोहळा मोठया भक्तिमय वातावरणात सम्पन्न

दिवा : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. म्हणून या भूमीला खर्‍या अर्थाने संत परंपरेच अनुष्ठान लाभलं आहे. संत परंपरेमुळे महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे. याच माध्यमातून हा वारकरी संप्रदाय खर्‍या…

कोकणात प्रथमच कुंभवडे (राजापूर) येथे महापाषाणकालीन एकाश्मस्तंभांचा शोध

पुणे-  कुंभवडे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील महापाषाण संस्कृतीकालीन एकाश्मस्तंभ स्मारके पुरातत्व संशोधक सतीश लळीत यांनी प्रथमच उजेडात आणली असून यामुळे कोकणच्या प्राचीन इतिहासावर नवा प्रकाशझोत पडणार आहे. कोकणातील या…

पत्रकारांना भेडसावणाऱ्या टोलमाफीच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार

-प्रविण दरेकरांचे आश्वासन राजेंद्र साळसकर सांगली : पत्रकार एखाद्या नेत्याची दिशा बदलू शकतात तशीच दशाही बदलू शकतात, ही ताकद पत्रकारांच्या लेखणीत असते. पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकारांनी अनेक इतिहास उभे केलेत. अनेक विषय चव्हाट्यावर मांडून ते मार्गी लावण्याचे काम याच मातीतील पत्रकारांनी केले आहेत. पत्रकारांना भेडसावणाऱ्या टोलमाफीच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री महोदयांशी बोलून तालुका व जिल्ह्याच्या पत्रकारांना सवलत कशी मिळेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन, असे आश्वासन भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिले. सांगलीतील ऐतवडे खुर्द येथील वारणा महाविद्यालयाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागातर्फे बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून ‘पत्रकार सन्मान सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दरेकर बोलत होते. याप्रसंगी वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रताप पाटील, भाजपा विधानपरिषद आमदार प्रसाद लाड, माजी कृषी राज्यमंत्री व आमदार सदाभाऊ खोत, स्थानिक आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार भगवान साळुंखे, वनश्री दूध संघाचे अध्यक्ष सम्राट महाडिक यांसह शिक्षण व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांना संबोधित करताना दरेकर म्हणाले कि, आज मी ज्या कार्यक्रमाला उपस्थित आहे तो कार्यक्रम पत्रकारांचा आहे. जी पत्रकारिता चळवळ उभी केली गेली त्या चळवळीचा सन्मान करणारा हा कार्यक्रम आहे. दरेकर पुढे म्हणाले कि, आज पत्रकारांचा सन्मान होतोय. मीही एक साप्ताहिक चालवतो. त्यामुळे छोट्या पत्रकारांच्या व्यथा, अडचणी काय असतात याची नीट माहिती व आकलन मला आहे. ग्रामीण, तालुक्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या पत्रकारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागतेय. पत्रकारांनी जो टोलमाफीचा प्रश्न सांगितला आहे त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलेन व तालुका, जिल्ह्याच्या पत्रकारांना सवलत कशी मिळेल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही, असा शब्दही दरेकरांनी यावेळी पत्रकारांना दिला. विरोधी पक्षाचे नेते असेल तरी विकासासाठी सहकार्य करण्याची गरज या प्रसंगी बोलताना दरेकर म्हणाले की, वारणा शिक्षण संस्थेचे डॉ.प्रतापराव पाटील यांचे सहकारातील योगदान आणि निष्ठा पाहून माझ्यासारखा कार्यकर्ताही प्रभावित झाला. डॉ.प्रतापराव विरोधी गटाचे असतानाही आम्ही त्यांना मदत केली. कारण, ज्यांच्यामध्ये गुणवत्ता आणि कर्तृत्व आहे त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे हा विचार आम्ही केला व ऐतवड्याचा सुपुत्र राज्य सहकारी संघाचा अध्यक्ष झाला, सहकाराचे नेतृत्व करायला लागला. ही शिकवण आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी दिलीय. विरोधी पक्षाची लोकं असली तरी विकासासाठी काम करण्याची गरज आहे. निवडणुका, पक्ष, विरोध निवडणुकीपुरता असतो. परंतु सर्वांचा अंतिम उद्देश समाजाचा विकास हाच असतो. तोच विचार घेऊन प्रतापराव पाटील यांच्याशी जवळीक वाढल्याचे दरेकर म्हणाले. सहकारात नावीन्यपूर्ण प्रयोगाची गरज – दरेकरांचे प्रतिपादन याच कार्यक्रमात बोलताना दरेकर यांनी सहकारात नावीन्यपूर्ण प्रयोग करत चांगल्या कल्पना घेऊन आम्ही काम करतोय. मुंबईत स्वयंपुनर्विकास योजना मुंबई बँक मार्फत सुरु केली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहितीही दिली. मुंबई बँकेच्या सहकार्यातून स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून विलेपार्ले येथे उभ्या राहिलेल्या नंददीप सोसायटीचे कालच उदघाटन केले असून येथील रहिवासी ३४० स्क्वे. फुटाच्या घरातून १४०० स्क्वे. फुटाच्या घरात राहायला गेली असून अशा अनेक इमारती स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून उभ्या राहिल्या आहेत. सहकारी चळवळ वाढविण्यासाठी नावीन्यपूर्ण अशा कल्पना घेऊन काम करण्याची गरज असल्याचेही दरेकरांनी म्हटले.

मुलाच्या निधनानंतर अवघ्या नऊ तासात आईचे देखील निधन

सोयगाव: मुलांच्या निधनानंतर अवघ्या नऊ तासात आईने ही जगाचा निरोप घेतला ही घटना सोयगाव तालुक्यातील तिडका येथे घडली. तिडका येथील पांडुरंग नामदेव गवळी (वय ४७) यांचे अल्पशा आजाराने शनिवार सायंकाळी सहा वाजता निधन झाले. काही वेळाने आई निर्मलाबाई नामदेव गवळी( वय ७०)  यांची प्रकृती बिघडली. त्यांना नातेवाईकांनी गोदेंगाव येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. उपचार झाल्यानंतर काही वेळाने तिडका येथे घरी आणले असता रविवार पहाटे तीन वाजता त्यांचे देखील निधन झाले.. तिडका येथील स्मशानभूमीत पांडुरंग गवळी यांच्यावर शनिवारी रात्री नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले तर निर्मलाबाई गवळी यांच्यावर रविवारी दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलाच्या निधनानंतर अवघ्या नऊ तासात आईने देखील जगाचा निरोप घेतल्याची घटना घडल्याने तिडका गावात शोककळा पसरली होती. ०००००

मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली

जालना : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज जालना येथे मोर्चा काढण्यात आला.   या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील सहभाग घेतला. जालना…

आता ७२ तासांच्या आत खड्डा बुजणार

हरिभाऊ लाखे नाशिक : नाशिक विभागात वर्षभरात जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवरील 98 टक्के खड्डे बुजविण्याचा दावा नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची माहिती त्वरीत मिळावी यासाठी बांधकाम विभागाने पीसीआरएस हे मोबाईल अ‍ॅप विकसित केले आहे. अ‍ॅपवर माहितीनुसार 72 तासांच्या आत खड्डा बुजविण्यात येतो. मात्र नाशिक – त्र्यंबक रोड, नाशिक – दिंडोरी या खड्डेमय मार्गांकडे विभागाचे लक्ष वेधले असता निधीअभावी खड्डे बुजविण्याचे काम थांबले असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित नाशिक विभागातील 23 हजार किलोमीटरचे रस्ते येतात. त्यापैकी नाशिक जिल्ह्यातील २२00 किलोमीटर, तर धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यातील ५२00 किलोमीटर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहे. या सर्व रस्त्यांची नियमितपणे देखभाल दुरुस्ती बांधकाम विभागाकडून करण्यात येते. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे रस्त्यांना खड्डे पडतात, यामुळे वाहने चालवताना वाहनचालक बेजार होतात. गतवर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यासाठी मोठी मोहीम राबविली. मोहिमेवर वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष ठेवले. मोहिमेनंतर 98 टक्के खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा विभागाकडून करण्यात आला आहे. पीसीआरएस अ‍ॅपवर द्या खड्ड्यांची माहिती जिल्ह्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची माहिती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पीसीआरएस हे अ‍ॅप विकसित केले आहे. अ‍ॅपवर तक्रार दाखल झाल्यानंतर 72 तासांच्या आत खड्डे बुजविण्यात आल्याचे उत्तर अ‍ॅपद्वारे देण्यात आले. अ‍ॅपचा वापर सहजपणे करता येत असल्याने नागरिकांकडून तक्रारी दाखल करण्यात वाढ झाली आहे. कोट पीसीआरएस अ‍ॅपमुळे खड्ड्यांची माहिती त्वरीत उपलब्ध होते, यामुळे खड्डे बुजविणे सोपे झाले आहे. नागरिकांचा प्रवास सहज आणि सुलभ व्हावा यासाठी खड्डेमुक्त रस्ते तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. काही कारणास्तव जिल्ह्यातील मार्गांवर खड्डे असल्यास ते त्वरेने बुजविले जातील. प्रशांत औटी, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक. ००००

स्मार्ट हरितक्षेत्र परियोजना रद्द करा मुख्यमंत्री फडणवीस यांना नाशिकच्या शेतकऱ्यांचे साकडे हरिभाऊ लाखे

नाशिक : नाशिक महापालिका हद्दीतील मखमलाबाद व हनुमानवाडी परिसरातील 753 एकर क्षेत्रावर स्मार्ट सिटी अभियानांतर्गत प्रस्तावित हरितक्षेत्र विकास परियोजना अर्थात ग्रीनफील्ड योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी आ. देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखालील…