Category: महाराष्ट्र

Maharashtra News

३ एप्रिलला भोंदूगिरीचा बुरखा फाडणार

नाशिकमध्ये ‘अंनिस’ची राज्यस्तरीय बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद ३ एप्रिलला भोंदूगिरीचा बुरखा फाडणार हरिभाऊ लाखे नाशिक: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय संघर्ष परिषदेत भोंदूगिरी आणि फलज्योतिषाच्या दुष्परिणामांवर मंथन होणार आहे(छायाचित्र – AI Generated) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यस्तरीय फलज्योतिष आणि बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद ३ एप्रिल, सकाळी १० वाजता येथील खुटवड नगरातील सीटु भवनात आयोजित करण्यात आल्याची माहिती राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे आणि राज्य प्रधान सचिव डाॅ. ठकसेन गोराणे यांनी दिली आहे. परिषदेचे उद्घाटन खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. परिषदेत प्राचार्य डॉ. नितीन शिंदे, सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त बाबासाहेब बुधवंत, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जयंत ढाके, डी. एल. कराड, ॲड. रंजना गवांदे, दादा चांदणे, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष माधव बावगे, राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ३६ वर्षात हजारो बुवाबाबांचे काळे कृत्य उघडकीस आणले आहे. संघटनेच्या प्रयत्नामुळेच जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत काही भोंदूंना शिक्षा झाली आहे. यामध्ये वेगवेगळ्या जाती-धर्माचे भोंदू आहेत. भोंदूगिरी कशी चालते, राज्यात कोणत्या भागात भोंदू सक्रिय आहेत, यासह वेगवेगळ्या पैलुंवर राज्यस्तरीय परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे. परिषदेच्या समारोपप्रसंगी लोकप्रबोधनार्थ शहरातून फेरी काढण्यात येणार आहे. वाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादनानंतर परिषदेचा समारोप ज्येष्ठ साहित्यिक तथा महाराष्ट्र अंनिसचे राज्य उपाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या भाषणाने होईल. परिषदेचे नियोजन डॉ. ठकसेन गोराणे ,विनायक सावळे, कृष्णा चांदगुडे, प्रा. आशा लांडगे, अरुण घोडेराव,सुरेश बोरसे, राजेंद्र फेगडे आदी करीत आहेत. परिषदेसाठी राज्यभरातून तीनशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दीपक केसरकरांची भोंदू खरातवर ‘कृपा’ शालार्थ आयडी घोटाळ्यात हरिभाऊ लाखे नाशिक : दीपक केसरकर शिक्षणमंत्री असताना नाशिकचा लिंगपिसाट भोंदूबाबा अशोक खरातवर ‘केसरकर कृपा’ झाल्याचे पुरावे समोर येत आहेत. राज्यभर गाजलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात भोंदू अशोक…

बस्तर नक्षलमुक्त – अमित शाह

बस्तर नक्षलमुक्त – अमित शाह नवी दिल्ली :  देशाला दीर्घकाळ सतावणाऱ्या नक्षलवादाचा पुर्णता बिमोड केला  असून त्यातून देशाची मुक्तता झाली आहे. बस्तर विभागातून नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात आला आहे, अशी घोषणा लोकसभेत ‘नक्षलमुक्त भारत’ या विषयावरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी  केली. शाह म्हणाले की, देशातील १२ राज्ये नक्षलवादाने प्रभावित होती. डाव्या विचारसरणीमुळे या राज्यांमध्ये नक्षलवाद पसरला होता. मात्र आता बस्तर परिसरातून नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे. लाल दहशतीमुळे त्या भागात विकास झाला नव्हता. पण, आता बस्तरमधील प्रत्येक गावात शाळा उभारण्यात आल्या. यापुढे जो कोणी शस्त्र उचलेल, त्याला कायद्याने उत्तर दिले जाईल. यावेळी शाहांनी विरोधकांवर आरोप केला की, त्यांना नक्षलवाद्यांची सहानुभूती आहे, पण आदिवासींच्या विकासासाठी त्यांनी काही केले नाही. नक्षलवादी विचारसरणीनुसार सत्ता बंदुकीच्या जोरावर मिळते. नक्षलवाद्यांनी आदिवासी युवकांना भडकावून त्यांना शस्त्रे दिली आणि हिंसाचाराच्या मार्गावर नेले. नक्षलवादाचा विकासाशी काहीही संबंध नाही. उलट नक्षलवादामुळे त्या भागांमध्ये विकास थांबला होता. रेड कॉरिडॉरमध्ये नक्षलवादामुळे गरिबी वाढली. नक्षलवाद्यांनी शाळा जाळल्या, त्यामुळे आदिवासी मुलांना शिक्षण मिळू शकले नाही. 75 वर्षांत 60 वर्षे काँग्रेसचे सरकार होते, मग आदिवासी विकासापासून वंचित का राहिले? देश अनेक वर्षे नक्षलवादामुळे त्रस्त होता आणि आता नक्षलमुक्त भारताच्या दिशेने सरकार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी विकास होत असल्याचा दावा शाहांनी केला.

 गारपीट-पाऊस -वादळी वाऱ्यामुळे सिंधुदुर्गातील आंबा -काजूचे उरले -सुरले पीकही धोक्यात…!

गारपीट-पाऊस -वादळी वाऱ्यामुळे सिंधुदुर्गातील आंबा -काजूचे उरले -सुरले पीकही धोक्यात…! पाच वर्षानंतर पुन्हा एकदा तडाखा…! राजन चव्हाण सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकताच पडलेला अवकाळी पाऊस, काही भागाला बसलेला गारपिटीचा तडाखा आणि वादळी वाऱ्यामुळे आंबा आणि काजूचे उरले- सुरले पीकही आता हातचे जाणार अशी भिती व्यक्त केली जात आहे. तर काढणीला आलेल्या रब्बी पिकालाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील आंबा – काजू बागायतदार -शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. गेल्यावर्षी अवकाळी पाऊस आणि मान्सून वेळेअगोदर सुरू झाल्याने ‘कोकम’ या पिकाचे फार मोठे नुकसान झाले होते त्यामुळे त्याचे दरही वाढले होते यंदाही या पिकावर परिणाम होऊन दर वाढण्याची शक्यता आहे. कोकणची काळी -मैना म्हणून ओळखली जाणारे करवंदे यंदा खायला मिळतील की नाही याची शाश्वती नाही. शिवाय जांभुळ पिकावरही या अवकाळी पावसाचा परिणाम होणार आहे. कणकवली,देवगड आणि वैभववाडी या तालुक्यांच्या अनेक भागात  गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आणि कांही भागात तर वीजेचे  खांबही कोसळले. रामनवमीच्या आदल्या दिवशी जिल्ह्यात सकाळपासूनच प्रचंड  उकाडा जाणवत होता आणि रामनवमीच्या दिवशी सकाळपासून अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू झाली.वैभववाडी तालुक्याच्या काही भागात तर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि तालुक्यातील अनेक गावांना त्याचा तडाखा बसला. मालवण तालुक्यातील कसाल,आंब्रड,ओसरगाव,फोंडाघाट, शिवडाव आदी ठिकाणी तब्बल अर्धा ते पाऊण तास पाऊस झाला. देवगड तालुक्यातील अनेक गावांनाही पावसाने चांगलाच तडाखा दिला. बदलत्या हवामानामुळे आधीच संकटात असलेल्या आंबा – काजू बागायतदार आणि शेतकऱ्यांची ब चिंता त्यामुळे अधिक वाढली आहे.शासकीय सर्वेक्षणानुसार बदलत्या हवामानामुळे आणि अवकाळी पावसामुळे ९० टक्के पीक वाया गेले आहे आणि आता उरले -सुरले १० टक्के पिकही हातचे जाईल अशी भिती व्यक्त केली जात आहे. यापूर्वी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी गारपीट झाली होती त्यामुळे शेतकरी आणि बागायतदारांचे खूप मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीला शेतकरी- बागायतदारांना सामोरे जावे लागत आहे.  

सिंधुदुर्गात सभापती निवडीतही राणे यांचे धक्कातंत्र

सिंधुदुर्गात सभापती निवडीतही राणे यांचे धक्कातंत्र प्रक्रिया बिनविरोध, राऊळ, नारकर,साटविलकर, तांबे यांची वर्णी राजन चव्हाण सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या चारही विषय समिती सभापतींच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत.  कट्टर राणे  समर्थक भाजपाचे प्रितेश राऊत( शिक्षण व आरोग्य) आणि सुलोचना नारकर (महिला व बालकल्याण) तर शिंदे शिवसेनेचे संतोष साठविलकर (वित्त व बांधकाम )आणि रुहिता तांबे( समाज कल्याण) यांना सभापती पदाची संधी देण्यात आली आहे. या निवडीत खासदार नारायण राणे यांनी जुन्या नव्या सदस्यांना संधी दिली आहे. रेडी वेंगुर्ले इथून निवडून आलेले प्रितेश राऊळ  यांना दुसऱ्यांदा सभापती होण्याची संधी मिळाली आहे. सुलोचना नारकर या पोंभुर्ले (देवगड ) जि. प.गटातून निवडून आल्या आहेत. शिंदे सेनेचे साटविलकर हे मालवण तालुक्यातील पेंडूर जि. प. गटातून निवडून आले आहेत. तर रोहिता तांबे या जानवली (कणकवली) या जि. प. गटातून निवडून आल्या आहेत. निवडीनंतर जि. प. चे अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी जय प्रकाश परब,उपाध्यक्ष दादा साईल शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी मनीष दळवी शिंदे सेनेचे उपनेते संजय आंग्रे गटनेते संजय बोबडी यांनी बिनविरोध निवड झालेल्या सर्व सभापतींचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

नाशिक पोलीस आयुक्तालय राज्यात प्रथम

नाशिक पोलीस आयुक्तालय राज्यात प्रथम १५० दिवसांचा ई-प्रशासन उपक्रम हरिभाऊ लाखे नाशिक – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या १५० दिवसांच्या ई गव्हर्नन्स कार्यक्रमात पोलीस आयुक्तालय गटात ‘नाशिक जिल्हा – कायद्याचा बालेकिल्ला’ उपक्रम राबविणाऱ्या नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा गौरव करण्यात आला. यावेळी माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी १५० दिवसांचा कृती आराखड्याबाबत शासकीय कार्यालयांमध्ये ई – प्रशासन सुधारणा आणण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी १५० दिवसांचा ई प्रशासन सुधारणा कार्यक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात कार्यालयाचे संकेतस्थळ, आपले सरकार प्रणाली, ई कार्यालय, कार्यालयाचा ‘डॅश बोर्ड’, ‘व्हॉटस ॲप’, ‘चॅटबॉट’, कृत्रिम बुद्धिमत्ता व ‘ब्लॉक चेन’चा वापर आणि भौगोलिक माहिती प्रणाली या सात घटकांवर सहभागी कार्यालयांचे मूल्यमापन करण्यात आले होते. १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे करण्यात आले होते. त्यात ‘नाशिक जिल्हा- कायद्याचा बालेकिल्ला उपक्रम’ राबविणाऱ्या नाशिक पोलिस आयुक्त कार्यालयाने सर्वाधिक १५६.२५ गुण मिळवून पोलिस आयुक्तालय गटात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली नाशिक पोलीस आयुक्तालयाने डिजिटल उपक्रम राबविले. नागरिकांशी थेट संवादाचे उपक्रम राबविले. यामध्ये ‘ई मीट वीथ सीपी’, ‘वॉक इन टूर’, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य आदींचा समावेश आहे. यामुळे पोलिस दलाच्या कामकाजात पारदर्शकता, गतिमानता येऊन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर झाला. या विषयी पोलीस आयुक्त संदीपकर्णिक यांनी राज्य शासनाने दिलेल्या १५० दिवसांच्या कार्यक्रमात नाशिक पोलिस दलाने प्रभावी कामगिरी बजावली. त्यामुळे राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. नागरिकांच्या सुरक्षेसाठी नाशिक पोलिस आयुक्तालय सदैव तत्पर असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. जिल्हा परिषदेचाही गौरव ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरीबद्दल नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांचा सन्मानपत्रक देऊन गौरव करण्यात आला. १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यात आले. सात निकषांत उत्कृष्ट कामगिरी करत नाशिक जिल्हा परिषदेने एकूण १६५.७५ गुण मिळवून राज्यात पाचवा क्रमांक मिळवला.

 फ्युएलचा सोशल आयपीओ ३० मार्चला एनएसईवर

फ्युएलचा सोशल आयपीओ ३० मार्चला एनएसईवर ४० विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देऊन पदवी अभ्यासक्रम मोफत उपलब्ध करुन देणार राजेंद्र साळसकर पुणे – सीएसआरच्या माध्यमातून विद्यार्थींना व्यावसायिक अभ्यासक्रमाचे मोफत प्रशिक्षण देणारी देशातील पहिली शैक्षणिक संस्था फ्युएलचा आयपीओ एनएसईच्या सोशल स्टॉक मार्केटमध्ये येणार आहे. सोमवार, ३० मार्चला दुपारी ३ वा. मुंबई येथील एनएसई अ‍ॅट्रियम, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे या आयपीओचा बेल रिंगिग समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्याचे कौशल्य विकास व उद्योग मंत्री मंगल प्रभात लोढा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती फ्यूल ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे यांनी दिली. तसेच त्यांनी विश्वास व्यक्त केला की, संस्थेची विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेमुळे आयपीओला चांगला प्रतिसाद मिळेल. डॉ. देशपांडे यांनी सांगितले की, अत्यंत काटेकोर निकषातून निवड झालेल्या ४० विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देऊन बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेनचा तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी आयपीओ काढण्यात येणार आहे. या माध्यमातून एक कोटी रुपयांचा निधी जमा करण्याचा मानस आहे. सोशल आयपीओच्या संकल्पनेनुसार हा आयपीओ घेणार्‍या भागधारकांना कोणत्याही स्वरुपाचा आर्थिक लाभ मिळत नाही. मात्र, सोशल आयपीओमध्ये येणार्‍या संस्थांची कार्यक्षमता, उद्दिष्ट आणि फलित, विश्वासार्हता याची काटेकोर छाननी करण्यात येणार आहे. या मुळे सामाजिक कार्यासाठी देत असलेल्या निधी योग्य ठिकाणी गेल्याची खात्री आणि समाधान भागधारकांना मिळेल. सामाजिक भरीव कार्य करणार्‍या संस्थांना निधी उपलब्ध व्हावा आणि सामाजिक कार्यासाठी देण्यात येणारा निधी योग्य ठिकाणी पोहोचावा या उद्देशाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तीन वर्षांपूर्वी अर्थसंकल्पात ही योजना मांडली. सध्या ७० सामाजिक संस्था सोशल स्टॉक एक्सचेंजवर नोंदणीकृत आहेत. डॉ. देशपांडे यांनी सर्व संस्थांना आवाहन केले की, सामाजिक कार्य करणार्‍या ना नफा ना तोटा या तत्वावरील संस्थांनी सोशल आयपीओमध्ये भाग घ्यावा

राष्ट्रवादी महीला प्रदेशाध्यक्षपदाचा रुपाली चाकणकरांचा राजीनामा

राष्ट्रवादी महीला प्रदेशाध्यक्षपदाचा रुपाली चाकणकरांचा राजीनामा भोंदूगिरी भोवली पोलिसांकडूनही चौकशी होण्याची शक्यता ० पुणे : भोंदूबाबा अशोक खरातच्या नादी लागलेल्या रुपाली चाकणकरांना अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा…

धक्कादायक ! दोन पोलिसांनी किडनॅप करून केली लुटमार

धक्कादायक ! दोन पोलिसांनी किडनॅप करून केली लुटमार मुंबई पोलिसांच्या वर्दीला काळिमा संदीप शिंदे आणि गजेंद्र राजपूत या दोन्ही पोलिसांना अटक दहा हजार डॉलर लुटण्यासाठी केले किडनॅपिंग सिद्धेश शिगवण मुंबई…

लॉकडाऊन लागणार नाही- फडणवीस

लॉकडाऊन लागणार नाही- फडणवीस मुंबई : देशात इंधनाचा तुटवडा असून लवकरच कोरोनाप्रमाणे लॉकडाऊन लागणार, अशा आशयाचे संदेश ही सफशेल अफवा असून असे कोणतेही लॉकडाऊन लागणार नाही असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.…