Category: महाराष्ट्र

Maharashtra News

– ५ जून रोजी सोलापुरात होणार राष्ट्रीय खो-खो पंच परीक्षा

२ जूनपर्यंत नाव नोंदणीचे आवाहन पुणे : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या वतीने आणि भारतीय खो-खो महासंघाच्या मान्यतेने शुक्रवार, ५ जूनला राष्ट्रीय खो-खो पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर येथे होणाऱ्या या परीक्षेमुळे राज्य परीक्षा पास झालेल्या पंचांना राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी या परीक्षेबाबत माहिती दिली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त राज्य पंच परीक्षा उत्तीर्ण पंचांनी राष्ट्रीय परीक्षेला बसावे आणि राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपली नाव नोंदणी २ जून २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत पूर्ण करावी. यासाठी प्रशांत पाटणकर (मो. क्र. ९९६७५६२४६६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याने पंचांनी वेळेत नोंदणी करण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे. 0000000000

शिरोली बुद्रुकच्या ‘डोळ्यांच्या डॉक्टरबाई’ अनुसयाबाई डबडे यांचे निधन

 शतक महोत्सव चार दिवसांवर असतानाच काळाचा घाला; गावावर शोककळा नारायणगाव : आपल्या अंगभूत कौशल्याने अनेकांच्या डोळ्यात गेलेला कचरा कापसाच्या बोळ्याने सहजतेने व विनामोबदला काढून देणाऱ्या आणि त्यामुळे पंचक्रोशीत ‘डोळ्यांच्या डॉक्टरबाई’…

नाशिक रिंग रोडचा वाद पेटला

भुजबळ फार्मवर शेतकऱ्यांचे आंदोलन हरिभाऊ लाखे नाशिक : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित नाशिक परिक्रमा मार्ग अर्थात रिंग रोडमध्ये एकाही मंत्री वा त्यांचे निकटवर्तीय, बिल्डर्स आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या जमिनी जात नसल्याकडे लक्ष वेधत कुंभमेळ्याच्या नावाखाली बिल्डरांसह हितसंबंधितांच्या फायद्यासाठी रिंग रोड बनवला जात असल्याचा आरोप बाधित शेतकऱ्यांकडून होत आहे. नाशिक रिंग रोडची मोजणी मध्यंतरी वादात सापडली होती. या प्रश्नावर स्थानिक तीनही मंत्र्यांनी भूमिका मांडलेली नाही. बाधित शेतकऱ्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या निवास स्थानासमोर दाद मागो आंदोलन केले. यावर आता मंत्री भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाशिक रिंग रोड आणि एमआयडीसी भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचे गोदा काठावर आमरण उपोषण सुरू आहे. दुसऱ्या दिवशी बाधित शेतकऱ्यांनी मंत्री भुजबळ यांच्या निवासस्थानी आंदोलन केले. सकाळपासून भुजबळ फार्म परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला. कांदा प्रश्नांसंदर्भातील बैठकीसाठी मंत्री भुजबळ यांना दिल्लीला जावे लागल्याने ते नाशिकमध्ये नव्हते. मात्र, त्यांच्या स्वीय सहाय्यकांसमवेत शेतकरी शिष्ट मंडळाने चर्चा केली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीतील सर्व आश्वासनांची पूर्तता शासनाच्या संबंधित विभागांनी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मंत्री भुजबळ यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. भुजबळ हे पालकमंत्री असताना जिल्ह्यात अनेक महामार्ग व मोठे विकास प्रकल्प झाले. त्यामुळे रिंग रोडसारख्या महत्वाच्या प्रकल्पात शेतकरी हित जपून न्याय निर्णय घेण्यासाठी त्यांच्या अनुभवाची शिदोरी वापरावी. नाशिक रिंग रोडच्या संरेखनाच्या पर्यायावर अंतिम निर्णय मंत्री स्तरावर घेतला जाणार आहे. त्यामुळे गिरीश महाजन, छगन भुजबळ, दादा भुसे आणि नरहरी झिरवाळ या चारही मंत्र्यांनी एकत्रितपणे शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा, यासाठी आम्ही सर्व मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट केले. आंदोलनात छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, शिवा तेलंग, नवनाथ शिंदे, आशिष हिरे, आदींसह बाधित शेतकरी उपस्थित होते. नाशिक रिंग रोड नेमका कुणाच्या फायद्यासाठी होत आहे, असा प्रश्न करण्यात आला. रिंग रोडच्या भू संपादनात शेतकरी भूमिहीन होऊ नये, कोणाची घरे, विहिरी, गोठे व शेती उद्ध्वस्त होणार नाही, याची काळजी घेत निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. छगन भुजबळ काय म्हणाले ? या आंदोलनावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. विकास कामे करताना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, ही महायुती सरकारची भूमिका आहे. नाशिकमधील रिंग रोड विस्ताराच्या संदर्भात प्रशासन शेतकऱ्यांशी योग्य ती चर्चा करत आहे. शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, हीच शासनाची भूमिका राहील असे मंत्री भुजबळ यांनी स्पष्ट केले. 000000000

H- नीट नंतर आता मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेत प्रचंड गोंधळ

 ऐनवेळी जुन्याच प्रश्नपत्रिका वाटल्याने खळबळ हरिभाऊ लाखे नाशिक : नीट परीक्षेचा विषय देशभर गाजत असताना आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेतील सावळागोंधळ समोर आला आहे. संगणकीय आज्ञावलीतून पाठवलेली…

एसआयआर प्रक्रियेवर लक्ष ठेवा- वर्षा गायकवाड

एकाही मुंबईकराचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना मुंबई : लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार हा केवळ घटनात्मक अधिकार नाही, तर भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. परंतु भाजपा सरकार निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदार याद्यांमध्येही घोटाळा करत आहे. विविध राज्यात राबवण्यात आलेल्या एसआयआर प्रक्रियेतून मोठ्या संख्येने मतदार वगळण्यात आलेले आहेत. अशी परिस्थिती मुंबईकरांवर ओढवू नये, यासाठी एसआयआर प्रक्रियेवर बारीक नजर ठेवावी व एकाही मुंबईकराचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा स्पष्ट सुचना मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत. राजीव गांधी भवन येथे खासदार वर्षा गायकवाड यांनी एसआयआर प्रक्रियेसंदर्भात मुंबई क्षेत्रातील जिल्हाध्यक्षांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मुंबई काँग्रेसच्या फ्रंटल संघटना आणि सेलचे पदाधिकारीही उपस्थित होते. बैठकीत शहरातील एसआयआर प्रक्रियेच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच नागरिकांना कोणत्याही कारणामुळे मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी बीएलए कार्यकर्ते घेत असलेल्या विविध उपाय योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पुढील काळात  संघटित पद्धतीने काम करण्यासाठी जिल्हाध्यक्षांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. लोकशाही मजबूत ठेवायची असेल, तर प्रत्येक नागरिकाचा मताचा अधिकार सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने सामान्य माणसाचा आवाज बुलंद केला आहे. जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करणे आणि सरकारला जाब विचारणे ही आपली जबाबदारी आहे आणि आपण ती पार पाडली पाहिजे. पक्ष संघटना बळकट करण्याबरोबर जनतेच्या प्रश्नावर विविध आंदोलने करण्याच्या सुचनाही खासदार वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली. ००००००००

शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध विकास कामांचे भूमिपूजन

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र. १२ च्या वतीने प्रभागातील विविध विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. स्थानिक नगरसेविका सारिका शशिकांत झोरे यांच्या प्रयत्नांतून…

‘भाजपमध्ये भीती आणि जनतेमध्ये आक्रोश’

 नाशिक दौऱ्यात आदित्य ठाकरे यांचा घणाघात हरिभाऊ लाखे नाशिक – शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये मागील आठवड्यात शिवसंवाद मेळावा घेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर आता शिवसेना (उध्दव ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनीही नाशिकचा दौरा करुन कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना कोणकोणत्या समस्यांना हात घातला पाहिजे, प्रश्नांचा पाठपुरावा कसा केला पाहिजे, याविषयी मार्गदर्शन करतानाच पत्रकारांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या अपयशावर टीका केली. कुंभमेळ्यास कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. परंतु, कुंभमेळ्यातील कामांचे कंत्राट कोणाला देण्यात येत आहे, त्याचा नाशिकला काही फायदा आहे काय, याचा विचार करण्याची गरज आहे. नाशिकमध्ये सर्वत्र खोदकाम करुन ठेवल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसाळा सुरु झाल्यानंतर ही कामे यशस्वी होतील का, याची खात्री सरकार देणार आहे काय, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. जागतिक परिस्थिती वेगळी असली तरी या सरकारने मागील काही वर्षात आर्थिक परिस्थितीवर असे काही करुन ठेवले आहे की, त्याचा परिणाम सर्वाना भोगावा लागत आहे. पैसे नाही दिले तरी कंत्राटदार खोदकाम सोडून देणार नाही, याची हमी सरकार देऊ शकणार आहे काय, असा प्रश्न उपस्थित करुन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अनेक कंत्राटदारांना त्यांच्या कामाचे पैसे मिळाले नसल्याकडे लक्ष वेधले. कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये होणाऱ्या रिंगरोडकरिता होणाऱ्या भूसंपादनाविरोधात आवाज उठविणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली. संजय राऊत यांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे हा मुद्दा मांडला होता. शेतकरी कधीही चांगल्या कामाला विरोध करीत नाही. परंतु, त्याच्या मागण्यांचाही विचार करणे आवश्यक असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कोण होता शिवाजी ? हे पुस्तक वाचले असते तर शिवाजी महाराजांनी गद्दारांना काय शिक्षा दिली होती, याचा या गद्दारांना पळताना चारदा विचार करावा लागला असता. त्यांनी डोकं ठिकाणावर ठेवून देशात आणि राज्यात कोणते प्रश्न महत्वाचे आहेत, रोजगार किती आहेत, सरकारमुळे रुपयाची काय परिस्थिती झाली, या सरकारमुळे शहरांची काय अवस्था झाली, या प्रश्नांचा विचार करावयास हवा. असे प्रश्न अधिवेशनात मांडावयास हवेत. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरे हेच पक्षाची अधिकृत भूमिका मांडतील. नाशिकमध्ये ठाकरे गटाचे नगरसेवक आक्रमकपणे जनतेचे प्रश्न मांडत आहेत. त्यांनी अजून कशाप्रकारे प्रश्नांची मांडणी करावयास हवी, यासंदर्भात नगरसेवकांसह इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. इतर पक्षांमागे लागतात, तसे भाजप हे काॅक्रोच जनता पार्टीमागे लागले आहेत. काॅक्रोच जनता पार्टीला समाज माध्यमात बंदी घालावीशी भाजप सरकारला वाटले. यावरुन विचार करा त्यांच्यात किती भीती आहे. भाजपमध्ये भीती असल्याचे आणि जनतेमध्ये आक्रोश असल्याचे दिसून आले आहे. भाजपविरोधात कोणी बोलले की लगेच त्याचा पाकिस्तानशी संबंध जोडण्यात येतो, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. त्यांनी काॅक्रोच जनता पार्टीशी संबंधित विषयावरुन लोकांमध्ये किती आक्रोश आहे, हे लक्षात येत असल्याचे सांगितले. सरकारमधील मंत्री सर्वत्र पुरेसा इंधन साठा असल्याचा दावा करतात. परंतु, अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद झाले आहेत. इंधन मिळविण्यासाठी कुठे भांडणे होत आहेत. कुठे मारामाऱ्या होत आहेत. रांगा लागल्या आहेत. राज्यातील ही परिस्थिती सरकारमध्ये असूनही जर मंत्र्यांना माहीत नसेल तर काय उपयोग, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केला. कोट “भाजपमध्ये सध्या भीतीचे वातावरण असून जनतेमध्ये प्रचंड आक्रोश दिसून येत आहे. भाजपविरोधात कोणी आवाज उठवला किंवा सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले की, लगेच त्याचा पाकिस्तानशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. ही लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक प्रवृत्ती आहे.” – आदित्य ठाकरे ०००००००

– राष्ट्रवादीच्या आंदोलनाकडे खासदार सुरेश म्हात्रे यांनी फिरवली पाठ ?

– राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी कल्याण : कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने वाढत्या महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र भिवंडी लोकसभेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे हे आज दिवसभर कल्याणच्या शासकीय विश्रामगृहात उपलब्ध असतांना देखील त्यांनी या आंदोलनात उपस्थित न राहिल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून कार्यकर्त्यांकडून खासदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहेत. तर खासदार सुरेश म्हात्रे यांनी नुकतेच भाजपा सरपंचांचे आणि शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामाचे कौतुक केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यातच त्यांनी राष्ट्रवादीच्या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.

मतदार मॅपिंग प्रक्रियेत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात दुसरा…!

 जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली ९१ टक्के मॅपिंग पूर्ण…! सिंधुदुर्ग : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष पुनरिक्षण मोहिम (एसआयआर -२०२६) अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदारांच्या डिजिटल मॅपिंग प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, जिल्ह्याने ९१ टक्के मॅपिंग पूर्ण करण्याचा उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनामुळे आणि निवडणूक यंत्रणेच्या समन्वयाने सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानी आहे. विशेष पुनःरीक्षण  मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सिंधुदुर्ग  प्रशासन सुसज्ज असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी  धोडमिसे यांनी सांगितले. जिल्ह्यातील मतदार मॅपिंगची सुरुवातीची टक्केवारी अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी स्वतः या मोहिमेचा आढावा घेत विशेष लक्ष केंद्रीत केले. त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील बूथ पातळी अधिकारी (बीएलओ) यांच्या स्वतंत्र बैठका घेत कामाची गती वाढवण्याचे निर्देश दिले. या बैठकीत तांत्रिक अडचणींचे निराकरण, माहिती संकलनातील त्रुटी दूर करणे आणि मॅपिंग प्रक्रियेत अचूकता राखण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि योग्य नियोजनामुळे अल्पावधीतच जिल्ह्याने ९१ टक्के मॅपिंग पूर्ण करून उल्लेखनीय प्रगती साधली आहे. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्येक मतदाराचे नाव विद्यमान मतदार यादीतून सन २००२ मधील मतदार यादीशी जोडण्याचे कार्य करण्यात येत आहे. या प्रक्रियेमुळे मतदार नोंदींची खातरजमा होण्यास मदत होणार असून मतदार यादी अधिक स्वच्छ, अचूक आणि पारदर्शक बनणार आहे. निवडणूक विभागाच्या समन्वयातून संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात काटेकोर नियंत्रण ठेवत मोहिमेला गती दिली. तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार कणकवली, वैभववाडी, देवगड, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून बीएलओंकडून हे काम वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

बकरी ईदच्या दिवशी दुर्गादेवी मंदिर बंद ठेवण्याची प्रथा तात्काळ बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कल्याण: दुर्गाडी मंदिर प्रवेशबंदीवरून कल्याणमध्ये राजकारण तापले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांनी सत्ताधार्यांवर सडकून टीका केली आहे. हिंदुत्ववादी सरकार असताना हिंदूंना मंदिरात प्रवेश मिळत नाही, सत्ताधारी पक्ष संघटनांना आंदोलनाची भाषा करावी लागत हे लज्जास्पद आणि हास्यास्पद असल्याचे विजय साळवी यांनी सांगितले. तसेच बकरी ईदच्या दिवशी किल्ले दुर्गाडी येथील श्री दुर्गादेवी मंदिर दर्शनासाठी होणारे निर्बंध व मंदिर बंद ठेवण्याची प्रथा तात्काळ बंद करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. किल्ले दुर्गाडी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पदस्पशनि पवित्र झालेले ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे. किल्ले दुर्गाडीवरील थी दुगदिवी मंदिर हे ठाणे जिल्हयातील जागृत देवस्थान असुन लाखो हिंदु भाविकांच्या श्रध्देचे केंद्र आहे. दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करुन दुर्गाडी मंदिर परिसरात निर्बंध लादले जातात. मंदिराकडे जाणारे मार्ग बंद केले जातात, घंटानादावर निर्बंध आणले जातात आणि अनेक भाविकांना देवीच्या दर्शनापासून वंचित रहावे लागते. अशा प्रकारे हिंदुंच्या धार्मिक अधिकारांवर घाला घालण्याची परंपरा अनेक वर्षापासून सुरु आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार असुन या सरकारच्या काळातच हिंदुंना आपल्या आराध्य देवीच्या दर्शनासाठी संघर्ष करावा लागणे ही अत्यंत वेदनादायक आणि संतापजनक बाब आहे. त्यामुळे बकरी ईदच्या दिवशी श्री दुर्गादेवी मंदिर परिसरातील सर्व अनावश्यक निर्बंध तात्काळ हटवावेत. हिंदु भाविकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय देवीचे दर्शन घेण्याची हमी द्यावी. घंटानाद, आरती व इतर धार्मिक परंपरांवर कोणतेही निर्बंध लागू करू नयेत. संबंधित पोलिस व प्रशासकीय यंत्रणेला हिंदु भाविकांच्या धार्मिक अधिकारांचे संरक्षण करण्याबाबत स्पष्ट आदेश देण्याची मागणी विजय साळवी यांनी केली आहे. अन्यथा हिंदु समाजाच्या भावना, श्रध्दा आणि घटनात्मक अधिकारांच्या रक्षणासाठी लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 00000000