Category: महाराष्ट्र

Maharashtra News

Heading – पूर्व वैमनस्यातून तरुणाची धारदार चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या

मारेकरी अटकेत सुनिल इंगळे उल्हासनगर: मागील भांडणाचे व एकमेकांच्या विरोधात केलेल्या केसच्या वादातून मनात राग धरून तरुणाला भर रस्त्यात अडवून त्याच्यावर धारदार चाकूने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी तातडीने त्या मारेकर्‍याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४ परिसरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री अकराच्या सुमारास कुर्ला कॅम्प रोड, कालीमाता मंदिरच्या मागे भर रस्त्यात व सुरू असलेल्या पावसात एका तरुणाने दुसऱ्या तरुणांवर धारदार चाकूने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी करून त्या ठिकाणाहून पलायन केले. या घटनेची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांना मिळताच त्यांनी पोलीस पथकासह घटना घडलेल्या ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी त्या ठिकाणी रक्ताच्या ठरवण्यात एक तरुण जखमी अवस्थेत पडलेला होता. त्याच्या जवळच एक धारदार चाकू रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेला होता. पोलिसांनी सर्वप्रथम त्या जखमी तरुणाला जवळच असलेल्या बालाजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण त्याची प्रकृती खूपच गंभीर असल्याने त्याला उल्हासनगरातील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये घेण्यात आले. पण डॉक्टरांनी उपचार सुरू करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्या मयत झालेल्या तरुणाचे नाव सतनामसिंग लबाना असल्याचे व तो उल्हासनगरातील कॅम्प नंबर – ५ परिसरातील सेक्शन ३९ वीर तानाजी नगर या परिसरातला राहणारा असल्याचे समजले. सतनामसिंग याला जीव ठार मारून पळून गेलेल्या मारेकराचे नाव गुरप्रीतसिंग उर्फ अनिस करतारसिंग लबाना (१९ ) असून तो देखील वीर तानाजी नगर परिसरातली राहणार असल्याचे पोलिसांना समजले. त्याच दरम्यान हिल्लाईन पोलिसांनी अनिस लबाना याचा शोध घेऊन त्याला त्वरित ताब्यात घेऊन विठ्ठलवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेला धारदार चाकू व इतर वस्तू पंचनामा करून ताब्यात घेतल्या. याशिवाय या थरारक हत्याचा व्हिडिओ काही नागरिकांनी मोबाईल मध्ये चित्रीत केला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे घटना घडलेल्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सतनामसिंग लबाना याची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने त्याचा भाऊ कुलदीप सिंग लभाना यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुरुप्रीतसिंग उर्फ अनिस लबाना याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटने संदर्भात विठ्ठलवाडी पोलिसांनी केलेल्या चौकशीत अधिक माहिती मिळाली मयत सतनामसिंग व यातील आरोपी अनिस यांचे एकमेकांच्या कुटुंबीयांच्या विरोधात पूर्वीपासून वाद आहेत. आणि त्याच्या नातेवाईकांनी मयत सतनामसिंग याच्या विरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात जबरी चोरीची फिर्याद दाखल केली होती. त्यात त्याला अटक करण्यात आली होती. सध्या तो त्या केसमधून जामिनावर बाहेर आलेला होता. तेव्हापासून आरोपी व मयत यांच्या कुटुंबांमध्ये वाद सुरू होता. अनिस लबाना याने मयत सतनामसिंग याच्यासोबत असलेल्या मागील भांडणाचे व एकमेकांचे विरोधात केलेल्या केसच्या वादाचे कारणावरून मनात राग धरून सतनामसिंग लबाना यांच्यावर धारदार चाकूने त्याच्या मानेवर छातीवर पोटावर व शरीरावर सापासाप वार करून त्याला जीवे ठार मारले आहे अशी माहिती तपासात पोलिसांना मिळाली आहे. अधिक तपास विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे करीत आहेत.

 साचल्याने पाण्यामुळे लेप्टोस्पायरोसिसचा धोका वाढला

सुरुवातीची लक्षणे ओळखा, वेळेत उपचार घ्या – वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या तज्ज्ञांचा इशारा मिरा -भाईंदर : शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले असून नागरिकांना लेप्टोस्पायरोसिससह विविध जलजन्य आजारांचा धोका वाढला आहे. गटारे तुंबणे, रस्त्यांवर साचलेले दूषित पाणी आणि उंदरांसह इतर प्राण्यांच्या मूत्राने दूषित झालेल्या पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे. वोक्हार्ट हॉस्पिटल्स,, मीरा रोड येथील हेड कन्सल्टंट – क्रिटिकल केअर, डॉ. अकलेश तांडेकर म्हणाले, “मुंबईसह मीरा-भाईंदर, वसई, विरार आणि नालासोपारा परिसरात पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचते. अशा दूषित पाण्यातून चालताना त्वचेवरील जखम, खरचटलेली जागा किंवा डोळे, नाक आणि तोंडाद्वारे लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग होऊ शकतो. सुरुवातीला ताप, अंगदुखी, डोकेदुखी, थंडी वाजणे, उलट्या आणि अशक्तपणा अशी लक्षणे दिसतात. अनेकजण हा साधा व्हायरल ताप समजून दुर्लक्ष करतात. मात्र वेळेत उपचार न झाल्यास हा आजार किडनी, यकृत आणि फुफ्फुसांवर गंभीर परिणाम करू शकतो. काही रुग्णांना अतिदक्षता विभागात (ICU) उपचारांची गरज भासू शकते.” ते पुढे म्हणाले, “पूराचे किंवा साचलेल्या पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर पुढील दोन ते तीन आठवड्यांत ताप किंवा इतर लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लवकर निदान आणि योग्य अँटिबायोटिक उपचारांमुळे गंभीर गुंतागुंत टाळता येते.” ताप किंवा इतर लक्षणे आढळल्यास स्वतः औषधे न घेता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जनजागृती, सुरुवातीची लक्षणे वेळेत ओळखणे आणि त्वरित वैद्यकीय उपचार घेणे हेच लेप्टोस्पायरोसिससारख्या गंभीर आजारापासून बचावाचे सर्वात प्रभावी उपाय आहेत.

कुडाळ व मालवण तालुक्यातील ६ प्रवासी मार्ग निवारा शेडसाठी १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर…!

 आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नाला यश ! सिंधुदुर्ग: गेली अनेक वर्षे नादुरुस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मार्ग निवारा शेड साठी आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून १ कोटी २० लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये मालवण तालुक्यातील कट्टा, चौके, सुकळवाड तर कुडाळ तालुक्यातील आंब्रड, आवळेगाव, माणगाव या ठिकाणच्या जीर्ण व नादुरुस्त झालेल्या शेडसाठी प्रत्येकी २० लाख याप्रमाणे एकूण १ कोटी २० लाख एवढा निधी पहिल्या टप्यात मंजूर झाला आहे. या कामाची प्रशासकीय मान्यता झाली असून निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात आहे, लवकरच जुन्या शेड हटवून नवीन बांधकामाला पावसाळ्यानंतर सुरुवात होईल असे एस.टी.प्रशासनातर्फे सांगण्यात आले. दरम्यान या निर्णयाचे संबंधित गावच्या रहिवाशांनी, ग्रामस्थांनी स्वागत केले असून  आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.

 कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचे धुमशान

 ओढे नाले तुडुंब, नद्यांनी धोक्याची पातळी ओलंडली    कल्याण : कल्याण तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाच्या धुवाधार बँटिग मुळे ओढे, नाले, तुडुंब झाले. तर उल्हास, काळू, भातसा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने सखल भागात पाणी शिरले. कल्याण तालुक्यातील टिटवाळा, खडवली, वाळकस, म्हारळ, वरप,कांबा, रूंदे,नडगाव आदी ग्रामीण परिसरात गत दोन दिवसापासून पावसाचे धुमशान पाहता नाले, ओढे, तुडुंब भरून वाहत होते. तर नद्यांनी देखील धोक्याची पातळी ओलंडल्याने ग्रामीण परिसरातीलसखल भागात पाणी शिरल्याने जन जीवन विस्कळीत झाले. काळू नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने कल्याण तालुक्यातील रुंदे पूल,भातसानदीवरील वाळकस पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. तर खडवली भातसा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने जु गावाला पुराचा पाण्याचा वेढा वाढत असल्याने ज्युगावाकडे जाणारा पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला. उल्हासनदीची धोक्याची पातळीपाहता रायते जुना पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला. बल्याणी ते टिटवाळा रस्ता दरम्यान रस्ता खचल्याने रस्त्यावर मोठे भगदाडपडले, या संदर्भात स्थानिक माजी नगरसेवक यांनी यासंदर्भात प्रशासनानेरस्त्या दुरूस्ती संदर्भात पाठपुरावा करून देखील दुर्लक्ष केले. आता तरीप्रशासनाने लक्ष देऊन संदर्भीत रस्त्याची दुरूस्ती करावी, असे संपर्कसाधला असता सांगितले., तर मोहिली पाणीपुरवठा केंद्र पाण्याखाली गेल्याने केडीएमसी पाणीपुरवठा वितरण व्यवस्थावर यांचा फटका बसल्याने अ, ब, प्रभागासहटिटवाळा, परिसरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. तर जु गावाला पाण्याचा वाढणारा वेढापाहता गावातील गावकरी यांचा अन्न धान्य साठा जीवन आवश्यक वस्तू सुरक्षित ठिकाणीगावकऱ्यांनी हलविले असल्याचे तसेच, पुराच्या पाण्याचा  संभाव्य धोका पाहता, प्रशासनची पथकेघडामोडी पाहता परिस्थितीवर लक्ष ठेवून उपाययोजना करीत असल्याचे कल्याण तहसीलदारविकास गारूडकर यांनी सांगितले.

 नाशिकमध्ये मंगळवारी ढगफुटीसह ३०० मिमी पावसाचा इशारा!

 शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, पर्यटनस्थळे व मंदिरे बंद हरिभाऊ लाखे नाशिक –राज्यातील अनेक भागात पावसाने थैमान घातले असताना मंगळवारी नाशिक, त्र्यंबकेश्वर परिसरात ढगफुटीसह ३०० मिलीमीटर पावसाचा सर्वात मोठा अलर्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

दत्त निवारा इमारतीचा भाग कोसळल्यानंतर बाधितांना बीएसयूपी घरांमध्ये तात्पुरता निवारा द्या

– शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मागणी आरती परब दिवा : दिवा शहरातील वैभव हॉटेलच्या मागे असलेल्या ‘दत्त निवारा’ इमारतीच्या जिन्याचा आणि स्लॅबचा काही भाग रविवारी कोसळल्यानंतर येथील रहिवाशांसमोर निवाऱ्याचा…

राज्य कॅरम स्पर्धेत कोल्हापूरच्या नवोदित ओंकारची अपयशी झुंज

श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित हॉटेल मंगलम, नरसोबा वाडी, कोल्हापूर येथे कै अशोक पुजारी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या १० व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटातील तिसऱ्या फेरीच्या…

तुकाराम मुंढे यांचा नाशिक जिल्ह्यात धडाका सुरुच

 चार ठिकाणी दूध संकलन केंद्र, प्रक्रिया केंद्रांवर छापे हरिभाऊ लाखे नाशिक: अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांची आक्रमक आणि रोखठोक शैली विशेष चर्चेत आली आहे. संपूर्ण राज्यात त्यांनी अन्नातील भेसळीविरोधात रान उठविले असून नाशिक जिल्हाही त्यास अपवाद नाही. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सिन्नर तालुक्यातील चार गावांमध्ये दूध भेसळीच्या संशयावरून छापे टाकले. शनिवारी दिवसभर ही कारवाई सुरु होती. या छाप्यांमध्ये भेसळीसाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आल्याची माहिती पुढे आली असून, रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात येत होती. सिन्नर तालुक्यात दूध भेसळीविरोधात झालेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी ठिकठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सिन्नर तालक्यातील शहा, कारवाडी, पुतळेवाडी आणि विघनवाडी येथील दूध संकलन केंद्रे आणि प्रक्रिया केंदांवर छापे टाकले. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मंगेश माने यांच्या नेतृत्वाखाली हे छापे टाकण्यात आले. कारवाईपूर्वी सकाळपासून विभागातील १२ अधिकाऱ्यांच्या पथकाने छापे टाकण्यात येणाऱ्या केंद्रांवर गुप्तपणे लक्ष ठेवले होते. खात्री झाल्यानंतर स्वतंत्र पथकांव्दारे एकाचवेळी छापे टाकण्यात आले. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये पावडर किंवा इतर कोणत्या पदार्थांची भेसळ होत आहे काय, याची तपासणी करण्यात आली. या छाप्यांदरम्यान नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे तसेच काही साहित्यही जप्त करम्यात आल्याचे सांगितले जाते.यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली नाही. खबरदारी म्हणून छाप्यांवेळी वावी पोलीस ठाण्याकडून पोलीस बंदोबस्तही घेण्यात आला होता. शहा गावात छापा टाकण्यात आल्याची माहिती मिळताच किराणा दुकाने, पानटपऱ्या, खाद्यपदार्थांची दुकाने पटापट बंद झाली. ती सायंकाळपर्यंत बंदच राहिली. गोदामांचीही झडती घेण्यात आली. शहा येथील दोन, कारवाडी आणि विघनवाडी येथील प्रत्येकी एका दूध संकलन व प्रक्रिया केंद्रावर छापे टाकण्यात आले. दरम्यान, याआधी दोन दिवसांपूर्वी नाशिक विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथील हॉटेल आणि खाद्यगृहांची तपासणी करण्यात आली. त्यात नऊ हॉटेलांचे परवाने निलंबित करण्यात आले. तर आवश्यक नोंदणी व परवाना नसल्याने चार हॉटेलांना व्यवसायास प्रतिबंध करण्यात आला. नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने नाशिक विभागात दोन दिवसात २० हॉटेलांची तपासणी करण्यात आली. अन्न व सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हाॅटेलांवर कारवाई करण्यात आली. तपासणी दरम्यान स्वयंपाकगृहातील गंभीर अस्वच्छता, निकृष्ट दर्जाची शीतकरण यंत्रणा, अस्वच्छतेत उघड्यावर ठेवलेले कच्चे अन्न, कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव तसेच संबंधित आस्थापनांकडे आवश्यक कागदपत्रांचा अभाव, कार्यरत कर्मचाऱ्यांची कुठलीही वैद्यकीय तपासणी न करणे तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम आणि त्या अंतर्गत विविध नियम व विनियमांचे उल्लंघन या कारणावरून संबंधित हॉटेल आणि आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले. यात नाशिक जिल्ह्यातील चार, जळगाव येथील दोन तर नंदुरबार येथील एका हॉटेलचा समावेश आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून उल्हासनगरात गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप उपक्रम उत्साहात संपन्न

सुनिल इंगळे उल्हासनगर  : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या १० लाख मोफत वही वाटप उपक्रमा अंतर्गत,नगरसेवक दिलीप गायकवाड यांच्या माध्यमातून शिवसेना शाखा, शिवनेरी नगर येथे गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक दिलीप गायकवाड, युवासेना कल्याण जिल्हा सचिव हरजिंदरसिंह भुल्लर (विक्की भाई), उपशहरप्रमुख सुरेश सोनवणे, विभागप्रमुख विनोद सालेकर, विभागप्रमुख प्रमोद पाण्डेय, विभाग संघटक आदेश पाटील, युवासेना उल्हासनगर संपर्क प्रमुख तुषार बांदल, विजय इंजे, प्रदीप आयरे, अनंत सावंत, अरुण कोळी तसेच शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख व समस्त शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थी, पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “शिक्षण हीच खरी ताकद विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध!” असलायचे उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक दिलीप गायकवाड यांनी सांगितले. ०००००००

चालकाला थेट सव्वा कोटींचा बंगला भेट!

महेंद्रशेठ घरत यांचे अफाट दातृत्व! उलवे : सध्याच्या व्यावसायिक युगात मालक आणि कर्मचारी यांच्यातील संबंध केवळ करारापुरते मर्यादित होत असताना, मानवी मूल्यांचे जतन करणारी एक अनोखी घटना समोर आली आहे.…