Category: महाराष्ट्र

Maharashtra News

कर्जतच्या आगरी समाज सभागृहाचे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते शानदार उदघाटन

आगरी समाजाच्या विकासाला माझे सर्वप्रथम प्राधान्य : महेंद्रशेठ घरत उलवा : कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या वातानुकूलित भव्य सभागृहाचे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते शनिवारी शानदार उदघाटन करण्यात आले. या समारंभाला बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य बाबूशेठ घारे, उद्योजक मयूर पिसे आदी मान्यवर उपस्थित होते. कर्जतच्या आगरी समाज सभागृहाचे संपूर्ण अत्याधुनिक नूतनीकरण यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी १२ लाख ५० हजार रुपये सढळ हस्ते केलेल्या देणगीतून करण्यात आले आहे. त्यामुळे कर्जत तालुका आगरी समाज संघटनेतर्फे महेंद्रशेठ घरत यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला. “महेंद्रशेठ घरत हे आगरी समाजातील आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे नेतृत्व करणारे अवलिया आणि दानशूर व्यक्तिमत्त्व आहेत, याचा कर्जतच्या आगरी समाजाला अभिमान आहे,” असे कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “मला आगरी असल्याचा सार्थ अभिमान आहे. आपला समाज मेहनतीने आणि सन्मानाने जगण्याला अधिक प्राधान्य देतो. कुणापुढे कारण नसताना झुकत नाही. ताठ कण्याचा आपला समाज मला प्रिय आहे. त्यामुळे आगरी समाजाच्या उत्कर्षासाठी मी सर्व प्रकारचे सहकार्य करतो. समाजाच्या मागे मी कायमच खंबीरपणे उभा आहे आणि राहीन. कर्जतचा आगरी समाज संघटित होऊन समाजाच्या भल्यासाठी प्रयत्न करतोय. त्यामुळे कर्जतच्या आगरी समाजावर माझे विशेष प्रेम आहे. त्यांच्यासाठी माझा मदतीचा हात कायमच राहील. मी जागतिक पातळीवर कामगारांचे नेतृत्व करीत आहे. त्यामुळे जगभर फिरतो; परंतु मी माझ्या गावाच्या विकासाबाबत संवेदनशील आहे. आज राज्यात रोल मॉडेल ठरेल, असा माझ्या शेलघर गावाचा सुनियोजित विकास मी करून घेतला आहे. आज तिथे ग्रामस्थांना बोट ठेवायला जागा नाही. मी जिल्हा परिषद सदस्य असताना गावोगावी जलकुंभ बांधून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतविला. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर अभ्यास करून अधिकाऱ्यांवर वचक ठेवला आणि विकासात्मक कामे करून घेतली. रायगडमध्ये सी. डी. देशमुख यांच्यानंतर मी जगाच्या व्यासपीठावर नावलौकिक मिळवतोय. तिथेही मी त्या त्या देशांच्या कामगार नेत्यांवर वचक ठेवून आहे.” या समारंभाला बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य बाबूशेठ घारे, उद्योजक मयूर पिसे, कर्जत पंचायत समिती सदस्य भगवान चंचे, नितीन धुळे, रेश्माताई जोशी, मंगेश म्हसकर, विपूल पाटील, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. हा समारंभ हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील सामाजिक सभागृह नेरळ-बोपेले येथे पार पडला. यावेळी कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे, माजी अध्यक्ष नागो गवळी, एकनाथ धुळे, सावळाराम जाधव, कर्जत तालुका काँग्रेस अध्यक्ष संजय गवळी, उरण तालुका प्रमुख विनोद म्हात्रे, किरीट पाटील, वैभव पाटील, निखिल ढवळे आणि एम. जी. ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. यावेळी जितेंद्र गवळी यांनी सूत्रसंचालन केले, तर भरत भगत यांनी प्रास्ताविक केले.

भोंदू खरातच्या साथीदाराच्या खात्यातून १३.५० कोटी जप्त

हरिभाऊ लाखे नाशिक : महिलांचे लैंगिक शोषण, आर्थिक आणि फसवणूक खंडणी प्रकरणामुळे राज्यभर चर्चेत आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई करीत त्याच्या साथीदारांकडून तब्बल १३ कोटी ५० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. यात १३.१२ कोटी रुपयांची रोख रक्कम, मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे दागिन्यांचा समावेश असून, अशोक खरातच्या बँक खात्यातील २.२५ कोटी रुपयांच्या ठेवी गोठवण्यात आल्या आहेत. त्याच्या मालकीची आलिशान मर्सिडीज कारही ईडीने जप्त केल्याने या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिलांचे लैंगिक शोषण व आर्थिक फसवणुकीच्या आरोपांप्रकरणी नाशिक शहर पोलिसांनी १८ मार्चला अशोक खरातला अटक केली. या घटनेने राज्यभर खळबळ उडाली होती. अटकेनंतर अवघ्या पाच दिवसांत या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) वर्ग करण्यात आला. एसआयटीने जवळपास दीड महिना विविध पैलूंवर तपास करत अनेक धक्कादायक बाबी समोर आणल्या. त्यानंतर शिर्डी व नाशिक ग्रामीण पोलिसांनीही फसवणुकीच्या गुन्ह्यांचा स्वतंत्र तपास सुरू केला. तपासादरम्यान अवतार पूजा, धार्मिक मार्गदर्शन आणि चमत्काराच्या नावाखाली लोकांकडून ५.६२ कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप समोर आला आहे. जगदंबा व समता पतसंस्थांमधील २०० कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. ईडीकडून खरातच्या निकटवर्तीयांचीही कसून चौकशी सुरू असून, या चौकशीतून नवनवीन आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेचे धागेदोरे समोर येत आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यभर या तपासाकडे लक्ष लागले आहे.

 बँक एक, खाती अनेक; सर्व खात्यांना वारसदार अशोक खरात

ईडीकडून आता खरातला पाहुणचार हरिभाऊ लाखे नाशिक – भल्याभल्यांची मती गुंग करुन त्यांची आर्थिक फसवणूक आणि शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करणारा नाशिक जिल्ह्यातील भोंदू अशोक खरातची आता ईडी चौकशी होणार आहे. अशोक खरातचा ताबा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) घेतला असून ईडीचे विशेष पथक त्याला नाशिकहून मुंबईकडे घेऊन गेले. अशोक खरातला पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले असता आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने कोठडीची मागणी केली होती, ईडी विरोधात कोणतीही तक्रार नसल्याचे अशोक खरातने कोर्टात सांगितले. ईडीकडून अनेक बाबी मांडण्यात आल्या. त्यात समता नागरी क्रेडिट सोसायटीमध्ये अशोक खरातने अनेकांच्या नावाने ६३ खाती उघडली, परंतु, त्या सर्व खात्यांना नंबर खरातचा जोडला होता. वारसदार म्हणून अशोक खरातचे नाव होते. सर्व खात्यांचा लाभार्थी देखील अशोक खरात होता. कोट्यवधी रुपये बँकांमध्ये रोख स्वरुपात भरण्यात आले. आणि तसेच ते काढलेही गेले. इतक्या खात्यांमध्ये एवढे पैसे कुठून आले आणि ते कुठे गेले, असा प्रश्न उपस्थित करुन या पैशांच्या शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत आम्हाला पोहोचायचे आहे. या प्रकरणात अजून कोणाचा सहभाग आहे, हा सर्व तपास करणे बाकी आहे. पैसे भरण्याची कोणतीही (डिपॉझिट स्लिप: पावती न भरता रोखपालाच्या (कॅशियर) मदतीने थेट रोकड खात्यांमध्ये जमा करण्यात आली. एका संस्थेचा तर खरातच अध्यक्ष होता, यादरम्यान ३४ बेनामी एफडी खाती उघडण्यात आली. रोख स्वरुपातच संबंधित खात्यांमधून पैसे काढले गेले. २०१४-२०२४ या कालावधीत हा सर्व उद्योग सुरु होता. एफडीचे पैसे अशोक खरातकडेच पुन्हा आल्याने तोच मुख्य आरोपी आहे, असा युक्तीवाद ईडीकडून करण्यात आला. खरात याच्या पत्नीच्या खात्यात आणि तिच्या नावाने देखील मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि मालमत्ता दाखविण्यात आली आहे. बँक अधिकाऱ्यांकडे चौकशी करणे बाकी आहे. आरोपींची चौकशी करणे गरजेचे असल्याचे ईडीने नमूद केले. ६० नावे वापरून बँक खाती उघडल्याचा आरोप आहे. सर्व खातेदारांनी खरातलाच कसे वारसदार केले, असा प्रश्न न्यायालयाने खरातच्या वकिलांना विचारला असता खरातच्या वकिलांनी, हा काही गुन्हा नाही. १० दिवसांच्या कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद केला.. खरातला त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांसंदर्भात विचारणा करण्यात आली. त्यावेळी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे राहत खरातने स्वतःची बाजू मांडली. बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापक यांनी मला काही पैसे आल्याचे सांगितले होते. आवारे यांनी पैसे बँकेत ठेवल्यास ९ टक्के व्याज मिळेल, असे सांगितले. याशिवाय मला कोणतीही माहिती नाही. फक्त व्याज चांगले मिळते म्हणून व्याजासाठी हे केले, असे खरातने सांगितले. खरातला २६ मेपर्यंत ईडी कोठडी अशोक खरातला २६ मेपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने १० दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने सहा दिवसांची कोठडी दिली. कोठडीत चौकशी दरम्यान खरातकडून ईडीला काही वेगळी माहिती मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत न्यायालय, पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडी अशा फेऱ्या मारणाऱ्या अशोक खरातला आता ईडीचाही पाहुणचार करावा लागणार आहे.

सावंतवाडी शहर,आसपासच्या गावांना बसला पाऊस-वादळाचा तडाखा…!

  सावंतवाडी(प्रतिनिधी)- सावंतवाडी शहर आणि आसपासच्या गावांना काल मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा बसला. वीजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या  पावसाने लोकांची झोप उडवून दिली. या भागात…

 शेतकऱ्यांवरील गुन्हा मागे घेण्याची मनसेची मागणी

 मुंब्रा पोलिस स्टेशनमध्ये दिले निवेदन दिवा- मनसे दिवा तर्फे शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्याची मागणी करत मुंब्र्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. मनसेचे साबे विभाग…

भारतीय जनता युवा मोर्चाच्या सरचिटणीसपदी रिकी रत्नाकर

  योगेश चांदेकर पालघरः भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा सरटिचणीसपदी रिकी रत्नाकर यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नंदन वर्तक यांनी ही निवड केली असून त्याबाबतचे…

टेंबा रुग्णालयात प्रताप सरनाईक यांची धाड, १.६५ कोटींच्या एक्स्पायरी औषधांचा घोटाळा उघड

गोरगरिबांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश; संबंधितांवर गुन्हे दाखल होणार मीरा-भाईंदर : प्रताप सरनाईक यांनी भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी (टेंबा) रुग्णालय येथे अचानक पाहणी करत आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर बोट ठेवले. या…

सावंतवाडी शहर, आसपासच्या गावांना बसला पाऊस – वादळाचा तडाखा…!

सावंतवाडी(प्रतिनिधी)- सावंतवाडी शहर आणि आसपासच्या गावांना काल मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा बसला. वीजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या  पावसाने लोकांची झोप उडवून दिली. या भागात…

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेसाठी रविवारी मतदान

 मतदारांना फोटो आयडी ओळखपत्र आवश्यक रत्नागिरी : (अशोक गायकवाड )—महाराष्ट्र वैद्यकीय परिषद मुंबईची निवडणूक रविवार २६ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वा. या वेळेत होणार आहे. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील शरीर रचना शास्त्र विभाग खोली क्र.१ आणि खोली क्र.२ अशी दोन मतदान केंद्रे आहे. मतदान केंद्रात मोबाईल, कॅमेरा, वायरलेस संच नेण्यास मनाई असून, मतदारांना ओळख पटविण्यासाठी खालील नमूद पुरविण्यापैकी कोणताही एक पुरावा मूळ प्रतीत फोटो आयडी प्रुफसह सादर करावा लागणार आहे, असे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी कळविले आहे. निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात ५५६ मतदार आहेत. ही निवडणूक एकूण ६० उमेदवार लढवित असून, त्यापैकी ९ उमेदवारांच्या मतपत्रिकेतील नावासमोरील चौकटीत X करुन ९ उमेदवारांना मत देण्याचे आहे. त्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शरीर रचना शास्त्र विभाग, तळमजला खोली क्र.१ आणि खोली क्र.२ अशी दोन मतदार केंद्र स्थापित करण्यात आली आहेत. १ ल्या केंद्रात १ ते २८०, २८१ ते ५५६ मतदारांसाठी दुसरे मतदान केंद्र स्थापित करण्यात आलेले आहे. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरामध्ये कर्तव्यार्थ नेमलेल्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींनी भ्रमणध्वनी, ताररहित फोन, वायरलेस संच, कॅमेरा इ. मतदान केंद्रात नेण्यास मनाई आहे. मतदारांना आपली ओळख पटविण्यासाठी पुढील पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा मूळ प्रतीत फोटो आयडी प्रुफसह सादर करावा लागणार आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून देण्यात आलेले नोंदणी प्रमाणपत्र या नोंदणी प्रमाणपत्रावर छायाचित्र नसल्यास ओळख पटविण्यासाठी अन्य छायाचित्र असलेले ओळखपत्र, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून देण्यात आलेले ओळखपत्र, भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा, लोकसभा निवडणुकीसाठी जी ओळखपत्रे ग्राह्य धरण्यास मान्यता दिलेली अशी छायाचित्रासह ओळखपत्रे खालीलप्रमाणे- मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक पोस्ट ऑफीसने जारी केलेले छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहनचालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल पॉपुलेशन रजिस्टर अंतर्गत स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र राज्य सरकार सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमीटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदारांना, आमदारांना जारी करण्यात आलेले ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र. मतदारांनी वरीलप्रमाणे नमूद दस्तऐवजापैकी एक दस्तऐवजाची मूळ प्रत मतदानाच्या वेळी मतदान केंद्राध्यक्षांना सादर करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या मतदारांनी जास्तीत जास्त मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जिंदल यांनी केले आहे. ०००००००००

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेविषयी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांचे आवाहन

अशोक गायकवाड रायगड अलिबाग :सन २०२४-२५ या वर्षापासून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना https://hmas.mahait.org, या पोर्टलवर ऑनलाईन करण्यात आली आहे. त्यानुसार सन २०२५-२६ या वर्षात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत ऑनलाईन सादर केलेल्या अर्जामधील काही अर्ज त्रुटी पुर्ततेकरीता परत पाठविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी अर्ज आपले लॉगिन आयडी तपासून त्यामध्ये दर्शविण्यांत आलेल्या त्रुटींची पूर्तता करुन येत्या ०७ दिवसांत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन फेर सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधव यांनी केले आहे.