Category: महाराष्ट्र

Maharashtra News

महिलांसाठी एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत, नावासमोर आईचे नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय, कौशल्य विकास, स्टार्टअप तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थदर्शन यांसारख्या विविध योजना राबविण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालून सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि आरामदायी व्हावा, या उद्देशाने मोफत बससेवेचा उपक्रम राबविण्यात आला आहे. गणेशभक्तांनी उत्साहात आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा करावा, अशा शुभेच्छा देत शिंदे यांनी उपक्रमासाठी आयोजकांचे आभार मानले. रण्याचा प्रयत्न आहे का, असा संतप्त सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. विभागप्रमुख संतोष ढमाले यांनी लोकमान्यनगरच्या विनाशावर विकासाची इमारत उभी करू देणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. नागरिकांच्या घरांवर बुलडोझर…

 प्रयोगशाळेतील संशोधन आता शेताच्या बांधावर उतरणार?

दापोलीत कृषी क्षेत्रातील दिग्गजांची ‘परीक्षा’ – ५४व्या संयुक्त कृषी संशोधन-विकास समिती बैठकीत शेतकरीकेंद्री संशोधनावर खल अशोक गायकवाड रत्नागिरी :  शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणींपासून संशोधन दूर राहिले, तर प्रयोगशाळांतील निष्कर्षांचा उपयोग काय? बदलते हवामान, पिकांवरील संकटे, उत्पादनखर्च आणि बाजारपेठेतील अनिश्चितता अशा कोंडीत शेतकरी सापडलेला असताना कृषी संशोधनाला थेट शेतकऱ्यांच्या बांधाशी जोडण्याचे आव्हान दापोलीतील बैठकीसमोर आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ५४ वी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक-२०२६ आयोजित करण्यात आली आहे. बुधवार, ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सर विश्वेश्वरैय्या सभागृहात उद्घाटन होणार आहे. कृषीमंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती दत्तात्रय भरणे अध्यक्षस्थानी असतील. मंत्री भरत गोगावले, उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, आशिष जयस्वाल आणि खासदार सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राज्यातील कृषी संशोधनाची सद्यस्थिती, त्याची उपयुक्तता आणि संशोधनाचे निष्कर्ष प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या यंत्रणेवर बैठकीत चर्चा होण्याची अपेक्षा आहे. कृषी आयुक्त सुरज मांढरे, विविध कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, कृषी सचिव परिमल सिंग आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक राहुल महिवाल यांचीही उपस्थिती राहणार आहे. चौकट बैठकीपुढचे खरे आव्हान संशोधन झाले, निष्कर्ष आले; पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? कृषी संशोधनाचा प्रत्यक्ष शेतीत वापर वाढवणे, शेतकऱ्यांच्या स्थानिक समस्यांवर उपाय शोधणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर ठोस दिशा मिळणे अपेक्षित आहे. यामध्ये तीन ठळक मुद्दे आहेत. शेतकरीकेंद्री संशोधनाला प्राधान्य देण्याचे आव्हान, बदलत्या हवामानाशी जुळणाऱ्या शेती तंत्रज्ञानावर भर, संशोधनाचा प्रयोगशाळेतून थेट शेताच्या बांधापर्यंत प्रवास. 0000

पिंपरी डीवायपीसीओइ आणि रावेत पीसीसीओईआर विजयी

 आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धा पिंपरी, पुणे : आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस मुले आणि मुलींच्या स्पर्धेचे आयोजन पीसीसीओईआर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत मुलांच्या गटात आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग या संघाने ताथवडे येथील इंदिरा कॉलेज संघाचा पराभव करत विजय मिळवला. मुलींच्या स्पर्धेत रावेत येथील पीसीसीओईआर संघाने आकुर्डी येथील पीसीसीओई संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती आणि रावेत येथील पीसीसीओईआर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.  तत्पूर्वी झालेल्या मुलांच्या उपांत्य सामन्यांमध्ये डॉ. डीवाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग संघाने राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय संघाचा व इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, ताथवडे संघाने पीसीसीओई संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. मुलींच्या स्पर्धेत रावेत येथील पीसीसीओईआर संघाने पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय संघ आणि पीसीसीओई, सासवड येथील पीडीइए कॉलेज ऑफ फार्मसी संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. मुलांच्या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील एकूण १८ विविध महाविद्यालयांचे संघ तसेच मुलींच्या स्पर्धेत एकूण ८ विविध महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले.स्पर्धेचे उद्घाटन पीसीसीओईआरचे संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सह सचिव डॉ. अक्षय काशीद, डॉ. गणेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीसीसीओईआरचे संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सहसचिव डॉ. गणेश चव्हाण, निवड समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल कमलापुरे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे आयोजन पीसीसीओईआरचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. मिलिंद थोरात यांनी केले. यशस्वी संघांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभिनंदन केले. स्पर्धेचा अंतिम निकाल :- मुले विजयी :- आकुर्डी डीवायपीसीओइ, उपविजयी :- ताथवडे आयसीसीएस, तृतीय :- निगडी पीसीसीओई,; मुली विजयी :- रावेत पीसीसीओईआर, उपविजयी आकुर्डी पीसीसीओई, तृतीय :- पिंपरी डीवायपीएसीएससी. 0000

शिक्षकांच्या जुन्या पेन्शनच्या लढ्याला डॉ. रविंद्र शेळकेंचा सकारात्मक सूर!

  काळ्याफिती लावून अलिबागेत मूक मोर्चा; उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) डॉ. रविंद्र शेळके यांनी शासनदरबारी व्यथा पोहोचविण्याचे दिले आश्वासन अशोक गायकवाड अलिबाग : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शिक्षक दिनीच काळ्याफिती बांधून शासनाचे लक्ष वेधले. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या वतीने शनिवारी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मूक मोर्चात शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. मोर्चानंतर उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) डॉ. रविंद्र शेळके यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारताना डॉ. रविंद्र शेळके यांनी आंदोलक शिक्षकांची भूमिका गांभीर्याने ऐकून घेतली आणि त्यांची व्यथा शासनाच्या संबंधित स्तरापर्यंत निश्चितपणे पोहोचविण्याचे आश्वासन दिले. शिक्षक दिनाच्या निमित्ताने उपस्थित शिक्षक बंधू-भगिनींना शुभेच्छा देतानाच, जुन्या पेन्शनच्या प्रश्नावर शिक्षकांना निश्चितच यश मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाच्या लढ्याला प्रशासनाकडून मिळालेला हा सकारात्मक प्रतिसाद महत्त्वाचा मानला जात आहे. ‘नैसर्गिक न्यायाने जुनी पेन्शन द्या’ १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेले विनाअनुदानित, अंशतः अनुदानित तसेच त्यानंतर १०० टक्के अनुदानावर आलेले कायम आस्थापनेवरील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, अशी प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी आंदोलकांनी ३१ ऑक्टोबर २००५, १९ जुलै २०११ आणि २ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयांचा आधार घेतला आहे. समान परिस्थितीतील कर्मचाऱ्यांना वेगवेगळी वागणूक देणे अन्यायकारक असून, नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वावर जुनी पेन्शन लागू झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका शिक्षकांनी मांडली. अनिल बडेकर, शिवाजी वाघमोडे, राजेंद्र बोरसे, सुनील निकुंभ, चंद्रकांत गावंड, सुधीर शिंदे आदींनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनीही आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला. दरम्यान, महिनाअखेरीस मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनाला रायगडमधून मोठे पाठबळ देण्याचा निर्धार करण्यात आला. डॉ. शेळके यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनामुळे आता शासन या मागणीबाबत कोणती भूमिका घेते, याकडे रायगडातील शिक्षक-कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 शासनाच्या बदलत्या धोरणांचा सर्वाधिक फटका शिक्षकांना – बाळासाहेब माने

दापोली-पारगाव येथे मराठी भाषा संवर्धन व विकास आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उलवे : “मराठी ही आपली मातृभाषा आणि संस्कारांची भाषा आहे. त्यामुळे आपल्या वैविध्यामुळे जगात मराठी माणूस चमकतोय. त्यामुळे तिचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी आपणा सर्वांचीच आहे. परीक्षेतील गुण महत्त्वाचेच, पण त्यापेक्षा समाजात आपली गुणवत्ता निर्माण करणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यासाठी कठोर मेहनत महत्त्वाची आहे. आजघडीला शासनाच्या बदलत्या धोरणांचा सर्वाधिक फटका शिक्षकांना बसतोय,” असे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे सचिव प्रा. बाळासाहेब माने म्हणाले. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, रायगड विभागाच्या वतीने मराठी विषयात विशेष गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व काव्य मैफल रविवारी रंगली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. हा कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेच्या अनंत पांडुरंग भोईर विद्यालय व रघुनाथशेठ जितेकर ज्युनिअर कॉलेज दापोली-पारगाव येथे झाला. या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर तसेच दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सातारा, शाखा वाशी, नवी मुंबईचे चेअरमन प्रा. किशोर पाटील, संघटनेचे राज्य सल्लागार तथा उपप्राचार्य प्रा. संजय पाटील, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या संजीवनी म्हात्रे उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती आणि मराठी भाषेचे महत्त्व पटवून देण्यात आले. वाचन संस्कृती जोपासण्याच्या हेतूने विद्यार्थ्यांना पुस्तकांची भेट आणि महासंघाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय महासंघ रायगडच्या जिल्हाध्यक्ष प्रा. रेखा कटके यांनी कार्यक्रमामागील उद्देश व महत्त्व विशद केले. यावेळी प्रा. किशोर पाटील यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन केले. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्याबरोबरच मातृभाषेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच नवीन शैक्षणिक धोरणात मराठी भाषेला असलेले महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी व समाजाने मातृभाषेच्या जतनासाठी योगदान द्यावे, असे सांगितले. प्रा. संजय पाटील यांनी दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधताना मराठी भाषेचा आग्रह धरला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. संजीवनी म्हात्रे यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध साहित्यिक उपक्रम व मराठी भाषा संमेलने आयोजित करण्याची गरज व्यक्त केली. यावेळी ज्येठ पत्रकार कृष्णा पाटील यांनीही मराठी भाषा, संस्कृती आणि आर्थिक साक्षरता यावर आपले विचार मांडले.  महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या माध्यमातून मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे आयोजक प्रा. रेखा कटके यांनी नमूद केले. यावेळी श्रीवर्धन येथील कार्याध्यक्ष प्रवीण कुमार पाटील, महाडवरून प्राची हाटे, प्रा. गव्हाण, प्रा. धनंजय भोसले, प्रा. शिरसाठ, प्रा. पठाण, प्रा. वडितके, एस. एस. खिराडे व इतर अनेक शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शेळके कीर्तीदा यांनी केले, तर महासंघ जिल्हा सचिव प्राची हाटे यांनी आभार मानले. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि काव्य मैफलीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

 सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डॉ. अपूर्वा बासूर रुजू

 जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून स्वागत सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांनी पदभार स्वीकारला आहे. जिल्हा परिषद मुख्यालयात त्यांनी प्रशासकीय कामकाजाची सूत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यात त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले. तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील खातेप्रमुखांनी तसेच कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. डॉ. अपूर्वा बासूर या २०२२ च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या आयएएस अधिकारी असून, प्रशासकीय सेवेत आल्यानंतर त्यांनी वाशिम येथे अतिरिक्त सहाय्यक जिल्हाधिकारी, चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथे सहाय्यक जिल्हाधिकारी, पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे उपविभागीय अधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून उल्लेखनीय काम केले.

योगासन स्पर्धेत एसआयए, एसएसटीचा दबदबा!

– मुलींच्या वैयक्तिक गटात एसआयएचे क्लीन स्वीप भानुदास गायकवाड डोंबिवली : मुंबई विद्यापीठाच्या ठाणे विभागीय क्रीडा समितीच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रगती महाविद्यालय, डोंबिवली (पूर्व) यांच्या आयोजनाखाली आंतरमहाविद्यालयीन योगासना स्पर्धा प्रगती…

दिवा प्रभागातील विकासकामांची आयुक्त सौरभ राव यांच्याकडून पाहणी,

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिवा : दिवा प्रभाग समिती हद्दीतील विविध विकासकामांची ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून कामांचा सविस्तर आढावा घेतला.…

 सिंधुदुर्गातील सर्व १,५३९ अंगणवाड्यांमध्ये पाणी-शौचालय सुविधा १०० टक्के!

आठही तालुक्यातील आंगणवाड्यांची स्थिती समाधानकारक राजन चव्हाण सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणवाडी केंद्रामध्ये मूलभूत सुविधांच्या बाबतीत समाधानकारक चित्र समोर आले आहे. महिला व बाल विकास विभागाने अलिकडेच केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील सर्व १,५३९ कार्यान्वित अंगणवाडी केंद्रांमध्ये शौचालय तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. दोन्ही सुविधांचे प्रमाण तब्बल १०० टक्के आहे. जिल्ह्यात एकूण १,५३९  आंगणवाड्या मंजूर असून त्यापैकी सर्व १,५३९ अंगणवाड्या कार्यान्वित आहेत. या सर्व केंद्रांमध्ये शौचालयाची सुविधा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे सर्व अंगणवाड्यांमध्ये पिण्याचे पाणीही उपलब्ध असल्याचे या अहवालात  नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शौचालय किंवा पाण्याची सुविधा नसलेली एकही  आंगणवाडी जिल्ह्यात नाही ही जिल्ह्याच्या दृष्टीने आभिमानास्पद आणि कौतुकाची बाब आहे असे म्हणावे लागेल. तालुकानिहाय विचार करता सावंतवाडी २४७, कणकवली २४४, मालवण २२८, वैभववाडी १४७, कुडाळ २६८, वेंगुर्ला ९७, देवगड २०७ आणि दोडामार्ग १०१  आंगणवाडी केंद्रे आहेत. या आठही तालुक्यांतील प्रत्येक  आंगणवाडीमध्ये शौचालय व पिण्याच्या पाण्याची सुविधा १०० टक्के उपलब्ध असल्याचे सर्व्हेक्षणात आढळून आले आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती अनुराधा नारकर  यांनी अलिकडेच दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील आंगणवाड्यांना भेटी दिल्या असून  पोषण आहाराची तपासणी तसेच  तेथील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह आदी व्यवस्थेची पाहणी करण्यात येत आहे. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, महिला बालकल्याण अधिकारी प्रतीक उगारे हेही  अंगणवाड्यांना भेटी देऊन एकूण व्यवस्थेची पाहणी करत आहेत. तालुकानिहाय आकडेवारीत कुडाळ तालुका २६८ अंगणवाड्यांसह प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर सावंतवाडी (२४७), कणकवली (२४४), मालवण (२२८), देवगड (२०७), दोडामार्ग (१०१), वेंगुर्ला (९७) आणि वैभववाडी (१४७) अशी संख्या आहे. आंगणड्यांमध्ये येणाऱ्या बालकांसाठी आरोग्य, पोषण आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाबरोबरच स्वच्छता व सुरक्षित पिण्याचे पाणी या मूलभूत सुविधा महत्त्वाच्या आहेत. या दोन्ही सुविधांबाबत जिल्ह्याची आकडेवारी शंभर टक्के असल्याने सिंधुदुर्गच्या अंगणवाडी व्यवस्थेतील ही सकारात्मक बाब ठरली आहे. सिंधुदुर्गातील १,५३९ अंगणवाड्यात १०,७७२ बालके असून ६३ अंगणवाड्यांची पटसंख्या शून्य आहे. ६८१  आंगणवाड्यांमध्ये  पाचपेक्षा कमी मुले आहेत. जिल्ह्यातील आंगणवाड्यांच्या पटसंख्येची स्थिती पाहता अनेक  आंगणवाड्यांमध्ये अत्यल्प मुले  असल्याचे स्पष्ट झाले आहे. तब्बल ६३  आंगणवाड्यांमध्ये एकही मूल  नाही, तर ६८१  आंगणवाड्यांमध्ये केवळ १ ते ५ मुले आहेत. जिल्ह्यात ४०१ आंगणवाड्यांची पटसंख्या ६ ते ९, तर ३३५  आंगणवाड्यांची पटसंख्या १० ते २० आहे. २० पेक्षा अधिक लाभार्थी असलेल्या ५१, तर ३० पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या आठ अंगणवाड्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी अत्यल्प पटसंख्या, तर काही  आंगणवाड्यांमध्ये तुलनेने अधिक पटसंख्या असे चित्र दिसून येते. तालुकानिहाय विचार करता कुडाळमध्ये सर्वाधिक २६८ आंगणवाड्या असून तेथे २,१७८ मुले आहेत. सावंतवाडी तालुक्यात  २४७  आंगणवाड्या व १,८१८ मुले, कणकवलीत २४४  आंगणवाड्या व १,९०९ मुले , तर देवगडमध्ये २०७  आंगणवाड्या व १,५२० मुले  आहेत. मालवणमध्ये २२८  आंगणवाड्या असून ९९७ मुले आहेत. चौकट आंगणवाडीत ‘हिरकणी’ कक्ष सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयाजवळ असलेल्या ओरोस  देऊळवाडा इथल्या  आंगणवाडीत तर गर्भवती मातांसाठी ‘हिरकणी ‘कक्ष आहे.या कक्षाला बरीच वर्ष झाली असून असा कक्ष असलेली ही जिह्यातील पहिलीच  आंगणवाडी. ००००

 द्वारका येथील अतिक्रमित जागा महापालिका ताब्यात घेणार

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ६० दुकानदारांना नोटिसा हरिभाऊ लाखे नाशिक : द्वारका चौकातील महापालिकेच्या मालकीच्या चार एकर जागेवरील अतिक्रमणे हटविण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. संबंधित जागेचा ताबा सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने कायम ठेवत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जागा रिकामी करण्याचे निर्देश दिल्यानंतर अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाईला वेग दिला आहे. त्यानुसार नाशिक पूर्व विभागाने ६० दुकानदारांना जागा रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. द्वारका चौकातील सर्व्हे क्रमांक ४८९ मधील फायनल प्लॉट क्रमांक २८२ ही सुमारे चार एकर जागा महापालिकेच्या मालकीची आहे. नाशिक नगरपालिका अस्तित्वात असताना १९७३ पासून ही जागा भाडेतत्त्वावर दुकानदारांना दिली होती. सद्यःस्थितीत या जागेवर १०९ दुकानदार व्यवसाय करीत आहेत. रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरत असल्यामुळे महापालिकेने २०१५ मध्ये संबंधित दुकानदारांना नोटिसा बजाविल्या होत्या. त्यानंतर दि. २९ फेब्रुवारी २०२० रोजी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपायुक्तांनी संबंधित दुकाने अनधिकृत ठरवित १५ दिवसांमध्ये जागा रिकामी करण्याचे महानगरपालिका आदेश दिले होते. या कारवाईविरोधात दुकानदारांनी न्यायालयात धाव घेतली. जिल्हा न्यायालयाने दि. ५ जानेवारी २०२३ रोजी महापालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ४० दुकानदारांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. महापालिकेने अतिक्रमण हटविताना आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने दुकानदारांच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशान्वये दाखल या अपिलात महापालिकेची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. तुषार मेहता यांनी मांडली. सर्वोच्च न्यायालयाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित जागा रिकामी करण्याचे निर्देश दिल्यामुळे महापालिकेने त्यानुसार नोटिसांची कार्यवाही सुरू केली आहे. द्वारका सर्कल परिसरात मोठी लोकवस्ती, व्यावसायिक आस्थापना आणि सातत्याने मोठी वाहतूक असते. या परिसरात बँका, रुग्णालये, शाळा, व्यावसायिक संकुले आणि हॉटेल्स आहेत. नाशिक – पुणे मार्ग तसेच मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा चौक असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघातांची समस्या निर्माण होत असल्याचे नोटिसांमध्ये नमूद केले आहे. दुकानदारांना थेट जागा रिकामी करण्याचे निर्देश देतानाच त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे. २१ ते २३ सप्टेंबर २०२६ दरम्यान सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित दुकानदारांचे म्हणणे ऐकून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे. द्वारका सर्कल परिसरात मोठी लोकवस्ती, व्यावसायिक आस्थापना आणि सातत्याने मोठी वाहतूक असते. या परिसरात बँका, रुग्णालये, शाळा, व्यावसायिक संकुले आणि हॉटेल्स आहेत. नाशिक – पुणे मार्ग तसेच मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा चौक असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघातांची समस्या निर्माण होत असल्याचे नोटिसांमध्ये नमूद केले आहे ००००