Category: महाराष्ट्र

Maharashtra News

कोकणातील आंबा-काजू शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर

कोकणातील आंबा-काजू शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा 0 विमा असलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी ४२ हजार रुपये ०  विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी २२ हजार रुपये मिळणार ० हवामान बदलामुळे कोकणात झाले होते मोठे नुकसान  ० सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री…

हर्षवर्धन सदगीरला शरद पवारांकडून १२ लाखांची शिष्यवृत्ती

हर्षवर्धन सदगीरला शरद पवारांकडून १२ लाखांची शिष्यवृत्ती काका पवार यांच्‍या तालमीला ५० लाखांचे आर्थिक सहाय्य पुणेः खासदार व कुस्ती श्रेत्राचे आश्रयदाते  शरद पवार साहेब यांनी  डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला १२ लाख रूपयांची शिष्यवृत्ती तर काका पवार यांच्‍या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल,पुणे या संकुलसाठी ५० लाख रुपयेंचे बक्षिस दिले आहे. मुंबईत हर्षवर्धन सदगीरसह अर्जून पुरस्‍कार विजेते काका पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली.  यावेळी उद्योजक श्री मोहसीन बागवान, कुस्ती प्रशिक्षक शिवाजी कोळी सर महाराष्ट्र चॅम्पियन पृथ्वीराज पाटील आदी मान्‍यवर उपस्‍थित होते. हर्षवर्धन सदगीर यांचे कौतुक करीत ऑलिम्‍पिकपटू होण्यासाठी पुढील २ वर्षांसाठी महिना ५० हजार प्रमाणे १२ लाखांचे शिष्यवृत्ती धनादेश दिला आहे. काका पवार यांच्‍या तालमीतील हर्षवर्धनसह ११ मल्‍लांनी पदकाची लयलुट केल्‍याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलला ५० लाख रूपयांचे शरद पवार यांनी आर्थिक सहाय्य दिले आहे. शरद पवार यांचे आभार र्‍व्यक्‍त करीत काका पवार म्‍हणाले की, पवार हे खेळाडूंसाठी तारणहार व आधार आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे आम्ही सर्व पहिलवान व खेळाडू कायम ऋणी आहोत. पवार यांनी केवळ घोषणाच केली नाही तर धनादेश देऊन वेळीच विजेत्‍यांचे व प्रशिक्षण केंद्राचे कौतुक केले आहे. क्रिकेटनंतर इतक्‍या वेगाने पवार हेच कुस्‍तीगीरांसाठी अनेकदा धावून आले आहेत. हर्षवर्धन सदगीर यांनी सांगितले की, गुरूवर्य काका पवार यांच्‍या सल्‍ल्‍यानंतर मी पुन्‍हा महाराष्ट्र केसरीच्‍या मैदानात उतरणार आहे. परंतु ऑलिम्‍पिक खेळण्याचे माझे ध्येय आहे. त्‍यासाठी शरद पवार यांची मदत प्रोत्‍साहन देणारी ठरली आहे. चौकट शासनाकडून नोकरीचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही काक पवार व हर्षवर्धन सदगीर यांनी भेट घेतली. त्‍यावेळी येत्‍या अधिवेशनात नाशिक महानगरपालिकेत नोकरी देण्याचे आश्चासन एकनाथ शिंदे यांनी दिली असल्‍याचे काका पवार यांनी सांगितले आहे.

नाशिकमध्ये बिबट्यांच्या रेस्क्यूसाठी मिळणार ११ नवीन वाहने

नाशिकमध्ये बिबट्यांच्या रेस्क्यूसाठी मिळणार ११ नवीन वाहने मानव-वन्यजीव संघर्ष थांबवण्यासाठी प्रशासनाचे मोठे पाऊल! हरिभाऊ लाखे नाशिक: जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या हालचाली व मानव-वन्यजीव संघर्ष लक्षात घेऊन जिल्हा नियोजन समितीमार्फत दरवर्षी काही निधी मंजूर केला जातो. यावर्षी १७ कोटींचा निधी वनविभागाला देण्यात आला आहे. त्यातून विविध उपाययोजना करून बिबट्यांवर नियंत्रणासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या बिबट्यांनी जिल्ह्यात हैदोस घातला आहे. त्यातून वन्यजीव व मानव संघर्ष वाढत आहेत. नागरिकांमध्ये याविषयी भीतीचे वातावरण आहे. वन विभागातर्फे त्याबाबत नियोजन केले जात आहे. मात्र पुरेशी यंत्रणेसाठी निधीची आवश्यकता होती. जिल्हा नियोजनमधून या पूर्वी केवळ एक कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र बिबट्याचे वाढते प्रमाण व त्याचा रेस्क्यूसाठीची यंत्रणा, साहित्य यासाठी ती रक्कम अत्यल्प होती. त्यामुळे वनविभागाने पुन्हा जिल्हा नियोजन विभागाकडे प्रस्ताव पाठवून निधीची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर करून पुन्हा नव्याने १७ कोटी रुपये देण्यात आले आहेत. सध्या म्हसरूळ येथे बिबट्यांचा निवारा आहे. वनविभाग रेस्क्यू नंतर त्या ठिकाणी ठेवतात. मात्र सध्या वाढत्या बिबट्यांची संख्या लक्षात घेता ती पुरेशी नाही. त्यामुळे वनविभागाने जिल्हा नियोजन विभागाकडे निधीची मागणी केली होती. त्यातून वनविभाग बिबट्याचा निवारा वाढविणार आहे. त्यामुळे नियोजन विभागाने १७ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.   १७ कोटी रुपये वनविभागाला बिबट्या नियंत्रणासाठी दिले आहेत. तसेच ११ वाहने उपलब्ध करून दिले आहेत. त्यातून बिबट्यांचे रेस्क्यू व त्यांचे व्यवस्थापनावर खर्च करण्याचे नियोजन आहे. – आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी

धर्मांतरितांना मागासवर्गीय दर्जा मिळणार नाही – सुप्रीम कोर्ट

धर्मांतरितांना मागासवर्गीय दर्जा मिळणार नाही – सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली : “हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्मात धर्मांतर करणारी व्यक्ती अनुसूचित जाती दर्जासाठी पात्र ठरू शकत नाही”, असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च…

भयंकर : भोंदूबाबा खरातने ५ नरबळी दिल्याचा संशय

भयंकर : भोंदूबाबा खरातने ५ नरबळी दिल्याचा संशय खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी   रुपाली चाकणकरांचीही चौकशी होणार ० हरिभाऊ लाखे नाशिक : भोंदूबाबा अशोक खरातच्या रोज नवनवीन भानगडी उघडकीस येत आहेत. सिद्धी प्राप्त करण्यासाठी या…

नाशिक कोर्टाच्या आवारात गोंधळ! तृप्ती देसाई भोंदू बाबाच्या अंगावर धावल्या

हरिभाऊ लाखे नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण पोलिसांनी स्थानिक पातळीवर दाबण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नेत्यांनी आणि पोलिसांनी पीडितांना न्याय मिळेल अशी कृती करणे अपेक्षित असताना प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न झाला,…

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ जिल्हा कृती दलाची बैठक

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ जिल्हा कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे मार्गदर्शन रत्नागिरी : (अशोक गायकवाड )—पथनाट्ये, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, मॅरेथॉन यासारख्या विविध स्पर्धा आयोजित करुन ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाची प्रचार प्रसिध्दी मोठ्या प्रमाणात करावी. १० वी, १२ वी मुलींसाठी कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन मेळावा आयोजित करुन एमपीएससी, युपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा कृती दलाची बैठक आज घेण्यात आली. बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मल्लीनाथ कांबळे, परिविक्षा अधिकारी अनिल माळी आदी उपस्थित होते. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. मुलांप्रमाणे मुलींनाही समान दर्जा प्राप्त करुन देणे, स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाण समान करणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, स्त्री भ्रूण हत्या रोखणे, मुलींना संरक्षण पुरविणे, बालिकेच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे, मुलीच्या जन्माबाबत सकारात्मक विचार निर्माण करणे, शिक्षणासाठी मुलींना अधिकाधिक प्रोत्साहित करणे, बालिकेच्या शिक्षणाबाबत खात्री देणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत. पोलीस पाटील, सरपंच, निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांचे पीसीपीएनडीटी, पोक्सो, आरटीई बालविवाह या विषयांवर प्रबोधन करावे, असे सांगून जिल्हाधिकारी जिंदल यांनी योजनेच्या प्रचार प्रसिध्दीसाठी विविध उपक्रम आयोजित करण्याबाबत सांगितले. यावेळी बेटी बचाओ बेटी पढाओ कृती आराखडा २०२५-२६ ला मान्यता देण्यात आली.

‘१९४७ चा भारत आणि आजची कृषी शाश्वतता’ या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय परिषद संपन्न

‘१९४७ चा भारत आणि आजची कृषी शाश्वतता’ या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय परिषद संपन्न अनिल ठाणेकर सांगली, स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्था संचलित, बाबा नाईक महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभाग आणि आय.क्यू.ए.सी. (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने “१९४७ चा भारत आणि आजची कृषी शाश्वतता” या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय परिषद उत्साहात पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. भगतसिंग नाईक यांच्या हस्ते झाले. बीजभाषक म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रो. डॉ. एम. एस. देशमुख यांनी भारताच्या ७९ वर्षांच्या कृषी प्रवासाचा आढावा घेतला. परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्वला पाटील होत्या. या सत्राचे आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रो. डॉ. विनोद राठोड यांनी केले. प्रथम सत्र: कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय ठिगळे यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि कृषी विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. या सत्राचे अध्यक्षपद डॉ. जयवंत इंगळे यांनी भूषवले. या सत्राचे आभार प्रो.डॉ.के.आर.गावडे यांनी मानले.द्वितीय सत्र: पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथील डॉ. कुलविंदर सिंग यांनी १९४७ मधील कृषी स्थिती आणि आजची शाश्वतता यातील आव्हानांवर सविस्तर प्रकाश टाकला. या सत्राचे अध्यक्ष डॉ. मनोहर कोरे होते.या परिषदेसाठी तांत्रिक सहाय्य आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रो. डॉ. अनिल काटे आणि प्रा.डॉ. संदीप देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. एस. डी. शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. निलेश कांबळे यांनी मानले. या ऑनलाईन परिषदेत देशातील विविध भागांतून प्राध्यापक आणि संशोधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भोंदू खरातचा हायटेक बनाव!

भोंदू खरातचा हायटेक बनाव! 20 फुटी ‘ड्रोन’ नागाचा चमत्कार दाखवून करायचा वशीकरण हरिभाऊ लाखे नाशिक :भाविकांची फसवणूक करण्यासाठी अशोक खरात वेगवेगळे फंडे वापरायचा. त्यातील त्याचा २० फुटी नागाचा फंडा सध्या जोरदार चर्चिला जात आहे. त्याच्या या अजब प्रकाराला पोलिसांनी दुजोरा दिला असून, यातून त्याने अनेकांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. आतापर्यंत खरात हा व्हायग्रा गोळ्यामिश्रित पाणी, ज्यास तो ‘ओस्नो जल’ असे संबोधायचा. तसेच रत्न खडे देऊन भाविकांची आर्थिक लूट करीत असल्याच्या बाबी समोर आल्या आहेत. आता २० फुटी नागाचा हा प्रकार तो भाविकांचे वशीकरण करण्यासाठी करीत होता. हा प्रकार त्याच्या मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थान येथे दररोज सायंकाळच्या सुमारास चालयचा. अंधार पडायला लागला की, तो भाविकांना एका ठिकाणी बोलवायचा. त्या ठिकाणी तंत्र-मंत्र करीत, २० फुटांचा नाग स्वतःकडे बोलवायचा. नागदेखील सरपटत त्याच्यासमोर येऊन फणा काढून उभा राहायचा. हा नाग बघून उपस्थित भाविकांची बोलतीच बंद व्हायची. खरात सांगेल, त्या पद्धतीने नाग हालचाली करायचा. त्यानंतर खरातच्या आदेशावरून साप निघून जायचा. हा सर्व प्रकार झाल्यानंतर खरात उपस्थितांना मी नागाला वश केल्याची बतावणी करायचा. खरातचा हा चमत्कार बघून अनेक जण अचंबित व्हायचे. खरातचा हा प्रकार बघून अनेक जण प्रभावित व्हायचे. तो सांगेल त्या पद्धतीने लोक वागायचे. पुढे त्याला बळीही पडायचे. मात्र, प्रत्यक्षात हा संपूर्ण प्रकार वेगळाच होता. हा साप खोटा होता. त्याने कागदाच्या लगद्यापासून हा साप तयार केला होता. त्यात ड्रोन यंत्रणा बसवली होती. त्याचे रिमोट तो स्वतःकडे ठेवायचा. रिमोटच्या साहाय्याने तो त्या खोट्या सापाला त्याच्या इशाऱ्यावर फिरवायचा. ही बाब पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. अल्पवयीन पीडितेची आपबिती खरातने अल्पवयीन मुलीवर देखीलदुष्कर्म केले. या मुलीने पुढे येत आपबिती सांगितली आहे. खरातने केबिनमध्ये बोलावून घेतले. मी येताच, त्याने केबिनचा लॅच बंद करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने तांब्याच्या भांड्यात पाणी मला पिण्यास दिले. त्या पाण्याची चव खूपच खारट आणि कडवट होती. पाणी प्यायल्यानंतर मला मळमळ व्हायला लागली. मी पाणी पिण्यास नकार दिला. मात्र, खरातने मला म्हटले की, तू जेवढे जास्त पाणी पिणार, तेवढे जास्त तुला फळ मिळणार. नंतर पाणी भरलेला ग्लास त्याने माझ्या डोक्यावर ठेवून उभे राहण्यास सांगितले. तसेच गायत्री मंत्र म्हणण्यास सांगितले. मात्र, ते म्हणत असताना माझे डोके जड व्हायला लागले. तेवढ्यात खरातने त्या रूममधील लाइट बंद केली. त्यावेळी ‘मी कृष्णाचा अवतार आहे, तू माझी राधा आहेस’ असे सारखे कानाजवळ पुटपुटत त्याने जबरदस्ती केली आणि माझ्यावर बलात्कार केला. खरातला गावबंदीचा ठराव खरातच्या दर्शनाला मिरगावात अनेक नेते मंडळी येत होती. अगदी कलेक्टरपासून बडी अधिकारी मंडळी येथे बाबाच्या सेवेला हजर असायची. मिरगावातील अनेक ग्रामस्थांना खरातने दहशतीखाली ठेवले होते. सुरुवातीला ईशान्येश्वर महादेवाच्या मंदिर संस्थानात गावातील मंडळी पूजेसाठी दर सोमवारी आणि महाशिवरात्रीला जमायची. नंतर खरातचे कारनामे कळाल्यानंतर या लोकांनी तेथे जाणे बंद केले. गावातील अनेक तरुणांवर खोटे आरोप करून त्यांना अटक करायलादेखील भाग पाडण्यात खरातचा हात होता असे मिरगावचे रहिवासी सांगत आहेत. आता या ईशान्येश्वर मंदिर संस्थानाचे मंडळ बरखास्त करून ते गावाच्या ताब्यात द्यावे अशी मागणी गावकरी करीत आहेत. तसेच वर्षानुवर्षे खरातच्या दहशतीखाली दबलेले गावकरी आता निर्भयपणे पुढे येत आहेत. मिरगावात मंदिर बांधल्यानंतर खरातने एका शेतकऱ्याची वहिवाट बंद केली होती. त्यामुळे त्याला राहते घर सोडून गेल्या आठ महिन्यांपासून पत्र्याच्या खोलीत राहावे लागत असल्याचे गावकरी सांगत आहेत. त्यामुळे अशा विकृत वृत्तीच्या व्यक्तीला पुन्हा गावात स्थान द्यायचे नाही, असा निर्धार करीत गावकरी खरातविरोधात गावबंदीचा ठराव आणणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. जाधवकडे ४० महिलांचे मोबाइल नंबर खरातचा ऑफिसबॉय नीरज जाधवकडे तब्बल ४० महिलांचे मोबाइल नंबर असल्याची बाब पोलिस तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी नीरजचा मोबाइल ताब्यात घेतला असून, तो यातील किती महिलांच्या संपर्कात होता, याचा तपास केला जात आहे. तसेच नीरजकडे मिळालेले हे नंबर खरातला बळी पडलेल्या महिलांचे तर नाहीत ना? यादृष्टीनेदेखील तपास केला जात आहे.

विदर्भाचे ज्येष्ठ नेते  दत्ता मेघे यांचे निधन

  नागपूर : विदर्भातील ज्येष्ठ नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक दत्ता राघोबाजी मेघे यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. सुमारे चार दशकांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय राहून…