Category: महाराष्ट्र

Maharashtra News

माथेरान कुशीतील आदिवासी वाडी हाशाची पट्टी रस्ता मंजूर

  माथेरान : माथेरानच्या पनवेल बाजूस असलेली आदिवासी वाडी हाशाची पट्टी करिता धोधानी येथून कायमस्वरूपी रस्ता बनवला जावा याकरता वनविभागाने हिरवा कंदील दिला असून लवकरच ही वाडी डांबरी रस्त्यामार्फत विकासाच्या…

आजपासून अहमदनगर नव्हे, आता अहिल्यानगर

अहमदनगर : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वीच केंद्रातील मोदी सरकारने अहमदनगरच्या नामांतराला केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली होती. त्यामुळे, केंद्रातील मंजुरीनंतर आता अहमदनगर शहराचे अहिल्यानंतर नामांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून राजपत्रित आदेशही जारी झाला आहे. मात्र, केंद्र…

महापालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहीर

भाईंदर, ता. ९ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या वर्ग एक ते चारच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना, त्याचप्रमाणे मनधनावरील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी एवढेच सानुग्रह अनुदान…

पीवायसीतर्फे राज्यभरातील खेळाडूंसाठी 19 वर्षाखालील मुलांसाठी क्रिकेट निवड चाचणी

 निवड झालेल्या खेळाडूंना वर्षभर मोफत प्रशिक्षण देणार पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने राज्यभरातील खेळाडूंसाठी पीवायसी क्रिकेट अकादमीची येत्या 15 व 16 ऑक्टोबर रोजी 19 वर्षाखालील मुलांसाठी क्रिकेटची निवड…

माथेरानमध्ये पक्ष वाढीसाठी चंद्रकांत चौधरी यांनी कंबर कसली

माथेरान : आगामी विधानसभा निवडणूका त्याचप्रमाणे पुढील काळात नगरपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी आतापासूनच पक्षाची बांधणी करण्यास सुरुवात…

जंजिरा किल्‍ला पर्यटकांसाठी खुला

मुरूड ः पावसाळ्यात खवळलेला समुद्र, वादळी वाऱ्यासह येणाऱ्या उंच लाटांमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी जंजिरा किल्‍ला पर्यटकांसाठी बंद ठेवला जातो. वाढलेले गवत, झाडे, वेली, कचरा उचलून परिसर स्‍वच्छ करण्यात…

कळसुबाईच्या शिखरावर ‘तरुणा’ची सायकलवारी!

Photo-1    सव्वा वर्षात १५ हजार किलोमीटरचा सायकल प्रवास  सायकलिंग मधील हाफ एवरेस्टींग पूर्ण योगेश चांदेकर पालघरः ‘तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच भरत राहो!  वार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहो!’ सुरेश भट यांच्या कवितेच्या या ओळी. तरुण म्हणजे किती वयाचा असे विचारले जात असले, तरी तारुण्य हे वयावर नाही, तर मनावर अवलंबून असते, हे अनेकांनी आपल्या कृतीतून वारंवार दाखवून दिले आहे. पालघर तालुक्यातील बोईसर येथील रामदास तातोबा जाधव या ५२ वर्षाच्या ‘युवका’ने चप्पल न घालता सायकलवर महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर गाठून एक नवा पराक्रम नोंदवला आहे. सव्वा वर्षात त्यांनी पंधरा हजार किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण केला असून सायकलिंग मधील हाफ एवरेस्टींग पूर्ण केले आहे. तरुणपण आणि वार्धक्य हे शारीरिकदृष्ट्या वेगवेगळे असले, तरी ते जसे शरीराशी संबंधित आहे, तसे ते मनाशी संबंधित आहे. सजीवसृष्टीतील प्रत्येक वनस्पती आणि प्राण्यांच्या आयुष्यात फुलण्याचे दिवस अगदी थोडेच असतात. वनस्पतींना कळ्या येऊन फुले येऊ लागली, की त्यांच्या आयुष्यातल्या भरणीचे दिवस सुरू होतात. मानवाच्या आयुष्यातले तारुण्याचे दिवस म्हणजे आयुष्यरुपी वृक्षाला सुंदर फुलांनी मोहरलेला बहर असतो. फुललेले रोपटे असो किंवा एखादा वृक्ष; तो जसा आजूबाजूचे परिसरातल्या इतर सजीवांना आकर्षित करतो, तसेच तारुण्यातली सतेज कांती, प्रफुल्ल चेहरा चालण्या- बोलण्यातला रुबाबदारपणा असे तरुण व्यक्तीचे व्यक्तिमत्व सर्वांना भुरळ पाडत असते. अवघ्या ५२ मध्येही यौवनात मी! फुले जशी लवकर कोमेजतात तसेच तारुण्याचे दिवस झर्रकन निघून जातात. फुलासारखे तारुण्यही कोमेजू लागते, हा निसर्ग नियम असला, तरी माणसाच्या बाबतीत मात्र शरीर तारुण्य आणि मन याचा परस्परांशी अन्योन्य संबंध आहे. मनुष्याला आपल्या आयुष्याकडे सकारात्मकतेने पुढे बघण्याची, विचार करण्याची बुद्धी आहे; मात्र बहुतेक माणसांची विचार करण्याची बुद्धी नकारात्मक होते. आता माझे वय झाले. तारुण्य संपले असे रडगाणे अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात गात असतात. वयोमानानुसार शरीर थकलेले असले, तरी विचार करण्याची बुद्धी नकारात्मक असेल, तर मात्र खऱ्या अर्थाने माणूस वृद्ध होतो. रामदास जाधव मात्र त्याला अपवाद आहेत. छंद हा लागे जिवा, सायकलचा ठेवा! आयुष्यात सकारात्मक विचार असले, तर आपले मन चिरतरुण ठेवता येते. त्यामुळे विचारपुष्प कधीच थांबत नाही. त्याचा सुगंध वर्षानुवर्षे दरवळत राहतो. शरीराने वयस्कर असले आणि विचार आणि मनाने तरुण असणारे वृद्ध हे आयुष्याचा खऱ्या अर्थाने आनंद घेतात आणि त्यांचे विचार तारुण्यातील सगळ्यांना आकर्षित करतात. अशी माणसे सर्वांना हवीहवीशी असतात आणि ते इतरांना आपल्या जगण्यातून नवी दिशा देत असतात. इतरांच्या आयुष्यात नवनवीन पालवी फुटायला मदत करत असतात. जाधव हे असेच व्यक्तिमत्व आहे. कुणाला गिर्यारोहणाचा, कुणाला मोटरसायकलवर भटकण्याचा, कुणाला चित्रे जमवण्याचा, कुणाला सह्या गोळा करण्याचा तर कुणाला अन्य काहीही छंद असतो. रामदास जाधव यांनाही असाच एक छंद आहे; परंतु तो आगळा वेगळा आहे. अडचणी तुला पामराला! लोक पायी डोंगरकपाऱ्या पार करत असतात; परंतु जाधव मात्र सायकलवरून मोठमोठी शिखरे गाठत असतात. कोरोनाच्या काळात डहाणू आणि पालघर तालुक्यातील हौशी सायकलस्वारांनी एकत्र येऊन ‘बोईसर फ्लायर्स ग्रुप’ची स्थापना केली. रामदास जाधव या ग्रुपचे सदस्य असून गेल्या सव्वा वर्षात त्यांनी सायकल मोहिमात भाग घेतला. सव्वा वर्षात त्यांनी पंधरा हजार किलोमीटरचा सायकल प्रवास केला आहे. सायकलवरील प्रेमापोटीच त्यांनी कळसुबाई शिखरावर सायकलने पोहोचण्याचा निर्धार केला. केवळ निर्धार करून ते स्वस्थ बसले नाहीत, तर १६४६ मीटर उंचीचे कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर त्यांनी सायकलवर गाठले. त्यासाठी बोईसर मधील दुर्गअसावा ते श्री क्षेत्र कळसूबाई असा सायकल  प्रवास व श्री क्षेत्र कळसुबाई पायथ्यापासून शिखरावर त्यांनी खांद्यावर सायकल उचलून त्यांनी असा प्रवास केला. ऑगस्टमध्ये अन्य भाविक, गिर्यारोहक आणि पर्यटकांची गर्दी असल्याने लोखंडी शिडीवरून सायकल नेताना त्यांना त्रास झाला; परंतु त्यावर त्यांनी मात केली. आता लक्ष्य एव्हरेस्ट मागील काही वर्षात एव्हरेस्ट मोहिमा विशेष लोकप्रिय होत आहेत. जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या एव्हरेस्टचे ८८४८ मीटर उंचीची चढाई करणे हे सोपे काम नाही; परंतु जाधव यांनी आतापर्यंत २२१२ मीटर उंचीएवढी चढाई एकदा, दोनदा नव्हे तर तब्बल सात वेळा पूर्ण केली आहे. याचा अर्थ त्यांनी एव्हरेस्ट एवढ्या उंचीचे शिखर अनेकदा सायकलवारीने गाठले. ही मोहीम राबवताना दीड-दोन तासापेक्षा अधिक विश्रांती न घेता सलग कामगिरी पूर्ण करावी लागते. ही राईड ‘स्ट्रॉवा ॲप’ वर नोंदवून एव्हरेस्टिंग वेबसाईटवर खाते बनवून अपलोड करावे लागते. ‘हॉल ऑफ फेम एव्हरेस्टिंग’ मध्ये सायकलस्वार,देशाचे नाव व राईटचे सेगमेंट लिहावे लागते. त्यात सात वेळा रामदास जाधव यांचे व देशाचे नाव झळकले आहे. यापुढे सायकलिंग मधील फुलएवरेस्टींग  हा क्रीडा प्रकार करण्याचा त्यांचा मानस आहे. एलिवेशन म्हणजे जगातील कोणत्याही टेकडीवर एकाच दिशेने सतत वर खाली फेऱ्या मारणे. अशा प्रकारचे आव्हान रामदास जाधव यांनी स्वीकारले असून त्यांनी पालघर मधील वाघोबा घाट  पहाटे ४ वाजल्यापासून ते रात्री १  वाजेपर्यंत असा एक दिवसात ५६ वेळा चढ उतार करण्याचा पराक्रम केला आहे.

घोडबंदर खाडी किनाऱ्यावर उभारणार आकर्षक ग्लास स्कायवॉक

 १०० कोटींचा निधी मंजूर-प्रताप सरनाईक अनिल ठाणेकर / अरविंद जोशी भाईंदर : ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याचे जतन – संवर्धन होण्याच्या दृष्टीने काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले आहे.  घोडबंदर  खाडी किनारा विकासाचे कामही लवकरच सुरु होत आहे. याच शेजारी असलेल्या जागेत भव्य ‘शिवसृष्टी’चे कामही मंजूर झाले आहे. त्याजवळ हा खाडी किनारा विकास सुरु होणार असल्याने येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येणार आहेत.  आता वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटच्या दुसऱ्या टप्प्यात, मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील घोडबंदर खाडी किनारा व घोडबंदर किल्ल्याला जोडणाऱ्या स्काय वॉक तयार करण्यासाठी १०० कोटींच्या कामास निधीसह राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे.जवळपास १ किलोमीटर लांबीचा हा ग्लास स्काय वॉक असेल. हा तयार होणारा ग्लास स्कायवॉक आकर्षक डिझाईनचा असणार असून फक्त मीरा भाईंदरच नाही तर मुंबई महानगरातील पर्यटकांच्या पसंतीस तो उतरेल असा विश्वास आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. पहिल्या टप्प्यात घोडबंदर खाडी किनारा विकास म्हणजेच वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटचे काम आता सुरु होत आहे. दुसऱ्या टप्प्यात येथे खाडी किनाऱ्यावरून थेट किल्ल्यात , शिवसृष्टीला जोडणारा स्काय वॉक असावा अशी संकल्पना आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडली. त्याला राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने निधीसह मंजुरी दिली आहे.  घोडबंदर येथे खाडी किनारा विकासाचे काम जिथे पूर्ण होईल त्या खाडी किनाऱ्यापासून तिथपासून घोडबंदर किल्ला वरील भागात म्हणजे उंचावर आहे. खाडी किनाऱ्यावरून उंचावरील किल्ल्यात व पुढे तयार होणाऱ्या शिवसृष्टीत जाण्यासाठी एक आकर्षक स्काय वॉक तयार करण्याची आमदार प्रताप सरनाईक यांची संकल्पना आहे. या स्काय वॉकचा बराचसा भाग हा पारदर्शक काचेचा असणार आहे. ‘ग्लास स्कायवॉक’ किंवा ‘ग्लास ब्रिज’ म्हणून त्याची ओळख होईल. जे पर्यटक खाडी किनाऱ्यावर फिरण्यासाठी येतील त्यांना थेट किल्ल्यात किंवा शिवसृष्टीत जाण्यासाठी हा काचेचा स्कायवॉक मदत करेल. जवळपास १ किलोमीटर लांबीचा हा स्काय वॉक असेल. खाडी किनाऱ्यावरून जाणारा हा स्कायवॉक म्हणजे पाण्याच्या वरून जाण्याचा अनुभव पर्यटकांना घेता येईल. त्यात काचेचा स्काय वॉक असल्याने त्याचे विशेष आकर्षण अधिक वाढेल. या स्काय वॉकचे संकल्पचित्र बनवले जात असून आकर्षक आगळेवेगळे व लक्षवेधी असे ग्लास स्कायवॉक चे डिजाईन असेल. शिवाय या काचेच्या स्काय वॉकवरून आजूबाजूच्या परिसराची दृश्ये पाहता व टिपता यावीत यासाठी ‘व्यूइंग डेक’ तयार करण्याचाही आमदार सरनाईक यांचा विचार आहे. घोडबंदर खाडी किनारा ते किल्ला – शिवसृष्टी असे दोन पॉईंट या स्काय वॉकने जोडले जातील.घोडबंदर खाडी किनारा ते घोडबंदर किल्ला साधारणतः ४५० मीटर लांबीचा स्काय वॉक असेल तर तिथून पुढे शिवसृष्टीपर्यंत जोडण्यासाठी ५०० मीटर असा जवळपास १ किलोमीटर लांबीचा हा ग्लास स्कायवॉक असणार आहे. स्काय वॉक बरोबर परिसर सुशोभीकरणही केले जाईल , अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

हर्षवर्धन पाटलांचा भाजपाला रामराम

इंदापूर : हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपाला रामराम करीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. गेली ६ दशकापासून पवार कुटुंबाचे आणि आमचे संबंध खूप चांगले आहेत. परंतु आज निर्णय करताना आम्ही जी भूमिका घेतो, ती जनतेची…

आरक्षणाची मर्यादा वाढवून ७५ टक्के करा- शरद पवार

सांगली : आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरुन वाढवून ७५ टक्क्यांपर्यंत जाऊ द्या, ज्याला मिळाले नाही त्याचा २५ टक्क्यांमध्ये समावेश करता येईल. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली…