Category: महाराष्ट्र

Maharashtra News

लाडक्या बहीणी १७ ऑगस्टला 3 हजार रुपयांनी श्रीमंत होणार!

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी  एक कोटींपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. या योजनेला मिळालेला वाढता प्रतिसाद पहाता राज्य सरकारने १५ ऑगस्टची मुदत वाढवून आता ३१ ऑगस्टपर्यंत लाडक्या बहि‍णींना अर्ज करण्यासाठी मुभा दिली आहे. पण ज्यांनी अर्ज…

जरांगेच्या ‘सगे सोयरे’ला प्रकाश आंबेडकरांचा विरोध

अकोला : मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणामध्ये कायदेशीररित्या समावेश होऊ शकत नाही, तसेच मनोज जरांगे पाटील  यांच्या सगेसोयरे या मागणीला देखील आमचा विरोध असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहिर केले आहे. कुणबी हा ओबीसीत आहे. त्यामुळे त्यांनी…

21 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश – चंद्रकांत सूर्यवंशी

अशोक गायकवाड     रत्नागिरी : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ७ ऑगस्ट, 1 वाजल्यापासून ते २१ ऑगस्ट रात्रीपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. असे आदेश अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिले. जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा क्र. ६६ चे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येतात. अशा वेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. तसेच १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार असून, त्याअनुषंगाने ठिकठिकाणी आंदोलनात्मक काय्रक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. १९ ऑगस्टला नारळी पौर्णिमा सण साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. हे कृत्य करण्यास मनाई करण्यात येत आहे. शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदूका, सुरे लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेवून फिरणे. अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे. दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे. सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल, अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार करणे. इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितिनी घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे. पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे. या बाबींना प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत. अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम इत्यादी, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी .तसेच प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणलाही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही. वरील आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सन १९५१ चा कायदा २२ नुसार कारवाई करण्यात येईल.

भटक्या जमातीमध्ये नव्या जातींचा समावेश

मुंबई : इतर मागास वर्ग, विमुक्त जाती/ भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील जातीच्या यादीमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार शासनाने काही नवीन जातींचा अंतर्भाव करून तसेच वगळून अद्ययावत यादी तयार केली आहे. नव्या बदलानुसार…

बांगलादेशासारखे महाराष्ट्रात होणार नाही-मनोज जरांगे

वडीगोद्री ( जालना) : आरक्षणाचा विषय सरकारने समजून घेतला पाहिजे. हा विषय साधासुधा नाही, खूप भयानक वेदना आणि आक्रोश समाजात आहे. पण बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर जे झाले ते महाराष्ट्रात होणार नाही. महाराष्ट्र सर्व जाती धर्माचा आहे. त्यामुळे इथे…

सिंधुदुर्गातील जंगलात सापडलेल्या महिलेने स्वत:च बनाव रचला होता !

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी येथील जंगलात सापडलेल्या महिलेच्या बाबतची उकल आता झाली आहे. या महिलेने स्वताच्याच अपहरणाचा बनाव रचल्याचे तपासात पुढे आले आहे. तशी धक्कादायक कबुली तीने दिली आहे. मानसिक आजारपणातून आपण स्वतःला…

सेल्फीची मस्ती अंगाशी.. बोरणे घाटात युवती कोसळली खोल दरीत..थरारक रेस्क्यू ऑपरेशनद्वारे जवानांनी दिले जीवदान !

सातारा : जिल्ह्यातील ठोसेघर-सज्जनगड परिसरात बोरणेि घाटात एक तरुणी सेल्फी काढत असताना दरीत कोसळली होती. या तरुणीला महाबळेश्वर टेकर्स व शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने बाहेर काढले. ठोसेघर-सज्जनगड परिसरातील बोरणे घाटात आज…

जरांगेंचा नारायण राणेंसह राम कदमांना इशारा

जरांगेंचा नारायण राणेंसह राम कदमांना इशारा बीड : राज्यातील मराठा आरक्षणाचा  प्रश्न सोडवण्यासाठी समाजम्हणून आपल्यालच निवडणूकीच्या रिंगणात उतरावे लागेल. ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी कागदपत्रांची तयारी ठेवा. ठरलेल्या एकाच उमेदवाराच्या पाठीमागे समाजाने उभे राहायचं असा आवाहन करतानाच मनोज जरांगे यांनी भाजपा आमदार राम कदम आणि खासदार नारायण राणे यांनाही इशारा दिलाय. राम कदम यांचा दहीहंडी आमदार म्हणून उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांसह नारायण राणेंनाही त्यांनी चांगलंच फटकारले. विधानसभेत कोणाला पाडायचं हे 29 ऑगस्ट ला ठरवणार असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. ‘मराठवाड्यात जाऊन एकदा बघतोच मनोज जरांगे काय करतात’, असं नारायण राणेंनी म्हटल्यानंतर मनोज जरांगे यांनी आज त्यांना प्रत्युत्तर दिलंय. मी दादांना म्हटलंच नाही मराठवाड्यात यायचं नाही. तुम्ही काय बघून घेणार. मी जर समजा म्हणलोच तर तुमचं कोकणात जाणं ही अवघड होईल असं मनोज जरांगे म्हणाले. आमदार राम कदम यांनी कशाला यात उडी घ्यावी असं म्हणत रात्रंदिवस हे भाकरी खात नाही ताकच पितेत. मी स्वाभिमान गहाण ठेवून पक्षासाठी काम करणारा त्यांच्यासारखा नाही. मला माझा मराठा मोठा करायचा आहे हे मी ठरवलंय. असे जरांगे म्हणाले.…

सर्व योजनांचे रुपांतरण करुन गावात कारखाना उभा करण्यासाठी प्रयत्न करा-कीर्ती किरण पुजार

अशोक गायकवाड   रत्नागिरी : केंद्र शासन, राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेऊन गावामध्ये छोटे उद्योजक तयार झाले आहेत. या सर्व योजनांचे रुपांतरण करुन एकत्रितपणे गावागावात कारखाने निर्माण करता येतील…

शिमला, मंडीमध्ये ढगफुटी; एकाचा मृत्यू, 30 जण बेपत्ता

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशात ढगफुटी झाल्यानं हाहाःकार माजला आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला, मंडी आणि कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आतापर्यंत 30 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. शिमल्यातील हायड्रो प्रोजेक्टजवळ गुरुवारी पहाटे ढग फुटल्याची माहिती मिळत आहे. जिल्हा आपत्ती…