Category: मुंबई

Mumbai news

मुंब्र्यातून नजीब मुल्ला आव्हांडविरोधात लढणार

मुंबई :  ठाण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार जिंतेंद्र आव्हाडांविरुद्धचा महायुतीचा उमेदवार निश्चित झाला आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघासाठी नजीब मुल्ला यांना तिकीट दिलं आहे. उमेदवार नजीब मुल्ला यांनी अजित…

शिंदेसेनेचे माजी नगरसेवक हाजी बब्बू खान यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश मुंबई : काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते, माजी नगरसेवक हाजी बब्बू खान यांनी आज मुंबई काँग्रेस अधयक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी वर्षा गायकवाड यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भाजपा सरकार अदानीसाठी काम करत असून धारावीकरांना बाहेर हाकलण्याचे षडयंत्र सुरु आहे. धारावीच्या लोकांना मुलुंड, देवनार, कुर्ला, मालवणी आक्सा, मिठागरांच्या जागेवर विस्थापीत केले जात आहे. पण धारावीसाठी आपली लढाई अदानीच्या विरोधात सुरु आहे. विधानसभेच्या निवडणुकीत धारावीतून सर्वात जास्त मताधिक्क्याने आपला उमेदवार विजयी करायचा आहे. विधानसभेची ही निवडणूक लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी महत्वाची आहे. धारावीसाठी, मुंबईसाठी व महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मविआचे सरकार आणायचे आहे, त्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावे, असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केले. हाजी बब्बू खान म्हणाले की, काँग्रेस पक्षच सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. काहीवेळेसाठी काँग्रेसमधून बाहेल गेले होते पण मनातून काँग्रेस कधीही गेली नाही. माझे व या सर्व   लोकांचे धारावीवर प्रेम आहे, सर्व लोक स्वतः उमेदवार समजून काम करतात. काँग्रेस पक्ष व खासदार वर्षाताई गायकवाड यांच्यासोबत आम्ही खंबीरपणे उभे राहू. या पक्षप्रवेशावेळी माजी मंत्री अस्लम शेख, आमदार अमिन पटेल, काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, विरेंद्र चौधरी, कचरू यादव, इब्राहिम भाईजान आदी उपस्थित होते.

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा

एसएसटी महाविद्यालयाचा दुहेरी विजय उल्हासनगर : क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद,ठाणे आणि उल्हासनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये एसएसटी महाविद्यालयाने आपला दबदबा सिद्ध करत दुहेरी मुकुट मिळवला आहे. स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलांच्या गटात एसएसटी महाविद्यालयाच्या संघाने अप्रतिम खेळ दाखवत प्रथम क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे, १९ वर्षाखालील मुलींच्या गटातही उत्कृष्ट प्रदर्शन करत एसएसटी महाविद्यालयाच्या मुलींनी प्रथम क्रमांकावर आपली मोहर उमटवली. या दुहेरी विजयामुळे एसएसटी महाविद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत असून, महाविद्यालयाचे प्रशिक्षक आणि खेळाडूंचे अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच या विजयाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ.पुरस्वानी,आयक्यूएसी समन्वय डॉ.खुशबू पुरस्वानी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले असून त्यांना विभागीय स्पर्धांसाठी शुभेच्छा ही दिल्या.

मुंबईकरांनो सावधान ! पाणी गाळून, उकळून प्या

मुंबई : राजधानी मुंबईसह उपनगरातील अनेक भागांत गेल्या ४ दिवसांपासून पावासाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या या परतीच्या पावसामुळे धरणक्षेत्र भागातील नद्यांमधून पावसाचे पाणी जलशयात जात आहे. येथील भातसा जलाशयाच्‍या पाणलोट क्षेत्रात मागील ३…

ठाकरेंकडे इनकमिंग सुरुच

भाजपचे कुर्ला विधानसभा महामंत्री स्वप्निल चंद्रकांत येरुणकर आणि ॲड. राणी स्वप्निल येरुणकर ह्यांनी त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांसह आज मातोश्री येथे पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश…

वाझेला जामीन मंजूर, तरीही मुक्काम जेलमध्येच

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गेल्या दोन वर्षांपासून तुरूंगात असलेले बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना जामीन मंजूर झाला आहे. देशमुख यांच्यासह अन्य आरोपी जामिनावर…

अनिल देशमुखांची ‘स्फोटक डायरी’ !

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्याविरोधात झालेल्या षडयंत्राचा गौप्यस्फोट करण्यासाठी पुस्तकाची निवड केली आहे. अनिल देशमुख लिखीत “डायरी ऑफ होम मिनिस्टर” हे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर असून त्यात अनेक…

मुबईत शिवसेना, नागपूरमध्ये कांग्रेस ;

मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला मुंबई :  काँग्रेस  नेते बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर महाविकास आघाडीतील तणाव निवळला आहे. मुंबईत शिवसेनेला तर नागपुरात काँग्रेसला झुकते माप मिळेल या निकषावर तडजोड झाली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. थोरात…

दहावीत दांडी गुल झाली तरी टेन्शन नाय

प्रशांत शिंदे मुंबई : दहावीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुषखबर आहे. आता दहावीत सायन्स किंवा गणितात तुमची दांडी गुल झाली तरी टेन्शन घ्यायची गरज नाय…. अकरावीत तुम्हाल प्रवेश मिळू शकतो…राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार…

अमित ठाकरे माहीममधून, तर देशपांडे वरळीतून ‘मनसे’ लढणार

स्वाती घोसाळकर मुंबई : आणखिन एक ठाकरे अखेर निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. माहिम विधानसभा मतदार संघातून मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हे निवडणूक लढविणार आहे. विशेष म्हणजे मनसेने आज…