Category: मुंबई

Mumbai news

  प्रेरणा व्यक्तिमत्त्व संस्था आयोजित शिक्षक आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित मी होणार ठाण्याचा टॉपर ह्या कार्यक्रमात बेस्ट कोचिंग क्लास म्हणून केदार क्लासेसचा सत्कार आमदार संजय केळकर यांच्यातर्फे देण्यात आला.…

आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या नियंत्रणाखाली, सफाई अपनाओ, बिमारी भगाओचा आरोग्यपूर्ण संदेश

    अशोक गायकवाड       नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशनच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ’सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानास जागतिक डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून १ जुलैपासून प्रारंभ…

 व्यंकटेश कोणार, काजल भाकरे ठरले ‘सर्वोत्तम लिफ्टर’

  महाराष्ट्र राज्य सिनियर पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद निवडचाचणी स्पर्धा       मुंबई : नागरिक सहाय्य केंद्र संचालित ज्ञानेश्वर विद्यालय, वडाळा येथे महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात…

 जोरदार पावसाने वंदे भारत एक्स्प्रेस रद्द रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलले

    मुंबई : ठाणे जिल्ह्यात जोरदार पाऊस पडल्याने, अनेक भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्य रेल्वेच्या आटगाव-तानशेत दरम्यान भूस्खलन झाल्याने, रेल्वे रुळावर चिखल-मातीचा…

भारतात सर्वप्रथम नवी मुंबई येथील सानपाडा येथे ज्येष्ठ नागरिक संघाचे विरंगुळा केंद्र-विजय नाहटा

नवी मुंबई : पूर्वी ज्येष्ठ नागरिक आरामासाठी कुठेतरी झाडाखाली बसत असत. आपण ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून, भारतात सर्वप्रथम नवी मुंबई येथील सानपाडा येथे ज्येष्ठ नागरिक संघाचे विरंगुळा केंद्र उभारले. आजही…

 ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’

अभियानात रेल्वे स्टेशन, बस डेपो व वर्दळीच्या जागी सखोल स्वच्छता मोहीमा     नवी मुंबई : दररोज नियमितपणे करण्यात येणा-या स्वच्छतेप्रमाणेच काही दुर्लक्षित जागांची सफाईदेखील विशेष मोहीमेव्दारे करण्यात यावी अशा प्रकारच्या नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या सूचनांनुसार आठही विभागांमध्ये सखोल स्वच्छता मोहीमा (Deep Cleaning) राबविण्यात येत आहेत. यामध्ये नागरिकांना सहभागी करून घेऊन शहरात स्वच्छतेची चळवळ उभी करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त  सुनिल पवार आणि घनकचरा व्यवस्थापनाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे व परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली घणसोली विभागात विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त  संजय तायडे यांच्या पुढाकाराने घणसोली रेल्वे स्टेशन व परिसरात विशेष सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रेल्वे स्टेशन्सच्या स्वच्छतेची जबाबदारी सिडको महामंडळाची असली तरी नवी मुंबईच्या स्वच्छ शहर मानांकनात कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये याकरिता आयुक्त महोदयांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका सखोल स्वच्छता मोहीमेंतर्गत रेल्वे स्टेशन स्वच्छतेकडे विशेष लक्ष देत आहे. या अनुषंगाने घेण्यात आलेल्या घणसोली रेल्वे स्टेशन स्वच्छता मोहीमेत पोलीस प्रशिक्षण घेत असलेले दळवी ॲकेडमीचे होतकरू युवक – युवती सामाजिक बांधिलकीच्या भावनेने सहभागी झाले होते. तसेच राजीव गांधी महाविद्यालयातील एन.एस.एस. चे विद्यार्थी आणि स्वच्छताप्रेमी नागरिकही उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग अधिकारी  संजय तायडे यांच्या समवेत उप मुख्य स्वच्छता अधिकारी  राजेंद्र इंगळे, स्वच्छता अधिकारी  विजय पडघन तसेच स्वच्छता निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतामित्र यांनी विशेष योगदान दिले. सखोल स्वच्छता मोहीमेंतर्गत विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त  भरत धांडे यांच्या नियंत्रणाखाली तुर्भे येथील पेट्रोल पंपांवरील शौचालय सफाईची विशेष मोहीम स्वच्छता अधिकारी  संजीव रोकडे यांनी स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता मित्रांसह राबविली. तसेच कोपरखैरणे विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी  सुनिल काठोळे यांनी स्वच्छता अधिकारी राजूसिंग चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता मित्रांच्या सहयोगाने कौपरखैरणे बस डेपोमध्ये सखोल स्वच्छता मोहीम राबविली. अशा सखोल स्वच्छता मोहीमांव्दारे दुर्लक्षित जागांप्रमाणेच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते अशा ठिकाणांचीही स्वच्छता केली जात आहे. ०००००

आता फैसला १३ जुलैलाच- जरांगे

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यात २८८ उमेदवार उभे करायचे की २८८ उमेदवार पाडायचे याचा फैसला आता १३ जुलैलाच होईल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते.  मराठा आरक्षणातील सगेसोयऱ्यांच्या…

पेपरफुटीला आळा घालणारे विधेयक विधानसभेत सादर

मुंबई : देशात नीट आणि  युजीसी परीक्षांमध्ये पेपरफुटीसह अनेक गैरप्रकार समोर आल्यानंतर आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पेपरफुटीला आळा घालणारे विधेयक विधानसभेत सादर करण्यात आले आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी हे विधेयक…

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची स्वबळाची चाचपणी

मुंबई : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एकीकडे शिवसेनेने २८८ मतदार संघात उमेदवारांची चाचपणी केल्यानंतर आता काँग्रेसनेही सर्वच्य सर्व २८८ मतदार संघातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवून स्वबळाची चाचपणी केली आहे. येत्या १० जुलैपर्यंत…

१४८ कोटींच्या ‘वॅाटर टॅक्सी’ला पर्यावरणीय मंजुरीच नाही

नवी मुंबई : नवी मुंबई आणि मुंबईला सागरी मार्गाने जोडण्यासाठी बेलापूर- नेरूळ खाडी किनारी सिडकोने वॅाटर टॅक्सी हब बनवले आहे. 148 कोटी खर्च करून उभारलेल्या या जेट्टीला पर्यावरणीय परवानगीच घेतली नसल्याची धक्कादायक माहिती अधिकारात उघड झाली आहे. शहरात…