Category: मुंबई

Mumbai news

गौरी लंकेशचा मर्डरर पांगारकरच्या शिंदेच्या सेनेतील प्रवेशाला स्थगीती

मुंबई: पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश झाल्यावर २४ तासाच्या आतच या प्रवेशाला स्थगिती देण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांच्या उपस्थितीत जालन्यात हा पक्षप्रवेशाचा…

भाजप ‘नाबाद ९९’

पहिल्या यादीत फडणवीस, बावनकुळेंसह अशोक चव्हाणांच्या मुलीला तिकीट ० ८८ आमदारांना पुन्हा संधी ० ११ नवे चेहरे० मुंबईच्या भारती लव्हेकर, पराग शहा, सुनील राणेंचे टेन्शन वाढले० स्वाती घोसाळकर मुंबई – महाराष्ट्र…

 योगेश त्रिवेदी यांचा वाढदिवस आधार वृद्धाश्रम येथे साजरा

वयोवृद्धांनी साजरा केला आनंद सोहळा   मुंबई : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री विजय वैद्य यांच्या निधनानंतर या परिसरात मरगळ झटकून सामाजिक कार्यक्रमात खंड पडू नये म्हणून कंबर कसून उपनगरचा राजाच्या पदाधिकाऱ्यांनी पुनश्च हरि ओम म्हणत सुरुवात केली. बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील उपनगराचा राजा या विजय वैद्य यांनी स्थापन केलेल्या या संस्थेने वैद्य यांचे सुमारे पन्नास वर्षांचे निकटवर्तीय ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांच्या वाढदिवसानिमित्त आधार वृद्धाश्रम, दौलत नगर बोरीवली पूर्व येथे सुमारे शंभरहून अधिक वयोवृद्धांनी आनंद सोहळा साजरा केला. शिवसेना उपविभाग संघटक सौ रेखा बोऱ्हाडे यांच्या पुढाकाराने झालेल्या या आनंद सोहोळ्यात योगेश वसंत त्रिवेदी आणि सौ. माया योगेश त्रिवेदी आणि उपनगरचा राजा च्या कार्यकर्त्यांनी अल्पोपहार तसेच फळे वितरित केली. वयोवृद्धांनी गाणी सादर केली. मिलिंद कोळवणकर, राजन सावंत, मनीषा परब, रुपाला भाटिया, मिथिलेश सावंत, विक्रांत पाटील, हेमाल ठक्कर, भावना ठक्कर, जिगर भाटिया, कु. प्रथम हेमाल ठक्कर आदी कार्यकर्त्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

या ‘जन्मावर’… या ‘मरणावर’… शतदा प्रेम करावे- संदीप चव्हाण

मुंबई / रमेश औताडे सर्वांना परिचित असलेले गाणे  ‘या जन्मावर …या जगण्यावर … शतदा प्रेम करावे’ संपूर्ण जीवनाचे सार सांगून जाते हे गाणे. मात्र अवयव दान केले तर या ‘मरणावर’  शतदा प्रेम करावे असे आपल्या मृत्युनंतर जग बोलू लागेल. त्यासाठी अवयव दान चळवळ व्यापक करत ‘अवयवदान सैनिकांचे’  जाळे निर्माण करण्याची गरज आहे.  मुंबई मराठी पत्रकार संघ ‘ ‘द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन’ या अवयव दान संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करेल असे बित्तंबातमीचे संपादक आणि मुंबई  पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितले. मुंबई मराठी पत्रकार संघ आणि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड डोनेशन मुंबई यांच्या वतीने अवयवदान आणि नेत्रदानाबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. १४० कोटीच्या देशात मागील वर्षी फक्त १०२० जणांनी केले अवयव दान केले. खेदाची बाब जरी असली तरी अजूनही कोट्यवधी जनतेला अवयव दान म्हणजे काय हेच माहिती नाही. यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे असे ‘द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन’ या अवयव दान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांनी सांगितले. कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक कुमार कदम, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, संयुक्त कार्यवाह सुरेश वडवलकर, माजी अध्यक्ष प्रसाद मोकाशी, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, अजय वैद्य, हेमंत सामंत,जगदीश भोवड, आदी पत्रकार उपस्थित होते. फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड डोनेशन चे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पवार, उपाध्यक्ष सुनील देशपांडे, प्रशांत पागनीस, नागराज अय्यर, श्रीकांत कुलकर्णी यांनी त्यावेळी अवयव दान संदर्भात मार्गदर्शन केले. जेव्हा आपण अवयव दान करतो तेव्हा शरीर दान शक्य नसते आणि जेव्हा शरीर दान होते असे केल्याने शरीरातील अंतर्गत अवयवांचे दान करता येत नाही. मुळात शरीर दान आणि अवयवदान या दोन भिन्न गोष्टी आहेत. असे पुरुषोत्तम पवार यांनी सांगितले.

अखेर नितीनला आपण श्वास देऊ शकलो नाही- संदीप चव्हाण

मुंबई / रमेश औताडे कमी वयात निधन झालेल्या पत्रकार नितीन चव्हाण यांच्या उपचारासाठी आपण कुठेतरी कमी पडलो, अशी खंत बित्तंबातमीचे संपादक आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी पत्रकार भवनात शुक्रवारी आयोजित शोकसभेच्या वेळी व्यक्त केली. मुंबई मराठी पत्रकार संघाचे दिवंगत सदस्य ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य, नितीन चव्हाण व रघुनाथ घानकुटकर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शुक्रवार १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पत्रकार भवनात शोकसभा आयोजित करण्यात आली होती. पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, विश्वस्त देवदास मटाले, विश्वस्त राही भिडे, संयुक्त कार्यवाह सुरेश वडवलकर, माजी अध्यक्ष प्रसाद मोकाशी, दूरदर्शनचे जयू भटकर, विलास मुकादम, सदानंद खोपकर आदी पत्रकार उपस्थित होते. यावेळी संदीप चव्हाण म्हणाले, विजय वैद्य यांचे ग्रंथ प्रेम मोठे होते. पुस्तक त्यांचा प्राण होता. योगेश त्रिवेदी यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांच्या चितेवर त्यांच्या आहुती वृत्तपत्राचा अंक ठेवावा. तर विजय वैद्य म्हणाले होते माझ्या अंत्यात्रेत माझ्या उशीखाली त्या दिवशीचे सर्व वृत्तपत्राचे अंक ठेवा. जिंदगी लंबी नहीं बडी होनी चाहिए असे नितीन चव्हाण सांगायचा. पत्रकारिता माझी कमिटमेंट आहे असे नितीन म्हणायचा. त्याची साता समुद्रापार पत्रकारिता होती. दुबईतून पाच लाख मदत आली. अजून मदतीसाठी शाहरुख खान व अक्षय कुमार यांची भेट घेणार होतो. नितीनसाठी एक नाटकाचा प्रयोग करणार होते. ऑक्सिजन सिलिंडर घेऊन नितीन ऑफिसला जायचा. मात्र अखेर नितीनला आपण श्वास देऊ शकलो नाही. नितीनचा मोबाईल क्रमांक डिलिट करू नका अजूनही अनेकांचे फोन येत आहेत. त्याचा वसा त्याचा मुलगा चालवेल. त्यांच्या कुटुंबाने पत्रकार संघात कधीही यावे संघ तुमचाच आहे. असे चव्हाण यांनी सांगितले. नीला उपाध्ये शिक्षिका होत्या माझ्या त्या आमची माय होत्या. अशी आठवण चव्हाण यांनी सांगितली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी यांनी या चारही पत्रकारांच्या सोबत पत्रकारिता करताना आलेले अनुभव सांगितले. भिकऱ्यांची संघटना काढून मला अध्यक्ष केले तरी चालेल असे सांगणारे वैद्य पत्रकरितले भीष्माचार्य होते. नितीन चव्हाण व मी सामना मध्ये एकत्र काम करत होतो. ते एक हरहुन्नरी पत्रकार होते. पत्रकार मारुती मोरे व सचिन धानजी यांनी नितीन  यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीसाठी खूप धावपळ केली. अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी आर्थिक मदतीसाठी आवाहन केले मात्र आपण नितीन चव्हाण यांना वाचवू शकलो नाही. असे योगेश त्रिवेदी यांनी सांगितले. विजय वैद्य यांच्या घरी मी सहावीत असताना त्यांच्या घरी वृत्तपत्र टाकत होतो. अशी एक आठवण सदानंद खोपकर यांनी सांगितली. पत्रकार संघाने पत्रकारांच्या आरोग्य निधीसाठी एका मोठ्या फंडाची उपलब्धता करावी असे आवाहन खोपकर यांनी केले. यावेळी बोलताना माजी अध्यक्ष प्रसाद मोकाशी यांनी सांगितले की, रघुनाथ घानकुटकर डोळस पत्रकार होते. त्यांच्या दिवाळी अंकात ते जीव ओतून काम करत होते. नीला उपाध्ये या पत्रकार संघाच्या कार्यवाह असताना त्यांनी पत्रकारांच्या मुलांच्या स्पर्धा घेतली होती. स्पर्धेत मला बक्षीस मिळाले ते माझे पाहिले बक्षीस होते. विजय वैद्य यांचे पुस्तकावरील प्रेम खूप मोठे होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार सुरू केला तर पहिला पुरस्कार त्यांनाच मिळायला हवा. नितीन आजारी असतानाही पत्रकारिता करत होता त्यांनी कधीही आजारपणाचा बाऊ केला नाही. तत्वाने जगणारे हे पत्रकार संघाचे हिरे होते. यावेळी राही भिडे यांनी या सर्व पत्रकारांच्या आठवणी सांगताना अश्रू अनावर झाले. इतके महान पत्रकार होते हे सर्व. यावेळी देवदास मटाले म्हणाले, आयुष्याची टर्म पूर्ण करण्याअगोदर  नितीन गेला. जे आहे ते छापायचेच असा बिनधास्त पत्रकार होता. विजय वैद्य यांच्याशी माझी छान मैत्री होती. निलाताई मला लाडाने टोण्या म्हणायची. देहदान करा व शोकसभा करू नका असे त्यांनी सांगितले होते. 0000

 देवनार डम्पिंगवरील पुनर्वसनाचा मुद्दा वादात

 मानखुर्द मतदारसंघात उमेदवारांना डोकेदुखी   मुंबई : देवनार डम्पिंग ग्राउंडच्या काही भागावर धारावीतील अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचा मुद्दा आगामी विधानसभा निवडणुकीत मानखुर्द विधानसभा क्षेत्रात गाजण्याची चिन्हे आहेत. देवनार विभागाचा काही भाग अणुशक्ती नगर मतदारसंघात, तर डम्पिंगचा भाग मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रात येतो. त्यामुळे मानखुर्द-शिवाजीनगर भागातून उभ्या राहणाऱ्या  महायुतीच्या उमेदवारासाठी पुनर्वसनाचा मुद्दा डोकेदुखी ठरू शकतो. देवनार  डम्पिंग ग्राउंडच्या काही भागावर धारावीतील अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य सरकाराने दोनच दिवसांपूर्वी घेतला. त्यामुळे देवनार पुन्हा चर्चेत आले आहे. देवनार डम्पिंग बंद करण्याची प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून सुरू असून, ती अंतिम टप्प्यात आहे. मात्र, डम्पिंग ग्राउंड अजून बंद करण्यास प्रशासनाला यश आलेले नाही. वीज निर्मितीतून  ६०० मेगावॅट वीज – देवनार डम्पिंंग येथे वीज निर्मितीचा प्रकल्पही सुरू केला जाणार आहे. दोन टप्प्यांत सुरू केल्या जाणाऱ्या या प्रकल्पातून ६०० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे. – डम्पिंग ग्राउंडच्या एकूण क्षेत्रफळापैकी काही भागांत पुनर्वसन आणि काही भागात वीज निर्मिती प्रकल्प अशी योजना आहे. सोयी-सुविधांवर भार अनेक वर्षे देवनार डम्पिंंगवर कचरा साठवला जात असल्याने या भागातील जमिनीची गुणवत्ता ढासळली आहे. शिवाय हा भाग प्रदूषितही झाला आहे. अशा ठिकाणी लोकांसाठी घरे बांधणे संयुक्तिक नाही, असा सूर उमटत आहे. डम्पिंग ग्राउंडमुळे या भागातील पायाभूत सोयी-सुविधांवर आधीच ताण आहे. त्यातच हजारो नागरिकांचे पुनर्वसन केले जाणार असल्याने आधीच अपुऱ्या असलेल्या सोयी-सुविधांवर आणखी भार पडण्याची शक्यता आहे. देवनारवर आणखी किती भार टाकणार, हा मुद्दा उपस्थित होत आहे. पुनर्वसनाचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याने मानखुर्द मतदारसंघात महाविकास आघाडी या निर्णयाच्या विरोधात वातावरण तापवण्याचा प्रयत्न करणार, हे उघड आहे. त्यामुळे या भागातील महायुतीच्या उमेदवाराला डोकेदुखीचा सामना करावा लागेल, असे दिसते. 0000

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणावरील ”  थॉटस् ऑफ आंबेडकर ” पुस्तकाचे प्रकाशन

रमेश औताडे मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक भाषणातील विविध पैलूंची विषयावर रचना असलेले ” थॉटस् ऑफ आंबेडकर ” या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी मुंबई प्रेस क्लब येथे ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक अर्जुन डांगळे  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना नामदेव साबळे म्हणाले, हे पुस्तक आधुनिक भारताचे शिल्पकार महामानव आणि भारतीय घटनेचे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे संकलन आहे. बाबासाहेबांचे क्रांतीकारी परिवर्तनवादी विचार हे भारतातल्या शोषित, पिडीत पददलित लोक समुहाच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय लढ्यांना ऊर्जा नि प्रेरणा देणारे विचार आहेत. डॉ. बाबासाहेबांच्या विचारा शिवाय इथला सर्वहारा वर्ग त्याच्या मनुवादी बामन, बनिया शोषकाविरुद्ध, शोषकांच्या शासनाविरुद्ध आणि या शोषकांचं रक्षण करणाऱ्या समाज व धर्मव्यवस्थेविरुद्ध सर्वंकष निर्णायक लढा उभारू शकत नाही असे नामदेव साबळे म्हणाले. यावेळी दलित पॅंथर एनएलडी चे केंद्रीय अध्यक्ष सुरेश केदारे, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, राजकीय विश्लेषक सुनील कदम, दैनिक सार्वभौम राष्ट्र चे संपादक प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक साहित्यिक विचारवंत राजू रोटे तर सूत्रसंचालन केतकी प्रकाशन कार्यकारी संपादक पंकज चाळके यांनी केले. 0000

 मतदारराजासाठी धावाधाव!

 जिल्ह्यात मतदानाच्या विविध कामांसाठी ३ हजार ७५९ वाहनांचे नियोजन   नवी मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे जिल्हा निवडणूक कार्यालयाने जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाच्या विविध कामांसाठी ३ हजार ७५९ वाहनांचे नियोजन केले आहे. यामध्ये बस, ट्रक, टेम्पो, जीप, कार, ऑटोरिक्षा आदी विविध वाहनांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या माध्यमातून विविध गोष्टींचे नियोजन सुरू झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांत ६ हजार ८९४ मतदान केंद्रांवर मतदान प्रकिया पार पडणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघ कार्यालयाच्या माध्यमातून त्या त्या विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर मतदानाच्या अनुषंगाने आवश्यक साहित्य, मतदार जनजागृती साहित्य, ईव्हीएम मशीन, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी वाहने, भरारी पथकांसाठी वाहने आदी वाहनांचे जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वाहतूक व्यवस्था पथकाच्या माध्यमातून नियोजन केले आहे.

– ५१ नागरिकांना हरवलेले मोबाईल रिटर्न गिफ्ट

विठ्ठलवाडी पोलिसांची कामगिरी उल्हासनगर-  हिललाइन पोलिस ठाण्याच्या हद्दीत २५ नागरिकांचे त्यांचे हरवलेले किंबहुना गहाळ झालेले मोबाईल वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप यांच्या टीमने दसऱ्याच्या दिवशी परत केल्याची घटना ताजी असतानाच,…

खो-खो प्रेमी सरस्वती मंदिरमध्ये दसरा संमेलन संपन्न

मुंबई : माहीम मध्ये खो-खो म्हटल कि सरस्वती मंदिर हायस्कूलच नाव लगेच झळाळून समोर येत. या शाळेने खो-खो ला जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडू दिले. त्यात रंजन कोळी,…