Category: मुंबई

Mumbai news

राज्यातील तरुणींना सरकारकडून स्वरक्षणाचे प्रशिक्षण मिळणार…

 ‘हर घर दुर्गा’ अभियानाची सुरवात मुंबई : आत्म संरक्षणासाठी राज्यातील तरुणींना स्व रक्षणाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण फक्त काही दिवसांपुरते मर्यादित राहणार नसून, शासकीय औद्योगिक संस्थांमध्ये संपूर्ण वर्षभर आठवड्यातून २ ते ३ वेळा तासिका स्वरूपात आयोजित केले जाणार असल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘स्वरक्षण हा एक पर्याय नसून आजच्या काळाची गरज आहे. हर घर दुर्गा अभियानाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक महिलेला स्वतःचे रक्षण करण्यासाठी सुसज्ज करत आहोत. हा उपक्रम फक्त आत्मरक्षणाचे कौशल्य शिकवणार नाही, तर आपल्या महिलांमध्ये आत्मविश्वास आणि धैर्य निर्माण करेल,’ असे लोढा म्हणाले. ३० सप्टेंबर रोजी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते ‘हर घर दुर्गा ” अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मुंबई , कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे लोढा यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर केरळा स्टोरीज चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री अदाह शर्मा यावेळी उपस्थित राहणार आहे. राज्यातील १४ आय टी आय चे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने नुकताच घेतला आहे. मुंबई, कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेचे नामकरण महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक संस्था असे करण्यात येणार आहे.अशी माहिती लोढा यांनी यावेळी दिली. 0000

तर छगन भुजबळांविरोधात निवडणूक लढवणार –  हेमंत पाटील

रमेश औताडे   मुंबई : राज्यात बहु‌संख्येने असलेल्या इतर मागासवर्गीयांच्या समस्या आहे तिथेच आहेत. तथाकथित ओबीसी नेत्यांनी समाजाच्या मतांचा वापर केवळ आपल्या राजकीय फाय‌द्यासाठी करून घेतला, असा थेट आरोप करत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी ) राष्ट्रीय अध्यक्ष व ओबीसी नेते हेमंत पाटील यानी शनिवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री छगन भुजबळांविरोधात निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेला आरक्षण आंदोलनकर्ते  मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्‌याला पुर्ण समर्थन असल्याचे यावेळी पाटील यांनी जाहिर केले. जरांगे पाटील यांनी संधी दिली तर ओबीसी आणि मराठा बांधवांच्या वतीने नाशिक मधून छगन भुजबळांविरोधात निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे  पाटील म्हणाले. भूजबळ आणि काही तथाकथित नेत्यांना धडा शिकवण्यासाठी राज्यभरात त्याच्याविरोधात समक्ष उमेदवार देण्याचा संघटनेचा प्रयत्न असणार आहे. मनोज जरांगे यांनी  ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी रास्तच आहे. त्यामुळे ओबीसी समाजाने मोठे मन दाखवून जरांगे यांना समर्थन दिले तर, आगामी काळात ओबीसी-मराठा समाजाच्या नेतृत्वाला एक नवीन दिशा मिळेल. असे मत पाटील यांनी व्यक्त केले. ओबीसी समाजाच्या तरुणांमध्ये बेरोजगारीच्या वाढत्या प्रमाणामुळे प्रचंड नैराश्य पसरल्याचे चित्र आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहचल्या नाहीत. काही तथाकथित नेत्यानी आरक्षणाच्या मुद्दयावर ओबीसी विरोधात मराठा असा संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न केला. पंरतु, आता राज्यातील ओबीसी-मराठा बहुजनांना भासणारी सक्षम नेतृत्वाची पोकळी जरांगे पाटीलच भरू शकतात, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

 सायन-पनवेल महामार्ग व ठाणे-बेलापूर मार्गाची सखोल स्वच्छता

   5500 हून अधिक नागरिक सहभागातून नवी मुंबई : नवी मुंबई हे दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे शहर असून सायन पनवेल महामार्ग हा अत्यंत महत्वाचा व वर्दळीचा रस्ता शहरातून जातो. या महामार्गाचे…

 मुंबईच्या ज्येष्ठा पवारला तीन सुवर्णपदके

 इन्ड्युरन्स वर्ल्ड फेडरेशन आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धा मुंबई: थायलंड येथे झालेल्या इन्ड्युरन्स वर्ल्ड फेडरेशन आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत लोअर परळच्या (मुंबई) सहा वर्षीय ज्येष्ठा शशांक पवारने तीन सुवर्णपदकांची कमाई केली. या स्पर्धेत…

 महाराष्ट्राचा महिला खो-खो संघ स्पर्धेसाठी रवाना

 पश्चिम विभागीय अस्मिता खेलो इंडिया लीग मुंबई : पश्चिम विभागीय अस्मिता खेलो इंडिया खो- खो स्पर्धेच्या महाराष्ट्र महिला संघाचा निरोप समारंभ सरस्वती स्पोर्ट्स क्लबच्या वतीने मुंबई येथे पार पडला. हा…

माहिती तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ट वापरासाठी महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई : माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे वीज ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देणे आणि दर्जेदार ग्राहक सेवेसाठी प्रभावी धोरणात्मक उपक्रम राबविल्याबद्दल महावितरणला द गव्हर्नन्स नाऊ या संस्थेतर्फे दोन प्रवर्गात राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान…

देशाच्या संसदीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस समितीच्या अध्यक्षपदी सुनिल तटकरे

मुंबई : देशाच्या संसदीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांची निवड झाली असून याबाबत त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. देशात सर्वाधिक…

 वक्तृत्व व निबंध प्रत्येक स्पर्धेत

 विद्यार्थ्यांनी मांडले स्वच्छता विचार   नवी मुंबई : स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असल्याने स्वच्छतेची सवय लागणे महत्वाचे आहे हे लक्षात घेत नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई शहराचे भविष्य असणा-या नव्या पिढीच्या मनावर स्वच्छताविषयक विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थीदशेपासूनच स्वच्छतेचे संस्कार रूजविले जात आहेत. या माध्यमातून शहराचे भविष्य स्वच्छ व सुरक्षित केले जात आहे. त्यानुसार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणा-या ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यामध्ये नमुंमपा शिक्षण विभागाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्या नियंत्रणाखाली शालेय स्तरावर विविध स्पर्धात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. या अनुषंगाने नुकत्याच महापालिका शाळांप्रमाणेच खाजगी शाळांमध्येही वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत आपले विचार मांडले. वक्तृत्व व निबंध स्पर्धेकरिता स्वच्छतेशी संबंधित विषय देण्यात आले होते. ज्यामध्ये इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांकरिता महात्मा गांधी, संत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज यापैकी एक विषय निवडण्याचा पर्याय होता. त्याचप्रमाणे इ.सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता माझ्या स्वप्नातील शहर, स्वच्छतेतून समृध्दीकडे यापैकी एक विषय निवडायचा होता. तसेच इ.नववी – दहावी गटाकरिता ऊठ तरूणा जागा हो – स्वच्छतेचा धागा हो आणि स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता यापैकी एक पर्याय निवडण्याचे सूचित केले होते. या विषयांच्या अनुषंगाने वक्तृत्व स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या 57 प्राथमिक, 23 माध्यमिक शाळांप्रमाणेच खाजगी 333 शाळांतील 10 हजार 512 विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपले स्वच्छताविषयक विचार मांडले. निबंध स्पर्धेतही नवी मुंबई महानगरपालिकेच्या 57 प्राथमिक, 23 माध्यमिक शाळांसोबत खाजगी 333 शाळांतील 10 हजार 426 विद्यार्थ्यांनी सहभागी होत आपले स्वच्छता विचार शब्दांकित केले. विद्यार्थी म्हणून आपण स्वच्छता कार्यात कसे योगदान देऊ शकतो याचा विचार या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वतीने अविष्कृत झाला. या स्पर्धांची तयारी करताना विद्यार्थ्यांसह त्यांचे शिक्षक व पालकही स्वच्छतेशी निगडीत स्पर्धेतील विषयांच्या अनुषंगाने स्वच्छतामय झाल्याचे चित्र शाळांमधून तसेच स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांच्या घरांमधून बघावयास मिळाले. या स्पर्धांमधून केंद्रनिहाय प्रत्येक गटातून एका विद्यार्थ्याची निवड करण्यात आली असून निबंध स्पर्धेतील 30 व वक्तृत्व स्पर्धेतील 30 अशा बक्षिसपात्र विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. या दोन्ही स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयी बारकाईने विचार केला व तो मांडला हे या स्पर्धा उपक्रमाचे यश असून याव्दारे नवी मुंबईतील घराघरांत स्वच्छतेचा संदेश विद्यार्थ्यांमार्फत प्रसारित झाला. ००००

 महिलांनी आपले बँकखाते आधारकार्डशी संलग्न करण्याचे आवाहन

 ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत अर्ज केलेल्या मुंबई :‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’या योजनेअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिलांनी अर्ज सादर केले आहेत. ज्या महिलांचे अर्ज पात्र असलेबाबत त्यांना भ्रमणध्वनीवर संदेश (SMS) प्राप्त झाले आहेत. परंतू अद्यापपर्यंत योजनेचा लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही, अशा महिलांनी आपले बँक खाते आधारकार्डशी संलग्न (आधारसीडेड) असल्याची त्वरित खात्री करून घ्यावी आणि आधार संलग्न केलेले नसल्यास संबंधित बँकेत जावून बँक खाते आधारकार्डशी संलग्न करण्याची कार्यवाही त्वरित करून घ्यावी, असे नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात येत आहे. ००००

ई – वेस्ट संकलन मोहीम नागरिकांच्या उत्तम प्रतिसादाने यशस्वी

 थ्री आर सेंटर्समधील कपडे संकलन मोहीम तसेच नवी मुंबई : ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीमेत ‘थ्री आर’ संकल्पनेनुसार उपक्रम राबविण्याकडेही विशेष लक्ष देत आज ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियान अंतर्गत नमुंमपा…