Category: मुंबई

Mumbai news

विश्व पॉवरलिफ्टिंग स्पर्धा

प्रेरणा, सेजल, रोशनची निवड मुंबई : येत्या २८ ऑगस्टपासून माल्टा येथे सुरु होणाऱ्या विश्व पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी प्रेरणा साळवी, सेजल मकवाना, रोशन गावकर या तीन महाराष्ट्राच्या खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली आहे. रोशन १०५, प्रेरणा ७६ व सेजल ६३ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करतील. पतियाळा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत रोशन ने रौप्य पदक पटकावले होते. कलकत्ता येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रेरणा ला कांस्य पदक मिळाले. याच स्पर्धेत सेजलने ११२.५ किलो वजन उचलून बेंचप्रेसमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम साजरा केला. रोशन १४ वीत तर प्रेरणा १५ वीत शिकत आहेत. सेजल बीपीएड करत आहे. रोशन, प्रेरणा हे दोघे चेंदणी कोळीवाडा, ठाणे (पूर्व) येथील “युनायटेड क्लब”चे खेळाडू आहेत. रोशन, प्रेरणाचे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अनंत चाळके प्रशिक्षक आहेत. सेजल जोगेश्वरी (पूर्व) येथील “टू पॉवर जिम” मध्ये सराव करते. संकेत चव्हाण यांचे मार्गदर्शन सेजलला मिळत आहे. संजय सरदेसाई, सतीश पाताडे, सुरेश गद्रे यांनी विश्व स्पर्धेसाठी प्रेरणा, सेजल आणि रोशन या तिघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

स्नेहांकित हेल्पलाईनची अंध शिक्षण परिषद मुंबईत

रमेश औताडे मुंबई :विशेष अंध शाळांकरिता व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी स्नेहांकित हेल्पलाईन या सामाजिक संस्थेमार्फत मार्फत नवीन शिक्षण पद्धती या विषयावर परिषद आयोजित केली आहे.अशी माहिती मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेच्या अध्यक्षा परिमला भट यांनी दिली. सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत शिक्षकांकरिता नवीन शिक्षण पद्धती कशी लागू करता येईल याबाबत चर्चासत्र व सूचना या परिषदेच्या माध्यमातुन शासनास सादर करण्यात येणार आहेत. नेहांकित हेल्पलाईन ही संस्था मागील २३ वर्षांपासून अंध युवकांना शैक्षणिक क्षेत्रात विविध स्तरावर मार्गदर्शन करत आहे. विलेपार्ले पूर्व मुंबई येथे महाराष्ट्रातील विविध अंध शाळांकरिता व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत शिक्षकांकरिता परिषद २५ ऑगस्ट रोजी उत्कर्ष मंडळ हॉल, विलेपार्ले पूर्व, मुंबई येथे होत आहे. माधव गोरे व योगेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन शैक्षणिक धोरण, त्याची ओळख व ते अंधांकरिता कसे राबविता येईल याबाबत एक सत्र आहे. विविध क्षेत्रातील जाणकार व अनुभवी आपले अभ्यासपूर्वक विश्लेषण करणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरण हे सर्वसमावेशी असून यात प्रत्येक टप्प्यावर विविध शाळांमध्ये कशा पद्धतीने कामकाज करावे याबाबत माहिती मिळणार आहे . नवीन धोरण अंधशाळांकरिता देखील शासनाने लागू करावे. तसेच स्नेहांकित हेल्पलाईन या संस्थेमार्फत अभ्यासपूर्वक  सर्व शाळांच्या सहमतीने प्रस्ताव या परिषदेत सादर करण्यात येणार आहे.असे डॉ माधव गोरे यांनी सांगितले.

वीज कंत्राटी कामगारांचा ‘इशारा मोर्चा’

रमेश औताडे मुंबई : भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने वेतनवाढ व हरियाना सरकार प्रमाणे वीज उद्योगात कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार मिळावा या व अन्य प्रमुख मागण्यासाठी राज्यभरातून सुमारे चार हजार वीज कंत्राटी कामगारांनी मोर्चा काढला. सरकारने जर आता गांभीर्याने लक्ष दिले नाही तर आझाद मैदानात बेमुदत आंदोलन करू असा इशारा संघटनेचे अध्यक्ष सचिन मेंगाळे यांनी दिला. ऊर्जामंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी सुनील मित्रा यांना निवेदन दिले आहे. त्यांनी निवेदनात दिलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करावा. सरकारने संघटने सोबत सकारात्मक चर्चा करून कायमस्वरूपी तोडगा काढावा व जो पर्यंत ऊर्जामंत्री भेटून ठोस तोडगा काढत नाही तो पर्यंत कामगार आंदोलनातून घरी जाणार नाहीत असा इशारा त्यांनी दिला. कंत्राटी कामगार व कायम कामगार यांच्या कामात काही फरक नाही. मात्र वेतनात फरक का ? कंत्राटी कामगार कायम करा म्हणून न्यायालय वारंवार आदेश देत असते तरीही सरकार अंमलबजावणी करत नाही त्यामुळे यापुढचे आंदोलन बेमुदत असेल असे सचिन मेंगाळे यांनी सांगितले.

भायखळा येथील कारागृहात संत रामपाल जी महाराज यांचा सत्संग

मुंबई-  मुंबईतील भायखळा जिल्हा पुरुष कारागृह आणि महिला कारागृहात 24 ऑगस्टला संत रामपाल जी महाराज यांच्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले. हा सत्संग प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखवण्यात आला होता, दोन्ही कारागृहातील बंदींसाठी…

दहीहंडीला पावसाची दांडी !

मुंबई : येत्या २५ ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याची हवामान खात्याची माहिती आहे. त्यामुळे यंदाची दहीहंडी ही पावसाशिवाय होणार आहे. नेमक्या दहीहंडीच्या दिवशी पाऊस दांडी मारणार आहे. येत्या २६ ते…

बदलापुरच्या शाळेचे संचालक मंडळ बरखास्त; प्रशासकाची नेमणूक

अत्याचाराची घटना घडलेल्या बदलापुरच्या शाळेवरील संचालक मंडळ शासनाने बरखास्त केले आहे. तसेच या शाळेवर आता प्रशासकाची नेमणूक करण्यात आली असून उपशिक्षणाधिकारी कुंदा पंडित यांनी पदभार सांभाळला आहे.  चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणानंतर शाळा प्रशासनाने…

उद्धव ठाकरेंचा सदावर्तेंवर निशाणा

खरंतर याचिकाकर्त्याने या कारणासाठी कोर्टात जायला नको होतं. जिथे आई बहि‍णींचा विषय येतो तिथे त्यांनी संवेदनशील व्हायला हवं होतं. आता उद्या जर कुणावर अत्याचार झाला तर त्याची जबाबदारी याचिकाकर्ते आणि…

बंद मागे, आंदोलन सुरू हाताची घडी, तोंडावर काळी पट्टी

न्यायालयाचा आदर राखत महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद मागे ० आता राज्यभरात निषेध आंदोलने    मुंबई  : बदलापुरमधिल शाळेत चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधात शनिवार दिनांक २४ मार्च रोजी पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद न्यायालयाच्या…

 फेरीवाल्यांवर आणि वाहनांवर कारवाई

दक्षता पथक मार्फत अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नेरुळ विभागाअंतर्गत नेरुळ स्टेशन व सेक्टर-20 येथील गुडविल कॉर्नर येथे पदपथावर अनधिकृतरित्या व्यवसाय करणाऱ्या तसेच बेवारसपणे वाहन पार्किंग करणारे तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या पंधरा हातगाडी, तीन टेम्पो व एक रिक्षा इत्यादींवर सदर मोहिमेअंतर्गत अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालयातील केंद्रीय अतिक्रमण्‌ दक्षता पथक मार्फत पदपथावर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर हटविण्याची व सामान जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेले सामान कोपरखैरणे क्षेपणभुमी येथे जमा करण्यात आलेले आहे. सदर कारवाईसाठी अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी, तेरा मजूर, तीन टोईंग, तीन पिकअप, एक आयशेर, अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक समवेत सुरक्षारक्षक उपस्थित होते. यापूढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

 11 लाख ‘लखपती दिदींना’ प्रधानमंत्री यांच्याकडून प्रमाणपत्र

जळगावात 25 ऑगस्ट रोजी सोहळा   मुंबई  : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 25 ऑगस्टला महाराष्ट्राच्या दौ-यावर येत आहेत. या दौ-या दरम्यान  जळगाव येथे 11 लाख दिदींनी केलेल्या यशस्वी कामगिरीचा सन्मान म्हणून श्री.मोदी त्यांचा सत्कार  करतील. ज्या कष्टाळू महिलांनी स्व:बळावर वर्षाकाठी  एक लाखाहून अधिक रुपये कमावले आहेत व त्यांनी त्यांच्या  कुटुबांला  हातभार लावत, कुंटुंबीयाना  गरिबीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यात  मदत करुन, समाजात एक आदर्श निर्माण केला आहे, अशा लखपती दिदींचा प्रधानमंत्री .मोदी सन्मान करतील, अशी माहिती केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमात प्रधानमंत्री 2500 कोटी रुपयांचा सामुदायिक गुंतवणूक निधी आणि 5000 कोटी रुपयांचे बँक कर्ज जाहीर करणार असल्याचे श्री चौहान यांनी सांगितले. यामुळे 4.3 लाख बचत गटांच्या 48 लाख सदस्यांना तसेच 2.35 लाख बचत गटांच्या 25.8 लाख सदस्यांना लाभ होईल. चौहान यांनी सांगितले की, ग्रामीण विकास मंत्रालयाने यापूर्वीच 1 कोटी लखपती दीदी तयार केल्या आहेत आणि आगामी 3 वर्षांत 3 कोटी लखपती दिदींना तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या कार्यक्रमामध्ये 34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील जिल्हा मुख्यालये आणि सीएलएफ दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होतील. 15 लाख नवीन लखपती दिदींची यादी राज्यनिहाय उपलब्ध असून यात महाराष्ट्रातील 1,04,520 लखपती दिदींचा समावेश आहे. ००००