Category: मुंबई

Mumbai news

अंबानीचे कर्ज माफ करू शकता, मग सर्वसामान्यांचे का करत नाही ?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल रमेश औताडे मुंबई : मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी यांचे ५ हजार कोटी कर्ज माफ करणारे सरकार सर्वसामान्य जनतेला फक्त आश्वासनांचे गाजर दाखवत आहे. कर्जमाफी दूरच मात्र दिलेली आश्वासनही पाळत नाही. तीन महिन्यात माहाविकास आघाडीचे सरकार आले की सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणार. असे आश्वासन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी आझाद मैदानात आंदोलनकर्त्यांना दिले. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात राज्य परिवहन कामगार, अंगणवाडी, आशा सेविका, गट प्रवर्तक, बचत गट प्रशिक्षण देणारे उमेद चे कामगार, शिक्षक, असे अनेक घटक आपल्या मागण्या घेऊन आले आहेत. सर्वांनी आप आपले मंडप टाकले आहेत. नाना पटोले प्रत्येक मंडपात जाऊन आश्वासने देत टाळ्या घेत आहेत. भर पावसात चिखल झाला आहे. माश्या घोंगावत आहेत. मेट्रो चे बांधकाम व मुलांचा क्रिकेट सराव सुरू असल्याने मैदान अपुरे पडत आहे. त्यामुळे दाटीवाटीने आंदोलनकर्ते एकच गर्दी करून मैदानात आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आले आहेत. अधिवेशन जस जसे संपत जाते तस तसे आंदोलनकर्ते गर्दी करत असतात. आता या सरकारचे काही खरे नाही. त्यामुळे मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलनकर्ते राज्यभरातून आले आहेत. सरकारच्या विरोधात तीव्र घोषणा देत महिला आक्रमक झाल्या होत्या. पिण्याच्या पाण्याच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे मैदानात महिलांनी आणलेल्या पिण्याच्या पाण्याच्या  बाटल्यांचा खच पडला होता. सरकारने आता आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आगामी निवडणुकीत मतपेटीतून आम्ही काय करू ते कळेलच असा इशारा यावेळी दिला.

मला एक रुपयाचाही निधी दिला नाही-आव्हाड

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने आजपर्यंत मला एक रुपयांचा निधी दिलेला नाही. मी अजित पवारांच्या पीएला १०० वेळा फोन केले, पण त्यांनी मला भेटीची वेळही दिली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे…

मराठा आरक्षणावरील सुनावणी पाच ऑगस्टपर्यंत तहकूब

आयोगाला 3 आठवडे मुदतवाढ मुंबई :  राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या १० टक्के आरक्षणाची कायदेशीर लढाई सुरू असून आज मुंबई उच्च न्यायालयात याबाबत सुनावणी झाली. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर सरकारच्यावतीने राज्य मागास आयोगाकडून बाजू…

आयएएस पुजाचा बोगसपणा उघड ?

मुंबई : अपंग असल्याचा बोगस दाखला देतानाचा ओबीसीचेही बोगस प्रमाणपत्र दाखल करीत आयएएस बनल्याचा पुजा खेडेकर यांच्यावर आरोप होत असून त्याची गंभीर दखल घेतली गेली आहे. अपंग असल्याचा बनावट दाखला देऊन कलेक्टर झालेल्या…

वरळी हिट अँण्ड रनप्रकरणी आरोपी मिहीरला ७ दिवसांची पोलिस कोठडी

मुंबई : वरळी हिट अॅड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने सात दिवसांची म्हणजेच येत्या १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात अधिक तपास करायचा असून अपघात ज्या गाडीने…

आरक्षणप्रश्नी सरकारच्या मंत्र्यांमध्येच एकवाक्यता नाही: नाना पटोले

मुंबई  : राज्यात आरक्षणाचा प्रश्न गंभीर होण्यास महायुती सरकारच जबाबदार आहे. सरकारने २०१४ पासून मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले आहे. केंद्रात व राज्यातही भाजपाचे सरकार आहे, त्यांची इच्छाशक्ती असती तर त्यांनी आरक्षण दिले असते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी…

अदानी विरोधात आज काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा

मुंबई  : महागाईने जनता त्रस्त असताना महायुती सरकारने वीज दर वाढ करुन जनतेचे कंबरडे मोडले आहे. ही दरवाढ केवळ ७ टक्के असल्याचा सरकारचा दावा असला तरी प्रत्यक्षात मात्र ही दरवाढ ३० टक्के आहे. एवढी…

आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधिमंडळात गदारोळ

कामकाज दिवसभरासाठी तहकूब   गदारोळात ९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या  मंजूर मुंबई   :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर काल  बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीस महाविकास आघाडीने बहिष्कार टाकल्यानंतर बुधवारी महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही…

आमदार ‘पक्ष’कैदेत

० विधान परिषदेसाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी ० आमदारांवर हॉटेलच्या सीसीटीव्हीची नजर ० मतदान होईपर्यंत आमदारांचा मुक्काम पंचतारांकीत हॉटेलमध्ये स्वाती घोसाळकर मुंबई: विधान परिषदेच्या मतदानाआधी सावधगिरीचा उपाय म्हणून प्रत्येक पक्षाने आपल्या आमदांराना…

वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टचे वैद्यकीय पथक वारीत

मुंबई : वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट, मुंबई या संस्थेच्या आतापर्यंतच्या आषाढी व कार्तिकीवारीत वैद्यकीय सेवा देणाऱ्या अलौकिक कार्याचा गौरव केला. या वारीत संस्थेचे २५० कार्यकर्ते व डॉक्टर रुग्णवाहिका, औषधांच्या…