Category: मुंबई

Mumbai news

फाशीची शिक्षा झालेल्या तरुणाच्या वर्तनाबाबतचा अहवाल सादर करा

 उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश   मुंबई : आईची हत्या करून तिचे अवयव भाजून खाल्ल्याप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या तरुणाचा मानसिक आणि मानसशास्त्रीय अहवाल तसेच त्याच्या वर्तनाबाबतचा प्रोबेशन अधिकाऱ्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. सुनील कुचकोरवी याला आईची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी २०२१ मध्ये कोल्हापूर येथील सत्र न्यायालयाने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा कायम करण्याचे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल आहे. याशिवाय, सुनील यानेही शिक्षेविरोधात अपील दाखल केले आहे. त्यावरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, २८ ऑगस्ट २०१७ रोजी कोल्हापूर शहर येथील माकडवाला वसाहतीत आईसह राहणाऱ्या सुनील याने तिची निर्घृण हत्या केली. नंतर त्याने मृतदेहाचे तुकडे केले आणि ते तव्यावर भाजून खाल्ले. सुनील याने दाखल केलेल्या अपिलावर सुनावणी झाली होती.

नेरूळ सेक्टर 15 येथील फकिरा मार्केटमध्ये विशेष स्वच्छता मोहीम

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने “स्वच्छ सर्वेक्षण 2024” अंतर्गत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या पुढाकाराने अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व उपआयुक्त डॉ. अजय गडदे…

पत्रकारांच्या कल्याणासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर महामंडळाची स्थापना करा

ज्येष्ठ विधिज्ञ नितीन सातपुते यांची मागणी   मुंबई : न्यायमूर्ती काही वर्षांपुर्वी आपल्यावरील दबावाविरोधात आंदोलनाला बसले होते, खाजगी डॉक्टर्स आपल्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरले तसेच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने आपल्या आर्थिक, राजकीय,…

‘लोकाधिकार’चे माजी कार्याध्यक्ष अरुण गावकर यांचे निधन

आज परळमध्ये शोकसभा होणार   मुंंबई : भविष्य निर्वाह निधी स्थानिय लोकाधिकार समितीचे माजी कार्याध्यक्ष, ज्येष्ठ शिवसैनिक आणि वांद्रे येथील भविष्य निर्वाह निधी संघटना कार्यालयातील निवृत्त सेक्शन सुपरवायझर अरुण भिकाजी…

सरकार मराठ्यांवर शंभर टक्के अन्याय करणार- मनोज जरांगे

जालना : सरकारकडून मराठ्यांवर शंभर टक्के अन्याय होणार आहे, हे आम्हाला दिसत आहे. त्यामुळं आता आम्ही ताकतीने उठाव करणार असल्याचे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं. मंत्री शंभूराज देसाई यांच्या शब्दाखातर १३ जुलैपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत असे मनोज जरांगे म्हणाले. १३ जुलैपर्यंत…

हे खोके सरकारच्या निरोपाचे अधिवेशन-  उद्धव ठाकरे

मुंबई  :  राज्यातील 4 विधानपरिषद निवडणुकांसाठी आज मतदान पार पडले. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक पार पडत असून याच विधानपरिषदेच्या मतदानासाठी आज उद्धव ठाकरे यांनी कुटुंबीयांसोबत मतदान केले. यावेळी, उद्यापासून सुरू होणाऱ्या…

वंचितचा पुन्हा एकला चलो रे

 २८८ जागांवर स्वबळाच्या दृष्टीने चाचपणी अकोला : आगामी विधानसभेसाठी वंचितने पुन्हा एकदा एकला चलो रेचा नारा दिला आहे.  राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या स्वबळाच्यादृष्टीने चाचपणी केली जात आहे. प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय इच्छुकांकडून पक्षाने अर्ज मागवले…

सर्वाधिक पेपरफुटी उद्धव ठाकरेंच्या काळात-फडणवीस

मुंबई :  सर्वात जास्त पेपरफूट ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली आहे. जवळपास सर्वच परीक्षांमध्ये ही पेपरफूट झाली होती, आणि ते आम्हाला प्रश्न विचारत आहेत. या अधिवेशनात आम्ही ज्या परीक्षा घेण्यात आल्या, त्याचा लेखाजोखा मांडणार आहोत…

आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 

सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार मुंबई  : आगामी विधानसभेपुर्वीचे शेवटचे पावसाळी अधिवेशन यंदा वादळी ठरणारी आहे. लोकसभेच्या निवडणूकीतील विजयामुळे महाविकास आघाडीचा विश्वास दुणावला आहे. तर सत्ता स्थापनेपासून विशेषता शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर…

मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक भवनात पाण्याची चणचण

मुंबई : परीक्षेसंबंधित विविध गोंधळांमुळे मन:स्ताप सहन करणारे मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी सध्या पाण्याच्या तुटवड्यामुळे त्रस्त आहेत. कलिना संकुलाजवळ असणाऱ्या सांस्कृतिक भवनात पाण्याचा तुटवडा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी यंत्रेही बंद आणि प्रसाधनगृहांसह इतर ठिकाणी अस्वच्छता असल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. तर इमारतीत डागडुजीचे काम सुरू असल्यामुळे धुळीच्या साम्राज्याने विद्यार्थी त्रस्त आहेत. कलिना संकुलाजवळ असणाऱ्या सांस्कृतिक भवनाच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावर नाट्यशास्त्र विभाग, दुसऱ्या मजल्यावर संगीत विभाग, तिसऱ्या मजल्यावर लोककला अकादमी आणि चौथ्या मजल्यावर शाहीर अमरशेख अध्यासन केंद्र आहे. मात्र, बाहेरून प्रशस्त व चकचकीत दिसणारी ही इमारत आतून विविध सोयी-सुविधांपासून वंचित आहे. कलेचे धडे गिरवण्यासाठी सांस्कृतिक भवनात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याच्या तुटवड्यामुळे हाल सोसावे लागत असून बाटलीबंद पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. तसेच, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी यंत्रेही बंद आहेत आणि प्रसाधनगृहांमध्ये हात धुण्यासाठीही पाणी नसल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. अनेकदा टँकरने पाणीपुरवठा केला जातो, मात्र टँकरचे पाणीही अपुरे पडते. तसेच, सांस्कृतिक भवनाच्या इमारतीत डागडुजीचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे सर्वत्र धूळ व मातीचे साम्राज्य पसरून विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. प्रसाधनगृहांमध्येही अस्वच्छता असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते अशी भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. कोट सांस्कृतिक भवनातील गैरसोयींबाबत अद्याप कोणत्याही विद्यार्थ्याने तक्रार केलेली नाही. काही अडचणी असल्यास विद्यार्थ्यांनी संबंधित विभाग व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात, प्रशासनाकडून तात्काळ सुधारणा करण्यात येईल. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. डॉ. बळीराम गायकवाड, कुलसचिव, मुंबई विद्यापीठाचे प्रभारी ०००००