Category: मुंबई

Mumbai news

‘पिपाणी’विरोधात शरद पवारांची निवडणूक आयोगात धाव

मुंबई :  लोकसभा निवडणूकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले होते तर जाणीवपुर्वक नुसती तुतारीही अपक्ष उमेदवाराला दिल्यामुळे साताराची जागा गमवावी लागली होती. लोकसभेतील चिन्हाचा हा घोळ…

दोन दिवसात रोहीत पवारांचा मोठा धमाका

मुंबई: विधानसभेचे पडघम राज्यात वाजू लागलेत. आरोप प्रत्यारोपांना सुरवात झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहीत पवार यांनी येत्या दोन दिवसात मोठा धमाका करणार असल्याचे सुतोवाच केल्याने राजकीय वर्तुळात त्याची…

जितेश कदमची अपयशी झुंज

एमसीएफ राज्य कॅरम स्पर्धा मुंबई : रोटरी क्लब ऑफ बोरिवलीच्या सहकार्याने एम सी एफ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बोरिवली ( पश्चिम ) येथे सुरु एम सी एफ ९ व्या राज्य मानांकन कॅरम…

हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी ‘ऑप्टा’ उपक्रम

असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाचा पुढाकार मुंबई : भारतात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण अन्य देशांच्या तुलनेत २० ते २५ टक्के अधिक आहे. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीची प्रक्रिया असलेल्या अंजायनाला नियंत्रित केल्यास हे प्रमाण कमी होऊ शकते ही बाब लक्षात घेऊन डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘दी असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया’ने (एपीआय) अंजायनाला रोखण्यासाठी ‘ऑप्टा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत हृदयाशी संबंधित त्रास होत असल्याची तक्रारी असलेल्या रुग्णावर अंजायनावरील प्राथमिक उपचार करण्याचे डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. छातीत दुखणे, चालायला त्रास होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, शरीराच्या विविध भागात दुखणे अशा त्रासांकडे नागरिक व डॉक्टर दुर्लक्ष करतात. ही लक्षणे हृदयविकारापूर्वी असलेल्या अंजायनाची असतात. त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याची परिणीती हृदयविकाराच्या झटक्यामध्ये होते. त्यामुळे हृदयाशी संबंधित धोके कमी करण्यासाठी आणि रुग्णांना अधिक चांगले आरोग्य मिळावे यासाठी अंजायनाचे लवकरात लवकर निदान व्हावे यासाठी ‘एपीआय’ने प्रथमच अंजायना सप्ताहाचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर ‘ऑप्टिमल ट्रीटमेंट ऑफ अंजायना (ऑप्टा) : द नीड ऑफ दि अवर’ हा उपक्रम हाती घेतला आहे. यात आजाराचे वेळीच निदान होण्यासाठीचा कृती आराखडा तयार केला असल्याची माहिती एपीआयचे महासचिव डॉ. अगम व्होरा यांनी दिली. अंजायनाची समस्या लवकरात लवकर ओळखून त्यावर उपचार सुरू करणे, हृदयविकार बळावण्याची प्रक्रिया संथ करणे, हृदयविकाराचा धोका कमी करणे तसेच औषधावर होणारा अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी ‘ऑप्टा’ हा महत्त्वाचा उपक्रम आहे. ऑप्टा पडताळणी सूची, ऑप्टा प्रश्नावली आणि ऑप्टा दृष्टीकोन अशा तीन प्रक्रिया ‘एपीआय’ने विकसित केल्या आहेत. त्याच्या योग्य अंमलबजावणीने अंजायना व पर्याययाने हृदयविकाराचा झटका रोखणे शक्य होणार असल्याचे एपीआयचे अध्यक्ष डॉ. मिलिंद नाडकर यांनी सांगितले. दुर्लक्षित असणाऱ्या अंजायनाबाबत जागरुकता निर्माण करणे आणि देशातील डॉक्टर आणि हृदयविकार तज्ज्ञांच्या माध्यमातून हा उपक्रम अधिक सक्षमपणे राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हृदयविकाराच्या आजारांशी संबंधित मृत्यूंच्या बाबतीत भारत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. दरवर्षी हृदयविकाराने मृत्यू होणाचे प्रमाण पुरुष व स्त्रियांमध्ये अनुक्रमे २०.३ टक्‍के आणि १६.९ टक्‍के इतके आहे. त्यामुळेच अंजायनाकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. भारतीयांमध्ये बरेचदा अंजायनाच्या सर्वसाधारण लक्षणांपेक्षा वेगळी लक्षणे दिसून येतात. ज्यांच्यामुळे अचूक निदान करण्यामध्ये अडथळे येऊन डॉक्टरांकडून लक्षणांपासून आराम मिळण्यासाठीची औषधे दिली जातात. त्यामुळे हा धोका अधिकच वाढत आहे. हा धोका कमी करण्यासाठी ‘ऑप्टा’ उपक्रमांतर्गत माहिती घेत रुग्णांना सर्वात प्रथम ॲस्पिरीन हे औषध देणे कधीही सोयीस्कर असल्याचे ज्येष्ठ हृदयविकार तज्ज्ञ डॉ. व्ही. टी. शाह यांनी सांगितले.

कर्मचारी कामावर वेळेवर येत असल्याची खात्री करून घ्या – डॉ. कैलास शिंदे

अशोक गायकवाड   नवी मुंबई : अधिकारी, कर्मचारी यांची कार्यालयातील उपस्थिती वेळेवर असणे अनिवार्य असल्याचे नमूद करीत प्रत्येक विभागप्रमुखाने त्यांच्या अधिनस्त कर्मचारी कामावर वेळेवर येत असल्याची खात्री करून घ्यावी असे स्पष्ट निर्देश नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले. नवी मुंबई महानगरपालिकेचा कारभार लोकाभिमुख व गतीमान होण्यासोबतच कार्यालयीन शिस्तीवरही नमुंमपा आयुकत्‍ डॉ. कैलास शिंदे यांचे बारकाईने लक्ष असून आज त्यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता मुख्यालयातील सर्व विभागांना अचानक भेट देत पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्या समवेत प्रशासन विभागाचे उप आयुक्त्‍ शरद पवार उपस्थि होते. यावेळी आयुक्तांनी अधिकारी, कर्मचारी यांची कार्यालयातील उपस्थिती वेळेवर असणे अनिवार्य असल्याचे नमूद करीत प्रत्येक विभागप्रमुखाने त्यांच्या अधिनस्त कर्मचारी वेळेवर येत असल्याची खात्री करून घ्यावी असे स्पष्ट निर्देश दिले. कार्यालयातील नस्ती व कागदपत्रे शासकीय नियमावलीनुसार कपाटांमध्ये ठेवलेले असावेत याची विशेष दक्षता घेण्यात यावी व विभागप्रमुखांनी त्यांच्या विभागात त्या पध्दतीने अंमलबजावणी होत असल्याची खातरजमा करुन घ्यावी असेही आयुक्तांनी निर्देश दिले. मुख्यालयातील प्रत्येक विभागात नागरिक मोठया संख्येने भेटी देत असल्याने सौंदर्याला बाधा पोहचणार नाही अशा प्रकारे स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानाचे संदेश प्रसिध्दी करण्यात यावेत असेही आयुक्तांनी सूचित केले.यावेळी स्वच्छतागृहांचीही तपासणी करुन आणखी सुधारणा करण्याच्या सूचना करतानाच वॉटर कुलरची अंतर्गत स्वच्छता तसेच त्याच्या आजुबाजूच्या परिसराची स्वच्छता नियमीतपणे होत राहील याकडे काटेकोर लक्ष देण्याचे निेर्देश देण्यात आले. सीसीटिव्ही कंट्रोल रुममधील अंतर्गत व्यवस्थापनामध्ये अधिक सुसूत्रता आणण्याचे निर्देशित करीत त्या ठिकाणची माहिती त्वरीत उपलब्ध्‍ होण्याच्या दृष्टीने कार्यप्रणाली सक्षम करावी असे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले.आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष कायम सतर्क असायला हवा. तसेच त्या ठिकाणी नागरिकांमार्फत येणारे संदेश दिनांक व वेळेसह अचूक टिपून घेतले जाऊन ते ज्या विभागाशी संबंधित आहेत त्या विभागांना त्वरीत सूचना देऊन त्यावरील कार्यवाही ही नोंदवून ठेवण्याची कार्यप्रणाली काटेकोरपणे अंमलात आणावी असे आयुक्तांनी निर्देशित केले. कक्षातील हॉटलाईन व संपर्कासाठीच्या दूरध्वनी लाईन्स कायम कार्यान्वित राहतील याची विशेष दक्षता घेण्याचे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाप्रमाणेच विभाग कार्यालये व इतर कार्यालयांमध्येही अशा प्रकारची कार्यप्रणाली अंमलात आणावी असेही आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी निर्देशित केले. 0000

 नवीन इमारतींमध्ये ५० टक्के घरे मराठी लोकांसाठी आरक्षित ठेवा – ॲड अनिल परब

मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक परब यांनी विधानभवन सचिवालयाकडे अशासकीय विधेयक सादर केले   मुंबई : घरे नाकारल्यामुळे मराठी लोकांचे मुंबईतून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड अनिल परब यांनी अशासकीय विधेयक विधानमंडळ सचिवालयाकडे सादर केले आहे. मुंबईत बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांना ५० टक्के आरक्षित ठेवली पाहिजेत त्यामुळे मुंबईतील मराठी लोकांची टक्केवारी आणखी कमी होणार नाही, असे परब म्हणाले. परब यांनी या विधेयकाद्वारे मुंबईतील नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांना ५० टक्के आरक्षणासह घरे उपलब्ध करून देण्यासाठी कायदा करण्याची मागणी केली आहे. घरे आरक्षित ठेवण्याची जबाबदारी संबंधित विकासकाची राहील. विकासकाने तसे न केल्यास विकासकाला सहा महिने तुरुंगवास किंवा १० लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा यांची मागणी परब यांनी केली आहे. या विधेयकामागील उद्देश स्पष्ट करताना परब म्हणाले की, खाण्याचे प्राधान्य किंवा धर्माच्या नावाखाली मराठी लोकांना घरे नाकारण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. विकासकांकडून मराठी लोकांना जाणीवपूर्वक घरे नाकारली जात असल्याचे दिसून आले आहे. धर्म किंवा खाण्याचे प्राधान्य यावर आधारित कोणताही भेदभाव हा घटनाबाह्य आहे, असे परब म्हणाले. परब यांनी पुढे विलेपार्ले येथील एका बांधकाम व्यावसायिकाने मराठी लोकांना मांसाहार करत असल्यामुळे घरे नाकारल्याच्या घटनेचा संदर्भ दिला. विलेपार्ले येथील मराठी लोकांनी बिल्डरच्या विरोधात निदर्शने केली. परंतु, सरकारने या समस्येची दखल घेतली नाही. हा मुद्दा प्रसारमाध्यमांनी अधोरेखित केल्यानंतरच विकासकाने माफी मागितली, असे परब पुढे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मुंबईतील मराठी लोकांचा टक्का दिवसेंदिवस कमी होत आहे. 105 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्राला मुंबई मिळाली. मात्र आता मराठी माणसांना मुंबईत घरे नाकारली जात आहेत. मराठी माणसांना भाड्याने घरे मिळणेदेखील मुश्कील झाले आहे. त्यामुळे राज्यात बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांसाठी ५० टक्के घरे आरक्षित करण्यात यावीत. याबाबत तातडीने कायदा करण्याची गरज आहे, असे परब म्हणाले. राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या चार जागांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मविआचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघासाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. 00000

शिक्षण हक्क कायदयाचे अध्वर्यू राजर्षि छत्रपती शाहू महाराज’ – अभिजीत कांबळे

अशोक गायकवाड   नवी मुंबई : शिक्षणामुळेच माणसाचा उत्कर्ष होतो हा ठाम विश्वास ठेवत राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा क्रांतीकारी कायदा केला आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. त्याचाच विस्तार सर्वदूर झालेला असून छत्रपती शाहू महाराजांचा हा शैक्षणिक दृष्टीकोन आपण समजून घेतला पाहिजे व त्यांनी आखून दिलेली पायवाट अधिक व्यापक केली पाहिजे असे मत व्याख्याते, संपादक अभिजीत कांबळे यांनी व्यक्त केले. राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून से.१५ ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात ‘विचारवेध’ या व्याख्यान शृंखलेमध्ये ‘राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचे दूरदृष्टीचे शैक्षणिक विचार’ या विषयावर बीबीसी मराठीचे संपादक तथा व्याख्याते अभिजीत कांबळे यांनी श्रोत्यांशी संवाद साधत छत्रपती शाहू महाराजांच्या शैक्षणिक विचारांचे महत्व विशद केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण, वाचन, माहिती व ज्ञान यांना महत्व देणाऱ्या विचारांवर आधारित नवी मुंबई महानगरपालिकेने उभे केलेले हे स्मारक खऱ्या अर्थाने ज्ञानस्मारक असून येथील अतिशय संपन्न ग्रंथालय अभ्यासकांसाठी तसेच बाबासाहेबांचे विचार समजून घेण्यासाठी अतिशय उल्लेखनीय असल्याचे मत अभिजीत कांबळे यांनी नोंदविले. आपले महाराष्ट्र राज्य पुरोगामी असण्याचे मूळ शिक्षणात असून महात्मा फुले यांनी शिक्षणाला महत्व देत शाळा सुरु केल्या, शाहू महाराजांनी शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचा कायदा केला आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात तशी तरतूद केली हा आपला समृध्द वारसाच प्रगतीचे लक्षण असल्याचे त्यांनी म्हटले. राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या शैक्षणिक विचारांचा अभ्यास करताना पाच महत्वाचे मुद्दे जाणवले असे सांगत त्यांनी शाहू महाराजांनी राबविलेला मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा क्रांतीकारी कायदा, स्त्री शिक्षणासाठी सुरू केलेले उपक्रम व कायदे, तत्कालीन अस्पृश्य समाजाच्या विकासासाठी राबविलेले शैक्षणिक उपक्रम व कायदे, संस्थानाच्या अर्थसंकल्पात शिक्षणावरील खर्चाला सहा टक्के इतके दिलेले प्राधान्य तसेच वसतीगृहाच्या चळवळीमुळे गरजू व होतकरु मुलांना खुली झालेली शिक्षणाची दारे या पाच मुद्दयांच्या अनुषंगाने छत्रपती शाहू महाराजांचा शैक्षणिक दृष्टीकोन विविध उदाहरणे देत मांडला. शिक्षण हक्क कायदयाचे अध्वर्यू राजर्षि छत्रपती शाहू महाराज हे असून त्यांनी राबविलेली शैक्षणिक धोरणे, उपक्रम हे आजच्या काळालाही सुसंगत असून त्यांच्या शैक्षणिक विचारांचा उपयोग आजच्या काळात कसा करुन घेता येऊ शकतो या दृष्टीने विचारमंथन व्हायला हवे असे ते म्हणाले. शिक्षणामुळे सुजाण व चांगला माणूस घडू शकतो आणि शिक्षण हे समाजाला परस्परांशी सद्भावनेने रहायला शिकवते त्यामुळे शिक्षणाला सर्वाधिक महत्व देण्याची गरज असून त्यासाठी छत्रपती शाहू महाराजांच्या शैक्षणिक विकासाच्या नजरेतून पहायला हवे असे अभिजीत कांबळे यांनी स्पष्ट केले. नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आपल्या मनोगतात अडीच वर्षात अडीच लाखाहून अधिक नागरिकांनी व मान्यवरांनी स्मारकाला भेट देत येथील सुविधांची मुक्तकंठाने प्रशंसा केली असल्याचा आनंद व्यक्त करीत ‘विचारवेध’ या व्याख्यान शृंखलेच्या माध्यमातून महानगरपालिका सांस्कृतिक व वैचारिक परंपरा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. आत्तापर्यंत या व्याख्यानमालेत दिग्गज व्याख्यात्यांनी मौलिक विचारधन दिलेले असून व्याख्यानांना श्रोत्यांचाही उत्तम प्रतिसाद लाभतो याबद्दल आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. सदर व्याख्यानाप्रसंगी नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त शिरीष आरदवाड, उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे व किसनराव पलांडे, कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे, लेट्स रिड फाऊंडेशनचे प्रमुख प्रफुल्ल वानखेडे, सुधाकर सोनवणे, श्रीम.हेमांगी व अंकुश सोनावणे व इतर श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्ताधाऱ्यांनी राजकारण गलिच्छ केले – सुप्रिया सुळे

मुंबई : घरे फोडा, पक्ष फोडा, पैसे वाटा अशी कटकारस्थाने करीत सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राचे राजकारण अतिशय गलिच्छ केले आहे. महाराष्ट्राच्या जनतेने ५० खोके वाल्यांना केव्हाच रिजेक्ट केले. देवेंद्र फडणवीस आमच्या घरापाशी येऊन म्हणाले होते, पहिल्या पंधरा दिवसात…

अनेकांचे डोळे उघडण्याची गरज – राज ठाकरे

मुंबई : महाराष्ट्रात अनेकांचे डोळे उघडण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज ठाकरे यांनी केले आहे. मुंबईतल्या एका कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी हे विधान केलं आहे. त्यामुळे आता राज ठाकरे यांनी हे विधान नेमकं कोणाला उद्देषून केले…

“कितीही चिखल असला तरी वरळीत कमळ फुलू देणार नाही’’

आदित्य ठाकरेंचा विरोधकांना टोला मुंबई : लोकसभा निवडणूकीत वरळीतून कमी मताधिक्य मिळाल्याने आदित्य ठाकरे वरळी मतदार संघ सोडणार असे भाकीत शिंदे सेनेचे खासदर श्रीकांत शिंदे यांनी केले होते. यावर भाष्य करताना वरळीत कितीही…