Category: मुंबई

Mumbai news

अविनाश भोसलेंना जामीन मंजूर

मुंबई: येस बँक आणि डीएचएफएलच्या घोटाळ्यात अटकेत असलेल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले  यांना अखेर जामीन मंजूर झाला असून एक लाखांच्या जामीनावर त्यांची सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. अविनाश भोसले…

सीसीटीव्ही बंद झाले तरी ईव्हिएम मात्र सुरक्षित

मुंबई  : बारामती आणि शिरूर येथे ईव्हिएम ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रुममधिल सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डिसप्ले मॉनिटर बंद पडल्याच्या घटना आहेत.मात्र सीसीटीव्ही मॉनिटर बंद पडले असले तरी त्याचे रेकॉर्डींग अव्याहत यावेळी सुरू होते.तसेच स्ट्राँग रुमला तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था…

भावेश भिंडेला पोलिस कोठडी

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण मुंबई: घाटकोपर येथे होर्डींग कोसळून १६ निरपराध नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या त्या होर्डींगचा मालक भावेश भिंडेला न्यायालयान येत्या २६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. घाटकोपर होर्डिंग केसमध्ये भावेश भिंडेला…

दाढी, दंडा विरोधात महापालिकेत् एल्गार 

रमेश औताडे  मुंबई : काही वरिष्ठ अधिकारी मनमानी कारभाराचा इतका कळस गाठतात की, त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांना वैतागून शेवटी न्यायालयाची पायरी चढावी लागते. असाच प्रकार मुंबई महानगर पालिकेत घडला आहे.…

शिवाजीपार्कवर ‘सावरकर’ बीकेसीत ‘आंबेडकर’

स्वाती घोसाळकर मुंबई: लोकसभा निवडणूकीसाठी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मुंबईत दोन हाय व्होल्टेज प्रचार सभा पार पडल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिवाजीपार्कवरील एनडीएच्या सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर तर बीकेसीतील इंडिया आघाडीच्या सभेत घटनाकार…

तुतारीचा आवाज झालाच नसल्याने वैफल्यग्रस्त अनिल देशमुखांनी गाठली खालची पातळी- सुनिल तटकरे

माझी आणि शरद पवार, जयंत पाटील यांची भेट होण्याचे कारणच असू शकत नाही… मुंबई  -पराजय समोर दिसत असल्याने तुतारीचा आवाज अजिबात झालाच नसल्यामुळे वैफल्यग्रस्त… निराश आणि हताश झालेले अनिल देशमुखांसारखे…

लोकसभा निवडणुकीसाठी लालपरी सज्ज

करणार लाखोंची कमाई मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचे यंत्र, साहित्य व मतदान पथकांना मतदान केंद्रापर्यंत नेऊन सोडण्याचे आणि निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना परत घेऊन आणण्याची जबाबदारी राज्य परिवहन (एसटी) महामंडळावर सोपविण्यात आली आहे. यासाठी २४६ एसटी बसचे आरक्षण करण्यात आले असून त्यातून ९० लाखांचे उत्पन्न एसटीच्या मुंबई विभागाला मिळणार आहे. एसटी महामंडळाला प्रत्येक बसमागे ८५०० ते हजार रुपये मिळणार आहेत. तीन टप्पे झालेत. राज्यात मतदानाचा पाचवा टप्पा २० मे रोजी पार पडणार आहे. पाचव्या टप्प्यात २० मे रोजी एकूण १३ मतदारसंघांत मतदान होत असून, मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघाचाही त्यामध्ये समावेश आहे.

पहिल्या स्वदेशी बनावटीच्या मोनोरेल गाडीची चाचणी सुरू

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) चेंबूर – जेकब सर्कल मोनोरेलच्या ताफ्यात पहिली स्वदेशी बनावटीची मोनोरेल गाडी दाखल झाली आहे. या गाडीची जोडणी करून तिच्या चाचणीला आता सुरुवात करण्यात आली आहे. महिनाभर ही चाचणी चालणार असून त्यानंतर म्हणजेच जूनच्या मध्यावर ही गाडी सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. चेंबूर – जेकब सर्कल मोनोरेल प्रकल्प तोट्यात असून या प्रकल्पास तोट्यातून बाहेर काढण्यासाठी, मोनोरेलची प्रवासी संख्या वाढविण्यासाठी एमएमआरडीए प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून मोनोरेलच्या ताफ्यात १० नवीन मोनोरेल गाड्या दाखल करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. भारतातच या गाड्यांची बांधणी करण्याचे निश्चित करून एमएमआरडीएने गाड्यांच्या बांधणीचे कंत्राट मेधा सर्वो ड्राइव्हज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिले आहे. या कंत्राटानुसार ही कंपनी १० मोनो गाड्यांची बांधणी करीत असून यासाठी ५९० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यापैकी पहिली गाडी तयार होऊन मुंबईत दाखल झाली आहे. वडाळा कारडेपोत या गाडीची जोडणी करण्यात आली असून गेल्या आठवड्यापासून या गाडीच्या चचणीस सुरुवात करण्यात आली आहे. ही चाचणी रात्री करण्यात येत आहे. स्वदेशी बनावटीची मोनोरेल गाडी रात्री धावत आहे. दरम्यान, महिनाभर ही चाचणी सुरू राहणार आहे. त्यानंतर ही गाडी सेवेत रुजू होणार आहे. उर्वरित नऊ गाड्या टप्प्याटप्प्याने डिसेंबरपर्यंत सेवेत दाखल होणार आहेत. या सर्व दहाही गाड्या सेवेत दाखल झाल्यास आजघडीला प्रत्येक १५ ते ३० मिनिटांनी सुटणारी मोनोरेल दर सहा मिनिटांनी सुटणार आहे. यामुळे प्रवासी संख्या आणि महसूल वाढेल, असा विश्वास एमएमआरडीएकडून व्यक्त केला जात आहे.

अनधिकृत होर्डिंग विरोधी कारवाई दुसऱ्या दिवशीही प्रभावीपणे सुरू

नवी मुंबई: राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत होर्डिंग विरोधातील कारवाई दुसऱ्या दिवशीही सकाळपासून पहाटेपर्यंत अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्यात आली असून घणसोली, कोपरखैरणे व तुर्भे विभागातील पाच मोठे होर्डिंग हटवण्यात आलेले आहेत. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली सर्व विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी व त्यांचे अधिनस्त सहकारी यांनी तांत्रिक समुहासह अनधिकृत होर्डिंग हटाव मोहीम सलग दोन दिवस पहाटेपर्यंत प्रभावीपणे राबवली. घणसोली विभागात ठाणे बेलापूर सर्विस रोड येथे हॉटेल रामडा, औरम निवासी संकुल येथील 2 मोठे होर्डिंग निष्काषित करण्यात आले. त्याचप्रमाणे ठाणे बेलापूर रोडवर कोपरखैरणे विभागात एमआयडीसीच्या फायर ब्रिगेड जवळ असलेले फार मोठ्या आकाराचे होर्डिंगही हटविण्यात आले. तुर्भे विभागामध्ये एपीएमसी मार्केट येथील एक मोठे अनधिकृत होर्डिंग तसेच तुर्भे रेल्वे स्टेशन नजीकची पदपथावर असलेली दोन मोठी अनधिकृत होर्डिंग पहाटेपर्यंत काम करून निष्कासित करण्यात आली. आजही वाशी विभागात हायवेनजिकचे मोठे होर्डींग निष्कासित करण्याची कार्यवाही सुरू आहे. विभाग कार्यालयांमार्फत त्यांच्या हद्दीतील अनधिकृत होर्डिंगचे सर्वेक्षण करण्यात आले असून महापालिका आयुक्त यांचे आदेशानुसार अनधिकृत होर्डिंग विरोधातील कारवाई तीव्र करण्यात आली आहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी तसेच दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येणार आहे असे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांनी स्पष्ट केले.

अखेर ना. म. जोशी मार्ग बीडीडीतील ३०५ रहिवाशांना मिळाली घराची हमी

मुंबई : ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत येथील ३०५ रहिवाशांना अखेर मंगळवारी पुनर्वसित इमारतीतील हक्काच्या घराची हमी म्हाडाच्या मुंबई मंडळाने सोडतीद्वारे दिली. मुंबई मंडळाने ३०५ घरांसाठी सोडत काढली असून या ३०५ रहिवाशांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता लवकरच या रहिवाशांबरोबर करार करण्यात येणार आहे. रहिवाशांच्या मागणीनुसार राज्य सरकारने पुनर्वसित इमारती उभ्या राहण्यापूर्वीच या इमारतीत पात्र रहिवाशांना कोणत्या मजल्यावर आणि कोणते घर असणार याची हमी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई मंडळाकडून सोडतीद्वारे ही हमी देण्यात येत आहे. आतापर्यंत वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील अनेक पात्र रहिवाशांना घराची हमी देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे ना. म. जोशी मार्ग येथील पहिल्या टप्प्यातील सर्वच्या सर्व १२५० रहिवाशांची पात्रता निश्चिती करून त्यांना सोडतीद्वारे घराची हमी घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील अंदाजे ९०० रहिवाशांसाठी सोडत काढून त्यांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यांच्याशी करारही करण्यात आला आहे. या टप्प्यातील ३०५ रहिवाशांची सोडत शिल्लक होती. काही बाबींच्या अनुषंगाने या सोडतीला रहिवाशांचा विरोध होता. त्यामुळे ही सोडत रखडली होती. मागील आठवड्यात, शुक्रवारी, १० मे रोजी ना. म. जोशी मार्ग येथील ३०५ रहिवाशांना हक्काच्या घराची हमी देण्यासाठी सोडत काढण्यात येणार होती. सोडतीची सर्व तयारही झाली होती. मात्र या सोडतीला एकही रहिवासी उपस्थित न राहिल्याने सोडत रद्द करावी लागली होती. मात्र ही सोडत रद्द करतानाच मुंबई मंडळाने १४ मे रोजी रहिवाशी उपस्थित राहिले नाही तरी सोडत काढण्यात येईल अशी भूमिका घेतली होती. त्यानुसार मंगळवारी ३०५ घरांसाठी सोडत काढण्यात आली असून पात्र ३०५ रहिवाशांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. आता लवकरच या रहिवाशांबरोबर करार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आता ३०५ रहिवासी रहात असलेल्या चार इमारती रिकाम्या करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, या ३०५ रहिवाशांना महिना २५ हजार रुपये घरभाडे देण्यात येण्याची शक्यता आहे.