Category: मुंबई

Mumbai news

दीर्घ कालीन क्रिकेट अधिक खेळा-वेंगसरकर

मुंबई :  १२ वर्षाखालील मुलांच्या एजिस फेडरल   इन्शुरन्स कप क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ३५ षटकांच्या सामन्यात एक संघ केवळ ७२ धावांत बाद होणे हे चांगले लक्षण नाही.  तुम्हाला जर चांगले आणि वरच्या स्तरावरचे क्रिकेट खेळायचे असेल तर दीर्घ काळ खेळपट्टीवर राहून मोठ्या खेळी करणे, त्यासाठी स्टॅमिना आणि मनोनिग्रह या गोष्टीवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे असे भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी सांगितले.  या वयातच तुम्ही दोन-दोन दिवसांचे सामने खेळण्याला पसंती दिलीत तर तुमचा पाया भक्कम होईल असेही त्यांनी पुढे सांगितले.  माहुल, चेंबूर यथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत अचिव्हर्स क्रिकेट अकादमी संघाने  ठाण्याच्या जी.ए.ई.टी. स्पोर्ट्स क्लब संघावर ७ विकेट्सनी आरामात मात करून विजेतेपद पटकावले.  प्रतिस्पर्धी संघाला ७२ धावांत गुंडाळत त्यांनी हे आव्हान केवळ १३.३ षटकांत तीन विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या जी.ए.ई.टी. स्पोर्ट्स क्लब संघाला अचिव्हर्स क्रिकेट अकादमीच्या शौनक गावडे (११ धावांत २ बळी) आणि अमेय महाडिक (१६ धावांत २ बळी) यांच्या अचूक गोलंदाजीचा सामना करणे जड गेले.   या स्पर्धेत चांगली कामगिरी करणारा मानव पोकर (२३) आणि वेदांत आनंद (नाबाद १५) यांचा अपवाद वगळता त्यांच्या अन्य फलंदाजांनी पार निराशा केली आणि त्यांचा डाव २५.५ षटकांत ७२ धावांतच आटोपला.  या आव्हानाचा पाठलाग करताना अचिव्हर्स क्रिकेट अकादमीने देखील २७ धावांत ३ विकेट्स गमावल्या होत्या, मात्र अर्जुन संघवी (नाबाद ३२) आणि निषाद परब (नाबाद १५) या जोडीने चौथ्या विकेटसाठी ४६ धावांची अभेद्य भागी रचून संचाचा विजय साजरा केला. शौनक गावडे याची अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली, तर स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून अचिव्हर्सच्या लक्ष्य भोर (८ बळी) याला गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्तम  फलंदाज, सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून जी.ए.ई.टी. स्पोर्ट्स क्लब संघाच्या मानव पोकर याची निवड करण्यात आली.  भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, मुंबईच्या रणजी संघाच्या निवड समितीचे सदस्य आणि माजी रणजीपटू  व  डावखुरे फिरकी गोलंदाज रवी ठाकर आणि समाजसेवक राहुल वाळुंज यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. स्पर्धेत १२ संघांचा सहभाग होता आणि त्यांची  चार गटात विभागणी करून प्रत्येक संघाला किमान दोन साखळी सामने खेळण्याची संधी देण्यात आली होती. त्यानंतर गटातील अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले होते. संक्षिप्त धावफलक –  जी.ए.ई.टी. स्पोर्ट्स क्लब – २५.५ षटकांत सर्वबाद ७२ (मानव पोकर २३, वेदांत आनंद नाबाद १५ ; शौनक गावडे ११ धावांत २ बळी, अमेय महाडिक १६ धावांत २ बळी) पराभूत वि. अचिव्हर्स क्रिकेट अकादमी – १३.३ षटकांत ३ बाद ७३ (अर्जुन संघवी नाबाद ३२, निषाद परब नाबाद १५). फोटो ओळी माहुल, चेंबूर येथे झालेल्या १२ वर्षाखालील मुलांच्या एजिस फेडरल इन्शुरन्स कप क्रिकेट स्पर्धेत अजिंक्य ठरलेल्या अचिव्हर्स क्रिकेट अकादमी संघाचे छायाचित्र. सोबत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, मुंबईच्या रणजी संघाच्या निवड समितीचे सदस्य आणि माजी रणजीपटू  व  डावखुरे फिरकी गोलंदाज रवी ठाकर,  समाजसेवक राहुल वाळुंज आणि अकादमीचे प्रशिक्षक दिसत आहेत.

काँक्रिटीकरण ३१ मेनंतर नको, पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा

आयुक्तांच्या सूचना मुंबई : मुंबईतील रस्त्यांची सर्व कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच ३१ मेपर्यंत पूर्ण करावीत. काँक्रिट रस्ते मुंबईकरांना वाहतुकीसाठी योग्य स्थितीत असतील याची खबरदारी घ्यावी. पावसाळा सुरू झाल्यानंतर रस्ते काँक्रिटीकरणाची कोणतेही नवीन कामे हाती घेऊ नयेत, अशा सूचना पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी गुरुवारी पालिका प्रशासनातील सर्व संबंधित यंत्रणांना दिल्या. मुंबई महानगरपालिका हद्दीतील ३९८ किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरणासाठी कार्यादेश जारी करण्यात आले. यापैकी पश्चिम आणि पूर्व उपनगरात मिळून ३२५ किलोमीटर अंतरापैकी काही कामे प्रगतिपथावर आहेत. निविदेच्या अटीनुसार, सर्व रस्ते वाहतूकयोग्य स्थितीत ठेवावेत, आवश्यक तेथे अपूर्ण रस्त्यांचे पुनर्पृष्ठिकरण करण्याच्या सूचना कंत्राटदारांना दिल्या आहेत. सिमेंट काँक्रिट रस्ते बनविण्यासाठी रस्ता खणण्यापासून ते काम पूर्ण होऊन रस्ते वाहतूक सुरू होईपर्यंत साधारणत: ३० ते ४५ दिवसांचा कालावधी जातो. जर प्राधान्याने रस्ते पूर्ण करण्याकडे लक्ष दिले नाही, तर पावसाळ्यादरम्यान रस्त्यांची कामे अपूर्णावस्थेत आढळतात. परिणामी, नागरिकांना मोठ्या प्रमाणावर असुविधांचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत सध्या सुरू असलेली सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण केली जातील, अन्यथा कंत्राटदार व अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, असे निर्देश महानगरपालिका प्रशासनाने दिले आहेत. खड्ड्यांच्या तक्रारींसाठी अभियंत्यांची नियुक्ती खड्ड्यांसंदर्भातील तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी यंहाही २२७ निवडणूक प्रभागांमध्ये दुय्यम अभियंत्यांची नियुक्ती केली जाईल. ते निवडणूक प्रभागात प्रत्यक्ष फिरून खड्ड्यांसंदर्भात तक्रारीची स्वतःहून नोंद घेतील. तक्रार प्राप्त झाल्यावर परिमंडळनिहाय नेमलेल्या कंत्राटदारामार्फत मास्टिक अस्फाल्टद्वारे खड्डे बुजविण्यात आले आहेत का याची खातरजमा करतील, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. प्राप्त तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करावी, असा उद्देश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बॅड पॅचसाठी कंत्राटदार पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरदेखील दुरुस्ती योग्य ठिकाणी (बॅड पॅच) डागडुजीकामी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्यांची दुरुस्तीही महानगरपालिका करणार आहे. मान्सूनपूर्व कामांचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून पालिका प्रशासनाने दोष दायित्व कालावधीत समाविष्ट नसलेल्या विविध रस्त्यांच्या दुरुस्ती योग्य ठिकाणी (बॅड पॅच) मास्टिक अस्फाल्टद्वारे डागडुजीची कामे हाती घेतली आहेत. त्यासाठी ७ परिमंडळांत एकूण मिळून १४ कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे.

लोकलच्या वेगमर्यादेमुळे हार्बरवासीयांचे हाल!

वडाळा ते सीएसएमटी गाड्यांची रांग मुंबई : सीएसएमटी स्थानकात तीन दिवसांत दोनदा लोकल रुळांवरून खाली घसरण्याची घटना घडली. त्यानंतर मध्य रेल्वेने प्रशासनाने रेल्वे रुळांची दुरुस्ती केल्यानंतर खबरादारी म्हणून हार्बर मार्गावरील अपघातग्रस्त जागेवर १० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा लागू केली. त्यामुळे हार्बर मार्गावरून सीएसएमटी येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकल सेवा कासवगतीने ये-जा करत असल्याने लोकल सेवांचे वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागला आहे. सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना लेटमार्क लागला. उन्हाळ्यामुळे मुंबईकरांना लोकलच्या गर्दीचा प्रवास नकोसा वाटत आहे. त्यातच सलग दोन दिवस लोकल रुळावरून खाली घसरल्याने मुंबईकरांचे पुरते हाल झाले. पनवेल- सीएसएमटी लोकल सोमवारी (ता. २९) सीएसएमटी स्थानकात शिरताना प्लॅटफॉर्म क्रमाक दोनवर घसरली. या घटनेनंतर बुधवारी (ता. १) चाचणीदरम्यान त्याच ठिकाणी लोकलच्या एका डब्याची दोन चाके रुळावरून घसरली. यामुळे हार्बर आणि मुख्य मार्गावरील प्रवाशांचे हाल झाले. लागोपाठ दोन घटना झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने गुरुवारी (ता. २) मस्जिद बंदर ते सीएसएमटी स्थानकापर्यंत लोकलची वेगमर्यादा १० किलोमीटर प्रतितास ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे सकाळपासून लोकलचे वेळापत्रक पुरते विस्कळित झाले होते. लोकलच्या रांगा हार्बर मार्गावरील लोकलचा वेग गुरुवारी (ता. २) सकाळपासून मंदावला होता. त्यामुळे वडाळा ते सीएसएमटीदरम्यान लोकलची एकामागोमाग एक रांग लागली होती. रेल्वे स्थानकांत प्रवाशांची गर्दी उसळली होती. अनेकांनी कंटाळून टॅक्सी आणि रिक्षाने जाणे पसंत केले. वेगमर्यादेमुळे विस्कळित झालेले वेळापत्रक सुरळीत ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सकाळी अनेक लोकल रद्द केल्या. त्यामुळे प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागला.

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ला बसणार आळा?

राज्य सरकार करणार कठोर कारवाई मुंबई : लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे / डिजिटल माध्यमांवरून प्रसारित करण्यात येत आहे. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई शासनामार्फत करण्यात येणार आहे. फोटोशॉप, मशीन लर्निंग (एमएल) किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) यांसारख्या विविध तंत्रांचा गैरवापर करून डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करण्यात येतो. निवडणुकीदरम्यान या तंत्राचा गैरवापर हा सध्या चिंतेचा विषय आहे. एखादा उमेदवार, राजकीय पक्ष किंवा निवडणुकीच्या मुद्द्याविषयी चुकीचे व्हिडिओ, ऑडिओ, फोटो तयार करण्यात येतात किंवा खऱ्या फोटो, ऑडिओ, व्हिडिओमध्ये फेरफार करून ते चुकीच्या पद्धतीने प्रसारित करण्यात येतात. हे डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स किंवा फोटो खरे असल्यासारखे भासतात आणि त्यामुळे संबंधिताविषयी गैरसमज किंवा बदनामी होते. निवडणूक काळात अशा प्रकरणांमध्ये वाढ होत असून यावर आळा घालण्यासाठी तसेच स्वच्छ आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया होण्याच्या दृष्टीने ‘डीप फेक’ कंटेंट तयार करणाऱ्या आणि प्रसारित करणाऱ्या समाजकंटकांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. राज्य शासनामार्फत पोलीस महासंचालकांना यासंदर्भात सूचना देण्यात आल्या असून पोलीस खात्यामार्फत यासंदर्भात कार्यवाही करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगानेही विपर्यस्त माहिती रोखण्यासंदर्भात त्यांच्या मार्गदर्शिकेमध्ये सूचना दिल्या आहेत. डिप फेक व्हिडीओ या निवडणूकीदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरक्षण समाप्त करण्याबद्दलचा व्हिडीओ प्रसारीत झाला. हा व्हिडीओ डिप फेक असून विरोधकांनी तो पसरवला असल्याचा आरोप अमित शहा यांनी आरोप केला. यावरुन दिल्ली पोलिसांनी काही जणांना अटक केली असून तेंलगणाचे मुख्यमंत्र्यांना समन्स जारी केले आहे.काही अभिनेत्यांचे प्रचाराचे डिप फेक व्हिडीओ प्रसारीत झाले आहेत.काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आणि राहुल गांधी यांचेही काही डिप फेक व्हिडीओ प्रसारीत झाले आहे.

अंधेरीत गॅसगळतीमुळे दुकानांना आग, चारजण जखमी

मुंबई : अंधेरी पश्चिम येथील ए. बी. नायर मार्गावरील जुहू टपाल कार्यालयाजवळ शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास गॅसगळतीमुळे काही दुकानांना आग लागली. या दुर्घटनेत एकूण चारजण जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनाग्रस्त परिसरातील महानगर गॅस कंपनीच्या गॅस वहिनीतून शुक्रवारी अचानक गळती सुरू झाली. त्यामुळे दोन ते तीन दुकानांमध्ये आग लागली. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य हाती घेतले. अग्निशामकांना दुपारी १२ वाजून १८ मिनिटांनी आग विझविण्यात यश आले. या दुर्घटनेत नरसिंह फगिल्ला (५०), वाझिर हुसेन (३०), शांतीलाल चौधरी (२४), आसिफ हुसेन (३०) हे चौघे जखमी झाले. जखमींना तात्काळ नजीकच्या कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

बेवारस वाहनांच्या मालकी हक्काबाबत पोलिसांकडून आव्हान

नवी मुंबई, :- एन आरआय सागरी पोलीस ठाणे, नवी मुंबई यांच्या पोलीस ठाण्याच्या आवारातील बेवारस पडून असलेल्या  मोटार  दुचाकी, स्कुटर, ऑटो रिक्षा,फोर व्हिलर  या वाहनांच्या मालकी हक्काबाबत एन आरआय सागरी पोलीस ठाणे, नवी मुंबई यांच्याशी संपर्क साधण्यात यावा. अशी माहिती एन आरआय सागरी पोलीस पोलीस ठाणे नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश कदम यांनी दिली आहे. एन आर आय सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध कारणास्तव प्राप्त झालेली 55 दुचाकी वाहने, 4- चारचाकी वाहन, 1 थ्री व्हीलर एकूण 60 बेवारस वाहने एन आर आय सागरी पोलीस ठाण्याच्या आवारात एकत्र करुन ठेवण्यात आली आहेत. वर्षानुवर्षे या वाहनांचे मूळ मालक सदर वाहने घेऊन जाण्यास आलेले नसल्याने एन आर आय सागरी पोलीस ठाण्यामार्फत सदर वाहनांच्या मूळ मालकांनी सात दिवसांच्या आत आपली वाहने कागदपत्रे दाखवून या बातमी सोबत दिलेल्या यादीतील आपल्या वाहनांची ओळख पटवून ती घेऊन जावी असे आवाहन एन आरआय सागरी पोलीस पोलीस ठाणे नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश कदम यानी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

पंतप्रधान मोदींचे बाळासाहेब ठाकरेंबद्लचे विधान हे ‘पुतणा मावशीचे प्रेम’

वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल मुंबई : पराभवाच्या भितीने घाबरलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. दारूण पराभव होणार असल्याची जाणीव झाल्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरेंबद्दल आपुलकी व प्रेम व्यक्त करत आहेत. एवढेच जर प्रेम असते तर बाळासाहेबांची शिवसेना कटकारस्थान करून फोडली नसती. मोदींनी व्यक्त केलेले बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरेंबद्दलचे प्रेम व आदर हे ‘पुतणा मावशीचे प्रेम’ आहे, असा हल्लाबोल मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष व उत्तर मध्य मुंबईच्या काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा समाचार घेत प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना व शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले, महाविकास आघाडीचे सरकार पाडले. बाळासाहेबांबदद्ल प्रेम, आदर व आपुलकी असती तर भाजपाने असे उद्योग केलेच नसते. शिवसेना व काँग्रेस यांची विचारधारा वेगळी आहे, असे असले तरी उद्धव ठाकरे संकटात असताना काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनियाजी गांधी यांनी फोन करून सोबत असल्याचा शब्द दिला, उद्धवजी आजारी असतानाही त्यांची विचारपूस केली पण जाहीरपणे वक्तव्य करून त्याचे राजकीय भांडवले केले नाही, हा शिष्टाचाराचा व राजकीय संस्क़ृतीचा भाग आहे आणि उध्दव ठाकरे आजारी असताना कटकारस्थान करून शिवसेना पक्ष फोडणे याला विकृती म्हणतात. “वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे ऋण मी विसरु शकत नाही, ज्या दिवशी कौटुंबिकदृष्ट्या श्रीमान उध्दव ठाकरे अडचणीत असतील तेव्हा पहिला मदतीला धावून मी जाईन’’ ही नरेंद्र मोदी यांचे विधान स्पष्ट, स्वच्छ आणि निर्मळ भूमिका असणारे नाही तर वातावरण निवळण्यासाठी चालवलेला खटाटोप आहे. नरेंद्र मोदी आज काहीही बोलले तर शिवसैनिक व महाराष्ट्रातील जनता त्यांना माप करणार नाही. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. सकाळी लोकमान्य टिळक नगर, येथील गोल मैदान येथे मार्निंग वॉक करत स्थानिक लोकांशी संवाद साधला. वाकोला मार्केट येथे विविध समाजाच्या प्रमुख नेत्यांबरोबर बैठक घेऊन चर्चा केली. वांद्रे-कुर्ला कॉमप्लेक्समधील मोहमद इस्टेट येथील स्थानिकांशी संवाद साधला. तसेच टिळक नगर, कुर्ला, कलिना भागातील शिवसेना शाखांना भेटी दिल्या.

ऐन उन्हाळ्यात कलिंगड विक्री थंड

नवी मुंबई : उन्हाळा सुरू होताच थंडगार शीतपेय, रसाळ फळांना अधिक मागणी असते. यंदा तर अधिक उष्मा आहे. मात्र असे असताना देखील सध्या बाजारात आंब्याचा हंगाम सुरू असल्याने कलिंगडची मागणी रोडावली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच एपीएमसी फळ बाजारात थंडगार, रसाळ फळांच्या हंगामाला सुरुवात होत असते. आंब्यापाठोपाठ फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात फळ बाजारात कलिंगड दाखल होण्यास सुरुवात होते तर मार्च-एप्रिलपासून मागणीत वाढत होते. सध्या बाजारात लाल रंगाच्या रसरशीत शरीराला थंडावा देणारी कलिंगड बाजारात मुबलक उपलब्ध झाली असून, तिची चव चाखण्यासाठी ग्राहकांनी मात्र पाठ फिरवली आहे, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. एपीएमसीत सध्या महाराष्ट्रसह तमिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक येथून आवक होते. सध्या बाजारात कलिंगडच्या १०० ते १३० गाड्या दाखल होत आहेत. घाऊक बाजारात प्रतिकिलोला ११ते १२ रुपये दर आहेत. तेच एप्रिल मध्ये १५ ते १६ रुपये बाजारभाव होते. एपीएमसीत आता आंब्याची आवक जास्त होत असून इतर फळांची मागणी कमी आहे. बहुतांशी ग्राहक आंबा खरेदीकडे वळला आहे. त्यामुळे बाजारात कलिंगडला म्हणावी तशी मागणी नाही. कोट एपीएमसी घाऊक बाजारात सध्या आंब्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे ग्राहक आंबा खरेदीला पसंती देत असून कडक उन्हाळा असूनही रसाळ कलिंगडाची मागणी कमी आहे. मुर्तीझा खान, कलिंगड व्यापारी, एपीएमसी

गणेशोत्सवासाठीचे रेल्वे आरक्षण शनिवारपासून

मुंबई : मुंबई महानगरात राहणाऱ्या कोकणवासियांना आता गणेशोत्सवाची चाहूल लागली असून गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण शनिवारपासून (४ मे) सुरू होणार आहे. यंदाच्यावर्षी ७ सप्टेंबरला गणेशचतुर्थी आहे. त्यामुळे आता अनेक कोकणवासीयांचे गावी जाण्याचे नियोजन सुरू…

पवार अस्वस्थ असते तर 84 वर्षे जगले नसते

नारायण राणेंचा तोल सुटला मुंबई :  लोकसभेच्या प्रचार भाषणात आज माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा शरद पवारांवर टीका करताना तोल ढळाला. चार वेळा मुख्यमंत्री, 12 वर्षे केंद्रीय मंत्री आणि दोन वर्षे संरक्षणमंत्री असूनही…