Category: मुंबई

Mumbai news

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर रविवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास दोन अज्ञात युवकांनी गोळीबार केला. घराच्या दिशेने त्यांनी चार राऊंड फायर केले. सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट निवासस्थानाबाहेर ही घटना घडलीय. फेसबूकवरून बिष्णोई गँगने या गोळीबाराची जबाबदारी…

मुंबईत सर्वाधिक घरांची विक्री

मुंबई : नव्या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत देशातील प्रमुख 8 शहरांत मिळून एकूण 1,20, 640 घरांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक घरांची विक्री मुंबईत झाली आहे. पहिल्या 3 महिन्यांत मुंबईत 41, 590 घरांची विक्री झाली आहे. दुस-या क्रमांकावर पुणे शहर असून…

महामानवाच्या अभिवादनास लाखोंचा जनसमुदाय लोटला

मुंबई: राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी लाखोंचा समुदाय चैत्यभूमीवर लोटला. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी रविवारी चैत्यभूमी स्मारक येथे जाऊन डॉ आंबेडकरांच्या स्मृतींना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामूहिक त्रिशरण बुद्धवंदना करण्यात आली तसेच राज्यपालांच्या हस्ते बौद्ध भिक्खूंना चिवर दान (वस्त्र) करण्यात आले. कार्यक्रमाला मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी, मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकारी, भन्ते राहुल बोधी, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी मुंबई शहर कार्यालयातर्फे चैत्यभूमी येथे मतदार जागृतीसाठी आयोजित स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होत राज्यपालांनी ‘मी मतदानाचा हक्क बजावणारच’ लिहिलेल्या फलकावर स्वाक्षरी केली. छाया- संतोष नागवेकर 

पाण्यासाठी महिला आक्रमक

पाये गावातील जलवाहिनी उखडली वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील पाये, पायगाव परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्यात पुरेसे पाणी मिळत नसल्याने तीव्रपाणी टंचाई जाणवत असल्याने नुकतीच जलजीवन मिशनअंतर्गत कोट्यवधी रुपयांची पाणी योजना मंजूर झाली आहे; मात्र ठेकेदाराने मनमानीपणे व नियमानुसार काम न केल्याने या योजनेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे श्रमजीवी संघटनेच्या चैतीताई चिपाट, भारती धापशी, सुमन टोपले, मुक्ता जाधव, कमला दांडेकर, आंनदीताई आणि महिलांनी नुकतेच आंदोलन केले. या वेळी संतप्त महिलांनी सदर योजनेचा पाईप उखडून फेकून दिला. भिवंडी तालुक्यातील महिलांना एप्रिल, मे महिन्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यंदादेखील आलखिवली, चिबिपाडा, पाये, मैदे, चाणे, चावे, डिघाशी, मोहंडूळ, राहूर, मालबिडी आदी दुर्गम भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. भूजल पातळी कमालीची खाली गेल्याने विहिरीचे तळ दिसू लागले आहेत; तर विंधणविहिरीतही खडखडाट झाला आहे. सरकारने ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या आहेत; मात्र ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे या योजनाचा बोजवारा उडाला आहे. ठेकेदाराने पाये गावात केवळ अर्धा फूट टाकलेली जलवाहिनी नुकतीच श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्त्यांनी उखडून फेकून दिली आहे. पायेप्रमाणेच संपूर्ण तालुक्यातील या योजनेचे पितळ उघडे पडले आहे. पाणीटंचाईमुळे त्रस्त महिलांनी भिवंडी तालुक्यातील अपूर्ण पाणी योजनांची शोध मोहीम श्रमजीवीचा नेतृत्वाखाली सुरू केली आहे. अशी माहिती श्रमजीवी संघटनेचे सागर देसक आणि सुनील लोणे यांनी दिली आहे.

नेहरू कला दालनात कलाकृतींचे प्रदर्शन

मुंबई : नेहरू सेंटर सर्क्युलर कलादालनात सहा ललित कलाकारांच्या एकत्रित कलाकृतींचे ‘अनंत’ हे प्रदर्शन आयोजित केले आहे. ॲक्रेलिक व तैलरंगातील रचनात्मक कलाकृती इथे मांडण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन प्रवास आपल्या कुशल कुंचल्यातून, शिवप्रेमींसाठी आकाश हाडवळे यांनी चितारला आहे. एक अनोखा कलाविष्कार बाबाजी कदम यांच्या चित्रांतून पाहायला मिळेल. निसर्ग व रुद्र अनुभव एका अनोख्या आकृतीबंधात, वेगळ्या पोतात राजय बोंगाळे हे सादर करत आहेत. गुढता हा कलेचा अविभाज्य भाग ही दिशा मिस्त्री हिच्या चित्रांची खासियत असून, ग्रामीण जीवनाची सफर मयूर पालकर यांच्या चित्रांतून घडून येते. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित महत्त्वपूर्ण प्रसंग किरण होवाळ यांनी साकारले आहेत. कलादालनात आज  सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.

आचारसंहितेच्या कचाट्यात शिष्यवृत्ती

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीकरिता लागू झालेल्या आचारसंहितेमुळे नवी मुंबई हद्दीतील जवळपास ४० हजार विद्यार्थ्यांना मागील वर्षाची शिष्यवृत्ती आता थेट पावसाळ्यात मिळणार आहे. प्रशासकीय दिरंगाईचा फटका नवी मुंबईतील गरजू आणि शाळकरी विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. तसेच चालू २०२४-२५ वर्षातील शिष्यवृत्तीची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे. धिम्या गतीने पडताळणी आणि कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे विद्यार्थी आणि पालकवर्गाला शिष्यवृत्तीला मुकावे लागणार आहे. नवी मुंबई महापालिकेतर्फे स्वःखर्चातून शहरातील विविध गरीब आणि गरजू घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती दिली जाते. महापालिकेच्या हद्दीतील इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीच्या रकमेचा लाभ मिळतो. त्याकरिता महापालिकेतर्फे दरवर्षी सप्टेंबर अथवा ऑक्टोबर महिन्यांत शिष्यवृत्ती योजनेकरिता पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज आणि पुरावे मागवले जातात. मात्र, २०२३ या वर्षातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच ऑनलाईन अर्जाद्वारे शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु हा निर्णय उशिराने झाल्यामुळे हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने उशिरा उपलब्ध झाले. त्यामुळे अर्ज उशिरा आल्यामुळे अर्ज भरण्यासही पालक व विद्यार्थ्यांकडून उशीर झाला. उशिरा आलेल्या अर्जांची छानणी व पडताळणी करण्यात वेळ गेल्यामुळे गेल्यावर्षीच्या शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना यावर्षी देण्यात येणार होता. महापालिकेकडे शिष्यवृत्तीकरिता ४० हजार अर्ज आले आहेत. या अर्जांची अद्याप समाजविकास विभागस्तरावर पडताळणी करण्याचे काम सुरू होते. त्यादरम्यान लोकसभा निवडणुकांकरिता आचारसंहिता घोषित झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कर्तव्याकरिता नियुक्त करण्यात आले. समाजविकास विभागाचे बरेचसे कर्मचारी निवडणुकीच्या कामाला गेल्यामुळे शिष्यवृत्तीच्या अर्जांची पडताळणी धिम्या गतीने सुरू आहे. तसेच आचारसंहितेमध्ये योजनेचा लाभ देता येत नाही, असे प्रशासनाने गृहित धरून ठेवल्यामुळे आता शिष्यवृत्तीचा लाभ थेट पावसाळ्यात होईल, अशी दाट शक्यता आहे. या घटकांना मिळते शिष्यवृत्ती – विधवा अथवा घटस्फोटीत महिलांच्या मुलांना – आर्थिक व दुर्बल घटकांतील पालकांच्या मुलांना – मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना – महापालिका हद्दीतील प्रकल्पग्रस्तांच्या विद्यार्थ्यांना – महापालिकेतील आस्थापनेवरील व कंत्राटी सफाई कामगारांच्या मुलांना – शहरातील दगड खाण, बांधकाम, रेती आणि नाका कामगारांच्या मुलांना या योजनाही रखडल्या नवी मुंबई महापालिकेच्या समाजविकास विभागातर्फे शहरातील नागरिकांना वेगळ्या योजनांचा लाभ दिला जातो. त्यापैकी कर्त्या पुरुषाचे निधन झालेल्या विधवा महिलेला २५ हजार रुपये, विधवा महिलेच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसाह्य ६५ हजार, मागासवर्गीय मुलींच्या विवाहासाठी अर्थसाह्य ५० हजार आणि आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना अर्थसाह्य ५० हजार रुपयांची मदत केली जाते. मात्र, आचारसंहितेच्या आधी आलेल्या अर्जांवर संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ कार्यवाही न केल्यामुळे योजनेला पात्र असणाऱ्या नागरिकांचे शेकडो अर्ज विभागनिहाय रखडून पडले आहेत.

अग्निशमन दिनानिमित्त शहीद अग्निशमन जवानांना आदरांजली

नवी मुंबई : अग्निविमचनाचे काम करीत असताना आपल्या प्राणांचे बलिदान करणाऱ्या शहीदांचा सन्मान ठेवणे हे आपले कर्तव्य असून त्यांच्या स्मृतींपासून अधिक चांगले काम करण्याची ऊर्जा मिळते असे सांगत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी शहीद‌ अग्निशमन जवानांच्या  स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करीत भावपूर्ण आदरांजली दिली. नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन दलाच्या वतीने वाशी अग्निशमन केंद्रात अग्निशमन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी आयुक्तांनी उपस्थित अग्निशमन जवानांशी संवाद साधला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या 5 अग्निशमन केंद्राद्वारे शहर सुरक्षिततेची जबाबदारी आपले अग्निशमन दल पार पाडत असून आपत्तीनंतर आपत्ती निवारणाचे कार्य करण्यासोबतच आपत्ती उद्भवूच नये याकरिता नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणारे उपक्रम राबविण्यावर भर द्यावा असे आयुक्तांनी यावेळी सूचित केले. मागील वर्षी पावसाळी कालावधीत इरशाळवाडी येथे आपत्तीप्रसंगी मदतकार्य करताना वीरगती प्राप्त झालेले नवी मुंबई महानगरपालिकेचे सहा. अग्निशमन केंद्र अधिकारी शिवराम ढुमणे यांच्याही सेवाभावी समर्पित कार्याचे स्मरण याप्रसंगी आयुक्तांनी केले. यावेळी आयुक्तांप्रमाणेच उपस्थित अतिरिक्त आयुक्त श्री सुनील पवार तसेच अतिरिक्त आयुक्त तथा मुख्य अग्निशमन अधिकारी श्री शिरीष आरदवाड, शहर अभियंता श्री संजय देसाई, उप मुख्य अग्निशमन अधिकारी श्री पुरुषोत्तम जाधव, वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री सागर मोरे, कार्यकारी अभियंता श्री अजय संख्ये, अग्निशमन केंद्र अधिकारी श्री जे टी पाटील व श्री जी एस सुसवीरकर आणि इतर अग्निशमन अधिकारी यांनी शहीद वीरांच्या स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण अभिवादन केले. 14 एप्रिल 1944 रोजी मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये एस एस फोर्ट स्टिकीन या जहाजाला लागलेल्या आगीत मुंबई अग्निशमन दलातील 66 जवानांनी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन अग्निविमोचनाचे कार्य केले. या शहीद जवानांना तसेच त्यानंतरही अग्नीविमोचनाचे कार्य करताना आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या शहीद जवानांना भावपूर्ण अभिवादन करीत 14 एप्रिल हा दिवस अग्निशमन सेवा दिन म्हणून पालन करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून 14 ते 20 एप्रिल 2024 या कालावधीत संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात येत असून या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रातील मॉल्स, मोठ्या सोसायट्या, हॉस्पिटल्स, शाळा – महाविद्यालये, हॉटेल्स, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी अग्निसुरक्षतेच्या दृष्टिकोनातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे तसेच विविध ठिकाणी मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे

नमुंमपा मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

नवी मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अॅम्फीथिएटर येथे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील पवार व श्री. शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपायुक्त श्री. शरद पवार, शहर अभियंता श्री. संजय देसाई, परिमंडळ उपायुक्त श्री. सोमनाथ पोटरे, कार्यकारी अभियंता श्री. अजय संखे आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मतदान जनजागृतीसाठी दादर चैत्यभूमी परिसरात विशेष स्वाक्षरी मोहीम

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने नवीन मतदारांची नोंदणी वाढवणे आणि मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमाच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज चैत्यभूमी परिसरात मुंबई शहर जिल्हा कार्यालयाच्या तर्फे विशेष स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज चैत्यभूमी स्मारक येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच चैत्यभूमीवरील भिमज्योतीस पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ.आश्विनी जोशी यांच्यासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे, आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथिल घराबाहेर काल पहाटे दोन अज्ञातांनी गोळीबार केला. त्यानंतर हे दोन्ही आरोपी फरार झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील…