Category: मुंबई

Mumbai news

ध्यानमग्न मोदींना ८०० जागा मिळतिल- राऊत

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूच्या विवेकानंद रॉक मेमोरिअलमध्ये ध्यानधारणा सुरू केली. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि एक्झिट पोलच्या निकालावर भाष्य…

मोदींच्या विजयाचा आनंद दोन दिवसांचाच – वडेट्टीवार

मुंबई :लोकसभा निवडणूकीच्या एक्झिट पोलच्या अंदाजावरुन देशात पुन्हा मोदी सरकरा येणार असल्याचे चित्र असले तरी हे आकडे फसवे आहेत. दोन दिवसांनी म्हणजेच येत्या चार जूनला मतमोजणीत सत्य सामोरे येईल. त्यामुळेच…

राज्यात महायुती कर्माची फळं भोगतेय- मनोज जरांगे

जालना : लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल नुसार राज्यातक भाजपाप्रणित महायुतीच्या जागा कमी होताना दिसत आहेत. मराठा आंदोलकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते आपल्या कर्माची फळे भोगत आहेत अशा शब्दात मनोज जरांगे यांनी एक्झिट…

फोडाफोडीचं राजकारण जनतेला रुचलं नाही- एकनाथ खडसे

मुंबई : देशात भाजपायुक्त एनडीए साडेतीनशे पार जात असल्याचे एक्झिट पोलमधून दिसत असले तरी महाराष्ट्रात मात्र महायुतीला फटका बसला आहे. फोडाफोडीचं राजकारण जनतेला रुचलं नाही, अशा शब्दात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपाला घरचा आहेर दिला…

कॅन्सरच्या रुग्णांना जीवदान मिळणार !

 भारतात प्रथमच गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी शेवटच्या टप्प्यावरील कर्करोग उपचारासाठी गामा-डेल्टा एलोजेनिक सीएआर -टी सेल कॅन्सर थेरपी ठरली प्रभावी  प्रख्यात मुंबईस्थित ऑन्कोलॉजिस्ट डॉ. विजय पाटील यांचे यश मुंबई:  जीवघेणा कर्करोग शेवटच्या टप्प्यावर…

अजितदादांचे अरुणाचलमध्ये ३ आमदार !

मुंबई: एक्झिट पोलमध्य अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा महाराष्ट्रात धुव्वा उडाला असला तरी अरुणाचलमधून खुशखबर आहे. अरुणाचल विधानसभा निवडणूकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ३ आमदार निवडूण आले आहेत. अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार…

ॲड अनिल परब आज उमेदवारी दाखल करणार

 मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी मंत्री, आमदार ॲड अनिल परब हे सोमवारी, ३ जून रोजी विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार…

हुश्श ! मेगाब्लॉक संपला मध्य रेल्वे पुन्हा रुळावर

मुंबई : उकाड्याने हैरान झालेल्या मुंबई आणि ठाणेकरांना आता हुश्श करीत सुटकेचा निश्वास सोडायला हरकत नाही. गेले ६२ तास सुरु असलेल्या जंबो मोगाब्लॉकमधून अखेर त्यांना सुटका मिळाली आहे. मध्ये रेल्व पुन्हा रुळावर…

सम्राट,  जश, प्रिजेश, ध्रुव विजेते

गोविंदराव मोहिते बुध्दिबळ स्पर्धेत मुंबई : अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक बुध्दिबळ स्पर्धेमधील ८/१०/१२/१४ वयोगटात मुलांमध्ये सम्राट जिंदल, जश शाह, व्ही. प्रिजेश, ध्रुव जैन यांनी आणि मुलींमध्ये अनिश्का बियाणी, आराध्या पुरो, हुसैना राज, मयंका राणा यांनी विजेतेपद पटकाविले. याप्रसंगी गेली ५ दशके विविध क्रीडा स्पर्धांद्वारे खेळाडूंना प्रोत्साहन देणारे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सोन्याची अंगठी देऊन आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक-अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. यावेळी नामवंत बुध्दिबळपटू, क्रिकेटपटू, कॅरमपटू, कबड्डीपटू, व्यायामपटू, क्रीडा पत्रकार तसेच कामगार क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर जिल्ह्यातील नामवंत आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटूसह एकूण ११७ खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला होता. ८ वर्षाखालील मुलांमध्ये सम्राट जिंदलने (५ गुण) प्रथम, रेयांश सचदेवने (४ गुण) द्वितीय, ऐडेन लासराडोने (४ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये अनिष्का बियाणीने (२ गुण) प्रथम, पृषा गाडाने (२ गुण) द्वितीय, भावना श्रॉफने (१ गुण) तृतीय; १०  वर्षाखालील मुलांमध्ये जश शाहने (५ गुण) प्रथम, समर्थ गोरेने (४ गुण) द्वितीय, समक्ष कर्नावटने (३ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये आराध्या पुरोने (४ गुण) प्रथम, नित्या बंगने (३ गुण) द्वितीय, वेदा कपूरने (३ गुण) तृतीय; १२ वर्षाखालील मुलांमध्ये व्ही. प्रिजेशने (४ गुण) प्रथम, लोबो फेरद्यनने (४ गुण) द्वितीय, विराज शाहने (३.५ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये हुसैना राजने (२ गुण) प्रथम तर १४ वर्षाखालील मुलांमध्ये ध्रुव जैनने (४ गुण) प्रथम, अर्जुन पाधारीयाने (३ गुण) द्वितीय, आदित्य राणेने (२ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये मयंका राणाने (५ गुण) प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जिंकला.

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा `पाऊसवेळा’ कार्यक्रम

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार दिनांक ८ जून रोजी संध्याकाळी ५.३० वाजता `पाऊसवेळा’ हा कार्यक्रम डॉ. सुधा जोशी यांच्या सहकार्याने केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला असून रसिकांसाठी खुला आहे. पावसाआधीचा पाऊस ते परतीचा पाऊस, शैशवातला पाऊस ते प्रौढपणीचा पाऊस, पहाटेपासून मध्यरात्रीपर्य॔तचा पाऊस, आतला नि बाहेरचा पाऊस…..अनुभवा ही यामागची संकल्पना आहे. मराठीतील नव्या जुन्या साहित्यिकांच्या शब्दातून झरणाऱ्या पावसाची अनंत रूपे यावेळी रसिकांना अनुभवता येतील. या कार्यक्रमाची संहिता आणि निवेदन डॅा. वंदना बोकील-कुलकर्णी यांचे आहे तर अभिवाचन गिरीश दातार आणि श्रीमती गौरी देशपांडे करतील. त्यांना धनश्री गणात्रा संगीतसाथ देतील.