Category: मुंबई

Mumbai news

माढा लोकसभा मतदार संघातील ‘मसल पॉवर, मनी पॉवर’ संजय हाके संपवणार – प्रकाश शेंडगे

रमेश औताडे  मुंबई : माढा लोकसभा मतदार संघात प्रस्थापितांची असलेली मसल पॉवर मनी पॉवर आमचा ओबीसी उमेदवार संपवणार असल्याचा इशारा ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी शुक्रवारी मुंबई…

नवी मुंबईतील बस थांब्यांवरील डिजिटल फलक बंद

एनएमएमटी बस प्रवाशांची मोठी गैरसोय नवी मुंबई : एनएमएमटीने बस थांब्यावर लावलेले डिजिटल फलक पुन्हा बंद पडले आहेत. त्यामुळे बस संबंधित बस थांब्यांवर नेमके कधी येईल हे प्रवाशांना कळत नाही. असा प्रकार वारंवार होत आहे. त्यामुळे जोशात सुरू करण्यात आलेला चांगल्या उपक्रमात सातत्य राखण्यातील दुर्लक्षामुळे अपयश येत असल्याचा आरोप केला जात आहे. एनएमएमटी प्रशासनाने २०१८ मध्ये आयटीएमएस या प्रणालीद्वारा शहरातील १०० बस थांब्यांवर डिजिटल फलक लावण्यात आले होते. ज्यामुळे त्या बस थांब्यांवरून जाणाऱ्या सर्व एनएमएमटी बस कुठल्या मार्ग क्रमांकाची आणि किती वाजेपर्यंत येईल हे सहज समजत होते. त्यामुळे प्रवाशांना त्याचा चांगलाच फायदा होत होता. विशेष म्हणजे एखादी बस ५-७ मिनिटांत येणार असेल आणि नेमके त्याच वेळेस बेस्ट वा अन्य शहर वाहतूक बस आल्या तर प्रवासी त्या बसने जाण्याचे टाळत होते. याच कारणाने प्रवासी संख्याही वाढत होती. दोन-अडीच वर्षे हा उपक्रम व्यवस्थित सुरू होता. मात्र त्यानंतर हळूहळू करीत एक-एक डिजिटल फलक बंद पडत गेले. याबाबत २०२२ डिसेंबरमध्ये ‘लोकसत्ता’मध्ये वृत्त आल्यावर त्याची दखल घेत एनएमएमटी प्रशासनाने ते पुन्हा सुरू केले. मात्र गेल्या काही आठवड्यापांसून अनेक बस थांब्यांवरील डिजिटल फलक पुन्हा बंद पडले आहेत. २०१८ मध्ये ९ कोटींचा खर्च करून ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र २०२२-२३ मध्ये हे फलक बंद पडले त्यावेळी नव्याने घेतलेल्या बसगाड्यांमध्ये फोर जी स्पेक्ट्रम प्रणाली होती आणि डिजिटल फलकासाठी वापरण्यात येणारी प्रणाली ही टू जी स्पेक्ट्रमची होती. त्यामुळे फोरजी प्रणाली टूजी प्रणालीला सहाय्यकारी ठरत नव्हती. मात्र त्यात तांत्रिक दुरुस्ती वा अद्यायावत केले जात नव्हते. याबाबत अनेक तक्रारी आल्यावर प्रणाली अद्यायावत करण्यात आली. मात्र आता पुन्हा हे फलक बंद पडले आहेत. याबाबत संबंधित विभाग अधिकाऱ्यांना विचारणा केली असता निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्याने आता काही सांगू शकत नाही, असे सांगण्यात आले. तर व्यवस्थापक याच्याशी संपर्क न झाल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

शिधापत्रिका वाटपासाठी विशेष मोहीम

 स्थलांतरित, असंघटित कामगारांना मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेमधील १९ मार्च रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्यातील जास्तीत जास्त स्थलांतरित किंवा असंघटित कामगारांना शिधापत्रिकांचे वितरण करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही विशेष मोहीम एप्रिल ते मे  या दोन महिन्यांच्या कालावधीत राबविली जात आहे. या प्रक्रियेमध्ये प्रचलित नियमानुसार पडताळणी किंवा तपासणी करून स्थलांतरित व असंघटित कामगारांना उचित शिधापत्रिका वितरित करुन शिधापत्रिकेवरील अनुज्ञेय लाभ तत्काळ देण्यात यावेत, अशा सूचना क्षेत्रीय यंत्रणेस देण्यात आलेल्या आहेत. ही प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राबविण्यात येत असल्याने जास्तीत जास्त स्थलांतरित व असंघटित कामगारांनी या प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण  विभागाने केले आहे.

महाराष्ट्रासाठी 2 लाख 15 हजार 850 शाईच्या बाटल्यांची तरतूद

लोकसभा निवडणूक 2024 मुंबई : लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात सुमारे २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्या लागणार आहेत. या शाईचे वाटप जिल्हानिहाय करण्यात आले आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघांमध्ये ९८ हजार ११४ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदार संघासाठी प्रत्येकी २ शाईच्या बाटल्या याप्रमाणे १ लाख ९६ हजार २२८ शाईच्या बाटल्यांची संख्या होते. याशिवाय १ लाख ९६ हजार २२८ शाईच्या बाटल्यांबरोबरच १० टक्के अधिक अशा एकूण २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्या त्याचबरोबर मतदानासाठी आवश्यक ते साहित्य येत्या काही दिवसात पोहोच करण्यासाठी निवडणूक यंत्रणेमार्फत प्रयत्न सुरु आहेत. या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांकरिता राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये पावणे ९ कोटी २४ लाख ९१ हजार ८०६ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या मतदारांच्या डाव्या तर्जनीवर शाई लावण्याकरिता निवडणूक आयोगामार्फत सुमारे २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. या सर्व बाटल्या राज्याला प्राप्त झाल्या असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. मतदारांच्या तर्जनीवर लावण्यात येणारी आणि काही दिवस न पुसली जाणारी ही शाई म्हैसूर पेंटस् कंपनीमार्फत बनवली जाते. मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारी ही काळी रेष निवडणुकांचा अविभाज्य घटक बनली आहे. मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या तर्जनीवर न पुसली जाणारी शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. मतदानापूर्वी मतदान केंद्राध्यक्ष (पोलींग ऑफीसर) मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावलेली आहे की नाही याची तपासणी करतात. जी व्यक्ती डाव्या तर्जनीची तपासणी करु देत नाही ते मतदानासाठी अपात्र असल्याचे मतदान अधिकारी सांगू शकतात. जर एखाद्या मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर त्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.

‘संसद ताब्यात घ्या; पण मित्रपक्षांचाही मान राखा’

शिंदे गटाचे खासदार कीर्तिकर यांचा मोदींना टोला मुंबई : विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे ही भाजपने आणलेली नवी संस्कृती आहे. अनुच्छेद ३७० रद्द करणे, वस्तू सेवा कर, राम मंदिर…

हाफकिनकडून आणखी १६ औषधांचे उत्पादन!

मुंबई : राज्य सरकारने हाफकिनला आणखी १६ औषधांची निर्मिती करण्याची परवानगी दिली आहे. परिणामी, हाफकिन निर्मिती करीत असलेल्या औषधांची संख्या २५ हून अधिक होणार आहे. हाफकिन जीवऔषध निर्माण महामंडळ निर्मिती…

रमजान ईद मुबारक! 

फुलांना बहर मुबारक, शेतकऱ्याला पीक मुबारक, पक्ष्यांना उडान मुबारक, चंद्राला तारे मुबारक … रमजान ईदच्या शुभेच्छा देताना मुस्लिम बांधव. छाया संतोष नागवेकर

रेल्वेचे आता ‘सुपर ॲप’

मुंबई :  रेल्वेचा प्रवास करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. आता भारतीय रेल्वेतर्फे ‘सुपर ॲप’ लॉन्च करण्यात येणार आहे. या अॅपमध्ये सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळं आता प्रत्येक समस्येसाठी वेगवेगळ्या अॅपची गरज नसणार आहे. आता एकाच…

गिरीश महाजनांची खडसेंवर टीका सुरुच

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाकामांवर विश्वास ठेऊन आपण भाजपात पुन्हा प्रवेश करणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी जाहिर केल्यानंतरही भाजपाचे नेते गिरीश महाजनांनी त्यांच्यावरील टीका सुरुच ठेवली आहे. गिरीश…

वर्षा गायकवाडंची पटोलेंविरोधात तक्रार

रमेश औताडे मुंबई : लोकसभेच्या जागावाटपात महाराष्ट्रात काँग्रेसवर अन्याय झाल्याची कार्यकर्त्यांत भावना आहे. पक्षश्रेष्ठी त्याचा जरुर विचार करतील. मी मुंबईची प्रदेशाध्यक्ष असतानाही मुंबईच्या जागावाटपाचा निर्णय घेताना माझे मत राज्य प्रदेशाध्यक्ष…