Category: मुंबई

Mumbai news

कोकण विभागीय लोकशाही दिनी 5 अर्ज प्राप्त

नवी मुंबई : कोंकण विभागीय लोकशाही दिन कोंकण भवनमध्ये अप्पर आयुक्त (सामान्य प्रशासन) संजीव पलांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. त्यांच्या समस्या जाणून प्रकरणे उचित कार्यवाहीसाठी…

सीपीएमचे गुजरात राज्य अधिवेशन उपलेटा येथे उत्साहात संपन्न

अनिल ठाणेकर ठाणे : ११ व १२ जानेवारीला राजकोट जिल्ह्यातील उपलेटा शहरात कॉम्रेड सीताराम येचुरी नगर येथे सीपीआय(एम) चे २४वे गुजरात राज्य अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्या अधिवेशनात १० जिल्ह्यांतील १९२ प्रतिनिधी उपस्थित होते. त्यापैकी ५६ महिला प्रतिनिधी होत्या. तसेच तरुणांचाही मोठा सहभाग होता. अधिवेशनाची सुरुवात मगनभाई जिवानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाली. शहीदांना पुष्पांजली अर्पण करून शोक प्रस्ताव घेण्यात आला. यांनतर उद्घाटन सत्राचे अध्यक्षपद माजी राज्य सचिव प्रागजीभाई भांभी यांनी भूषवले. स्वागत समितीच्या अध्यक्षा किरणबेन कालावाडिया यांनी सर्वांचे स्वागत केले. अधिवेशनाचे उद्घाटन डॉ. अशोक ढवळे यांनी केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात साम्राज्यवाद व झायोनिझमचा आणि राष्ट्रीय क्षेत्रात नव-फॅसिस्ट आरएसएस-भाजपचा धोका स्पष्ट केला. यावेळी सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींच्या एकतेची गरज त्यांनी अधोरेखित केली तसेच सीपीआय(एम) ची स्वतंत्र ताकद आणि प्रभाव वेगाने वाढवण्याची निकड देखील विषद केली.अधिवेशनात अहवाल दोन भाग्गत सादर करण्यात आला आणि दोन भागात त्यावर चर्चा झाली. राज्य सचिव एच.आय.भट्ट यांनी राजकीय भाग मांडला आणि केंद्रीय समिती सदस्य अरुण मेहता यांनी संघटनात्मक भाग मांडला. पहिल्या भागावर २४ प्रतिनिधींची भाषणे झाली आणि दुसऱ्या भागावर १७ प्रतिनिधींची भाषणे झाली. अहवाल एकमताने मंजूर झाला, तसेच प्रमुख मुद्द्यांवर १२ ठरावही करण्यात आले. पहिल्या दिवशी उपलेटा टाऊन हॉलमध्ये “शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांचे निराकरण” या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. डॉ. अशोक ढवळे, मुरलीधरन आणि दयाभाई गजेरा यांची भाषणे झाली. अधिवेशनात माजी राज्य सचिव सुबोध मेहता यांनी लिहिलेल्या “कम्युनिस्ट विचारसरणी” या गुजराती पुस्तिकेची नवीन आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. उदय जोशी यांनी क्रेडेन्शियल अहवाल सादर केला. या अधिवेशनाने एकमताने ३० सदस्यांची नवीन राज्य समिती आणि कायमस्वरूपी निमंत्रितांची एकमताने निवड केली. नवीन राज्य समितीने एकमताने एच. आय. भट्ट यांची राज्य सचिवपदी फेरनिवड केली आणि ९ सदस्यांचे राज्य सचिवमंडळ निवडले. मदुराई पक्ष काँग्रेससाठी ६ प्रतिनिधी, २ पर्यायी प्रतिनिधी आणि २ निरीक्षकांची निवड केली. मुरलीधरन यांनी समारोपाचे भाषण केले, ज्यामध्ये त्यांनी संघटनेशी संबंधित प्रमुख मुद्द्यांवर भर दिला. उपलेटा तहसील आणि राजकोट जिल्हा संचाने परिषदेसाठी उत्कृष्ट व्यवस्था केली होती. आयोजक आणि स्वयंसेवकांचे आभार मानल्यानंतर, मोठ्या उत्साहात अधिवेशनाची सांगता झाली.

५वी अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट भामाच्या प्रिती अय्यरचे नाबाद शतक

यजमान स्पोर्टिंग युनियन, भामा सी.सी. विजयी मुंबई : सलामीच्या प्रिती अय्यरचे फटकेबाज शतक आणि तिने आयुषी इंदुलकर (२६) आणि अंजू सिंग (नाबाद ६७) यांच्यासह केलेल्या अनुक्रमे १०० आणि ११५ धावांच्या भागिदाऱ्या यामुळे भामा क्रिकेट क्लबला ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये जे भाटिय़ा क्रिकेट क्लबवर १३२ धावांनी मोठा विजय प्राप्त करता आला. स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशन यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या अन्य एका साखळी लढतीमध्ये यजमान स्पोर्टिंग युनियनने देखील ५ विकेटसनी महाराष्ट्र यंगला पराभूत केले. त्यांच्या या विजयामध्ये सलामीच्या प्रांजल मयेकर (५५) हिची महत्वपूर्ण भूमिका होती. प्रितीच्या झंझावाता पुढे हतबल झालेल्या जे. भाटिया संघाला प्रतिस्पर्ध्यांच्या एक बाद २१५ या प्रचंड धावसंख्येला केवळ ९ बाद ८३ असे प्रतिउत्तर देता आले. प्रितीने ७२ चेंडूमध्ये नाबाद ११५ धावांच्या खेळीमध्ये १७ चौकार आणि ३ षटकार होते. अंजू सिंगने भाटियाच्या जखमांवर मीठ चोळताना केवळ २९ चेंडूत ६७ धावा फटकावताना ६ चौकार आणि ५ षटकारांची बरसात केली. अंजूने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करताना १२ धावात २ बळीही देखील घेतले. कर्णधार सानया जोशी नाबाद ५२ हिच्या खेळीमुळे महाराष्ट्र यंगला ७ बाद १२१ अशी माफक धावसंख्या रचता आली. स्पोर्टिंगला ध्रुवी पटेल (३०) प्रांजल यांनी ८६ धावांची सलामी दिली. पण त्यानंतर १०५ धावांवर दुसरी विकेट गमावण्या पाठोपाठ त्यांनी आणखी तीन विकेट गमावत काहीश्या तणावाखाली आपले लक्ष १८व्या षटकात पार केले. आज माटुंगा जिमखाना येथे मुंबई क्रिकेटचे मानद सचिव अभय हड़प यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी अविसा आणि “एसजी”चे विजय कुमार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. संक्षिप्त धावफलक महाराष्ट्र यंग २० षटकात ७ बाद १२१ धावा (जयनी शाह २३, सानया जोशी नाबाद ५२, गगना मुल्का १५ धावात ३ बळी, तन्वी चव्हाण २० धावात २ बळी) पराभूत विरुद्ध स्पोर्टिंग युनियन १७.५ षटकात १२२ धावा (ध्रुवी पटेल ३०, प्रांजल मयेकर ५५, अनन्या अय्यर २८ धावात २ बळी, जैनी शाह १९ धावात २ बळी) सर्वोत्तम प्रांजल मयेकर भामा सी. सी. २० षटकात १ बाद २१५ धावा (प्रीती अय्यर नाबाद ११५, आयुषी इंदुलकर २६, अंजू सिंग नाबाद ६७) विजयी विरुद्ध जे. भाटिया सी. सी. २० षटकात ९ बाद ८३ (इशा शाह २१, सौम्या पान्डे २३ धावात २ बळी, अंजू सिंग १२ धावात २ बळी, चांदनी कनुजिया १० धावात ३ बळी) सामन्यात सर्वोत्तम प्रिती अय्यर. 00000

ठाण्याच्या युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशनने विजेतेपद राखले

मुंबई : ठाण्याच्या युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशनने स्पोर्ट्स फिल्डचे ११८ धावांचे आव्हान तब्बल ६ गडी आणि १७ चेंडू राखून पराभव करत कुर्ला स्पोर्ट्स क्लब आयोजित ६६ व्या बाळकृष्ण बापट स्मृती…

१६ वर्षाखालील गटात लोबो फेरडीनने मारली बाजी

चेस मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा   मुंबई : ओढ हिरवळी आणि माझगाव येथील सर एली कदुरी शाळेतर्फ विविध वयोगटासाठी चेस मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात १६ वर्षाखालील वयोगटात लोबो फेरडीनने ४.५…

नवी मुंबई सानपाडा येथे मराठा समाजाचा वधू वर मेळावा संपन्न

नवी मुंबई : नवी मुंबई सानपाडा येथे मराठा विकास प्रतिष्ठानच्या वतीने ११ जानेवारी रोजी केमिस्ट भवन येथे १५ वा मराठा समाजाचा वधु- वर परिचय मेळावा संपन्न झाला, अशी माहिती मराठा…

संविधान अमृत महोत्सव साजरा 

 कल्याणमध्ये वकील संघटनांच्या वतीने कल्याण :  बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा गजानन चव्हाण यांच्या प्रयत्नातून कल्याण येथे दिवाणी वकील संघटना, कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटना कल्याण, उल्हासनगर वकील संघटना, मुरबाड…

कल्याण, डोंबिवलीत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या सहा दुकानदारांवर कारवाई

कल्याण : मकरसंक्रातीनिमित्त बाजारात पतंग आणि मांजा विक्रीची झुंबड आहे. शासनाने हा आनंद घेत असताना नायलॉन मांजा, चिनी, प्लास्टिक कृत्रिम मांजा यांचा वापर पतंग उडविण्यासाठी करू नये असे आदेश दिले…

 माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त

 दोन कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ कल्याण : ऑल इंडिया केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष, माजी आमदार जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त २ कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण कल्याण पूर्व विजयनगर परिसरात करण्यात आले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये गेले तीन वर्षे प्रशासकीय राजवट सुरू असून नगरसेवकांना जनतेच्या कामाची पूर्तता करण्यासाठी पुरेसा निधी मिळत नसल्याने, शिवसेना नगरसेविका माधुरी प्रशांत, शिवसेना संपर्कप्रमुख, निरीक्षक कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र प्रमुख  प्रशांत काळे  यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निदर्शनात परिस्थिती आणून जनतेच्या विकास कामासाठी 2 कोटी  निधी उपलब्ध करून आणला.  त्यातील बहुतांशी कामे पूर्ण होऊन त्याचे रविवारी स्थानिक कार्यकर्ते यांच्या हस्ते प्रशांत काळे आणि माधुरी काळे यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. पोहच रस्ता, पेव्हर ब्लॉक, सिमेंट काँक्रीट रस्ते, पाणी योजना अश्या अनेक केलेल्या कामांचे लोकार्पण करण्यात आले. याबाबत प्रशांत काळे यांनी पत्रकारांशी संवाद साधून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानून, आपल्या पाठीशी उभे राहणारे नागरिक यांच्यासाठी आपण सदैव विकास कामांसाठी बांधील असल्याचे सांगितले. यावेळेस शिवसेनेचे विभाग प्रमुख सत्यवान खेडेकर, संतोष साळवी, अनंत आंब्रे, विभाग संघटक प्रशांत मांजरेकर, दिलीप कोल्हे, विशाल विरा, विभाग समन्वयक महेंद एटमे, उपविभाग प्रमुख संभाजी माने, भगवान सोंडकर, शाखाप्रमुख विशाल वाघमारे, प्रदीप तांबे, उपशाखाप्रमुख विकास गुरव, अतुल वाघमारे, सुरेंद्र मोरे, प्रमोद लाड, अमर मलाह, नंदकिशोर सुरकुतवार, राजाराम पठारे, साहेबराव आहिरे आणि मोठ्या संख्येने महिला आघाडी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. 00000

 ठाणे व डोंबिवली परिक्षेत्रामध्ये 22 ठिकाणी भक्तीपर्व समागम संपन्न

परमात्म्याशी एकरुपता हाच खऱ्या भक्तीचा आधार – निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज कल्याण : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संत निरंकारी मिशनच्या वतीने देशभरात रविवारी भक्ती पर्वाचे आयोजन करण्यात आले. भक्ती पर्व संत समागमाचा मुख्य कार्यक्रम सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेमध्ये संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा येथे संपन्न झाला. भक्तीपर्वाच्या निमित्ताने ठाणे शहर आणि कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, बदलापुर परिसरामध्ये एकंदर 22 ठिकाणी विशेष सत्संग समारोहांचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये हजारोंच्या संख्येने स्थानिक भक्तगणांनी भाग घेतला. समालखा येथील भक्तीपर्व संत समागमामध्ये सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित विशाल जनसमुदायाला संबोधित करताना प्रतिपादन केले, की “भक्ती अशी अवस्था आहे जी जीवनाला दिव्यत्व आणि आनंदाने ओतप्रोत करते. हा इच्छापुर्तीचा सौदा नाही किंवा स्वार्थाचे माध्यमही नाही. खऱ्या भक्तीचा अर्थ आहे परमात्म्याशी गहिरे नाते आणि निःस्वार्थ प्रेम।” याप्रसंगी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात श्रद्धा व भक्तिची अनुपम छटा पहायला मिळाली. दिल्ली, एन.सी.आर.सहित देश-विदेशातील हजारों भाविक-भक्तगणांनी या दिव्य समागमामध्ये भाग घेऊन आध्यात्मिक आनंदाची  दिव्य अनुभूती प्राप्त केली. इस पावन प्रसंगी महान संत सन्तोखसिंहजी यांच्यासह अनेक संतांच्या तप, त्याग आणि ब्रह्मज्ञानाच्या प्रचार-प्रसारामधील त्यांच्या अमूल्य योगदानांचे स्मरण केले गेले आणि त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्यात आली. समागमा दरम्यान अनेक वक्ते, कवी व गीतकारांनी विभिन्न माध्यमातून गुरुचा महिमा आणि भक्तीभावनेचे सारगर्भित वर्ण केले आणि संतांच्या प्रेरणादायी शिकवणूकीतून भाविकांच्या जीवनातील आध्यात्मिक दृष्टीकोन समृद्ध केला. सतगुरु माताजींनी माता सविंदरजी आणि निरंकारी राजमाताजी यांचे जीवन भक्ती आणि समर्पणाचे मूर्तिमंत प्रतीक असल्याचे सांगून या दिव्य विभूतींचे जीवन हे भक्ती आणि सेवा यांचे श्रेष्ठ उदाहरण असल्याचे सांगितले. निरंकारी मिशनचा मूळ सिद्धांत हाच आहे, की भक्ती ही परमात्म तत्वाला जाणूनच सार्थक रूप घेऊ शकते. निःसंदेह सतगुरु माताजींच्या अमूल्य प्रवचनांनी भाविक भक्तगणांना जीवनात ब्रह्मज्ञानाद्वारे भक्तीचे वास्तविक महत्व समजण्याची आणि अंगीकारण्याची प्रेरणा मिळाली.