Category: मुंबई

Mumbai news

महाराष्ट्राचे पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण तयार करा : शेलार

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे, यासाठी राज्याचे पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण तयार करण्याचे निर्देश माहिती व तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी बुधवारी दिले.…

बीकेसी-कुलाबा भुयारी मेट्रो प्रवास लवकरच

मुंबई : ‘एमएमआर’मधील वाहतूक कोंडी सोडवून नागरिकांचा प्रवास सुकर, सुसाट करण्यासाठी, कोणत्याही ठिकाणांहून इच्छितस्थळी ५९ मिनिटांत पोहोचता यावे यासाठी मेट्रो, सागरी सेतू, उन्नत रस्त्यासह अन्य प्रकल्पांच्या कामाला वेग देण्यात येईल. मुंबई महानगर प्रदेशाचा (एमएमआर) विकास आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणून ‘ग्रोथ हब’ संकल्पनेनुसार केला जाईल. नववर्षात विकास केंद्राच्या आराखड्यातील ३० प्रकल्पांच्या कामाला टप्प्याटप्प्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) सुरुवात करेल. अटल सेतू प्रभावित क्षेत्रात तिसरी मुंबई अर्थात नवनगर वसविले जाईल. या नवनगरचा आराखडा तयार करून भूसंपादनाच्या कामाला सुरुवात केली जाईल. ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा, तसेच ऑरेंज गेट – मरिन ड्राईव्ह बोगद्याचे कामही सुरू करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे नव्या वर्षात आरे-कुलाबा असा थेट भुयारी प्रवास करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण होणार असून दुसऱ्या टप्प्यातील बीकेसी – कुलाबादरम्यानची भूमिगत मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. एमएमआरमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्याची जबाबदारी एमएमआरडीएवर आहे. त्यानुसार एमएमआरमधील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी विशेषत्वाने एमएमआरडीएकडून मेट्रोसह अनेक प्रकल्प राबविले जात आहेत. त्यानुसार नव्या वर्षात एमएमआरडीएकडून कामे सुरू असलेली कोणतीही मेट्रो मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होण्याची चिन्हे नाहीत. यासाठी मुंबईकरांना २०२६ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. गृहनिर्मिती एमएमआरमध्ये ३० लाख रोजगार निर्मितीसह आठ लाख घरांची निर्मिती करण्याचे लक्ष्य आहे. यादृष्टीने २०२५ मध्ये कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. नवनगरसाठी भूसंपादन अटल सेतू प्रभावित क्षेत्रात नवनगर अर्थात तिसरी मुंबई विकसित करण्यात येणार आहे. त्यानुसार येत्या काही दिवसात नवनगरासाठी भूसंपादनाच्या कामालाही सुरुवात होणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून पहिला टप्प्यातील स्मारक जानेवारीअखेरीस खुले होण्याची शक्यता आहे. तर वसई – विरार आणि मिरा – भाईंदरमधील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीएने सूर्या प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातील पहिला टप्पा कार्यान्वित झाला असून त्याद्वारे वसई-विराराला पाणीपुरवठा केला जात आहे. आता दुसरा टप्पा येत्या काही महिन्यात पूर्ण करून मिरा-भाईंदरला मुबलक पाणीपुरवठा केला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विकास केंद्र एमएमआरडीएकडून एमएमआरच्या विकासासाठी मेट्रोसह अनेक पायाभूत सुविधा विकास प्रकल्प राबविले जात आहेत. पण आता संपूर्ण एमएमआरचा आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक विकास केंद्र म्हणून विकास करण्याचे उद्दीष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. निती आयोगाने एमएमआर ग्रोथ हबची शिफारस केली आहे. निती आयोगाच्या शिफारशीनुसार एमएमआर ग्रोथ हबचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आता ग्रोथ हबमधील ३० प्रकल्पांना एक – एक करून नव्या वर्षात सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. एमएमआरचा २०३० पर्यंत आर्थिक विकास करून अर्थव्यवस्था मजबूत केली जाणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) कुलाबा – वांद्रे – सीप्झ भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी – कुलाबा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. मार्च २०२५ मध्ये बीकेसी-आचार्य अत्रे, वरळी मेट्रो स्थानक मार्गिका वाहतुकीसाठी खुली होईल. तर जून २०२५ आचार्य अत्रे, वरळी, मेट्रो स्थानक – कुलाबा टप्पा सुरू होईल. हे टप्पे सुरू झाल्यास आरे – कुलाबा असा थेट भुयारी मेट्रो प्रवास करणे शक्य होणार आहे. एमएमआरडीएकडून सांताक्रुझ – चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. या विस्तारीकरणाअंतर्गत वाकोला नाला ते पानबाई इंटरनॅशनल स्कुल दरम्यान उन्नत रस्ता बांधण्यात येत आहे. या रस्त्याचे काम नव्या वर्षात पूर्ण करून तो वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. हा उन्नत रस्ता खुला झाल्यास अमर महल ते पश्चिम द्रुतगती महामार्ग असा प्रवास सिग्नल विरहित आणि केवळ ३० ते ३५ मिनिटांत करता येईल. ठाणे – बोरिवली २० मिनिटांत ठाणे – बोरिवली अंतर केवळ २० मिनिटांत पार करता यावे यासाठी ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठीचे कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. तर भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम नव्या वर्षात सुरू होणार असल्याची माहिती महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली. पूर्वमूक्त मार्गावरून येणाऱ्या वाहनांमुळे ऑरेंज गेट येथे वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी दूर करून पूर्वमूक्त मार्गावरून येणाऱ्या वाहनांना चर्चगेट, मरिन ड्राईव्हला अतिवेगाने जाता यावे यासाठी ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या कामासही २०२५ मध्ये सुरुवात करण्यात येणार असल्याचेही मुखर्जी यांनी सांगितले. 00000

ठाण्यात वृक्षांची कत्तल, चार जणांविरोधात गुन्हा दाखल

ठाणे : तुळशीधाम येथील धर्मवीरनगर परिसरात सात वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महापालिकेतील वृक्ष प्राधिकरण विभागाने दिलेल्या तक्रारीनंतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. धर्मवीरनगर येथे एमएमआरडीएच्या इमारती आहेत. या इमारतीजवळील काही वृक्ष तोडल्याबाबतची तक्रार सुमारे २० दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाला प्राप्त झाली होती. या माहितीनंतर महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी दोन सप्तपर्णी, दोन जंगली उंबर, दोन जंगल चेरी आणि एक अज्ञात वृक्ष असे एकूण सात वृक्ष तोडण्यात आल्याचे तपासणीत आढळून आले. अधिकाऱ्यांनी याबाबत वृक्षांची लाकूड वाहून नेणाऱ्यांची चौकशी केली असता, चार जणांची नावे निष्पन्न झाली. त्यानुसार, वृक्ष प्राधिकरण विभागाने चितळसर पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज केला होता. याबाबत आता तक्रारी अर्जानंतर अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. झाडांचे संवर्धन आणि जतन अधिनियम १९७५ चे कलम २१ (१), २१ (२), ८ आणि महाराष्‍ट्र मालमत्‍ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ चे कलम ३ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

डोंबिवलीतील महानगर गॅसचा पुरवठा दुरुस्तीसाठी ८ जानेवारीला बंद

डोंबिवली : मुख्य गॅस वाहिकेच्या दुरुस्तीचे काम करावयाचे असल्याने महानगर गॅसकडून डोंबिवली शहराच्या विविध भागाला होणारा महानगर गॅसचा पुरवठा ८ जानेवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ६ यावेळेत बंद ठेवण्यात येणार…

परेश ठाकूर यांच्यामुळे मच्छी विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध होणार

अशोक गायकवाड पनवेल : पनवेल महापालिकेच्यावतीने नवीन पनवेल मधील गणेश मार्केट जवळील भुखंडावर तात्पुरत्या स्वरूपात मच्छी विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्या पार्श्वभुमीवर पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी या ठिकाणची अधिकाऱ्यांसह पाहणी करुन सूचना दिल्या. नवीन पनवेल शिवा कॉम्प्लेक्स जवळ असलेल्या बस डेपोजवळील भुखंड हा मच्छी मार्केट साठी राखीव असून मच्छी मार्केट उभारण्यात येणार आहे. तो पर्यंत मच्छी विक्रेत्यांना या ठिकाणी व्यवसाय करता यावा यासाठी तात्पुरत्या स्वरुपात या ठिकाणी पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. या ठिकाणची पनवेल महापालिकेचे माजी सभागृनेते परेश ठाकूर यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. यावेळी माजी नगरसेवक संतोष शेट्टी, माजी नगरसेविका सुशीला घरत, राजश्री वावेकर, महापालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर उपस्थित होते. ००००

कामगार कार्यकर्ते संदीप परब हे मुंबई पोर्टच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त

मुंबई : मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या गोदी विभागातील शेड सुप्रीटेंडंट व  सामाजिक  कामगार कार्यकर्ते  संदीप चंद्रकांत परब हे मुंबई पोर्टच्या ३७  वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निष्कलंकपणे सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने   इंदिरा गोदीतील हमालेज बिल्डिंग येथे ३१  डिसेंबर २०२४  रोजी  मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे  वरिष्ठ सहाय्यक गोदी प्रबंधक  हंसराज सावंत यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी सोबत मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष व मुंबई पोर्ट  प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर  प्रदीप नलावडे, युनियनचे सेक्रेटरी आणि  माजी बोर्ड मेंबर  दत्ता खेसे, युनियनचे सेक्रेटरी  विजय रणदिवे, युनियनचे  प्रसिद्धी प्रमुख  मारुती विश्वासराव असिस्टंट ट्रॅफिक मॅनेजर गणेश जाधव आणि अदाते उपस्थित होते.

गोगावलेंच्या एसटी भ्रष्ट्राचाराला फडणवीसांनी दिला नववर्षात ब्रेक !

स्वाती घोसाळकर  वाढीव दराने काढले होते टेंडर० दोन हजार कोटींचा बसणार होता फटका०  भरत गोगावलेंनी आचारसंहीतेपुर्वी घेतला होता घाईघाईत निर्णय   मुंबई : ना खाऊंगा ना खाणे दुंगा या पंतप्रधान…

भडेकर, राऊत, म्हस्के, मोरे, लुंगसेंना

मुंबई मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार   मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाचे प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. ज्येष्ठ छायाचित्रकार घनश्याम भडेकर यांनी लिहीलेल्या पुस्तकाला यंदाचा प्रतिष्ठेचा जयहींद पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.…

भडेकर, राऊत, म्हस्के, मोरे, लुंगसेंना मुंबई मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाचे प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. ज्येष्ठ छायाचित्रकार घनश्याम भडेकर यांनी लिहीलेल्या पुस्तकाला यंदाचा प्रतिष्ठेचा जयहींद पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ललित लेखनासाठी सकाळच्या विनोद…

 नववर्ष सीएसाठी लाख मोलाचे

 ८ हजार जणांना नोकऱ्या, २४१ कंपन्या घेणार उमेदवारांना सामावून   मुंबई : चाटर्ड अकाऊंटंट अर्थात सीए झालेल्यांसाठी नववर्ष अतिशय आंनदाचे जाणार आहे. आयसीएआय या संस्थेने तब्बल ८ हजार सीएंना २४१ कंपन्यांमध्ये नोकरी दिली आहे. जानेवारीपासून हे सीए कंपन्यांमध्ये रूजू होतील. यातील सर्वांधिक पगाराचे पॅकेज २६.७० लाख रुपयांचे आहे. आयसीएआयच्या कॅम्पसमध्ये नुकत्याच सीएंच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामध्ये नोव्हेंबर २०२३मध्ये परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेले तसेच मे २०२४मध्ये या परी-क्षेत यश मिळवलेल्या सीएंचा समावेश होता. आजवरचा हा ६० वा मुलाखतीचा कार्यक्रम होता. तो फेब्रुवारी २०२४ आणि मे २०२४ या दोन टप्प्यांत घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात ३००२ आणि दुसऱ्या टप्प्यात ४७८२ उमेदवार सहभागी झाले होते. पहिल्या टप्प्यात सर्वाधिक पगार होता तो २९ लाखांचा जो दीएगो इंडिया या कंपनीने दिला. तर दुसऱ्या टप्प्यात २६.७० लाख रुपयांचे पॅकेज देण्यात आले. अर्थात नेहमीपेक्षा पगाराचे पॅकेज यावेळी सरासरी पाहता कमीच होते. ते १३.२४ लाख आणि १२.४९ लाख असे खाली घसरले. या मुलाखती देशातील ९ मुख्य केंद्रांवर पार पडल्या. त्यामध्ये मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद या मोठ्या शहरांचा समावेश होता, त्याचबरोबर २० लहान केंद्रांवरही या मुलाखती घेण्यात आल्या. आयसीएआयचे धीरज खंडेलवाल यांनी सांगितले की, नोकरी मिळालेली आकडेवारी फारच आशादायी आहे. हे क्षेत्र विस्तारत आहे. विविध कंपन्यांमध्ये सीए झालेल्या उमेदवारांना मोठी मागणी आहे. यावेळी मुलाखत घेणाऱ्या कंपन्यांमध्येही मोठी वाढ नोंदवली गेली. येत्या २४ आणि २५ जानेवारीला विदेशातील कंपन्यांमध्ये सीए झालेल्या उमेदवारांना नोकरी मिळावी यासाठी विशेष कॅम्प भरवण्यात येणार आहेत. संयुक्त अरब अमिरात तसेच आशिया आणि यूरोप खंडातील अनेक देशांमधील कंपन्या या कॅम्पमध्ये सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. या अभ्यासक्रमाचे जगभरात ९ लाख ८५ हजार विद्यार्थी आहेत, अशी माहितीही खंडेलवाल यांनी दिली.