Category: देश

National-News

खातेवाटप जाहीर

अमित शाह पुन्हा गृहमंत्री, गडकरींकडे रस्ते  विकास नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळाचे आज खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. अमित शाहयांच्याकडे पुन्हा एकदागृहमंत्रीपद  सोपवण्यात आले आहे. नितीन गडकरींकडे रस्ते  विकास कायम ठेवण्यात आले आहे. राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाचीजबाबदारी देण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालय एस. जयशंकर यांच्याकडे देण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी यांनीरविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह72 मंत्र्यांनी पद आणि गोपिनीयतेची शपथ घेतली होती. त्यानंतर आता खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. मोदी कॅबिनेटचं खातेवाटप जाहीर! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 72 जणांनी रविवारी 9 जूनला  कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलीहोती. महाराष्ट्रातील 6 जणांचा यामध्ये समावेश होता. शपथघेतल्यानंतर या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार याकडेसर्वांचं लक्ष होतं. अखेर आज हे खातेवाटप जाहीर करण्यातआलं. त्यानुसार नितीन गडकरी यांना पुन्हा त्यांचं रस्ते आणिपरिवहन वाहतूक मंत्रालय, अमित शाह यांना गृह, एसजयशंकर यांना परराष्ट्र, राजनाथ सिंह यांना संरक्षण आणिअश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्रालय मिळालं आहे. बिहारने केली होती रेल्वे मंत्रालयाची मागणी बिहारमधील घटकपक्ष असलेल्या नितीश कुमार यांनी रेल्वेमंत्रालयाची मागणी केली असल्याची माहिती होती. पण हेखातं भाजपच्या अश्विनी वैष्णव यांच्याकडेच राहणारअसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला कोणतं मंत्रालय? अमित शाह- गृहमंत्रालय राजनाथ सिंह- संरक्षण मंत्रालय एस जयशंकर – परराष्ट्र नितीन गडकरी- रस्ते आणि वाहतूक निर्मला सीतारमन – अर्थमंत्रालय शिवराज सिंह चौहान- कृषी मंत्रालय…

मोदींचे ७२ जणांचे मंत्रीमंडळ

अजित पवारांना भोपळा; शिंदे सेनेची एका राज्मंत्रीपदावर बोळवण मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा नेत्यांचा समावेश नितीन गडकरी, पीयुष गोयल यांना कॅबिनेट मंत्रिपद मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव आणि रामदास आठवले यांना…

राष्ट्रपतींकडून मोदींना शपथविधीचे आमंत्रण!

 ९ जूनचा मुहुर्त ठरला ! नवी दिल्ली : नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा मुहुर्त अखेर ठरला. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्यास सज्ज झाले आहेत. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना येत्या रविवारी ९…

खोटे एक्झिट पोल दाखवून शेअर बाजारात करोडोंचा घोटाळा

राहुल गांधींचा मोदी, शाहंवर आरोप नवी दिल्ली : सोमवारी शेअर बाजार उघडण्यापुर्वीच खोटे एक्झिट पोल दाखवून शेअर मार्केट वधारून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी आणि शहांवर केला…

नरेंद्र मोदी होणार तिसऱ्यांदा पंतप्रधान

 नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचे ‘एनडीए’ला समर्थन नवी दिल्ली  : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. एनडीएच्या बैठकीत आज एकमताने मोदी यांची नेतेपदी निवड करण्यात आली. त्यापुर्वी एनडीएच्या बैठकीमध्ये संयुक्त जनता दलचे…

अरविंद केजरीवालांचे आत्मसमर्पण

“देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय”– अरविंद केजरीवाल नवी दिल्ली : “आम आदमी पार्टी महत्त्वाची नाही, देश महत्त्वाचा आहे. देश वाचवण्यासाठी मी तुरुंगात जात आहोत. मी हुकूमशाहीविरोधात आवाज उठवला आहे, म्हणून मला कोणत्याही पुराव्याशिवाय तुरुंगात टाकले, ही हुकूमशाही आहे,” अशी…

प्रज्ज्वल रेवण्णाला ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी

बंगुळूरू: कर्नाटकमधील सेक्स टेप प्रकरणी आरोपी प्रज्वल रेवण्णाला आज पोलिसांनी बंगुळूरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली . त्याला विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली…

पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींना माझी पहीली पसंती : खरगे

नवी दिल्ली : इंडिया आघाडीने या निवडणुकीत एनडीएचा पराभव केला तर पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांना माझी पहिली पसंती असेल, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या सातव्या टप्प्याचे…

हुकूमशाहीपासून देशाला वाचवण्यासाठी जेलमध्ये जातोय : अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल २ जून रोजी आत्मसमर्पण करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी एक भावनिक व्हिडीओ प्रसारित करून जनतेशी संवाद साधला आहे. “मी कुठे असीन, आत किंवा बाहेर, दिल्लीचं काम थांबणार नाही हुकूमशाहीपासून देशाला वाचवण्यासाठी जेलमध्ये जातोय.”, असं अरविंद…

सावधान !

देशभरात ५४ जणांचा उष्माघातामुळे मृत्यू नवी दिल्ली : भर उन्हात जर बाहेर पडत असाल तर सावधान ! देशभरात दिवसागणिक उष्णतेची लाट वाढत असून आतापर्यंत उष्माघाताने ५४ लोकांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या तापमानामुळे हवामान खात्याने नागरिकांना…