Category: पालघर

palghar news

पालघरमध्ये महायुतीत तिढा कायम

 मनधरणीसाठी नेत्यांची दमछाक पालघर : लोकसभा निवडणुका जाहीर होउ न वीस दिवसांचा कालावधी लोटला आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागा वाटप आणि उ मेदवार निश्चित करण्याच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहे. पालघर लोकसभेसाठी आघाडीने शिवसेना उ बाठाचे उ मेदवार घोषीत केले आहे. मात्र, महायुतीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हट्टामुळे शिवसेनेला ही जागा भाजपला सोडण्याची नामुष्की आली आहे. मात्र, उमेदवारीवरून अजुनही खल मिटलेला नाही. उमेदवारी वरून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मनधरणीसाठी नेत्यांना वारंवार बैठका घ्याव्या लागतं आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सुरं जुळलेले नाही. त्यासाठी नेत्यांची दमछाक झाली आहे. मागील निवडणुकीत पालघर लोकसभेतुन शिवसेनेचे राजेंद्र गावीत निवडुन आले होते. यावेळी ही जागा भाजप ला मिळावी म्हणून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आग्रहाची मागणी लावुन धरली. अखेर, मोठा खल आणि वाटाघाटी करून शिवसेनेला पालघर ची जागा भाजप ला सोडण्याची नामुष्की आली. मात्र, उमेदवारी वरून अजुनही युती चे घोडे आडले आहे. एकीकडे राज्यात युती आणि आघाडीचे उमेदवार निश्चितीचा तिढा अंतिम टप्प्यात आला आहे. परंतु पालघर च्या उ मेदवारी चा तिढा अजुनही सुटलेला नाही. भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांनी पालघर ची जागा भाजप ला मिळावी तसेच खासदार राजेंद्र गावीतांच्या उमेदवारी ला प्रखर विरोध करत आपली बाजु माध्यमांकडे जाहीरपणे मांडली आहे. त्यामुळे महायुतीतील वाद उफाळून आला. दुसरीकडे वसई- विरारमधील भाजप पदाधिकार्यांनी देखील राजेंद्र गावीतांच्या उमेदवारी ला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे युतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. हा वाद शमविण्यासाठी युतीच्या नेत्यांना ठिक ठिकाणी बैठका घ्याव्या लागल्या आहेत. त्यानंतर मनोर येथे भाजप नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह युतीच्या प्रमुख नेत्यांना मनोमिलन बैठक घ्यावी लागली आहे. मात्र, या बैठकीतही भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजेंद्र गावीत यांच्या उमेदवारी विरोधात सुरं आळवला आहे. अखेर, नेत्यांना कार्यकर्त्याची मनधरणी करण्यात अपयशच आले आहे. काही दिवसांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत येउ न ठेपली आहे. मात्र, युतीचा उमेदवारीचा तिढा कायम असल्याने, महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हट्टहास करून पालघर ची जागा शिवसेनेकडून मिळवली. त्यानंतर शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावीत यांनाच पुन्हा नव्याने भाजप कडून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यासाठी गावीतांनी देखील भाजपच्या वरिष्ठांकडे धावाधाव केली आहे. ही बाब लक्षात आल्याने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा गावीतांच्या उ मेदवारी ला अधिकच विरोध वाढला आहे. अखेर, मनोरच्या बैठकीत युतीच्या नेत्यांना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मनधरणीसाठी ” पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच उ मेदवार समजून, एक दिलाने कामाला लागण्याचे केविलवाणे आवाहन करावे लागले आहे. मात्र, तरीही गावीतांच्या उमेदवारी ला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विरोधच राहिला आहे.

सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू

विरार : मार्चअखेरीस येणाऱ्या गुड फ्रायडे (ता. २९) पासून रविवार (ता. ३१)पर्यंत सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही पालघर जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक व सह दुय्यम निबंधक कार्यालये दस्त नोंदणीसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय…

एमपीएससीच्या परीक्षा लांबणीवर

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यात येत्या २८ एप्रिल रोजी होणारी ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’, तसेच १९ मे रोजी होणाऱ्या ‘समाज कल्याण अधिकारी गट…

डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेस अंतिम फेरीत

४८ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धा ठाणे : डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेस संघाने सारस्वत बँकेचा १३६ धावांनी दणदणीत पराभव करत ४८ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक…

मुख्यमंत्र्यांचे आपल्या नेत्यांवर नियंत्रण नाही – आनंद परांजपे

अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्रामध्ये असे चित्र दिसते आहे की, मुख्यमंत्र्यांचे आपल्या नेत्यांवर नियंत्रण नाही. किंवा त्यांच्याच पक्षाचे नेते हे मुख्यमंत्र्याचे ऐकत नाहीत. विजय शिवतारे हे राष्ट्रवादीची शक्तिस्थळे, स्वाभिमान, बारामती…

महावितरणच्या कल्याण ग्रामीण विभागाचे विभाजन

बदलापूर विभागीय कार्यालय कार्यान्वित कल्याण : भौगोलिकदृष्ट्या मोठ्या असलेल्या कल्याण ग्रामीण विभागाचे ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरणने विभाजन केले आहे. कल्याण ग्रामीण विभागातून बदलापूर विभागाची निर्मिती करण्यात आली असून बदलापूर पूर्व आणि…

कल्याण परिमंडलातील ९ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित थकबाकी दोनशे कोटींच्या घरात; वसुलीला वेग कल्याण: थकीत वीजबिलांचा भरणा टाळणाऱ्या थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने तीव्र केली आहे. १३ मार्चपर्यंत…

मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणासाठी २८ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : मातंग समाजातील व तत्सम १२ पोट जातीतील विद्यार्थ्यांस प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी २८ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे मुंबई…

निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याचे प्रश्नचिन्ह

भारताचे एक नियडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे हे गेल्या महिन्यात निवृत्त झाल्याने एक आयुक्तपद रिक्तच होते. आता आयुक्त अरूण गोयल यांनी पदत्याग केला आणि त्यामुळे तीन सदस्यांच्या भारताच्या निवडणूक आयोगात केवळ…