Category: रायगड

raigad news and updates

तृतीयपंथीयांच्या घरकुल मागणीसाठी शासनाकडून मार्गदर्शन घ्यावे – एम देवेंदर सिंह

अशोक गायकवाड रत्नागिरी : शहर ज्येष्ठ नागरिक संघाकडून आलेल्या मागण्यांची पूर्तता संबंधित विभागाने करावी. त्याचबरोबर तृतीयपंथीयांच्या घरकुल मागणीबाबत नगरपरिषदेने शासनस्तरावरुन मार्गदर्शन मागवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले. समाजकल्याण…

सुधागडातील शाळांमध्ये वैयक्तिक क्रीडा स्पर्धा

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे व टाटा कॅपिटल लिमिटेड यांच्या सौजन्याने पाली ः सुधागड तालुकास्तरीय वैयक्तिक क्रीडा स्पर्धा ,सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे व टाटा कॅपिटल लिमिटेड यांच्या…

माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा

माथेरान : माथेरान मध्ये माघी गणेशोत्सव उत्साहात आणि आनंदाने साजरा करण्यात आला. १ फेब्रुवायेथील विविध ठिकाणी जवळपास पंचवीस गणेशमूर्तींची यानिमित्ताने प्रतिष्ठापना करण्यात आली होती.माथेरान हे एक छोटेसे गाव असल्याने ग्रामस्थांनी घरोघरी जाऊन बाप्पांच्या दर्शनाचा लाभ घेतला.दि.२ रोजी बाप्पांना ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करून मुले ,मुली महिलांनी बेभान होऊन नाचत निरोप देण्यासाठी मिरवणुकीत भाविकांनी गर्दी केली होती.येथील शारलोट तलावात विसर्जन करण्यात आले.परंतु नेहमीप्रमाणेच बत्ती गुल असल्याने याभागातून बाप्पाना अंधारात मार्गक्रमण करावे लागले.

डायलिसीस सुविधा देणारे हे रायगड जिल्हयातील सर्वात मोठे केंद्र – आदिती तटकरे

अशोक गायकवाड रायगड : डायलिसीस सुविधा देणारे हे रायगड जिल्हयातील सर्वात मोठे केंद्र आहे. अशा प्रकारे जिल्हयात ३२ केंद्र मंजुर करण्यात आले आहेत.संपुर्ण राज्यात शासनाने ४०० डायलिसिस केंद्रांना मंजुरी दिली आसून त्यामधे रोज ३००० रुग्णांना सेवा दिली जाणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण विभाग अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक रायगड अलिबाग आणि एच.एल.एल.लाईफ केअर लि.यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रूग्णालय म्हसळा येथे सुरु करण्यात आलेल्या डायलिसिस सेंटरचे लोकार्पण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना मोफत सेवा देण्यात येणार असल्याची घोषणा तटकरे यांनी यावेळी केली. या कार्यक्रमाला वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रफुल्ल पावसेकर, उप जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण शिंदे, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, स.पो.निरिक्षक संदीप कहाळे, सा.बांधकाम अभियंता महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलतांना तटकरे म्हणाल्या, म्हसळा या ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र कक्षात ५ डायलिसिस मशीन व बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. दरदिवसाला १५ डायलिसिस रूग्णांना सेवा दिली जाणार आहे. डायलिसीस सुविधा देणारे हे रायगड जिल्हयातील सर्वात मोठे केंद्र आहे. अशा प्रकारे जिल्हयात ३२ केंद्र मंजुर करण्यात आले आहेत. संपुर्ण राज्यात शासनाने ४०० डायलिसिस केंद्रांना मंजुरी दिली आसून त्यामधे रोज ३००० रुग्णांना सेवा दिली जाणार आहे. श्रीवर्धन मतदार संघात श्रीवर्धन येथे २,माणगाव २, आणि रोहा येथे ३ मशीन ऊपलब्ध आहेत. जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन कु. तटकरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रफुल्ल पावसेकर यांनी केले.यावेळी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

नावीन्यपूर्ण कृषिकडे वळताना कृषी परिसंस्था बदलू नका-डॉ. संजय भावे

अशोक गायकवाड कर्जत : नावीन्यपूर्ण कृषिकडे वळताना कृषी परिसंस्था बदलू नका, त्यामुळे सामाजिक समस्या निर्माण होतात.सोयाबीन, बी. टी.कापसाचे उत्पादन ज्या भागात होते त्याठिकाणी शेतकरी आत्महत्यासारख्या समस्या उद्भवल्या मात्र कोकणातील भात…

जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध मोहीम अभियान सुरु – डॉ. भरत बास्टेवाड

अशोक गायकवाड अलिबाग : कुष्ठरुग्ण शोध मोहिमेतंर्गत आशा स्वयंसेविका, स्वयंसेवक व आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षन करून संशयित कुष्ठरुग्णांचा शोध घेणिर आहेत. नागरिकांनी कृष्ठरोग आजारबाबत गैरसमज व भीती न बाळगता घरी…

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ‘स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी’ अभियान उपयुक्त – आदिती तटकरे

अशोक गायकवाड रायगड : ‘शालेय विद्यार्थ्यांना जागरूक, आदर्श आणि सक्षम नागरिक बनण्याच्या दृष्टीने माझी शाळा  सुरक्षित शाळा अंतर्गत राबविण्यात आलेला स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी हा उपक्रम अत्यंत स्तुत्य व उपयुक्त…

जिल्ह्यात १४ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश- चंद्रकांत सूर्यवशी

अशोक गायकवाड रत्नागिरी : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ३१ जानेवारीला रात्री १ वाजल्यापासून ते १४ फेब्रुवारी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवशी यांनी दिला आहे. जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा क्र. ६६ चे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येतात. अशा वेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. १ फेब्रुवारी पासून माघी गणेशोत्सव सण साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. खालील कृत्य करण्यास मनाई करण्यात येत आहे. शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेवून फिरणे. अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे. दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे. सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल, अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार करणे. इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितिनी घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे. पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे.अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी बाबींना प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत.प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणलाही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही.

रस्त्याच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेले सा. बां. चे अधिकारी रिकाम्या हाताने परत

अतिक्रमण करणाऱ्यांनी घेतला मुस्लिम असल्याचा गैरफायदा; अतिक्रमण हटविण्यासाठी तक्रार करणारा देखील मुस्लिमच राज भंडारी रायगड : नागोठणे – पोयनाड रस्ता क्र – 87 हा रस्ता HAM अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रहदारीच्या दृष्टीने सहा पदरी असे रुंदीकरण करण्यासाठी शासनाच्यावतीने भुसंपादित करण्यात आला असतानाही याठिकाणी येथील काही तरुणांनी शासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून अतिक्रमण केल्याचा प्रकार समोर आला. मात्र येथील अतिक्रमण हे आजही ऐटीत उभे राहिल्यामुळे रस्ता रुंदीकरण कामाला सुरुवात होऊ शकली नसल्याचा आरोप स्थानिक तक्रारदार नसीम खान अधिकारी यांनी केला आहे. तसेच अतिक्रमण धारकांकडून मुस्लिम असल्यामुळे नोटीसा पाठवून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा बनाव करण्याचा प्रकार हा पूर्ण खोटे असल्याचा निर्वाळा देखील देत मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे काम अतिक्रमण धारकांनी केले असल्याचे तक्रारदार नसीम खान अधिकारी यांनी यावेळी सांगितले. येथील स्थानिक मुळ जागामालक नसीम अधिकारी आणि त्यांचा मुलगा दानिश अधिकारी यांनी संबंधित अतिक्रमण हटविण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरु केला. सदरील चौक रस्त्यालगत दोन शाळा आणि महाविद्यालये आहेत तसेच याच रस्त्यावर रिलायन्स कंपनी देखील आहे. या कंपनीमुळे याठिकाणी अवजड वाहने मोठ्या प्रमाणावर ये – जा करीत असतात, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याठिकानी ये – जा करणाऱ्या शाळकरी मुलांचे संरक्षण व्हावे यासाठी रस्त्याचे रुंदीकरण महत्वाचे आहे. मात्र सदर चौक परिसरात तब्बल 7 जणांनी अतिक्रमणे करून आपली दुकाने थाटली आहेत. याचा फटका येथील शालेय विद्यार्थ्यांना बसत असल्यामुळे स्थानिक तक्रारदार नसीम खान यांनी याठिकाणी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला. पेण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी डी. एम. पाटील यांनी सदरील अतिक्रमण हटविण्याच्या नोटीसा 07 ऑगस्ट 2024 पासून अतिक्रमण धारकांना पाठविल्या. यामध्ये मंजर महम्मद अली जुईकर, इकबाल पेणकर, बशीर शिदी, म्हात्रे ट्रेडर्स, मीरा गॅरेज, आयझल चिकन सेंटर आणि पटेल हॉटेल यांच्या नावाने नोटीसा काढण्यात आल्यानंतर सदरील अतिक्रमण हे 7 दिवसात हटविण्याचे या अतिक्रमण धारकांनी मान्य केले होते. मात्र साडे पाच महिने उलटून गेल्यानंतरही सदर अतिक्रमण हे अतिक्रमण धारकांनी किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने हटविण्यात आले नाही. नसीम अधिकारी आणि त्यांचा मुलगा दानिश अधिकारी यांनी वारंवार अतिक्रमण हटविण्याबाबतचा तगादा लावल्यामुळे पेण येथील सार्वजनिक बांधकाम बिभागाच्यावतीने दिनांक 21 जानेवारी रोजी सदरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली. मात्र सदरील अतिक्रमण हटविण्याची ही मोहीम म्हणजे दिखावेगिरी असल्याचा आरोप तक्रारदार नसीम अधिकारी यांनी केला. यामध्ये रस्त्यासाठी दोन्ही बाजूने 30 – 30 मिटर असे एकूण 60 मिटर भुसंपादित क्षेत्र असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने अर्धवट अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. यावेळी तक्रारदार यांनी पूर्ण अतिक्रमण हटवून रस्त्याच्या रुंदीकरण कामाची मागणी केली असता सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक रिकाम्या हाती माघारी झाल्याने या प्रकारात आर्थिक दबाव आहे का? असा संशय देखील नसीम खान अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. सदरील प्रकाराबाबत अधिकारी कुटुंबाने 7 – 10 – 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात देखील तक्रार दाखल करण्यासाठी गेले असताना याठिकाणी सदरील अतिक्रमण धारक मंजर मोहम्मद अली जुईकर आणि मोहब्बत अजीम हे याठिकाणी दाखल झाले. यावेळी तक्रार यांच्यासोबत वाद घालत त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली. याबाबत तक्रारदार यांच्या कुटुंबियांच्या वतीने या दोघांवर अलिबाग पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. मुळातच गुन्हेगारी वृत्तीने अतिक्रमण केले असल्याचा हा सढळ पुरावा शासनाकडे असतानाही शासनाचे अधिकारी या अतिक्रमण धारकांना वारंवार पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील नसीम खान अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. 21 ऑक्टोबर  रोजी पेणचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिक्रमण हटविणारे पथक या ठिकाणी आले असताना मात्र अतिक्रमण धारक मंजर मोहम्मद अली जुईकर यांनी आपण मुस्लिम असल्यामुळे आपल्याला नोटीसा पाठवून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा कांगावा केला. तसेच अतिक्रमण पथक हे माघारी फिरल्यानंतर आपण विजयी झाल्यासारखे फोटो सोशल मीडियावर व्हायरलं केले. मात्र हे अतिक्रमण धारक पूर्ण खोटे बोलून मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे काम करीत असल्याचे तक्रारदार नसीम खान अधिकारी यांनी यावेळी सांगितले. तसेच याबाबत योग्य ती कायदेशीर लढाई लढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत असेही बोलताना त्यांनी सांगितले.

कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तत्काळ कृती आराखडा तयार करा – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड :  कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तत्काळ कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिल्या. मुख्यमंत्री सात कलमी कार्यक्रमांतर्गत १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने खालापूर विभागातील औद्योगिक गुंतवणूक वाढीसाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली रसायनी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) भारत वाघमारे, उपविभागीय अधिकारी (प्रांत) कर्जत प्रकाश संकपाळ, खालापूर तहसीलदार अभय चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर विक्रम कदम, पोलीस निरीक्षक रसायनी संजय बाबर, पोलीस निरीक्षक खोपोली शीतल राऊत, पोलीस निरीक्षक सचिन पवार खालापूर, तसेच एमआयडीसी क्षेत्रातील औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जावळे यांनी औद्योगिक क्षेत्रातील व्यवसाय सुलभतेसाठी उपाययोजनांवर सखोल मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तत्काळ कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था, कर्मचारी आणि महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना, औद्योगिक क्षेत्रासाठी मूलभूत सुविधा, अग्निशमन दलाची गरज, अखंडित वीजपुरवठा आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.औद्योगिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जावळे यांनी दिले.