Category: रायगड

raigad news and updates

केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी-खासदार सुनिल तटकरे

अशोक गायकवाड रायगड : केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजना असून या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश खासदार सुनिल तटकरे यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व…

उघड्यावर शौचास करणाऱ्याना आता एक हजार रु दंड;-रेशन सह शासकीय योजना होणार बंद;

जरंडीच्या ग्रामसभेत ठराव   सोयगाव : खबरदार!आता उघड्यावर शौचालय साठी जाऊ तर ग्रामपंचायत देणार एक हजार रु दंड आणि रेशनचे धान्यही बंद करणार असल्याचा महत्वपुर्ण ठराव बुधवारी जरंडी ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत…

मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते संपन्न*

अशोक गायकवाड रायगड : जिल्हा रुग्णालय अलिबाग यांच्या माध्यमातून राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम (NCD) च्या राष्ट्रीय वृद्धापकाळ सुश्रुषा कार्यक्रमांर्तगत जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी (महिला व पुरुष) यांच्याकरिता…

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने ‘वीर बाल दिवसा’च्या निमित्ताने शिखांचे दहावे गुरू, गुरू गोबिंद सिंग यांचे छोटे साहिबजादे, बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि माहिती…

कझाकिस्तानमध्ये विमान कोसळले

 ४२ प्रवाशांचा मृत्यू० २५ प्रवाशांना वाचवण्यात यश   अझरबैझान : कझाकिस्तानच्या अक्ताऊ या ठिकाणी विमान कोसळून ४२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कझाकिस्तानच्या आपत्ती मंत्रालयाने दिलेल्या…

२५ वर्षात स्वस्त वीज, गरीबांना २० लाख घरे !

स्लग- महाराष्ट्राचा रोडमॅप ठरला स्लग- महाराष्ट्राचा रोडमॅप ठरला नागपूर : राज्य सरकारने उर्जा विभागाचा पुढील २५ वर्षांचा रोडमॅप तयार केला आहे. पुढील तीन वर्षात वीजेचे दर कमी करण्यात येतील. पंतप्रधान आवास ग्रामीण प्लस योजनेंतर्गत यंदा राज्यात गरीबांना २० लाख पक्की घरे दिली जातील. तर पुढील पाच वर्षांत सर्वांना पक्की घरे देण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रेस क्लब येथे झालेल्या मीट द प्रेस कार्यक्रमात केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझ्यासाठी राजकारण हे सेवेचे माध्यम आहे. नागपूरकरांना अभिमान वाटेल असे काम करण्याचा प्रयत्न आहे. लोककल्याणकारी योजनांचा बोजा अर्थसंकल्पात येतो. मात्र या सर्व गोष्टींचे नियोजन सरकारने केले आहे, तीन वर्षांत उद्योगांसह सर्व श्रेणींचे विजेचे दर स्वस्त व्हावेत, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी गृहनिर्माण योजनांच्या अटी शिथिल करण्याची राज्य सरकारची मागणी मान्य केली आहे. लाभार्थीने १० टक्के निधी जमा करण्याची अटही काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे गरिबांना सहज घरे मिळू शकणार आहेत. राज्य सरकार आता २० लाख गरीबांना हक्काची घरे देणार आहे. यासोबतच या घरांमध्ये सोलर रूफ टॉप बसवण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे घरकुलधारकांना मोफत वीजही मिळत राहील. राज्यात सहा नदी जोड प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. हे प्रकल्प मोठे बदल घडवून आणतील आणि ‘जनरेशन प्रोजेक्ट’ ठरतील. विदर्भातील १० लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. ७ जिल्ह्यांना…

ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर – डॉ.अंबादास देवमाने

अशोक गायकवाड रायगड :जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी (महिला व पुरुष) यांच्याकरिता २६ डिसेंबर, २७ डिसेंबर आणि २८ डिसेंबरला जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड-अलिबाग येथे सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले असून सर्वानी शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक,डॉ.अंबादास देवमाने यांनी केले आहे. या शिबिरामध्ये मेडिसीन विभाग-उच्च रक्तदाब, मधुमेह, पक्षाघात तपासणी व उपचार, हृदयरोग-गरजेनुसार 2D ECHO, X -ray, USG, ECG (stemi), डोळ्यांची तपासणी-डोळ्यांचे आजार व मोतिबिंदू चेकअप, मोफत चष्मे वाटप, स्त्रीरोग तपासणी-महिलांचे आजार, स्तन कर्करोग व गर्भाक्षयमुख कर्करोग तपासणी, नाक,कान, घसा तपासणी व शस्त्रक्रिया, गरजेनुसार एन्डोस्कोपीद्वारे कानाची श्रवण वाटप, ऑर्थोपेडिक-चेकअप, एक्स-रे, फिजिओथेरपि सुविधा, दंत विभाग- मुख आरोग्य तपासणी, दातांचे आजार, कवळी बसवणे, सर्जरी-हर्निया, हायड्रोसिल तपासणी व शस्त्रक्रिया, मानसिक-मानसिक आजार तपासणी, उपचार व तपासणी, आयुष-पंचकर्म, आयुर्वेद उपचार, समुपदेशन, आभाकार्ड-मोफत आभाकार्ड काढून दिले जाईल तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यकतेनुसार रक्ताच्या चाचण्या मोफत केल्या जातील.

डहाणूतील अतिक्रमणांवरील कारवाईविरोधात विनोद निकोले रस्त्यावर

 पूर्वसूचना, नोटिसा न देता कारवाई डहाणूच्या मुख्याधिकारी आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात संताप योगेश चांदेकर पालघरः रस्त्याच्या रूंदीकरणात येणारी अतिक्रमणे हटवल्याच्या विरोधात विनोद निकोले रस्त्यावर उतरले असून, नुकसान भरपाई आणि पुनर्वसन झाल्याशिवाय डहाणूतील रस्त्याचे रुंदीकरण होऊ न देण्याचा इशारा विनोद निकोले यांनी दिला आहे. डहाणूतील दुकाने, व्यापारी संकुलातील गाळे आणि झोपडपट्ट्या तोडण्याचे कारवाई डहाणू नगरपालिकेने केली असून त्या विरोधात आ. निकोले यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. यापूर्वी चर्चा झालेली असताना कोणतीही पूर्वसूचना न देता अतिक्रमणे काढण्यात आल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. दीडशे वर्षांपासून राहणाऱ्यांना केले बेघर विधिमंडळाचे अधिवेशन चालू असताना आमदारांना माहिती न देता ही कारवाई करण्यात आल्याबद्दल आ. निकोले यांनी नाराजी व्यक्त केली. डहाणू शहरातील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी रस्त्यालगतची दुकाने, टपऱ्या, व्यापारी संकुले तसेच काही पक्की घरेही पाडण्यात आली. त्या संदर्भात कोणालाही नोटिसा किंवा पूर्वसचना देण्यात आली नव्हती, असा आरोप आ. निकोले यांनी केला. डहाणूतील काही लोक शंभर दीडशे वर्षांपासून या घरात राहत आहेत. त्यांच्या नावावर वीजबिले, तसेच घरपट्टी आहेत. असे असताना त्यांना डहाणू नगरपालिकेने कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न पाठवता त्यांची पक्की बांधकामे उद्ध्वस्त केली. मुख्याधिकाऱ्यांची बेपर्वा वृत्ती डहाणू नगरपालिकेने मुख्याधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अतिशय बेपर्वाईने वागले असून याप्रकरणी त्यांनी आमदारांनाही विश्वासात घेतले नाही. आमदाराच्या सूचनांनाही डावलले. हा हक्कभंग आहे. याप्रकरणी आपण मुंबईच्या अधिवेशनात आवाज उठवणार आहोत; शिवाय सर्व गाळेधारक व्यापारी तसेच ज्यांची बांधकामे पाडली, ते नागरिक यांची एक सर्वसमावेशक बैठक घेऊन त्यांच्या पुनर्वसनाचा तसेच त्यांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न त्यात मांडला जाईल. त्याबाबत नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची काय भूमिका आहे ती जाणून घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.यावेळी माकपचे चंद्रकांत घोरखना  चेतन माढा,धनेश आक्रे, तसेच शमी पीरा संजय पाटील आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. संबंधितांवर कारवाईचा आग्रह संबंधितांवर कारवाई करण्याबाबत आपण वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करू, असे सांगून जोपर्यंत पुनर्वसन आणि नुकसान भरपाईबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत डहाणूतील रस्त्यांचे रुंदीकरण होऊ देणार नाही, असा इशारा आ. निकोले यांनी दिला. डहाणू आणि तलासरी तालुक्यातील जनता या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संबंधितांना जाब विचारेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

आरसीएफतर्फे देण्यात आलेल्या शितपेट्यांमुळे महिला मच्छिमारांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडेल -नितिन हिरडे*

अशोक गायकवाड* अलिबाग : आरसीएफतर्फे मच्छीमार महिलांना शितपेट्या वाटप करण्यात आले. या शीतपेटीमुळे या महिला मच्छिमारांच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण बदल घडेल आणि ते अधिक आत्मविश्वासी होऊन आपला व्यवसाय आणि कुटुंब…

जिल्ह्यात सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम राबवावी- किशन जावळे*

अशोक गायकवाड* रायगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०२५ ला भारत देश क्षयरोग मुक्त करण्याचे ध्येय ठेवलेले आहे जे की शाश्वत विकास ध्येयाच्या अपेक्षित कालावधी पेक्षा ५ वर्ष अगोदर…