अशोक गायकवाड अलिबाग: शेतीमधील खोती पद्धती विरुद्ध अलिबाग तालुक्यातील चरी येथे शेतकऱ्यांचे आंदोलन झाले होते. त्या आंदोलनाला बाबासाहेब आंबेडकर यांनी पाठिंबा देवून चरी येथे भेट दिली होती. या आंदोलनाचे स्मारक चरी गावाजवळ अलिबाग वडखळ रस्त्यानाजिक करण्याचे विचार असून त्याकरिता प्रयत्न करण्यात येणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवार, (दि. २१ जानेवारी २०२५ ) रोजी अलिबाग येथे पत्रकारांना सांगितले. त्यांनी चरी येथील शेतकरी आंदोलनस्थळी भेट देवून जागेची पाहणी केली. शेतकऱ्यांचे खोती प्रथेविरुद्ध आंदोलन रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील चरी या गावात १९३३ ते १९३९ असे ६ वर्षे झाले. या आंदोलना अंतर्गत शेतकऱ्यांनी संप केला.शेतकऱ्यांच्या संपाचा इतिहास सर्वांना माहिती व्हावा म्हणून चरी गावाजवळ सुमारे दीड एकर जमिनीची आवश्यकता असून पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र मुख्य रस्त्याजवळील जागा एमएमआरडी यांच्या ताब्यात असल्याने राज्य सरकारबरोबर चर्चा करून जागा मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मंत्री आठवले यांनी सांगून राज्याला पहिल्या क्रमांकावर आणण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या पाच वर्षात करतील तसेच देशाची अर्थव्यवस्था येत्या पाच वर्षात पहिल्या तीन क्रमांकावर येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कोकणातील विकास करायचा असेल तसेच रोजगारासाठी मुंबई पुण्याकडे जाणारा कोकणवासी थांबवायचा असेल तर कोकणात उद्योग आले पाहिजेत. त्यामध्ये स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे असेही मंत्री आठवले यांनी सांगितले. यावेळी मंत्री आठवले यांच्या समवेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), मोहनिष गायकवाड प्रभारी पनवेल महानगरनगर पालिका, हिरामण गायकवाड कर्जत तालुका अध्यक्ष, राहुल सोनावणे सुधागड तालुका अध्यक्ष, सुनील सप्रे अलिबाग तालुका अध्यक्ष, संजय गायकवाड उरण तालुका अध्यक्ष, जयप्रकाश पवार कोकण प्रदेश सहसचिव, जिवक गायकवाड कोकण प्रदेश युवासचिव, तानाजी गायकवाड रायगड जिल्हा उपअध्यक्ष, संजय जाधव अलिबाग तालुका सचिव ,शंकर दिनकर माने अलिबाग शहर अध्यक्ष , विजय गायकवाड तालुका प्रसिद्धी प्रमूख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.