Category: रायगड

raigad news and updates

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर सर्व मूलभूत सुविधा पुरविणे बंधनकारक- किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासनाची भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अंमलबजावणी सुरु आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर सर्व मूलभूत सुविधा पुरविणे बंधनकारक आहे. या मूलभूत सुविधांची पाहणी आणि तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिले. रायगड जिल्हा हा ३२-रायगड आणि ३३-मावळ अशा दोन लोकसभा मतदार संघात विभागला आहे. जिल्ह्यातील सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधित यंत्रणाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी जावळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जावळे म्हणाले की,मूलभूत सुविधा पुरविणे ही संबंधित विभागाची जबाबदारी आहे, सर्व अधिकाऱ्यांनी स्वत: मतदान केंद्राना भेट देऊन पाहणी करून मुलभूत सुविधांच्या उपलब्धतेची खात्री करावी. आवश्यकते नुसार डागडुजी, दुरुस्ती करावी. सर्व मतदान केंद्रांवर प्रकाश, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, रॅम्प आदींची व्यवस्था करण्यात यावी. वेब कास्टिंगसाठी निवडलेल्या मतदान केंद्रांवर आवश्यक अटींची खात्री करावी. ज्या मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदार मतदान करतील तेथे व्हीलचेअर व स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात यावी. आयोगाच्या सूचनानुसार आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जावळे यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यातील जी मतदान केंद्रे आदर्श मतदान केंद्र बनवली जातील, ती स्थानिक साहित्याने सुसज्ज असावीत. कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये. यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील किमान ५० टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग, सीसीटीव्ही किंवा व्हिडिओग्राफीसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तसेच मतदान केंद्रावर पोचण्यास मतदारास त्रास होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी. मतदानाचा दिनांक लक्षात घेता सावलीची व्यवस्था तसेच रांगेचे नियोजन करावे. सर्व मतदार केंद्रावर प्रथमोपचार सुविधा बरोबरच एक आरोग्य कर्मचारी अधिकारी नियुक्त करण्यात यावा. आवश्यक ती सर्व औषधे मतदान केंद्रावर ठेवण्यात यावीत, असेही त्यांनी यावेळी संगितले.

आपची ‘फेस टू फेस’ लढाई !

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टी इतकेच सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करून सत्तेत कायम राहणाऱ्या आपने मोदींविरुध्द ‘फेस टू फेस’ ची लढाई सुरु केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. केजरीवालांच्या…

आदिवासींच्या समस्याबाबत कार्यकर्त्यांनी भावी खासदार संजोग वाघेरे पाटील यांची घेतली भेट

माथेरान : रायगड जिल्हात आदिवासी समाजातील अनेक समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्या समस्यांचे निवारण करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी मावळ लोकसभा मतदार संघातील भावी खासदार मा. संजोग वाघेरे पाटील…

माथेरान मध्ये होळी आनंदात साजरी

माथेरान : माथेरान मध्ये सर्वत्र होळीचा सण आनंदाने साजरा करण्यात आला.गावात जवळपास पन्नास पेक्षाही अधिक होळ्या उभारण्यात आल्या होत्या.सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास महिलांनी होळीला नैवेद्य दाखवून पूजाअर्चा करत आनंदाने होळी…

जर सुनील तटकरे यांचा कडेलोट करणार असाल तर आमदार महेंद्र थोरवे यांना हत्तीच्या पायाखाली तुडवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेते सुधाकर घारे यांनी ठणकावले अशोक गायकवाड कर्जत : जर सुनील तटकरे यांचा कडेलोट करणार असाल तर आम्ही देखील तुम्हाला हत्तीच्या पायाखाली तुडवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे…

समाज प्रबोधन करण्यासाठी, अंनिस कार्यकर्त्यांनी चक्क पाण्याने होळी पेटवली.

खेड : समाजातील अंधश्रध्दा दूर करायच्या असतील तर, आपल्या लोकांन मध्ये जावे लागेल. लोकांना चमत्कार मागे विज्ञान असते किंवा त्या व्यक्तींची हात चलाखी असते. हे लोकांना पटवून द्यावे लागेल. कोकणात…

मतदार जनजागृतीसाठी उभारलेल्या सेल्फी पॉईंटवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी काढला सेल्फी फोटो !

अशोक गायकवाड रायगड : जिल्हा माहिती कार्यालयामार्फत मतदार जनजागृतीसाठी माध्यम कक्षाबाहेर उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटला जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भेट देऊन येथे सेल्फी फोटो काढला. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता…

खंडाळा बोगद्यात पंक्चरसाठी थांबलेल्या गाडीमुळे स्कॉडमधील पोलिसांची गाडी उभ्या कंटेनरला ठोकली-ना. रामदास आठवले

कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांनी रामदास आठवले यांची भेट घेऊन केली विचारपूस अशोक गायकवाड कर्जत : खंडाळा बोगद्यात एका गाडीचा पंक्चर काढत असताना, त्यावेळी दोन कंटेनर तिकडे येऊन थांबले.…

ऑस्ट्रेलियातील १० लाख भारतीयांचे अर्थकारण, समाजकारण, क्रिकेट, सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट योगदान-पॉल मर्फी

क्रिकेट उभय देशांना जोडणारा दुवा : राज्यपाल अशोक गायकवाड मुंबई : ऑस्ट्रेलियात जवळपास १० लाख भारतीय लोक राहत असून ते तेथील अर्थकारण, समाजकारण, क्रिकेट तसेच सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देत…