Category: ठाणे

Thane news

तळाच्या फलंदाजांनी भुवड संघाला तारले

ठाणे :घसरगुंडी झाल्यावर तळाच्या फलंदाजांनी किल्ला लढवत सामना अनिर्णित राखत गणपत भुवड संघाला ठाणे फ्रेंड्स यूनियन क्रिकेट क्लब आयोजित १६ वर्षे वयोगटाच्या पहिल्या तुकाराम सुर्वे स्मृती दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या…

बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समिती (रजि.) ही संघटना राबवित असलेल्या शालेय विद्यार्थी दत्तक योजनेतील बालमोहन विद्यामंदिर शाळेतील दोन विद्यार्थीनींना मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मा.संदिपजी चव्हाण साहेब व संघाचे उपाध्यक्ष…

नवी मुंबईला पडलाय अमली पदार्थांचा विळखा

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबईला अमली पदार्थांचा विळखा पडला आहे. अमली पदार्थांसदर्भातील गुन्ह्यांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. या वर्षभरात अमली पदार्थांची ६५४ प्रकरणे समोर आली आहेत. २०२३ मध्ये अमली पदार्थांच्या गुन्ह्याचे प्रमाण…

मराठी द्वेष्ट्या अखिलेश शुल्काला २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

कल्याण – कल्याण येथील योगीधाम आजमेरा हाईट्समध्ये मराठी कुटुंबीयांना मारहाण करणाऱ्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अखिलेश शुक्ला यांच्यासह सात जणांना खडकपाडा पोलिसांनी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने शुक्रवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात…

स्थानक परिसरात लवकरच ‘टायर किलर’

ठाणे : एक दिशा मार्गिका असतानाही वाहतुक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहतुक करत असतात. अशा वाहन चालकांना वचक बसावा यासाठी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील गावदेवी भागात महत्त्वाच्या…

कोपरीवासीयांच्या हक्काच्या घरांसाठी नवकुंडीय महायज्ञात झाला जागर!

माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांच्याकडून आयोजन   ठाणे, दि. २७ (प्रतिनिधी) : कोपरीवासीयांच्या डोक्यावर हक्काच्या घराचे छत असावे, विकसकाकडून होणारी फसवणूक टळून घरांचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी कोपरी येथील सार्वजनिक सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञात जागर करण्यात आला. कोपरीतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत व विकसकांकडून होणाऱ्या संभाव्य फसवणुकीबाबत रहिवाशांचे प्रबोधन करण्यात आले. त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून कोपरी येथे सार्वजनिक सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाचे आयोजन केले आहे. या महायज्ञात धार्मिक कार्यक्रमांबरोबरच विविध कार्यक्रमांतून नागरिकांच्या हिताचे उपक्रम राबविले जात आहेत. कोपरीमध्ये मोठ्या संख्येने जुन्या इमारती आहेत. या पार्श्वभूमीवर महायज्ञाचे औचित्य साधून भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांनी `व्हिजन २०२५- कोपरी डेव्हलपमेंट’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याला कोपरी भागातील रहिवाशी सोसायट्यांचे पदाधिकारी, सदस्य आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. वास्तूविशारद मुकुंद गोडबोले यांनी कोपरीच्या भविष्यातील विकासाबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले. कोपरी परिसरातील ३० टक्के सोसायट्या सीआरझेड २ मध्ये येत आहेत. मात्र, या प्रश्नावर माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांनी पुढाकार घेऊन रहिवाशी सोसायट्यांच्या प्रतिनिधींसमवेत नवी दिल्लीत दाद मागितली. त्यानंतर २०१९ च्या कायद्यानुसार दिलासा मिळाला असून, आता सीआरझेड २ मधील इमारतींचाही विकास होऊ शकतो. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या ७९-अ नुसार पुनर्विकासासाठी प्रत्येक सोसायटीने नियमानुसार प्रक्रिया राबवावी. एखाद्या विकसकाकडून वाढीव `एफएसआय’ व अन्य आश्वासनांना बळी पडू नये. त्या विकसक कंपनीचा पूर्वेतिहास तपासावा. त्यांनी पूर्ण केलेल्या इमारतीला भेट देऊन पाहणी करुन तेथील रहिवाशांकडून माहिती घ्यावी. त्यानंतरच सोसायटीने पुनर्विकास प्रकल्प राबवावा, असे आवाहन वास्तूविशारद मुकुंद गोडबोले यांनी केले. कोपरीवासियांना कोपरीतच घराचा प्रयत्न जागांच्या वाढत्या किंमतीमुळे ठाण्यातील कुटुंबे बदलापूर, कर्जत, टिटवाळ्यापर्यंत स्थलांतरीत झाली. परंतु, कोपरीतील रहिवाशांनी कोपरीतच नव्या घरात राहावे, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. सोसायट्यांनी एकत्रित येऊन निविदा प्रक्रिया राबवून सोसायटीचा विकास करावा. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पुनर्विकासासाठी पुढाकार घेतल्यास त्यांना सर्वोतोपरी साह्य केले जाईल, असे आश्वासन. भरत चव्हाण यांनी दिले. कोपरीवासियांना चांगले व रुंदीकरण झालेले रस्ते, उत्तम मार्केट, नाट्यगृह आणि पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यादृष्टीकोनातून  `व्हिजन २०२५- कोपरी डेव्हलपमेंट’ साकारले जात आहे, अशी माहिती भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी दिली. 0000

सोमनाथ सुर्यवंशी संशयास्पद मृत्यू आणि अमीत शहा यांच्या निषेधार्थ

सोमवारी शिव-फुले-शाहू-आंबेडकरी अनुयायांचा संयुक्त मोर्चा   ठाणे : परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा पोलीस मारहाणीत झालेला मृत्यू आणि केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेले अवमानास्पद वक्तव्य याचा निषेध करण्यासाठी सोमवारी (दि. 30) ठाण्यात सर्व पुरोगामी, आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती शिव, फुले, शाहू, आंबेडकर अनुयायी मोर्चा नियोजन समितीचे निमंत्रक तथा ज्येष्ठ आंबेडकरी नेते नानासाहेब इंदिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळेस राजाभाऊ चव्हाण, भास्कर वाघमारे,  सुनील खांबे, सुखदेव उबाळे, आबासाहेब चासकर,  पंढरीनाथ गायकवाड,  गोविंद पठारे, प्रल्हाद मगरे, जयवंत बैले, शंकर जमदाडे, समाधान तायडे, राहुल घोडके, लोभसिंग राठोड, विशाल ढेंगळे, बाबासाहेब येडेकर, डॉ.प्रमोद जाधव, सुरेश कांबळे, अशोक कांबळे, विमलताई सातपुते, सुमनताई इंगळे, दैवशाळा हराळे आदी शिव, फुले, शाहू, आंबेडकर अनुयायी मोर्चा नियोजन समितीचे निमंत्रक उपस्थित होते. इंदिसे यांनी सांगितले की, सोमनाथ सुर्यवंशी हा कायद्याचा अभ्यास करणारा विद्यार्थी होता. त्यामुळे तो कायदाबाह्य काम करण्याची शक्यताच नाही. मात्र पोलिसांनी त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून कस्टडीत डांबले आणि तिथे बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. तसा शवविच्छेदनाचा अहवालही परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाने दिलेला असतानाही पोलिसांनी दिलेल्या खोट्या माहितीच्या आधारे सभागृहात सरकारच्या वतीने चुकीची माहिती देण्यात आली. या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांन बडतर्फ करून आयपीसी 302 तथा बीएसएस 103 (1) अन्वये गुन्हा दाखल करून  त्यांना अटक करावी; तसेच, अमीत शहा लोकसभेत द्वेषातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपमानकारक विधान केले आहे. मात्र, अद्यापही त्यांनी माफी मागितलेली नाही. त्यांनी देशाची माफी मागावी तसेच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून त्यांना काढून टाकावे, या मागण्यांसाठी हा मोर्चा आहे. हा मोर्चा सकाळी १०.३० वाजता ठाणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास  अभिवादन करून निघणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज पथमार्गे तलावपाळी येथे शिवरायांना मुजरा करून टेंभी नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाची सांगता होणार आहे. या मोर्चात हजारो लोक सहभागी होतील, असेही नानासाहेब इंदिसे यांनी सांगितले. 0000

हिरामण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रामदास आठवले यांचा वाढदिवस कर्जतमध्ये उत्साहात साजरा !

अशोक गायकवाड कर्जत : महाराष्ट्राच्या कानाकोप-यात अन्याय अत्याचाराविरोधात दंड थोपटून आवाज उठवून सर्वसामान्य बहुजन वर्गाला ” पँथर ” स्टाईल ने न्याय देऊन आपला सामाजिक बांधिलकीचा पगडा ” संघर्षनायक ” म्हणून ओळख निर्माण करणारे तसेच तमाम दलित – शोषित, वंचित बहुजन समाजाचे नेते, संघर्ष योद्धा रामदास आठवले यांच्या ६५ व्या वाढदिवसा निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रि.पा.इं. कर्जत तालुक्याच्या वतीने कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषद शाळा किरवली येथे विद्यार्थ्यांना फळ वाटप करून राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रिपाइंचे कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळीच रिपाइंच्या कार्यकर्त्यानी राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा जयघोष केला, त्यानंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजिप शाळा किरवली येथे शाळेत केक कापून व विद्यार्थ्यांना फळ वाटप करून वाढदिवस साजरा केला . दरवर्षी होत असलेल्या या रिपाइंच्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे, ” शिक्षण हे ज्ञानरुपी तिसरा डोळा आहे” जो ज्ञान प्राशन करतो, तो गुरगुरल्या शिवाय रहात नाही, हि शिकवण विश्वरत्न बाबासाहेब डॉ.आंबेडकर यांची असल्याने शिक्षण घेणाऱ्या देशाच्या भावी पिढीस सक्षम बनविण्यासाठी व आपणही या समाजाचे काही देणे आहोत, यासाठी हा उपक्रम राबविल्याचे रिपाइंचे कर्जत ता. अध्यक्ष हिरामण गायकवाड यांनी सांगितले, तर किरवली शाळेत विविध उपक्रम राबवून शाळेला कुठल्याही प्रकारच्या मदतीची गरज भासल्यास ती केली जाईल असे आश्वासन दिले.दरम्यान कर्जत तालुक्यांतील विविध भागात मोठमोठे फलक लावुन व विविध स्तुत्य उपक्रम – राबवून रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी मुख्याध्यापिकामती प्रियांका प्रदीप हरवंदे, उपशिक्षिका  चित्रा किशोर पाटील, वैशाली रुपेश पाटील,शिक्षक आकाराम तुकाराम पाटील, राजेंद्र सोपान रुपवनकर, ह. भ . प. प्रभाकर गोविंद बडेकर यांचे व सर्व पदाधिकाऱ्यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले, यावेळी आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले, तसेच पुढील भविष्यासाठी शाळेला शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी आरपी आय कर्जत ता. अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्या समवेत, कर्जत तालुका संपर्कप्रमुख किशोर द्वारकानाथ गायकवाड, कर्जत तालुका सचिव अशोक दत्तु गायकवाड, तालुका उपाध्यक्ष जगदीश शिंदे, खजिनदार विकास गायकवाड, कर्जत तालुका प्रसिद्धीप्रमुख विजय गायकवाड, उमरोली रा. जि.प वार्ड अध्यक्ष अमर गायकवाड, सावेळे पंचायत समिती वार्ड अध्यक्ष अमर जाधव, नेरळ शहर कार्याध्यक्ष हरिश्चंद्र सदावर्ते, मंजुळा किशोर गायकवाड, राधिका रविंद्र गायकवाड, योगिनी हिरामण गायकवाड, रेखा देवराम गायकवाड, रेखा चंद्रकांत जाधव, निशा प्रमोद लवांडे , अस्मिता जितेंद्र गायकवाड, शुभांगी महेंद्र भालेराव, कविता राजेश गायकवाड, शामिली सतीश गायकवाड, ज्योती हरिचंद्र रोकडे, कांचन उमेश भालेराव, अनुजा रुपेश रोकडे, शारदा सुखदेव भालेराव त्याचप्रमाणे आर पी आय चे असंख्य कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

अनुकंपा अंतर्गत ९ उमेदवारांची रोहन घुगे यांच्या हस्ते नियुक्ती

ठाणे : शासकीय सेवेत कार्यरत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका पात्र वारसाला अनुकंपातत्वावर अनुकंपा उमेदवारांच्या शैक्षणिक अहर्ता व अनुकंपा प्रतीक्षा यादीतील ज्येष्ठतेनुसार जिल्हा परिषदेच्या दरवर्षी रिक्त होणाऱ्या सरळ सेवेच्या…

शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी जिल्हास्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन

ठाणे : मुलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत मार्फत प्रोजेक्ट दिशा व्ही स्कूल पोर्टल द्वारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावण्यासाठी कामकाज करण्यात येत आहे.…