Category: ठाणे

Thane news

माकपच्या बिहार राज्य अधिवेशनाला दरभंगा येथे मोठ्या जाहीर सभेने दमदार सुरुवात

अनिल ठाणेकर ठाणे : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या २४व्या बिहार राज्य अधिवेशनाला २२ डिसेंबरला उत्तर बिहारमधील दरभंगा येथील हजारो शेतकरी आणि कामगारांच्या मोठ्या रॅलीने आणि जाहीर सभेने दमदार सुरुवात झाली. या सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.संपूर्ण अधिवेशन स्थळ लाल झेंडे, लाल बॅनर आणि लाल फलकांनी सजवले होते. अधिवेशन स्थळाला माकपचे माजी सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे, तर सभागृहाला बिहारचे माजी पक्ष राज्य सचिव आणि केंद्रीय कमिटी सदस्य विजयकांत ठाकूर यांचे नाव देण्यात आले होते. दरभंगा हा त्यांचा मूळ जिल्हा होता. राज्य सचिवमंडळ सदस्य श्याम भारती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या जाहीर सभेस पॉलिट ब्युरो सदस्य ए. विजयराघवन व डॉ. अशोक ढवळे, केंद्रीय कमिटी सदस्य खासदार आमरा राम, ए. आर. सिंधू, ललन चौधरी, अवधेश कुमार, राज्य सचिवमंडळ सदस्य आमदार अजय कुमार, आणि जिल्हा सचिव अविनाश ठाकूर यांनी संबोधित केले.सर्व वक्त्यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील ‘पलटू राम’ नितीशकुमार सरकारच्या जनविरोधी, कॉर्पोरेटधार्जिण्या, धर्मांध, जातपातवादी आणि हुकूमशाही धोरणांवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच भाजप-एनडीएच्या विरोधात बिहारमधील सर्व डाव्या आणि धर्मनिरपेक्ष शक्तींची एकजूट आणखी मजबूत करण्याचे आवाहन केले. वक्त्यांनी केरळच्या डाव्या लोकशाही आघाडी सरकारचा पर्याय लोकांसमोर ठेवला. जमीन आणि जनतेच्या इतर ज्वलंत स्थानिक समस्यांवरील संघर्ष तीव्र आणि व्यापक करावेत, धर्मांधता, जातपातवाद आणि नवउदारवादाच्या विरोधात प्रभावी राजकीय-वैचारिक मोहिमा कराव्यात, आणि बिहारमध्ये पक्ष संघटना व जनसंघटनांना जास्त बळकट करावे, असेही आवाहन वक्त्यांनी केले. बिहारचे हे राज्य अधिवेशन २४ डिसेंबरपर्यंत चालेल.

अमीत शहांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन

बाबासाहेब आंबेडकर हे आमचे पॅशन-डॉ. जितेंद्र आव्हाड अनिल ठाणेकर ठाणे : आंबेडकर… आंबेडकर असे म्हणणे फॅशन झाली आहे, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी केले होते. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीसडॉ.  जितेंद्र आव्हाड, शिवसेना नेते राजन विचारे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीने ठाणे स्टेशन परिसरात जोरदार निदर्शने केली. *या प्रसंगी,डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी, आंबेडकर हे नाव आमची पॅशन आहे. अमीत शहा हे ज्या पक्षात आहेत; त्यांच्या मातृसंस्थेने संविधानाला विरोध केला होता. आता शहांच्या विधानाने भाजपच्या मनात काय आहे, ते उघडकीस आले आहे, अशी टीका केली. यावेळेस राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण,शिवसेना(उबाठा)चे जिल्हाप्रमुख केदार दिघे, रचना वैद्य, राहुल पिंगळे, रवी कोळी, राजेश साटम, राजेश कदम यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष,  काँग्रेस,  शिवसेना, आप, सपा आदी पक्षांनी ठाणे स्टेशन परिसरातीलडॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अमीत शहा यांच्या निषेधार्थ आंदोलन केले. याप्रसंगी आंदोलकांनी मोदी – शहा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “तडीपार तो तडीपार, त्याला काय समजणार घटनाकार, संविधान आमचा अभिमान,डॉ.  बाबासाहेब आंबेडकर हमारे भगवान, अमीत शहा मुर्दाबाद” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या प्रसंगी, परभणीत संविधान प्रतिकृतीची मोडतोड करणारा माणूस विकृत होता, असे मुख्यमंत्री सांगत असतील तर संसदेतडॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्यास काय म्हणाल, असे पत्रकारांनी विचारले असता,डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आम्ही हृदयातून घेत असतो. आमच्यासाठी ते नाव पॅशन आहे. कारण, त्यांच्यामुळेच आम्हा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला. स्वर्ग आणि नरक कुणीच पाहिलेले नाही. मात्र, इथल्या नरकातून माणुसकीचा स्वर्ग बाबासाहेब आंबेडकर यांनीच आम्हाला दाखविला आहे.  अमीत शहा यांच्या विधानातून भाजपच्या मनात काय आहे, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. 1950 साली भाजपच्या मातृसंस्थेने संविधानाला विरोध केला होता. आजही त्यांना मनातून संविधान नको आहे. म्हणूनच ते अशी विधाने करीत आहेत. चौकट सूर्यवंशी कसा मेला? राज्यभर बॅनर लावून प्रश्न विचारणार.. सोमनाथ सुर्यवंशीला न्याय मिळणार का? असे विचारले असता, या सरकारला सोमनाथ सुर्यवंशीला न्याय द्यायचाच नाही. जे सरकार सुर्यवंशीचे निधन कसे झाले ते सांगायला तयार नाही. ते सरकार न्याय कसा देणार? आपण पहिल्या दिवसापासून हाच प्रश्न विचारत आहोत. आता आम्ही राज्यभर “सुर्यवंशी कसा मेला” असा प्रश्न विचारणारे बॅनर लाव, असेडॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले.

२४ डिसेंबरला ४०४ महसूल गावांमध्ये ‘पेसा दिन’ – रोहन घुगे

अनिल ठाणेकर ठाणे : २४ डिसेंबरला ४०४ महसूल गावांमध्ये ‘पेसा दिन’ साजरा होणार आहे.पेसा कायद्याशी संबधित घोष वाक्य व बॅनर यांचा वापर करून पेसा कायद्याची जनजागृती करण्यात येणार असून अनुसूचित क्षेत्रांतील ग्रामस्थांनी पेसा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. केंद्र शासनाने २४ डिसेंबर, १९९६ रोजी पंचायती संबंधीचे उपबंध(अनुसूचित क्षेत्रांवर विस्तारित करणे) अधिनियम, १९९६ अर्थात पेसा कायदा पारित केला आहे. पेसा कायद्याच्या निर्मितीला दि. २४ डिसेंबर रोजी २८ वर्षे पूर्ण होत आहे, त्यानिमित्ताने पंचायती राज मंत्रालयाच्या निर्देशाने हा दिवस “पेसा दिन” म्हणून मुरबाड, भिवंडी, शहापूर तालुक्यातील महसूल गावांमध्ये साजरा करण्यात येणार आहे. पंचायती राज मंत्रालयाचे अनुसूचित क्षेत्रांमध्ये पेसा कायद्याच्या अंमलबजावणीला बळकटी देण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. पेसा दिनाच्या निमित्ताने ग्रामसभा सदस्य, पंचायत सदस्य तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची क्षमताबांधणी व्हावी व त्यांच्यामध्ये जनजागृती वाढावी तसेच त्यांचा या कायद्याच्या अंमलबजावणीतील सहभाग वाढवून, ग्रामसभांचे सक्षमीकरण आणि अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या कामकाजात सुधारणा ही विशेष उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पेसा दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने गाव/ग्रामपंचायत पातळीवर मेळावा, प्रशिक्षण, कार्यशाळा आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत अंतर्गत सर्व पेसा गावातील संबंधीत घटकांनी सहभाग नोंदवावा तसेच ग्रामसभा सदस्यांनी जास्तीतजास्त उपस्थिती रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. ठाणे जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील, मुरबाड पंचायत समिती क्षेत्रातील ५५ ग्रामपंचायतींमधील १०१ महसूल गाव, भिवंडी पंचायत समिती क्षेत्रातील ४० ग्रामपंचायतींमधील ७३ महसूल गाव तर शहापूर पंचायत समिती क्षेत्रातील ११० ग्रामंपचायतींमधील २३० महसूल गाव असे एकूण ग्रामपंचायत २०५ तर महसूल गाव‌ ४०४ येथे पेसा दिन प्रभावीपणे साजरा करण्यासाठी ग्रामपंचायत विभागाच्यावतीने नियोजन करण्यात येत आहे. पेसा कायद्याचे उत्तम ज्ञान असलेल्या व शक्यतो स्थानिक बोली भाषेचे जाणकार व्यक्ती, संस्था, अधिकारी यांनी उपस्थित सर्वांना पेसा कायद्याविषयी माहिती देणार आहेत, अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) प्रमोद काळे यांनी दिली.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी पंचायत समिती भिवंडी,शहापूर व मुरबाड येथील गट विकास अधिकारी,  अधिनस्त विस्तार अधिकारी (पं), तालुका व्यवस्थापक(पेसा), तालुका प्रशिक्षण समन्वयक (पेसा), ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसभा मोबिलायझर व ग्रामस्तरीय कर्मचारी  इ. सर्व यंत्रणेला पेसा दिन अंमलबजावणी उत्कृष्टपणे नियोजित करण्याबाबत निर्देशित केले आहे.

ठाण्याहून नाशिक, पुण्याचा प्रवास होणार सुसाट

वडपे महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात ठाणे : माजिवडा पुलापासून सुरू झालेला ठाणे-वडपे महामार्ग लवकरच पूर्ण होण्याची चिन्हे दिसत आहेत. ठाणे वडपे हे अंतर २२ किलोमीटरचे आहे. त्यातील १३ किलोमीटर रस्ता रुंदीकरणाचे काम रात्रंदिवस सुरू आहे. माजिवडा ते साकेत पुलापर्यंत रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आगामी दहा-पंधरा दिवसांत नाशिककडे जाणाऱ्यांना तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे मुंबई, अहमदाबाद, नवी मुंबईतून माजिवडामार्गे नाशिककडे जाणाऱ्या मार्गावरील कोंडीचा तिढा सुटणार आहे. साधारणतः गेल्या दोन वर्षांपासून ठाणे-वडपे महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. दुतर्फा १२ पदरीचा हा महामार्ग आहे. त्यात दोन्ही बाजूला दोन-दोन पदरी सेवा रस्त्याचा समावेश आहे. यापैकी नाशिककडे जाणाऱ्या लेनचे काम जलदगतीने पुढे सरकत आहे. माजिवडा ते साकेत पुलाच्यादरम्यान असलेल्या मार्गाचे दोनपदरी सिमेंट काँक्रीटचे काम पूर्ण झाले आहे. लोढा संकुलजवळ रस्त्याखाली सुरू असलेल्या मोठ्या गटाराचे कामसुद्धा पूर्ण झाले आहे. त्यावरून नाशिककडे जाणारी वाहतूक सुरू आहे. दरम्यान, याच मार्गिकेला लागून आणखीन दोनपदरी काँक्रीटीकरणाचे काम हाती घेतले आहे. हे कामदेखील रात्रंदिवस सुरू आहे. येत्या दहा-पंधरा दिवसांत ते होणार असल्याचे रचना कन्स्ट्रक्शन कंपनीकडून सांगण्यात आले आहे. तर, ठाणे ते वडपेदरम्यान सुरू असलेल्या या मार्गाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. या मार्गावरून नाशिककडे जाणारी वाहतूक सुरू आहे. हे काम करण्यासाठी ४०० हून अधिक मनुष्यबळ कार्यरत आहे. ठाणे-वडपे मार्गाच्या खालून ६० नाले जात असून त्यांचे काम पूर्ण झाले आहे. या नाल्यांतील पाण्याला भूमिगत मार्गाने पुढे जाण्यासाठी रस्त्याखाली मोठे नाले बांधले आहेत. तर, रस्त्याच्या खालून वाहनांना पलीकडे जाण्यासाठी सहा भूमिगत भुयारी मार्ग बांधण्यात येत आहेत. खारेगाव टोलनाका पूर्णपणे सपाट खारेगाव टोलनाका पूर्णपणे सपाट केला आहे. या ठिकाणी चारपदरी रस्ता रुंद केला आहे. येथूनच पुण्यासाठी वेगळा रस्ता निर्माण केला आहे. त्या रस्त्याचे ३०० मीटरचे काँक्रीटीकरण पूर्ण झाल्याने तो पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी खुला केला आहे. खारेगाव टोलनाक्यापासून हा मार्ग मुंब्रा बायपासने पुढे पुण्याकडे जातो. नाशिककडे जाणाऱ्या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर नाशिककडून ठाण्याकडे येणाऱ्या मार्गाचे काँक्रीटीकरण आणि रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. कोट कंपनीने हाती घेतलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दिवस-रात्र कामगारांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेत काम केले जात आहे. या मार्गावर सुमारे ७०-८० टक्के काम पूर्ण झाले आहे. – सचिन पाटील, अभियंता

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आमची पॅशन – जितेंद्र आव्हाड

ठाणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे ज्या पक्षात आहेत, त्यांच्या मातृसंस्थेने संविधानाला विरोध केला होता. आता शहांच्या विधानाने भाजपच्या मनात काय आहे, ते उघडकीस आले आहे, अशी टीका राष्ट्रवादी…

एसटीत इलेक्ट्रिक बस सुरू करणार – प्रताप सरनाईक

ठाणे : एसटी बस महामंडळात टप्याटप्याने इलेक्ट्रिक बस सुरू करणार आहोत. अगदी ग्रामीण भागात देखील इलेक्ट्रिक बस सुरू केल्या जातील. त्यासाठी ग्रामीण भागात सुद्धा चार्जिंग स्टेशन उभारणार असल्याची माहिती परिवहन…

 राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पहिल्याच दिवशी ॲक्शन मोडवर

 खोपट बस स्थानकाची केली पाहणी   ठाणे : नुकतेच राज्याच्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप करण्यात आले. राज्याच्या परिवहन मंत्री पदाची प्रताप सरनाईक यांना जबाबदारी देण्यात आली. लगेच रविवारी सकाळी प्रताप सरनाईक यांनी खोपट येथील बस स्थानकाचा आढावा घेतला. एकनाथ शिंदे यांनी १५ फेब्रुवारी २०२४ रोजी खोपट बस आगार येथे इलेक्ट्रिक बस सेवा उद्घाटन प्रसंगी परिवहन सेवा, बस आगार व कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा सुधारण्याकरिता काही सूचना दिल्या होत्या. सदर सूचनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात झाली की नाही हे पाहण्याकरिता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खोपट बस आगार भेट देऊन तेथील सेवा, व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधांबाबत आढावा घेतला.प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सोयी-सुविधा पुरवण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांना कामाचे सुसज्ज वातावरण देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या. बस आगारात स्वच्छता गृह, प्रतीक्षालय आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उभारण्याचे निर्देश दिले. तसेच तेथील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.खोपट बस आगारातील अतिक्रमण तसेच गर्दुल्ले यांचा वावर त्वरित थांबवण्यात यावा अशा सूचना संबंधित अधिकाऱ्याला दिल्या. तसेच राज्यातील सर्वच बस आगारांना भेट देऊन तेथील नियोजन व समस्यांचा आढावा घेणार आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. ०००००

भारतातील बंदर व गोदी कामगारांच्या वेतन कराराची अंमलबजावणी जानेवारी २०२५ पासून होणार

ठाणे : भारतातील बंदर व गोदी कामगारांचा वेतन करार २७ सप्टेंबर २०२४  रोजी झाला असून,  या वेतन कराराची अंमलबजावणी जानेवारी २०२५ पासून होणार आहे.  असे ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांनी…

 ठाण्यात सुमधूर गीतांसह `अटल संध्या’

 अटलबिहारी वाजपेयी जयंतीदिनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले व विश्वास सामाजिक संस्थेतर्फे आयोजन   ठाणे :  माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष व माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले व भाजपा महिला मोर्चाच्या नौपाडा मंडल अध्यक्षा वृषाली वाघुले यांच्या वतीने ठाण्यात २५ डिसेंबर रोजी बुधवारी अटल संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नौपाड्यातील भगवती शाळेच्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता सुमधूर गीतांच्या माध्यमातून अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली अर्पण केली जाईल. या कार्यक्रमात गायिका मधुरा देशपांडे, गायक सर्वेश मिश्रा, प्रीती निमकर-जोशी आणि अनिल वाजपेयी यांची मराठी-हिंदी गीतांची मैफल रसिकांना अनुभवता येईल. समीरा गुजर-जोशी यांच्याकडून निवेदन केले जाईल. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. संपर्क : ९३२११९३७७५ रेल्वे स्टेशनबाहेर रक्तदान शिबीर स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ताने दरवर्षी विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले व भाजपा नौपाडा मंडल महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघुले यांच्याकडून ठाणे रेल्वे स्टेशनजवळ भव्य रक्तदान शिबीर भरविण्यात येते. यंदा १९ व्या वर्षीही शिबिराची परंपरा कायम सुरू राहणार आहे. यंदा अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त सॅटीस प्रकल्पालगत २५ डिसेंबर रोजी बुधवारी सकाळी ९ ते दुपारी दोनपर्यंत शिबीर भरविण्यात येणार आहे. या शिबिरात रक्तदान करून नागरिकांनी पवित्र राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, असे आवाहन संजय वाघुले यांनी केले आहे. 000000

पेरियार यांच्या कर्मभूमीत जादूटोणाविरुद्ध कायदा होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे – ॲड.मुक्ता दाभोलकर

ठाणे : शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतर आणि १८ वर्षाच्या अविरत संघर्षानंतर महाराष्ट्रामध्ये जादूटोणाविरोधी कायदा संमत झाला.त्यानंतर कर्नाटक, गोवा आणि याच वर्षी ऑगस्ट महिन्यात भाजपाचे शासन असलेल्या गुजरात मध्ये…