Category: ठाणे

Thane news

मुस्लीम दाम्पत्यास मतदान करण्यास अनिता गौरी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी केला विरोध – डॉ. जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर ठाणे : मुस्लीम दाम्पत्यास मतदान करण्यास माजी नगरसेविका अनिता गौरी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी केला विरोध केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. खारीगांवमधील गणेश विद्यालयात एका मुस्लीम दाम्पत्याचे मतदान आले होते. ते राहणारे मुंब्रा येथील आहेत. मात्र, निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे त्यांचे मतदान खारीगांवातील गणेश विद्यालयात आले होते. हे दोघेही पती…

 “काल भिजलेल्या कोंबडीप्रमाणे, आज कंठ फुटला”

विनोद तावडे यांच्यावर हितेंद्र ठाकूर यांचा हल्लाबोल   वसई: मंगळवारच्या नोटा वाटप नाट्य प्रकरणानंतर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी पुन्हा एकदा भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘काल विनोद तावडे भिजलेल्या कोंबडीप्रमाणे बसले होते आणि मुंबईला गेल्यावर त्यांना कंठफूटला असे ठाकूर म्हणाले.  मतदारसंघात कोणी दिसलं तर त्यांना पुन्हा फटकवणार असा इशारा त्यांनी ‘दिखेंगे तो पिटिंगे’ अशा शब्दात दिला. मंगळवारी संध्याकाळी विरारच्या विवांता हॉटेलमध्ये नोटा वाटप नाट्य घडले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे या हॉटेलमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले होते. तब्बल साडेचार तास त्यांनी भाजप नेत्यांची कोंडी केली होती. या प्रकरणात भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह भाजपच्या ३६ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर पैशांचे वाटप करून मतदारांना लाज दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. विनोद तावडे यांनी मात्र आता बविआवर आरोप केले आहेत. हॉटेलमध्ये सापडलेले पैसे भाजपचे नव्हते तसेच हॉटेल ठाकुरांच्या मालकीचे होते असाही आरोप तावडे यांनी केला आहे. बुधवारी हितेंद्र ठाकूर यांनी तावडे यांचा आरोपाचा खरपूस समाचार घेतला. या प्रकरणामुळे भाजपाला फायदा होईल असे भाजप नेते सांगत आहेत. याचा अर्थ हॉटेलमध्ये सापडलेले पैसे भाजपने मतदारांपर्यंत वाटले असा होतो. पैसे तुमचे, वाटले तुम्ही आणि फायदा देखील तुम्हाला होईल, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. विवांता हॉटेल हितेंद्र ठाकूर यांच्या मालकीचे होते असा आरोप विनोद तावडे यांनी केला आहे. त्याला ठाकूर यांनी जोरदार उत्तर दिले. जर हॉटेल माझ्या मालकीचे होते तर भाजपने का बुक केले? विनोद तावडे यांनी ते हॉटेल माझ्या नावावर करून द्यावे असेही ते म्हणाले. विनोद विनोद तावडे काल विरार मध्ये असताना भिजलेला कोंबडीप्रमाणे बसले होते. मला सारखे फोन करता होते. आता मुंबईत गेल्यावर त्यांना कंठ फुटला असून ते आरोप करत आहेत. खोटं बोला पण रेटून बोला ही भाजपाची प्रवृत्ती आहे असे ते म्हणाले. ‘आज दिखेंगे तो पिटेंगे’ आज सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे. मतदारसंघामध्ये बाहेरची लोकं आल्याने हा वाद निर्माण झाला होता. आज जर पुन्हा कोणी बाहेरून आलेले दिसले तर त्याला पुन्हा फटकावणार असा इशाराही ठाकूर यांनी ‘दिखेंगे तो पिटेंगे’ या धर्तीवर दिला. 00000

भिवंडीत तृतीयपंथींनी बजावला मतदानाचा अधिकार

शासकीय यंत्रणांबरोबरच उमेदवारांचेही आमच्याकडे दुर्लक्ष भिवंडी : भिवंडी शहरा व ग्रामीण भागात सर्वत्र मतदान शांततेत पार पडत असून  शहरातील दांडेकर विद्यालय येथील मतदान केंद्रावर तृतीयपंथीय मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्रात एकूण 179 तृतीयपंथी मतदार नोंदवण्यात आले असून त्यापैकी 119 तृतीयपंथीयांनी मतदान केलं आहे. तृतीय पंथीयांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.मात्र आजपर्यंत शासकीय यंत्रणेतील अधिकारी आमच्या घरापर्यंत पोहोचले नसून आम्हाला ओळखपत्र मिळाले नसल्याने अनेक तृतीयपंथीय मतदानापासून वंचित राहिले आहेत.विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी देखील आपल्या घोषणा पत्रात तृतीयपंथी समाजाबाबत आश्वासक भूमिका कोणी मांडली नसल्या बद्दल ची खंत तृतीयपंथीय समाजासाठी काम करणाऱ्या ख्वाईश फाउंडेशनच्या तमन्ना मंसूरी यांनी बोलून दाखवली आहे.  

कल्याण-डोंबिवलीत स्वयंस्फूर्तीने नागरिक मतदानासाठी रांगेत

 बाचाबाचीच्या घटना, पोलिसांच्या तात्काळ मध्यस्थीने वादावर पडदा कल्याण: कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली, कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणुकीसाठी या चारही मतदारसंघातील नागरिकांनी बुधवारी सकाळपासून मतदान केंद्रांबाहेर स्वयंस्फूर्तीने रांगा लावल्या होत्या. या रांगांमध्ये ज्येष्ठ नागरिक, वृध्द, कामावर जाणाऱ्या नोकरदारांचा सर्वाधिक सहभाग होता. महिला वर्गाची रांगेतील हजेरी लक्षणीय होती. मतदान केंद्र परिसर, उमेदवारांचे मतचिठ्ठी देण्याचे मंच याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने मतदारांना आपल्या बाजुने वळविण्यासाठीच्या प्रकारांना आळा बसला होता. कल्याण पश्चिमेत उंबर्डे भागातील पुण्योदय पार्क परिसरात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या समर्थकांनी मतचिठ्ठी देण्यासाठी मंच लावला होता. या भागात महायुतीचा वरचष्मा आहे. आपल्या भागात आघाडीच्या उमेदवाराचा मंच कसा लागला, असा प्रश्न महायुतीच्या एका कार्यकर्त्याने करून आघाडीच्या कार्यकर्त्याला मंच लावण्यास विरोध करून त्याला शिवीगाळ केली. यावरून दोन गटात शाब्दिक बाचाबाची झाली. खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांच्या मध्यस्थीने हा विषय तात्काळ मिटविण्यात आला. आघाडीच्या उमेदवाराला तेथे मंच लावण्यास परवानगी देण्यात आली. डोंबिवली पश्चिमेत राजूनगर परिसरात एक माजी नगरसेवक आणि एक स्थानिक कार्यकर्ता यांच्यात बाचाबाची झाली. भाजपच्या वरिष्ठाने या प्रकरणात मध्यस्थी करून या प्रकरणावर पडदा टाकला. ग्रामीणमधील दातिवली भागात दोन गटात बाचाबाची झाल्याची चर्चा होती. राजकीय चढाओढीतील हे किरकोळ प्रकार वगळता कल्याण, डोंबिवली परिसरात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदान केंद्र परिसरात मतदारांना कोणी कसलेही आमिष दाखविणार नाही याची विशेष काळजी पोलिसांनी घेतली होती. ज्येष्ठांचे सकाळीच मतदान मतदानाच्या पाच दिवस अगोदर भारतीय निवडणूक आयोग, पक्षीय उमेदवारांकडून मतदारांना घरपोच आपल्या मतदान केंद्राचे ठिकाणाची माहिती व्हाॅटसप, मतचिठ्यांमधून दिली होती. त्यामुळे मतदार स्वयंस्फूर्तीने घरातून बाहेर पडून मतदान केंद्रावर येत होते. सकाळी सात वाजल्यापासून वृध्द, ज्येष्ठ नागरिक, कामावर जाणारे नोकरदार मतदानासाठी रांगेत होते. मतदारांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मतदान केल्यानंतर मतदार केंद्राजवळील सेल्फी केंद्रात सेल्फी काढत होते. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास परवानगी नव्हती तरी अनेक जण मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन आले होते. मतदान केंद्रांबाहेर वृध्द, ज्येष्ठ नागरिक यांना पाणी, आसन व्यवस्थेची सोय करण्यात आली होती. अमेरिकन कॉर्पोरेट  मतदान नोकरीनिमित्त अमेरिकेत राहत असलेल्या काॅर्पोरेट अपूर्वा पांडे दोन दिवसापूर्वी डोंबिवलीत दाखल झाल्या आहेत. डोंबिवली पूर्वेतील मतदार यादीत नाव असल्याने अपूर्वा यांनी सावरकर रस्त्यावरील संगीता विद्यामंदिरात मतदान केले. गस्तीमुळे शांतता मतदानासाठी सुट्टी असल्याने बहुतांशी नोकरदार रांगेत तिष्ठत राहून मतदान करण्यास लागू नये म्हणून सकाळीच मतदानासाठी कुटुंबीयांसह बाहेर पडला होता. काही मतदार कौतुकाने आपली लहान मुले, पाळीव श्वान घेऊन मतदान केंद्र परिसरात आले होते. दुपारनंतर मतदान केंद्रावरील मतदान यंत्र संथगतीने काम करत असल्याच्या तक्रारी मतदारांकडून वाढल्या होत्या. त्यामुळे मतदान केंद्रांबाहेरील रांगाचे प्रमाण वाढले होते. मतदान केंद्रांवर महिला, वृध्द, ज्येष्ठ यांना प्रथम प्राधान्य देऊन मतदान करून दिले जात होते. कल्याण ग्रामीणमधील लोकग्राम भागात रस्त्यावर एका उमेदवाराचा चार आकडा लिहून प्रचार करण्यात येत होता. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून तो क्रमांक पुसून काढला.मतदान केंद्रात येणाऱ्या मतदाराकडील मतचिठ्ठीवर कोणत्याही पक्षाचे चिन्हे नाही याची खात्री करून मगच पोलीस त्यांना मतदानासाठी केंद्रात प्रवेश देत होते. उमेदवार मतदारसंघात कल्याण पूर्व, पश्चिम, ग्रामीण, डोंबिवलीतील उमेदवार मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे ना. मतदार कार्यकर्त्यांकडून मतदानासाठी घराबाहेर काढले जात आहेत की नाही याची पाहणी करण्यासाठी आपल्या मतदारसंघात समर्थकांसह फिरत होते. मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांचे भोजन, त्यांच्या पाण्यासाठी यावेळी चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. लोकसभेसारखी परिस्थिती यावेळी निर्माण होऊ नये याची विशेष काळजी निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली होती.

ठाणे शहरातील मतदार याद्यांचा घोळ कायम 

घराजवळील मतदान केंद्राऐवजी दूरच्या मतदान केंद्रावर नावे ठाणे : लोकसभा निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये घोळ समोर आला होता, तोच घोळ विधानसभा निवडणुकीत दिसून आला. ठाणे शहर मतदार संघातील अनेक मतदारांची नावे घराजवळील मतदान केंद्राऐवजी दूरच्या मतदान केंद्रावर नावे आल्याचे दिसून आले. घोडबंदर भागात सोसायटीत केंद्र असतानाही त्यांची नावे झोपडपट्टी भागातील केंद्रावर आल्याने मतदारांमधून नाराजीचा सूर उमटत होता. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ दिसून आला होता. अनेकांची नावे घराजवळील केंद्राऐवजी किंवा सोसायटीतल्या केंद्रा ऐवजी दूरवरच्या केंद्रावर होती. यामुळे मतदारांना त्रास सहन करावा लागला होता यासंबंधीच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. निवडणूक विभागाच्या कारभारावर मतदारांनी टीकाही केली होती. या टिकेनंतर विधानसभा निवडणुकीत ही चूक सुधारली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात मात्र ती फोल ठरल्याचे दिसून आले. घोडबंदर भागातील गृहसंकुलांमध्ये मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. परंतु येथील रहिवाशांना सुमारे ३ किमी लांब जावे लागत होते. हिरानंदानी इस्टेटमध्येही असा प्रकार समोर आला, येथील काही मतदारांची नावे ढोकळी भागातील केंद्रावर होती. कोलशेत येथील काही संकुलात मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत, परंतु येथील रहिवाशांची नावे या केंद्राऐवजी मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रातील मतदान केंद्रावर होती.  गेल्यावेळी असाच घोळ होता, तो यंदाही कायम असल्याचे दिसून आले.  झोपडपट्टी भागातल्या मतदारांना सोसायटी मध्ये मतदानासाठी जावे लागत असल्याचे चित्र ठाणे विधानसभा मतदार संघात अनेक ठिकाणी दिसून आले.

मतदारांकडून बोटावरील शाई पुसट झाल्याच्या तक्रारी

ठाणे : विधानसभा निवडणुकीत मतदान केल्यावर लावण्यात येणारी ओळख शाई पाण्याने धुतली असता, पुसट होत असल्याच्या तक्रारी मतदारांकडून करण्यात आल्या. ठाणे जिल्हा विधानसभा मतदारसंघातील कोपरी पाचपाखाडी, ठाणे शहर, अंबरनाथ, नवी मुंबई आणि मुरबाड मतदारसंघातील अनेक मतदारांच्या बोटावरील शाई पुसट झाल्याची बाब मतदारांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधुम बुधवारी सर्वत्र पाहायला मिळाली. लोकसभा निवडणुकीच्यावेळी मतदार याद्यांमधून मतदारांची नावे गायब होणे, मतदानकेंद्र बदलणे, तसेच काही तांत्रिक अडचणी, अशा अनेक समस्यांना मतदारांना सामोरे जावे लागले होते. विधानसभा निवडणुकीतही असाच काहीसा प्रकार झाला. अशातच मतदान केल्यावर ओळख म्हणुन लावण्यात येणारी बोटावरील शाई पाणी लागल्यास पुसट होत असल्याची बाब मतदार प्रदीप गुजर यांनी लोकसत्ताला सांगितली. गुजर हे सकाळी त्यांच्या मतदरसंघातील मतदान केंद्रावर मतदान करण्यास गेले होते. मतदान करून घरी आल्यावर त्यांनी आपले हात पाण्याने धुतले. बोटावरील शाईला पाणी लागल्याने ती पुसट होत असल्याचे त्यांना आढळले. शाई पुसली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी ही बाब लोकसत्ता प्रतिनिधींना सांगितली. या प्रकाराबाबत इतर मतदारसंघात पाहणी केली असता, असाच प्रकार ठाणे शहर मतदारसंघाबरोबरच कोपरी पाचपाखाडी, अंबनाथ, मुरबाड, नवी मुंबई मतदारसंघातील मतदारांना असाच अनुभव आल्याचे चित्र होते. याप्रकरणी मतदारांना विचारणा केली असता नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी ही बाब सांगितली.तर याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मतदान केल्यावर अनेक आठवडे बोटावरील शाई असते. विधानसभा निवडणुकीत मतदान केल्यावर लावण्यात आलेली शाई काही वेळातच पुसट झाली.- सरिता मांडावकर, मतदार बोटावर लावण्यात येणार शाई ही पक्की असते. अशा प्रकारे शाई जाणे शक्य नाही. आम्ही जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने सर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता मतदारांच्या बोटांवरील शाई पुसट होणे अथवा निघून जाणे असे कोणतेही प्रकार आढळून आलेले नाही.- उर्मिला पाटील, उपविभागीय अधिकारी, ठाणे

उबाठा गटाचे उमेदवार केदार दिघे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

पैसे आणि दारू वाटपाचा आरोप ठाणे : शिवसेना उबाठा गटाचे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे यांच्यासह 7 जणांवर ठाण्यातील कोपरी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदारांना पैसे आणि दारू वाटप करताना…

शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्र राज्याची विधानसभेची निवडणूक  पार पडत आहे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात मतदान प्रक्रियेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. ओवळा माजिवडा विधानसभेचे शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी आपल्या कुटूंबियांसमवेत सकाळी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर “लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे.” असे आवाहन प्रताप सरनाईक यांनी उपस्थित नागरिकांना केले. मतदानासाठी घरा बाहेर पडण्याचे देखील त्यांनी नागरिकांना आवाहन केले.सरनाईक यांनी मतदान केंद्रावर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाने घेतलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले. ठाण्यातील विविध मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा दिसून येत आहेत. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांमध्येही मतदानासाठी उत्साह जाणवत आहे. शांततेत आणि सुरळीतरीत्या मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने कडक सुरक्षा व्यवस्था देखील केली आहे. विधानसभा निवडणुकीत नागरिकांचा मोठा सहभाग असल्याने या निवडणुकीचे निकाल महत्वाचे ठरणार आहेत.

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त (मुख्यालय) जी. जी.…

जितेंद्र आव्हाडांच्या पाठीमागे मुंब्र्यातील माथाडींच कणखर युवा नेतृत्व म्हणजेच सद्दाम शेख

राज भंडारी ठाणे : जीवनातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, प्रसंगी मिळेल ते काम करत जिद्द, चिकाटी यांच्या जोरावर माथाडी कामगारांचे नेतृत्व करीत युवा वर्गाचे नेतृत्व करणारे सद्दाम शेख यांनी वेगळे विश्व निर्माण केले आहे. त्यांच्या कार्याची मुंब्रा शहरात मोठी प्रशंसा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय म्हणून सद्दाम शेख यांची ख्याती असली तरी मुंब्रा परिसरात त्यांनी अनेक योजना अंमलात आणून आपले स्थान निर्माण केले आहे. उत्तम वक्तृत्व असलेला हसतमुख चेहरा सदा हसतमुख, उत्तम वक्तृत्व, शिकण्याची वृत्ती, भविष्याची नवी दृष्टी असणारा, क्रिएटिव्ह माईंड आणि कवीमनाचा माणूस म्हणून हे युवा नेतृत्व सध्या चर्चेत आहे, त्यांचा स्वभाव शांत असा आहे. कोणत्याही पाठबळाविना सद्दाम शेख यांनी घेतलेली भरारी नव्या पिढीला प्रेरणादायी आहे. त्यांनी तरुणांना कष्टाने पुढे जाण्याचा एक मार्गच दाखविला आहे. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी जिद्द, चिकाटी आणि कष्टाची तयारी असेल, तर कोणतीही गोष्ट अवघड नाही, याचे हे जिवंत उदाहरण म्हणजे सद्दाम शेख हे आहेत. स्वतःच्या क्षमतांवर त्यांना मोठा विश्वास आहे. आपल्या साऱ्या यशाचे श्रेय ते आई-वडिलांचे संस्कार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या व्यक्तीची साथ यांनाच असल्याचे ते सांगतात. यावेळी ते सांगतात, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस पक्षाला राजकारणात मुस्लिमांचा पक्ष असे संबोधले जात असले तरी मी एक मुस्लिम म्हणून एव्हढेच सांगेन, की जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत राहताना मी ना हिंदू, ना मुस्लिम, ना बौध्द, ना शीख आहे, त्यांच्या शिकवणीनुसार मी एक भारतीय आहे म्हणून आम्ही देशातील, सर्व प्रांतातील नागरिक हे एक भारतीय म्हणून त्यांच्यासोबत राहत आहोत. आज मुंब्रासारख्या भागात अनेक हिंदूंची, मुस्लिम बांधवांनी तसेच अनेक धर्मांच्या स्नेहबांधवांची प्रार्थनास्थळे उभी राहिली आहेत ती आमच्यासाठी आदरस्थान असलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्यामुळेच आहेत. गेले अनेक वर्षे आम्ही याठिकाणी राहतोय तेही सर्व धर्म समभाव या वृत्तीने राहतोय याचे खरे श्रेय हे आम्ही जितेंद्र आव्हाड यांनाच देत असल्याचे त्यांनी सांगितले. खरं तर मुंब्र्यासारख्या विभागाला बदनाम करण्याचे कारस्थान करणाऱ्यांना उघडे पाडण्याचे काम सद्दाम शेख यांच्या माध्यमातून दिसत आहे. ज्या ठिकाणी सर्व धर्म, प्रांत एकत्र नांदत असतात, त्याठिकाणी जाती जातीमध्ये भांडणे लावण्याचे काम जरी राजकीय पक्ष करीत असले तरी स्थानिक नेतृत्व करणारे युवा नेता सद्दाम शेख यांच्यासारखे कार्यकर्ते हे कदापी होवू न देता, आपला परिसर सुरक्षित कसा राहील याकडे लक्ष देत असतात. ऐन निवडणुकीच्या काळात अनेक प्रकारे दंगलीचे प्रकार घडविले जातात, त्यातच मुंब्रा हा भाग अती संवेदनशील म्हणून मानला जात असला तरी सद्दाम शेख यांच्यासारख्या युवा नेतृत्वाने या महाभयंकर घटना घडू नये, म्हणून “सारे जहाँ से अच्छा हिंदोस्था हमारा” चा नारा दिला असल्याचे आता पाहायला मिळत आहे. त्यामुळे सद्दाम शेख या युवा नेतृत्वाला सलाम !!! ००००